Skip to main content

जानकी पुनःवनवास ६६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६६
 
बंधूंशी चर्चा केल्यानन्तर प्रभुनी मंत्रीगण आणि मुख्य सेवक वर्गाला पाचारण केल. राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेऊन त्याबद्दल सेनापतीना महत्वपूर्ण सूचनां केल्या. लक्ष्मणा बरोबर पुढील रूपरेषा ठरवून, त्याच्याशी संपर्क करण्यास सेनापतीना सांगितल. 

प्रशासनाबाबत प्रमुख मंत्री सुमंत यांचेबरोबर भरतालाही बसवून त्यानी विस्तृतपणे विचारविनिमय केला. यात सेवकां मधील समन्वय, कार्यातिल सूसूत्रता आणि समाधान कारक संपर्क याचाही उहापोह केला.  भरताचा मंत्रीगणांबरोबर असलेले प्रदीर्घ सौहार्दाचे  संबंध याचा राज्याला उपयोग व्हावा हाच मुख्य हेतु यामागे होता. 

राज्या संबंधी व राज्यकारभाराच्या अनुशंगाने वाटणाऱ्या सर्व चिंता, समस्या व बारीक सारीक गोष्टीन्ची चर्चा व त्यावर समाधानकारक उत्तर मिळाल्यानान्तर एकांतात अचानक  प्रभुना ध्यानात आलं की, हनुमंताकडे आपण लक्षच दिले नाही आणि क़ाय चमत्कार त्याचे प्रभुनी स्मरण करताच साक्षात महारुद्र हनुमान समोर प्रकट झाला. भगवान स्मित मुद्रेने त्यास म्हणाले

" हनुमंता फक्त स्मरण करताच कसा उपस्थित झालास तेही त्वरित प्रकट."

"स्वामी कोणी साध्या सुध्या व्यक्तिने केलेलं स्मरण नाही हे. प्रत्यक्ष प्रभु श्रीराम यानी केलेल स्मरण आहे ते. जीवाच्या अंतरात पोहोचतो त्याचा नाद आणि तेही सर्व कामकाज उरकल्यानंतर पूर्ण झाल्यावर केलेल स्मरण. त्याची शक्ति अशी असते प्रभु की जीव जिथे असेल तिथून दौडत येतो. फक्त आपल्या स्मरण करण्यात विलंब होतो, कार्यव्यस्ततेमुळे."

" हनुमन्ता कार्यव्यस्तातेचा परिणाम तात्पुरता असतो. पण तुझ्यासारख्या भक्ताच स्मरण नित्य , निरंतर असतच असत. किंबहुना स्मरण तेंव्हाच कराव लागत ज्यावेळी जिवाला विस्मरण होत. तू तर सदैव या हॄदयात विराजमान आहेस. एक भक्त म्हणून आणि एक सखा म्हणून. तुझ्या सारख्या भक्ताला मी नित्य स्थित करतो माझ्या हॄदयात." 

" प्रभु हा माझाच सन्मान आहे की आपण त्यालायक मला समजता. पण एक प्रश्न आहे. अनुमति असेल तर पृच्छा करीन." 

"अवश्य विचार. शंका येण आणि प्रश्न येण यात प्रश्न केंव्हाही श्रेष्ठ. कारण प्रश्न जिज्ञासे पोटी येतो. शंका ही अविश्वासापोटी जन्म घेतो. म्हणून अवश्य विचार "

आपण कोणालाही नित्य स्मरणात ठेवता की त्यात काही कसोट्या आहेत, ज्यायोगे जीव आपल्या स्मरणात असेल वा आपण त्याचे स्मरण कराल. कृपानिधान सविस्तर सांगावे." 

" ऐक तर. आत्मा  ज्यावेळी परमात्म्या पासून विभागला जाऊन अन्तरिक्षात येतो, त्याचा मजप्रत येण्याचा प्रवास ख़र तर तिथेच सुरु होतो. किंबहुना तोच त्याचा अंतिम टप्पा असतो. पण असा आत्मा जेंव्हा पंचमहाभूतधारी देह धारण करतो त्यावेळी त्या जड़ादेहात आल्यावर आत्माला विसर पडतो की कोठुन आलो आणि इथेच भटकन्तिला सुरवात होते. इथे एक लक्षात घे की जददेह धारण केल्याशिवाय उद्धार नाही. असा जड़देही जीव संसार सागराच्या प्रवाहात हरवून पतित होतो. कर्मेन्द्रिय त्याला कर्मरत ठेवतात. या देहाला सहा शत्रु  काम, क्रोध  आदि घेराव घालतात. बर यांच् वैशिष्टय हे की एकावर विजय मिळवला की दूसरा समोर येऊन प्रकट होतो. यांचा जन्मच मुळात जडदेहधारी जीवात्म्याला कर्मात, पापपुण्याच्या कोषात अडकवून कार्यरत ठेवून जन्ममृत्युच्या चक्रात विवंचित ठेवण. असा जीव मग अनेक युगे व अनेक जन्म त्याच कर्मफल श्रुंखलेचा धनी होतो. तुझा प्रश्न आहे की
मी कोणाला नित्य स्मरणात ठेवतो. वत्सा मला सर्व आत्मअंश एकसमान प्रिय आहेत. माझ्या स्मरणात सदैव सर्व आहेत आणि असतात. प्रश्न माझ स्मरण त्यांच्यां प्रति पोचण्याचा आहे. तोच आत्मअंश माझ स्मरण जाणु शकेल जो नित्य माझ्या स्मरणात राहिलं.  त्यालाच माझ्या स्मरणाचा ध्वनी प्राप्त होईल. तोच आत्म्या कृतकृत्य होऊ शकेल. अजातशत्रुचा खरा आध्यात्मिक अर्थ ज्याने सहाही शत्रुनवर विजय मिळवला आहे. किंबहुना ज्याला या शत्रुंचा स्पर्श होऊ शकत नाही. हे त्यालाच शक्य आहे, जो सदैव  माझे स्मरण करेल. मग तो देहाच्या कोणत्याही अवस्थेत असेल तरीही त्याला त्या कर्माचे बंधन पडणाऱ नाही जो माझ्या नामाच्या सदैव सांनिध्यात असेल. यांच् कारणास्तव रावण हा विरुद्ध भक्ति रूपाने तारला गेला आणि अंति मोक्षपदाला पोहोचला. " 

" देवा इथे एक शंका आहे, हो शंकाच."

" शंका मनातून बाहेर काढ़ आणि मन स्वच्छ कर. बोल वत्सा बोल." 

 ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...