ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ४८
भरत अतिथि गृहाकडे जात असताना प्रभु श्रीराम आणि भ्राता लक्ष्मण माता कौसल्या, कैकई आणि सुमित्रा यांच्या महालाच्या दिशेने प्रस्थान करतात. प्रभु लक्ष्मणाला विचारतात
"लक्ष्मणा तू माता कैकईकड़े जाऊन राज्याभिषेकाबाबत विचारुन घे आणि मी माता कौसल्या व माता सुमित्रा यांच्या महालाकडे मी जाऊन येतो."
यावर लक्ष्मण त्वरेने प्रतिसाद देतो
" ज्येष्ठ भ्राता क्षमस्व आपण माता कैकईच्या महाली जावं. मी .........."
"लक्ष्मणा अरे तू अजूनही त्याच ठिकाणी अडकलायस. मला वाटल की तू आतापर्यंत सर्व विसरून गेला असशील. चूक माझीच आहे, मी तुझ्याशी या विषयावर कधी चर्चा केली नाही."
" नाही भ्राताश्री आपली चूक नाही काही या सर्वात. आपणही यात भरडले गेलो होतो आणि ते ज्या एका व्यक्तिमुळे घडलय , ती व्यक्ति, ती व्यथा, ती आग , तो अपमान मन कधीच विसरु शकत नाही. किंबहुना इतकी मोठी गोष्ट मी मनातून काढून टाकू शकत नाही, काढून टाकू शकलो नाही"
" पण लक्ष्मणा या आधी तू यावर क्रोधायमान झाला हातास ,पण मी तुला तेंव्हाही समजावल होत की, यामध्ये मातेचा सहभाग असलाच तर तो आपल्या दृष्टीने सकारात्मक असेल. काळाने तर तेच सिद्ध केलय. आता तरी तुझा दुराग्रह सोडून दे. क़ाय योग्य आणि क़ाय अयोग्य हे काळ ठरवतो आणि काळाला त्याच कर्म करू द्याव. हे सम्पूर्ण जीवन हा क्रिया व प्रतिक्रियांचा एक प्रवाह आहे. अतिरिक्त आणि अहितकारक प्रतिक्रियानी आपण चुकीच्या कर्माची साखळी तयार करतो आणि मग त्याच्या कर्मफल मालिकेत , पुढचे जन्म मृत्यु हे त्यात व्यर्थ वाया घालवतो."
" भ्राताश्री आपल म्हणण सत्य आहे"
" लक्ष्मणा हेच जगतातील अंतिम सत्य आहे. कर्मफल मालिका सुधारा पुढील सर्व सुलभ होईल."
"भ्राताश्री आपल्या आज्ञेनुसार मी माता कैकईच्या महाली जाऊन त्यांच्याशी आपल्या राज्याभिषेकाविषयी बोलून सहमति घेऊन येतो."
" लक्ष्मणा तू राज्याभिषेकावर मातेच क़ाय मत आहे आणि त्यांची क़ाय मनीषा आहे, फक्त हेच जाणून घेण्याचा यत्न कर"
" जशी आपली इच्छा"
अस म्हणून लक्ष्मण माता कैकईच्या महालाच्या दिशेने व स्वतः प्रभु माता कौसल्या व माता सुमित्रा यांच्या महालाच्या दिशेने मार्गक्रमण करतात.
भ्राता लक्ष्मण कैकईच्या महालात पोचतो. आत निरोप जातो.
दासी मातेला
"महाराणी, भ्राता लक्ष्मण येत आहेत आज्ञा असावी "
माता कैकई एक क्षण विचारमग्न होतात, परंतु लगेच
" ठीक आहे पाठवून दे"
"जशी आज्ञा " अस म्हणून दासी निघुन जाते .
लक्ष्मण महालात प्रवेश करून अन्तःपुरात येऊन मातेसमोर उभा राहतो, आणि मातेला मस्तक चरणावर ठेवून नमस्कार करतो. माता त्याला आशीर्वाद देते.
" दीर्घायु भव, यशस्वी भव "
भ्राता लक्ष्मण विचारतो
" माते कशी आहेस. भ्राता भरत आपल्यास भेटून गेला असेल. आता आपण उभयता सकुशल असाल हे नककीच. पण ते माते तुझ्या मुख़ातून एकण्याची इच्छा आहे."
" लक्ष्मणा किती वर्षानी भेट होते आपली."
" होय माते चौदा वर्षानी"
"हो आणि हे सर्व माझ्या मुळे घडलय हे मी जाणुन आहे"
" माते नको आता ते सर्व . ख़र तर माझीही चूक झाली आल्या आल्या तुझ्या भेटिस आलो नाही. मनात किलमिष होत , पण ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्याशी बोलून माझहि मन आता हलक झालय. आपण सुद्धा ते सर्व विसरून जाव. आपल्या साऱ्यांच्या हिताचेच आहे ते."
"अगदी माझ्या रामासारख बोललास. ऐकून आनंद झाला आणि चिंता मिटली."
" चिंता कसली चिता माते "
कैकई यावर म्हणते
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment