ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ५९
प्रभुनी या प्रणामाचा स्वीकार केला आणि ते पुढे गेले, जिथे राजा सुग्रीव उभे होता. त्याना प्रभुनी आधी नमन करून मग आलिंगन देऊन गळाभेट घेतली आणि प्रभु वदले
" राजा सुग्रीव "
"प्रभु आपल्यासाठी फक्त आणि फक्त सुग्रीव. राजा तर किष्किंधेचा मीही नन्तर झालो आणि आपणसुद्धा अयोध्यानरेश नन्तर झालात. पण मी रिक्तहस्त असताना फक्त माझ्या सेनापतिच्या हनुमंताच्या शब्दान्वर विश्वासुन तुम्ही मला सखा मानलत आणि मला धन्य केलेत. "
सुग्रीवा अरे मीच ज्यावेळी द्विधा मनस्थितित आणि जानकीला गमवून तिच्या शोधार्त विमनस्क स्थितीत असताना तू अगदी प्रत्यक्ष देवासारखा धावून आलास . सुग्रीवा अरे त्याच मोल म्हणून शतजन्म तुझा ऋणी राहीन आणि शतजन्म मी त्यासाठी उपकृत असेन."
"प्रभु उपकार ह्या शब्दाने आपण आमच मोल तोलू नये. इतकं मोठ काही केलय अस आम्हाला कोणालाही वाटत नाही. किंबहुना आम्हा लोकांची ती परंपरा आहे. जेंव्हा एखाद्याला आपल मानल की प्रत्यक्ष प्राणसुद्धा आम्ही त्यागुन दिलेला शब्द पूरा करू. प्रभु आणि आपण जे माझ्यासाठी वैयक्तिक व किष्किंधा नगरीसाठी केलय त्याचे उपकार हे अनंत जन्मापर्यंत मी परत फेडू इच्छीत नाही"
"अर्थात"
" अर्थात तितके जन्म आपण आमचे सखे म्हणून पुन्हा पुन्हा येत रहाल आणि आम्ही आपल्या दर्शनमात्रे धन्य धन्य होत राहु"
अस म्हणून प्रभुनी पुन्हा सुग्रीवलां दीर्घ आलिंगन दिल आणि ते वळले लंकानरेश विभिषणाकड़े. इथे प्रभु बराच वेळ विभिषणाच्या नजरेत न्याहाळून बघत होते. यावर विभीषण म्हणतो
" प्रभु क़ाय पाहात आहात"
" तुझ्या माझ्यावरील स्नेहाला क़ाय उपमा द्यावी यांच विचारात आहे मी. त्यासाठी शब्द जमा करत होतो."
विभिषणाने यावर साश्रु नयनानी प्रभुना पाहिल. प्रभु पुढे म्हणाले
"इतकि माया प्रत्यक्ष शत्रुवर केलीस विभिषणा तू"
प्रभुना मधेच अडवून विभीषण म्हणाला
"प्रभु शत्रु आणि मित्र याचा निर्णय फक्त काही गोष्टीनवरुन करता येतो जो मी केला"
" कोणत्या गोष्टी विभिषणा " प्रभुनी पृच्छा केली
विभीषण किंचित स्मित करून म्हणाला
" प्रभु हा निर्णय खरतर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकवेळा येतो. पण कधी कधी हा निर्णय सहज सोप्पा नसतो. कारण तो कदाचित स्वकियांविरुद्ध जाण्याप्रत असु शकतो. अश्या संघर्षाच्या समयी मी या बाबी विचारात घेतल्या की
१. धर्म कोणत्या बाजूने आहे
२. सत्य कोणत्या बाजूला आहे
३. सारासार विवेक क़ाय दिशा दाखवतो
४. निर्णय घेतल्यावर आपला अंतरात्मा आपली साथ देईल
का नाही.
प्रभु इथे मला भ्राता कुम्भकर्णाचे शेवटचे शब्द आठवतात . भ्राता कुंभकर्ण जाणत होते की धर्म आणि सत्य प्रभुंच्या बाजूने आहे. म्हणून शेवटची विनंती त्यानी ज्येष्ठ भ्राता दशानन याना केली की अजूनही वेळ गेली नाही, आपण श्रीरामांना शरण जाऊन त्यांच्या धर्मपत्नी सीतेला माघारी पाठवावे आणि समेट घडवून आणावा. पण त्यानी ऐकल नाही आणि पुढच युद्ध घड़लच. त्यावेळीच मला या गोष्टीची कल्पना आली की आपल्याला या दोन गोष्टीतुन एक निवडायची आहे. निर्णय अवघड़ नव्हता पण सहज सुद्धा नव्हता. मी धर्माची आणि सत्याची वाट चाललो. आपण आपल्या वचनाला जगलात प्रभु. तू सत्य आणि धर्म या वाटेवर पाऊल टाक त्यानन्तर तुझी जबाबदारी माझीच. आपण आपला शब्द खरा केलात प्रभु. म्हणूनच मी आपली साथ देऊ शकलो. "
विभिषणासह सुग्रीव , अंगद, या सर्वांचेच लोचन भरून आले.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment