Skip to main content

जानकी पुनःवनवास ५४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५४ रामराज्याभिषेक पूर्वपीठिका

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा साडेतीन मुहूर्तातील प्रथम मुहूर्त, आणि सदभाग्य दिन. एखाद्या दिवसाच भाग्य  इतकं थोर युगानुयुगात एकदाच असत.  ब्राम्हमुहूर्ताला महर्षि वसिष्ठ ब्रम्हवृंदासह अतिथिगृहावरून मुख्य सभागृहाकडे येण्यास निघाले. प्रजाजन सम्पूर्ण रात्र निजले नाहीत. रास्तों रस्ती मार्गामार्गात, मार्गीकेत जिथे जागा असेल तिथे माणसांचे तांडे निघालेत राजगृहाकडे.

घरोघरी सडासारवण काढून ललना रांगोळ्या काढण्यात मग्न आहेत. विविध रंगात, नाक्षीदार, वेलबुट्टीदार, अनेक आकाराच्या , सुंदर नाजुक व भव्य रांगोळ्यानी अयोध्येतील प्रत्येक घर सजल आहे , सजवल जात आहे. घरांना नवीन रंगकाम करून झालय. गूढया , तोरण, पताका यांचा साज घरांना , चौका चौकात, नगरा नगरात चढवला जात आहे.  सर्व सजावट अगदी उत्कृष्ट असेल याची जाणकार मंडळी खास काळजी घेत आहेत. मुळातच स्वर्गाला हेवा वाटावा अशी नगरी म्हणजे अयोध्या आणि त्यात इतक्या सजावटीनन्तर तिची शोभा ब्रम्हांडातील उत्तम सजावट अशीच झाली होती.

सम्पूर्ण अयोध्येत वसंतोत्सव सुरु झाला आहे.  आम्रव्रुक्षांच्या बागा , गुलमोहराची झाड़, प्राजक्ताच्या सड्यानी न्हाऊन निघालेले मार्ग, अनेक तर्हेच्या रंगीत व बहुगंधित फुलानी सजलेले बाग़बग़ीचे, फूल , वेण्या, गजरे व नवनवीन वस्त्र आणि त्यावर अत्युत्तम अलंकार यानी साजश्रृंगारित समस्त ललना, अयोध्येतील नयनरम्य उद्यानात विहार करणारे मयूर, हंस आदि राजस पक्षीगण, वसंताच्या आगमनाने कंठ फुटलेले कोकिलादि पक्षी, आम्रलता मंजिऱ्या लावून सजलेली अयोध्या ही शोभा निव्वळ अवर्णनीय आणि शब्दाना न साधणारी अशीच आहे. म्हणून स्वये देवी श्रीशारदा आणि शब्दरत्नसागर श्रीगणेश आश्चर्यमुद्रेने लोचनात हे दृश्य साठवून  घेण्यास साक्षी आहेत.

स्वर्गाधिपति इंद्र , अष्टवरूण , यक्ष , गन्धर्व गानसाधनेसाठी सज्ज होते. अप्सरांचे नृत्यविष्कार करण्याआधीचे संस्कार सुरु होते. ब्रम्हालोकातुन ब्रम्हा, कैलासाहुन कैलासेश्वर आणि देवी पार्वती पुत्र गणेश आणि षडानन यांसह आगमन करते झालेत. आकाशस्थित सहस्त्ररष्मी उदयोस्तु होण्यास आतुर झाला आहे. तर प्रतिपदेचा रुप्यवर्णी चंद्रमा गमनास अनुत्सुक आहे.

त्याच वेळी सप्तऋषि नारद गरुड़, ग्रह , तारे  आपापल्या भौगोलिक  स्थानात स्थिर राहून या महामहोत्सवाचे साक्षी होऊ इच्छित होते. या सर्वांवर कड़ी म्हणजे प्रत्यक्ष काळ या पर्वाचा आनंद लुटण्यास काही पळे थांबु इच्छीत आहे.

तो महामहोत्सव म्हणजेच प्रभु श्रीरामचंद्र यांचा राज्याभिषेक

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...