Skip to main content

जानकी पुनःवनवास ६५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६५

सर्व अतिथि निजधामी पोहोचते झाले आणि प्रभु, राज्य कारभारात व्यग्र होऊ लागले. रामराज्याची घड़ी नीट बसावी या दृष्टीने , काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दृष्टीने, तसेच आतापर्यंत भरताने चौदा वर्ष चालवलेला राज्यकारभार पाहण्याच्या दृष्टीने व राज्यकारभाची सुत्रे  पूर्णपणे हाती घेण्याच्या दृष्टीने प्रभुनी प्रथम आपल्या तिन्ही बंधूंना एकत्र बोलावून प्रदीर्घ चर्चा केली.

" भरता तुझ्या चौदा वर्षान्च्या कार्यकालातून  तुला जो काही
अनुभव प्राप्त झाला आहे त्याचा अयोध्येला निश्चित उपयोग होऊ शकतो. तुझ्या या अनुभवाचा मी नककीच आदर करतो आणि काही महत्वपूर्ण सूचनां तसेच काही त्रुटि ज्या कदाचित तुझ्या नजरेस आल्या असतील, पण मनुष्यबळा अभावी ज्या तुला सुधारित करता आल्या नसतील, त्याबद्दल तू आम्हा सर्वाना मार्गदर्शन करावस. कारण त्यावेळी तू एकटा होतास. तात गेले त्याच आणि आमचा वीरह याचहि दुःख तुझ्या पदरी होत. पण आज आपण चौघे आहोत. माझ्या हाताशी मदतीला तुम्हीसुद्धा आहात. म्हणूनच तुझा अनुभव आणि तुमची साथ यावर आपण अयोध्येच्या राज्यकारभार, प्रशासन, संरक्षण, प्रजाहित व राज्यविस्तार सुसूत्रपणे , नियोजनबद्ध पद्धतीने सुनिश्चित करू शकतो. याचा मला विश्वास आहे, नव्हे दृढ़विश्वास आहे."

यावर भरताने आपल्या चौदा वर्षातील महत्वपूर्ण निर्णय, बारीक सारिक गोष्टिंचा तपशील सर्व विस्तृतपणे कथन केल. भरताला बोलताना प्रभु कौतुकाने भरताकडे बघत होते. हाच तो भरत जो लहानपणी प्रभुंच्या मागे मागे असायचा. दिवस सुरु होताना आणि संपताना सुद्धा  ज्येष्ठ भ्राता त्याला समोर हवे असायचे.  भरताच्या कथनाकडे लक्ष देतानाच अष्टावधानी असलेल्या प्रभुंच्या मनातला ज्येष्ठ भ्राता कौतुकाने भरताकडे पहात होता. भरताला कौतुकाने न्याहाळत होता. अश्या मनस्थितित सुद्धा भरताने,माझ्या भरताने, कोणत्याही छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल नव्हत. अगदी योजनाबद्धरित्या सर्व कारभार सांभाळला होता. बरोबर अर्थातच प्रामाणिक, कर्तव्यपरायण, कार्यकुशल मंत्रीगण व सेवकवर्ग होताच. पण अश्या सर्वकवर्ग व मंत्रीगणाला सतत कार्यरत ठेवून उत्तम कार्य करून घेण व प्रोत्साहित करण हेच एका उत्तम प्रशासकाच कार्य असत, जे भरताने उत्तमरीत्या पार पाडलय. हेच त्याच्या एकूण कथनावरुन दिसत होत.

भरताच कथन चालू असतानाचा प्रभुंच्या डोळ्यातील भाव भरताने ओळखले. आपल्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना आपल कार्य पसंत पडतय याचाच अर्थ आपण त्यांच्यां पादुकांचा उचित सन्मान करू शकलो, या भावनेने भरताला बोलता बोलता गहिवरुन आल.  प्रभुनी ते ओळखल. ते म्हणाले.

" भरता अरे किती उत्तमरीत्या पार पाड़लस तू उत्तरदायित्व. तेही आम्ही कोणीही नाही, तातही गेलेले, मातेवरचा तुझा क्रोध अश्या मनःस्थितित केलेल हे कार्य नककीच स्तुत्य आहे. ज्येष्ठ भ्राता म्हणून मला तुझा सार्थ अभिमान आहे. तुझ्या या अनुभवाचा व उच्च बुद्धिमत्तेचा आपण पूर्ण क्षमतेने सदुपयोग करून घेऊ."

"ज्येष्ठ भ्राता आपण अकारण मला श्रेय देत आहात. हा आपल्या पादुकांचा परिणाम ज्यायोगे हे सर्व साध्य होऊ शकले."

"भरता हा तुझा विनय आहे की तुला कार्याचे श्रेय घेऊ इच्छीत नाहीस आणि याचा देखील मला अभिमान आहे की, तू रघुकुलाच्या परंपरेला जागलास आणि तातांच्या अनुपस्थितिमुळेदेखील, एकाही शत्रुला जरासुद्धा ग़ैरफ़ायदा घेऊ दिला नाहीस. यास्तव मी प्रशासनाची पूर्ण जबाबदारी तुला देत आहे. "

अस म्हणून प्रभुनी उत्तिष्ठ होत भरताला सस्नेह आलिंगन दिल. या निर्णयाने सर्व बन्धु पुन्हा एकदा संतोष पावले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...