Skip to main content

जानकी पुनःवनवास ५३

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५३

सभेला जमलेल्या प्रत्येकाच्या नेत्रकडा नकळत पाणावल्या.  स्वये प्रभु साश्रु नयनानी गुरुंसह सर्वाना अभिवादन करत होते. प्रभु उभयता, माता कौसल्येसमीप गेले. मातेचे नेत्र अखंड आनंदाश्रुयुक्त आणि मन गगनात न मावणाऱ्या हर्षाने प्रभारित झाल. शब्द आपलीच जागा विसरून आज ओठांवर यावयास देखील तयार नव्हते. कारण देवी शारदा सुद्धा भारावली आहे. शत शत जन्मात जी गोष्ट कल्पनेत सुद्धा मांडण्यास मिळत नाही तीच आज प्रत्यक्षात साकार होण्या समीप आली आहे. त्रेतायुगाचा देखील भाव सद्गतित झाला आहे. तर प्रत्यक्ष मातेची अवस्था वर्णनाने सांगण कळिकाळालाही अशक्य आहे,आज.

समस्त सभागार भारावलेल्या अवस्थेप्रत पोहोचलय. प्रत्येक उपस्थित उत्सुक आहे सभा समाप्त व्हावी या साठी. कारण प्रत्येकाला अस झाल आहे की कधी एकदा हा समाचार आप्त, स्वकीय यांसह सर्व आयोध्येला सांगीन मी.  सभागारातून प्रथम  कुलगुरु, राम व माता कौसल्ये समीप येऊन शुभेच्छा व शुभाशीष देऊन निघण्यासाठी अनुमति मागून म्हणाले

" आम्हास अनुमति द्यावी. आम्ही अतिथिगृही परतून अभिषेकाची व त्यानिमित्ताने करावयाच्या विधिवत पूजा व यज्ञ यागादी कार्यक्रमाची पूर्व तयारी सुरु करतो. आम्हास काही सेवकवर्ग नेमुन द्यावा. त्यांच्यामार्फ़त आम्ही सर्व शिधासामग्रि व यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व जिन्नसांची तयारी करून घेतो. प्रतिपदेला ठिक ब्राम्हमुहूर्त समयी आम्ही राजगृहाच्या मुख्य सभागृहात उपस्थित असु. रामा तू सपत्नीक सर्व आप्त स्वकीय यांसह ब्राम्हमुहर्ती इथे उपस्थित राहावस. "

अस म्हणून गुरुदेव जानकीकडे पाहुन वदले

" आज्ञा असावी महाराज्ञी "

आणि पुनःश्च सभागार अनेक जयजयकारी घोषणानी दुमदुमुन गेल.

सर्व हर्षोल्हासात हनुमंत पुढे होऊन कुलगुरुंच्या चरणी लीन झाला. तदनन्तर कुलुगुरु महर्षि वसिष्ठ यानी प्रस्थान ठेवल. हनुमंत पुन्हा पुढे होऊन साश्रु नयनानी प्रभु श्रीराम आणि देवी महाराज्ञी जानकी यांना नमन करते झाले. प्रभुनी हनुमंताला आलिंगन दिल. दोघांचेही ओठ शब्द बोलण्यास असमर्थ आहेत. पण नेत्रातून वाहणाऱ्या उष्ण धारानी एकमेकांच्या खांद्यावर गुज या हॄदयिचे त्या हॄदयी पोहोचते केले. तदुपरांत भ्राता भरत, लक्ष्मण शत्रुघ्न यांच्यासह सर्व मंडळी प्रभुना आणि राज्ञी जानकी या उभयताना वंदन करून शुभेच्छा सादर करते झाले. भ्राता भरताला राज्याभिषेकाच यजमानपद कुलगुरुनी दिलेल असल्यामुळे भ्राता भरताने या सभेचा समारोप केल्याची औपचारिक घोषणा केली. सर्व मंडळी सभागृहातून बाहेर पडली मात्र ......

या भारावलेल्या वातावरणाचा आनंद दशदिशा आणि त्रिभुवनीं वाऱ्याच्याहि वेगाने सर्वत्र पसरला. भारावलेला सेवकवर्ग कमी अवधी हाती असल्याचे जाणून आपलेच नव्हे तर, इतर अनेक जणांचे काम आपणहुन आणि जलद गतीने करू लागला आहे. बघता बघता सम्पूर्ण आयोध्येला या वार्तेचा सुगंध पोहोचला . आणि अयोध्ये समान असलेल्या स्वर्गात प्रत्यक्ष इंद्रादि देव, अष्टवरूण, सुरवर, गन्धर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा, नारद, गरुड यांसह ब्रम्हलोकि स्वये सरस्वती सह  ब्रम्हा, कैलासावर गिरिजेसह प्रत्यक्ष पशुपतेश्वर , गजानन, तिन्ही लोक आणि सम्पूर्ण  ब्रम्हांड या सोहळयासाठी आतुर झाले.

अयोध्येत तर घरोघरी या सोहळयात सामिल होण्यासाठी नव नवीन वस्त्रालंकार घेण्याची चढाओढ सुरु झाली. प्रत्येक गृह आपल्या घरीच समारंभ असल्याप्रमाणे घर सजवण्याच्या कामाला लागला. प्रत्येक घराला रंग चढू लागला. गूढया , तोरण , पताका, माळा, विविध प्रकारची फूल, हार, वेण्या यांची लगबग सुरु झाली. अयोध्येतील दिव्यांच्या रोषणाईने प्रत्यक्ष रवीराजा चकित झाला की, माझ्या मावळण्यानन्तर सुद्धा तितकाच तेजोमय प्रकाश कसा क़ाय. त्याच्याही ध्यानी ही सुवार्ता आली आणि त्याच्याही मनात प्रथमच विचार आला कधी एकदा ही रात्र संपून प्रतिपदेचा दिवस उगावतोय आणि भर चैत्रातली ती सकाळ मी सुवर्णमय करतोय.  दशादिशाना फिरणारा वाऱ्याला आज अयोध्येत थांबण्याची अनुमति हवी होती. इंद्रदेव यावर प्रश्नांकित झाले होते.

सृष्टिच्या विधात्याने घालुन दिलेल्या नियमाना बाधा येईल अशी अनुमति कशी द्यावी.  पण तरीही त्यानी पवन देवांसह सर्वाना विनंती केली की आपण प्रार्थना करूया की समस्तास हा नयनरम्य व देवदुर्लभ सोहळा पहाता यावा.

इकडे सृष्टिसह देवी वसुंधरा व निसर्गराजासुद्धा अति आनंदित झाला. कारण हा अद्भुत सोहळा ऋतुराजाच्या पर्वात म्हणजेच वसंत ऋतुमधे पार पडणार आहे. वसुंधरेला निसर्गाने अनेकविध रंगांच्या पुष्पासह, लता व पानानी जणू सिशोभित केल आहे आणि जाई, जुई, चंपा, बकुळ, प्राजक्त, नागवेली, मोगरा, केवड़ा, गुलमोहर, गुलबकावली, गुलाब अश्याच अनेक प्रकारच्या अष्टगंधित व बहुविध पुष्पांच्या नवनवीन पालव्यानी नटून वसुंधरा या सोहळयासाठी सज्ज झाली आहे.

आणि सर्व चराचराच लक्ष लागलय चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या ब्राम्हमुहूर्ताकडे. आणि सर्व तयारी करता करता तो दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला. अयोध्येसह मुख्य सभागार सजून तयार आहे त्यासाठी , कारण

प्रभु श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक अगदी उद्याच

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...