Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

भोग आणि ईश्वर ४८७

भोग आणि ईश्वर  ४८७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  कोणतीही चल वा अस्थिर गोष्ट,वस्तू वा शक्ती, नियंत्रित करण्यासाठी, एखादी अचल, स्थिर आणि तितकीच किंवा त्याहून जास्त शक्तीची गरज असते, हे तर वैज्ञानिक सत्य आहे. जसं एखादा ताकदवान वळू वा बैल किंवा घोडा बांधण्यासाठी, तितकाच मजबूत आणि घट्ट रोवलेला, अर्थात स्थिर असलेला खुंटा लागतो, हे तर सत्य आहे.त्याचप्रमाणे अस्थिर,अविवेकी आणि अकस्मात क्षणात  माया मोह, लोभ मत्सर दुःख या अनेक भावात लुप्त होणाऱ्या, वायुगतीने चल असणाऱ्या  मनाला बांधणं, हे महाकर्मकठीण काम आहे.  भले भले आयुष्य घालवूनही हे जमवू शकतील याची खात्री देणार नाहीत. त्यामुळे अश्या मनाला स्थिर करणं जमेल याची शक्यता नाही. त्यातही आपण हे जाणतो आणि अनुभवतो की, मनात अपार शक्ती आणि ऊर्जा आहे. ते पाऱ्यासमान आहे. म्हणजे नियंत्रित करायला गेल्यावर तितक्याच वेगात व कल्पना तीतपणे कधी निसटून जाईल, हे सांगता येणार नाही. म्हणजे नियंत्रणाच्या नुसत्या कल्पनेने आधीच अस्थिर असलेलं मन, ...

भोग आणि ईश्वर ४८६

भोग आणि ईश्वर  ४८६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  कर्माचं फलरूप परिवर्तन, आपल्या भोवती घडणाऱ्या घटना, या सर्वातून मनात जागृत होणारा भाव, हा सर्वस्वी व्यक्तीसापेक्ष आहे.प्रत्येकाचं कर्म हे,त्याच्यासोबत असतं. जिथे एकत्र कर्मफल भोगण्याची वेळ येते वा काळ येतो, तिथे त्या त्या व्यक्ती एकत्र येऊन, तितकाच काळ, एकत्र असतात. त्यांचं नातं कोणतंही असो. पण म्हणजे सर्व काही व्यक्तिगत आणि व्यक्ती सापेक्ष आहे, हे नक्कीच. म्हणजे आनंद, दुःख, क्रोध, कारुण्य, मोह, माया, हेसुद्धा व्यक्तिगत आहे किंवा असणार.  याचं एक साधं प्रातिनिधिक उदाहरण घेऊया. एकच प्रसंग अनेक जणांच्या समोर घडतो, एखादा, त्यावेळी, क्रोधीत होतो, एखादा, सामान्य पणे प्रतिक्रिया देतो, एखादा आपला काही संबंध नसल्याने तिथून काहीच प्रतिक्रिया न देता निघून हातो. म्हणजे एकच प्रसंग तिघांच्या मनात वेगवेगळे भाव निर्माण करतो. याचाच अर्थ प्रत्येक क्षणी घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल घेऊन मन भाव निर्माण करतं. पण हा भाव त्या घटनेने निर्माण झाला...

भोग आणि ईश्वर ४८५

भोग आणि ईश्वर  ४८५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  आयुष्यात खरं स्मरण तेच जे आनंद देतं. आता आनंद हा भाव पुन्हा, मनाचा गुण आहे आणि तो व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूत, गोष्टीत वा आठवणीत एखाद्याला आनंद मिळेल, त्यात दुसऱ्याला मिळेलच असं नाही.  कारण प्रत्येकाचा भाव, स्वभाव, मानसिकता, आनंदाची व्याख्या, दृष्टी आणि दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि असणारच. म्हणजेच जो आनंद आपण प्राप्त करतो तो वस्तूंवर वा त्या क्षणांवर किंवा इतर कशावरही अवलंबून नसतो, तर तो आपल्या आतील मनावर आणि देहाच्या अवस्थेवर व स्थितीवर अवलंबून असतो.  एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीला साधं घड्याळ वा साधी पाच, दहा लाखांपर्यंतची गाडी आनंद नक्कीच देणार नाही. पण तीच गाडी एखाद्या मध्यम आर्थिक स्थितीतील व्यक्तीला आनंद देईल.म्हणजेच वस्तू।तीच पण आनंदाची भावना वेगवेगळी आहे. कारण त्याच्या सांपत्तिक स्थिती मुळे, त्याच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. म्हणजेच तो आनंद दीर्घकाळ वा चिरकाल टिकणारा अर्थात शाश्वत नसतो, हे निःसंशय...

भोग आणि ईश्वर ४८४

भोग आणि ईश्वर  ४८४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  स्मरण आणि विस्मरण या मनाच्या दोन बाजू आहेत. मेंदूतील पेशीत त्या आठवणी, ते नाम हे साठवलेलं असतं. त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण, ही समस्या असू शकते. आपण एखादी, विसरण्या योग्य गोष्ट, आठवण किंवा वस्तू असेल तर, ती कुठेतरी लिहून किंवा आठवणीत राहावी म्हणून काहीतरी सोय करतो. याचं कारण म्हणजे, ती गोष्ट, ते कर्म, हे तितकंच महत्वाचं असतं.  किंवा महत्वाचं असेल, त्याच गोष्टींचं आपण अश्याप्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये, त्या कर्माची वेळ येईपर्यंत आपण तिला आठवत राहतो किंवा आठवण येईल, यासाठीचे वेगळे खास प्रयत्न करतो.  यातून हे सिद्ध होतं की, जी गोष्ट आपल्याला महत्वाची असेल,ती गोष्ट, ते कर्म वा ती आठवण, आपण न विसरण्यासाठी सर्व करतो. अगदी आताच्या काळात, reminder लावून, अँप्स वगैरेंचा वापर करून, आपला हेतू साध्य होईल हे पाहतो.  असच एक अँप देह निर्मिती करतेवेळी, ईश्वराने स्थापित करून मानवाला, या देहात धाडलं आहे. ते reminde...

भोग आणि ईश्वर ४८३

भोग आणि ईश्वर  ४८३   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  कालचाच विषय पुढे नेऊया. त्याच्या फक्त स्मरणाने, जन्म आणि संसारातील सर्व बंधनं यांपासून तो विमोचित करतो अर्थात सोडवणूक करतो किंवा मुक्तता करतो. परंतु फक्त स्मरणाने इतक्या गोष्टी कश्या शक्य आहेत, असा एक सर्वसामान्य प्रश्न नक्कीच पडू शकतो. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे, आपण मर्त्य जगात राहात असल्यामुळे, आपण प्रचितीवर जास्त विसंबून असतो किंवा विश्वास ठेवतो. मर्त्य जगतातील गोष्टींसाठी हे योग्यच आहे. न्यायव्यवस्थासुद्धा पुरावा अर्थात substantiation वर अवलंबून असते, जे योग्य आहे.  आपण एक उदाहरण घेऊया. आपण एखाद्या चांगल्या, सुवासिक फुलाचं वा धुपाचं किंवा अत्तर इत्यादींचं स्मरण केल्यास, आपल्याला, त्या सुगंधाची आठवण येऊन, मनात आपण त्या सुगंधाचा प्रत्यय घेऊ शकतो आणि त्याने मन प्रसन्न होऊन, शुद्ध होतं. म्हणजे हे फक्त स्मरणाने साधलेलं कार्य आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्मरणाने, ती व्यक्ती आपल्या मन पटलावर उभी राहते आणि कल्पनेत...

भोग आणि ईश्वर ४८२

भोग आणि ईश्वर  ४८२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल आपण स्मरणाबद्दल बोलत होतो. त्याच संदर्भात एक श्लोक आठवतो.  यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।  विष्णूसहस्त्रनामात महाविष्णूंच्या स्मरणाच्या संदर्भात, त्यांच्या स्मरणाचं महत्व अधोरेखित करताना हा श्लोक येतो. वास्तविक हा श्लोक जरी, एक श्लोक म्हणून येत असला तरीही, माझ्या मते, ईश्वरस्मरणसंदर्भात हा श्लोक एका पूर्णरुप मंत्राप्रमाणे आहे.  त्याचं कारण आपण उद्याच्या भागात जाणून घेऊया.  स्मरण, एखाद्या हयात व्यक्तींचं, नित्य वा नियमित केल्यास, कालांतराने, ती व्यक्ती आपल्या संपर्कात येते आणि एकदातरी त्या व्यक्तीची आपली सदिच्छाभेट होऊ शकते, असा अनुभव आहे. मग प्रत्यक्ष जगतपालकाचं स्मरण, जीव देह बुद्धी मन व त्याही पलीकडे जाऊन, आत्म्यापासून केल्यास, निश्चित अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात व होतात.  त्याचंच महत्व अधोरेखित करणारा हा श्लोक आजच्या लेखा साठी निवडला. स्मरण म्हणजे एखाद्याची आठवण येणं, आठवण काढणं, त्या व्यक्तीच्या आठवणी काढणं. सासरी गेलेल्या लेकीची आठवण काढणाऱ्या एखाद्...

भोग आणि ईश्वर ४८१

भोग आणि ईश्वर  ४८१   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  इतका सहजसाध्य व सहजसोप्पा मार्ग स्वतः ईश्वराने स्वमुखे सांगूनही, जनसामान्यांना याकडे येण्याची बुद्धी होत नाही. त्याची कारणं प्रारब्ध, संचित, कर्मफल वासना माया इत्यादी अनेक आहेत.  पण मनात एक महत्वाचा गुणधर्म नसल्याचा हा परिणाम असावा. याचं कारण म्हणजे,  कर्मभोग भोगत असताना  वा उपभोग घेत असतानासुद्धा, त्यातून बाहेर पडण्याची इच्छा, बुद्धी होणं ही सद्गुरुकृपा व ईश्वरी स्नेह यांची प्रचिती आहे हे नक्कीच.  पण अशी बुद्धी इच्छा झाल्यानंतरसुद्धा, मनुष्य त्या जन्मात त्या मार्गाने जाईल, याची शक्यता कितपत, हे त्याच्या मनातील एक गुण वा ईश्वरी देणगी ठरवते. इथेच खरंतर माणसाची आत्म परिक्षा असते. तो गुण म्हणजे निग्रह किंवा restraint. एखादी चुकीची गोष्ट, इच्छा, वासना तेंव्हाच कार्य करते, जेंव्हा माणसाची इच्छाशक्ती कमकुवत असते. इच्छाशक्ती ही मनाच्या निग्रह या गुणाला किंवा केंद्राला धरून असते.  ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण बोटांनी, हातात धरल्या वर, ती वस्तू न पडण्यासाठी शारीरिक शक्तीसह, मना तील हा निग्रह कामाला येतो...

भोग आणि ईश्वर ४७९

भोग आणि ईश्वर  ४७९   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल सांगितल्याप्रमाणे आपण त्या गोष्टीवर विचार करूया, जो सर्वसामान्य जनांसाठी भगवंतांनी माय माऊली म्हणून तो उपाय सांगितला आहे, ज्यायोगे कोणत्याही प्रेरणेने कर्मरत असलेल्या जनांना आपल्या अध्यात्मिक, आत्मिक उन्नती व वृद्धीसाठी कार्यरत राहता येईल. किंबहुना त्यांना आपलं कोणतंही कर्म आणि कर्मफल न टाकतासुद्धा ईश्वरभक्तीचा हक्काचा मार्ग चोखळता येईल.  हे श्रीमदभगवद्गीतेत विस्ताराने,  ज्ञानी आणि जिज्ञासू असलेल्या अर्जुनाला उद्देशून सांगण्याचं प्रयोजनच हे आहे की, सर्वसामान्य जन जे जन्मानुजन्मे कर्मफल आणि जन्ममृत्युच्या साखळीत अडकून, अज्ञानवश त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. करुणा सागर ईश्वराला हे नक्कीच त्रासदायक होत असेल की, चुकीच्या कर्मात रत राहून, वासनेच्या मायेच्या अंधःकारात अडकून, दीन पतित आणि अज्ञानी राहून, मनुष्यदेहात प्राण्यांचेच भोग भोगून पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर, हे जीव फिरत राहतात.  म्हणून स्वमुखे भगवंतांनी वेद शास्त्र पुराणं यांचं सार, या भूमीवर उतरून, मानवी देह धारण करून, सांगितलं. जेणेकरून मोक्ष मुक्त...

भोग आणि ईश्वर ४७८

भोग आणि ईश्वर  ४७८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  Stimulation techniques मध्ये अर्थात मनाला कार्य प्रवृत्त करण्याच्या यादीत अनेक गोष्टी येतात. म्हणजे माणसाला कर्म करायला प्रवृत्त करणाऱ्या, अर्थात प्रेरणा देणाऱ्या, अनेक गोष्टी आहेत.  जसं आशा, इच्छा आकांक्षा, अपेक्षा, लालसा, कामना, वासना इत्यादी अनेक प्रेरणा माणसाला कर्म, हित आणि अहित दोन्ही करायला भाग पाडतात.  मानवी मानसशास्त्रात अशी तंत्र मुद्दामहून तयार करवून, माणसाला अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी, वापरली जातात, विशेषतः उत्पादन स्रोत म्हणून.  अश्या प्रकारची तंत्र काही प्रमाणात उपायकारक असतात आणि कमी अधिक प्रमाणात चांगला परिणाम सुद्धा घडवतात. पण प्रत्येकवेळी ते सारखाच परिणाम करतील याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. कारण मानवी मन, देह व बुद्धी यांना, एखाद्या गोष्टीची सवय झाली की, त्याचा परिणाम प्रत्येकवेळी घटत जातो, diminishing value प्रमाणे.  म्हणजे अशी तंत्र किंवा techniques पूर्णतः निर्दोष असू शकत नाहीत. अर्थात त्या बाबतीत म्हणायचं झालंच तर, या ब्रह्मांडा तील, मानव निर्मित, कोणतंही तंत्र पूर्ण निर्दोष असू ...

भोग आणि ईश्वर ४७७

भोग आणि ईश्वर  ४७७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  सुखप्राप्तीची इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा ही माणसाला कर्मप्रवृत्त करते. कर्मी रत राहण्याची इच्छा जागृत राहण्यासाठी ही सुखप्राप्तीची इच्छा आणि त्या इच्छेतून निर्माण होणारी रुची मनाला त्या कर्माची प्रेरणा देऊन कार्यरत ठेवते. म्हणजेच मनातील ऊर्जा आणि शक्ती याना स्फूर्ती देतेअर्थात stimulate  करते. असा stimulation किंवा स्फूर्तीचा झरा बाह्य औषधं किंवा व्यसनाने सुद्धा प्राप्त होतो. पण तो तात्पुरता असतो. ती नशा किंवा त्या औषधाचा परिणाम उतरल्यावर पुन्हा माणूस आपल्या मूळ विश्वात परत येतो.  असं कृत्रिम stimulation अर्थात स्फूर्ती प्राप्त करण्याची ओढ वा सवय फक्त व्यसनाधीन लोकांनाच असते हा सार्वत्रिक गैरसमज आहे. माणसाला दैनंदिन जीवनात अनेक मोह, माया, लोभ मद इत्यादी विकारांच्या प्रभावाची नशा माणसाला अनेक दुष्कर्मांना प्रवृत्त करते. ही चुकीच्या परिणामांची प्रलोभनांचं stimulation किंवा स्फूर्ती, शारीरिक नशेप्रमाणेच अंती किंवा कर्मफल स्वरूपात आत्मघाती किंवा जन्मजन्मांतरीच्या चक्रात नेऊन उभी करणारी आहे.  म्हणजेच stimulation ...

भोग आणि ईश्वर ४७५

भोग आणि ईश्वर  ४७५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल पाहिलं त्याप्रमाणे श्रद्धा ही मनाची ती स्थिती आहे ज्यामध्ये एकातच अनेक दिसतात आणि अनेकात एकच दिसतो. ही श्रद्धेची परमोच्च अवस्था. इथे भक्तीरूप श्रद्धा एका लक्ष्यावर पूर्ण थांबलेली असल्यामुळे कसलाही भेदा भेद आणि भेदभाव उरलेला नसतो. असा परमोच्च बिंदू जिथे किंतु परंतु हे सर्व संपलेले असतात.  या अवस्थेचा किंचित अनुभव आपण, परीक्षार्थी असताना, परीक्षा जवळ आल्यावर, अभ्यास करताना, घेतो. त्या काळात तहानभूक सुद्धा लागत नाही. खेळ सुचत नाहीत आणि एकदा ती परीक्षा दिल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. अशीच अवस्था क्वचित प्रसंगी एखादं महत्वाचं कार्यालयीन, कौटुंबिक वा सामाजिक कार्य हाती घेतल्यावर, त्यात गुंतलेल्या काही जणांना येतो.  काही जणांना यासाठी म्हटलं की, ते कार्य तुम्ही किती गांभीर्याने घेता त्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे फारसं गंभीरपणे एखाद्या गोष्टीकडे न बघणाऱ्यांना, त्यात फार काही विशेष वाटत नाही. म्हणजे झालं तर झालं नाहीतर नाही,अश्या वृत्तीच्या लोकांना,अश्याच नव्हे ते कोणत्याही गोष्टींचं वा कार्याचं, महत्व वा गांभीर्य वाट...

भोग आणि ईश्वर ४७४

भोग आणि ईश्वर  ४७४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  माणसाच्या श्रद्धा या मनातील भावांना प्रकट करण्याचं माध्यम आहे. मुळात श्रद्धा म्हणजे फक्त देवाप्रति हा एक संकुचित अर्थ आपण लहानपणापासून ऐकत, वाचत आणि समजत आलोय. पण श्रद्धा हा खूप व्यापक अर्थाचा शब्द आहे. श्रद्धा म्हणजे जिथे मनाची द्विधा मनःस्थिती संपते आणि इच्छाशक्ती दृढ आणि जागृत असते. श्रद्धा म्हणजे एखाद्या ध्येयावर,इच्छेवर, आकांक्षे वर, एखाद्या व्यक्तिविशेषावर असलेला गाढ विश्वास.  श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीला संकल्पनेला सत्य मानून, त्यासाठी केलेले प्रयत्न. श्रद्धा म्हणजे अभ्यासाचा पाया. श्रद्धा म्हणजे आत्मशक्तीचं केंद्र व प्रेरणास्थान. श्रद्धा म्हणजे मनाची ती स्थिती ज्यामुळे, माणूस देह आणि बुद्धी यांच्या परिसीमांना उल्लंघून कार्य करू शकतो. मला एखादं लक्ष प्राप्त करायचं असेल तर, त्यावर माझा असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा आणि त्यापाठी मी लावलेली इच्छा आणि कर्म ही त्याची परिणती. तीच श्रद्धेची शक्ती.  श्रद्धा ही संकल्पना, फक्त सकारात्मक गोष्टींसाठी वापरली जात असली तरीही, नकारात्मक हेतू मनात धरून, त्यासाठीदृढ विश्व...

भोग आणि ईश्वर ४७३

भोग आणि ईश्वर  ४७३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  वास्तविक एकदा एखाद्या गोष्टींचं ज्ञान मिळालं आणि जाणीवा जागृत झाल्या की, त्या मार्गाने माणूस पुढे जावा अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात आपण पाहिलं तर फार थोडे जीव या जगतात असे आहेत की, ज्यांना एकदा ज्ञान प्राप्त होऊन, जाणीवा जागृत झाल्यावर, पुन्हा त्याच गुंत्यात न अडकणं जमतं आणि ते पुढील प्रवासाला निघतात. आपल्यासह अनेकांना कर्ममार्गातून धर्म व मोक्ष मार्गाकडे वळवतात.  कदाचित यात एक शक्यता गृहीत धरावी लागेल. ती म्हणजे असे जीव, त्यांच्या आत्मप्रवासातील अनेक अडथळे व अडचणी, अनेकानेक जन्मात, पार करून, या जन्मापर्यंत आलेले असावेत. आपण देहातील त्यांचा हा एकच जन्म पाहिलेला किंवा या एकाच जन्माबद्दल ऐकलेलं असतं. म्हणून आपण जे समोर दिसतं किंवा ज्या जन्माबद्दल ऐकतो, त्या विषयी जाणून, एकाच जन्मात हा आत्मोद्धाराचा त्यांचा प्रवास घडला असं मानतो किंवा जाणतो.  पण वास्तविक परिस्थिती तशी नाही किंवा नसावी. कारण आपण अनेक कथा किंवा संतचरित्रामध्ये वाचलं असेल की, त्यांना सद्गुरु प्राप्तीची ओढ, लहानपणा पासून लागते. ही ओढच त्यांना या जगता...

भोग आणि ईश्वर ४७२

भोग आणि ईश्वर  ४७२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल आपण पाहिलं की, प्रत्येक क्षण हा, मनाच्या ऊर्जा आणि शक्ती त्याचप्रमाणे विचार व विवेक यासाठी किती महत्वाचा आहे.  आता हे साधणं हे लिहिण्याइतकं सोप्पं नाही,हे नक्की.पण त्यासाठी सुद्धा,आपल्या धर्म शास्त्राने आणि पूर्वजांनी, अनेक मंत्र, तंत्र इत्यादी लिहून वा आचरणात आणून,त्याचे दाखले देऊन ठेवलेत.   प्रत्येक क्षण हा वेगळा अर्थात भिन्न असतो. म्हणजे वास्तविक एका क्षणाचा दुसऱ्या क्षणाशी काही संबंध नसतो. पण हे सर्व सलग, येत असल्यामुळे आणि त्याच क्षणांप्रमाणे आपले श्वासांच्या देखील मालिका होत असल्यामुळे आपल्याला हे सर्व काळाचं गणित एकसंध वाटतं. पण प्रत्यक्षात ते क्षण व श्वास जोडलेली मालिका आहे.  म्हणजेच प्रत्येक क्षणी आपण वेगळे असतो आणि प्रत्येक क्षणी आपल्याला, मनासाठी आनंद ऊर्जा व शक्ती मिळवत राहणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रत्येक क्षणी सकारात्मकता टिकवण्या साठी प्रयत्नांची मालिका तयार करणं आवश्यक आहे. त्यासाठी एकतर प्रत्येक क्षणी, एखादी वेगळी गोष्ट वा कर्म, या आनंदा साठी, उर्जेसाठी करायला हवी. पण असं एकच कर्म सलगप...

भोग आणि ईश्वर ४७१

भोग आणि ईश्वर  ४७१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता या आत्मपरीक्षेत, व्यावहारिक परिक्षेप्रमाणे, काही तयारी,अभ्यास,मार्गदर्शन इत्यादी असतं का. तर नक्कीच असतं. मुख्य तयारी ही मनाची असते किंवा असावी लागते. कारण सर्व कर्माचं प्राक्तन, प्रारब्ध वा संचित जमा होताना, त्याचे भोग किंवा उपभोग, जरी देह भोगतो तरीही, मन हेच मुख्य लक्ष्य किंवा सह भागी साथीदार असतं. यातना किंवा सुख दोन्हीही, देहाप्रमाणे मनाला सुद्धा भोगाव्या लागतात किंवा उपभोगता येतात.  किंबहुना देहाचे घाव, यातना, जखमा किंवा झीज आणि सुखोप भोग हे देहावर, कालांतराने का होईना, दिसून येतात. पण मनाच्या जखमा, मनातील यातना, दुःख हे दिसतही नाही आणि कालांतराने भरूनही येत नाही. ते विसरण्याचा प्रयत्न करणं, ही एकच गोष्ट माणसाच्या हातात आहे. बर यामध्ये दुःख किंवा दुःखाच्या यातना, सुखाचे दिवस, काही प्रमाणात विसरायला लावतात. पण सुखानंतर दुःखाचे दिवस आले तर, त्या मानसिक यातना किंवा भावना, जास्त तापदायक असतात.  म्हणजेच सर्वांच्या केंद्रस्थानी, मन हे मुख्य इंद्रिय आहे. त्याचं अजून एक कारण आहे.ते म्हणजे,मृत्यूनंतर आत्म्या सह जो...

भोग आणि ईश्वर ४७०

भोग आणि ईश्वर  ४७०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालच्या उदाहरणाचा सखोल।विचार करूया.आपण परीक्षा देतो म्हणजे नक्की काय करतो, तर आपल्याला असलेल्या किंवा आपण प्राप्त केलेल्या, ज्ञानाची कुणी तरी ज्ञानी व्यक्ती परीक्षा घेऊन, तपासणी करतं आणि त्यावरून आपण पुढे जायला किती पात्र आहोत, हे ठरवतो. ती व्यक्ती असेल व्यवस्था असेल, संस्था असेल.  म्हणजे काही विशिष्ट सरकारमान्य किंवा सरकारी व्यवस्थेने आखून दिलेल्या अभ्यासक्रमाचा, आपण अभ्यास करून, त्या ज्ञानाची आपण कसोटी देतो. आता हेच सूत्र जीवनाकडे लावून बघून. एक स्वयंसिद्ध व्यवस्था ईश्वर, ज्याने या ब्रह्मांड नामक व्यवस्थेची स्थापना केली आणि त्याला काही शास्त्रीय व वैज्ञानिक नियम घालून दिले. त्या सर्व एकत्रित व्यवस्थेला निसर्ग आणि त्याचं सुत्रसंचालन करणाऱ्या नियंत्रकाला विधाता म्हटलं जातं व ज्या नियमाने हे सर्व बांधलं आहे त्याला नियती म्हणतात.  आता या सर्व व्यवस्थेची गरज काय, तर ईश्वराची इच्छा आणि त्यानुसार सर्व प्राणिमात्र आणि निसर्ग अशी सर्व कष व्यवस्था निर्माण करून, ती व्यवस्था स्वयंपूर्ण पद्धतीने चोख चालेल, याचीसुद्धा तरतूद क...

भोग आणि ईश्वर ४६९

भोग आणि ईश्वर  ४६९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल की, एखाद्या सर्व सामान्य माणसाला, भगवंतांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी स्वतः भगवंत सहाय्य करतात. पण त्यासाठी ती व्यक्ती किती पात्र आहे हे देखील पारखून घेतलं जातं. कारण ज्याप्रमाणे दान हे सत्पात्री असावं लागतं, त्याप्रमाणे ज्या जीवाला या जगतातून पार, ब्रह्मांडाच्या बाहेर भगवंताच्या हृदयात स्थान द्यायचं असेल तर, नक्कीच तो जीव, तो आत्मा आणि ते मन शुद्धता आणि सात्विकता यांच्या कसोटीवर उतरलं पाहिजे.  यासाठी ज्याप्रमाणे आपण शाळा कॉलेजमध्ये परीक्षा देऊन आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो. पण ते सिद्ध होण्याचे काही निकष, परीक्षा घेणाऱ्यांनी तयार केलेले असतात. त्या निकषांवर आधारित अभ्यास क्रम ठरवलेला असतो, त्यावर आधारित प्रश्न , परीक्षेच्या रुपात वा माध्यमातून विचारले जातात ज्यांना, त्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण क्षमतेने व तयारीने देता येतात, ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतात आणि पुढे जातात.  या छोट्याशा गोष्टीत वा उदाहरणात अनेक कंगोरे आहेत. म्हणजे परीक्षार्थी ह...

भोग आणि ईश्वर ४६८

भोग आणि ईश्वर  ४६८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  खरतर कुंडलिनी जागृती हा एक महामार्ग आहे, ज्ञान आणि जाणीवा जागृत होऊन, मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे जाण्याचा. प्रत्यक्षात कुंडलिनी ही, प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयासाने जागृत होतेच. पण ती अन्य अनेक मार्गांनी जागृत होते. महत्वाचं असतं, ते त्या मूलाधार चक्रावर आघात होणं. हा आघात, योगामार्गाने झाल्यास, ती शक्ती, तिच्या सहा चक्रातून अंतिम फिरत, सातव्या सहस्त्रार चक्रात स्थिर होते.  ही साधकाची अंतिम प्राप्ती आहे. कारण या नन्तर काही प्राप्त करण्यासारखं रहात नाही. याची दोन कारणं आहेत एक म्हणजे अंतिम ज्ञान ज्याला प्राप्त झालं आहे, त्याला अजून काही मिळवायची आवश्यकता व जाणीव उरत नाही. दुसरं कारण म्हणजे निर्विकार व वृत्तीविराहित मनात काही माया, वासना व मोह यांच्या लहरी शिल्लक रहात नाहीत. त्यामुळे काही मागणं वा मिळवणं हे ज्ञानच किंवा ही जाणीवच शिल्लक रहात नाही  याचं महत्वाचं कारण म्हणजे, त्या आत्मज्ञानाच्या प्रज्वलनाने, आत्मज्योत तेजस्वी होते आणि त्यामध्ये सर्व मोह, माया, बंधनं षड्रिपु यांचा विनाश झालेला असतो. म्हणून एकाच परमपाव...

भोग आणि ईश्वर ४८०

भोग आणि ईश्वर  ४८०   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  ईश्वर कथित सहजसोप्पा आणि सहजसाध्य मार्ग, जो फक्त त्याच्या स्मरणातून जातो आणि थेट त्याच्या हृदयापर्यंत पोचतो, तो मार्ग,वास्तविकपणे सार्वत्रिक वापराचा राजमार्ग आहे. राजमार्ग म्हणजे ज्यावर मोकळे पणाने कोणीही येऊ जाऊ शकतो. पण तरीही त्याचा उपयोग, म्हणावा तितका प्रभावाने होताना दिसत नाही, याची काय कारणं असतील, त्याचा शोध घेऊया.  मुळात जीवात्मा देहात बद्ध झाल्यावर आत्मोद्धाराचा मार्ग हा मनाच्या माध्यमातून जातो. म्हणजेच मनाच्या स्थितीवर व वर्तनावर सर्वकाही अवलंबून आहे किंवा अवलंबून असतं.कसं ते बघूया. मन हे इंद्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापक आहे. त्याच्या कार्यावर देहातील सर्व तंतू, मज्जासंस्था वा चेतासंस्था,प्रत्येक पेशी,धमन्या, रक्तवाहिन्या, नाड्या इतकंच काय तर ब्रह्मांडातील सर्व ज्ञान जाणून, ग्रहण करण्याची शक्ती व व्यवस्था आहे, हे अगदी विज्ञानसुद्धा जाणतं.  म्हणूनच मनाच्या अवस्थेला, स्थितीला, मनातील गुण अवगुण, तत्व, अपेक्षा, इच्छा, वासना या सर्वांना अनन्यसाधारण महत्व आहे. या व इतर अनेक गोष्टींच्या प्रभावातून ...

भोग आणि ईश्वर ४७६

भोग आणि ईश्वर  ४७६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  एखाद्या कर्मात, कार्यात मिळणारी गोडी त्या कार्यातील आपली रुची ठरवते. रुची म्हणजे एखाद्या कामाची आवड किंवा ते काम करण्यातील गोडी.  म्हणजे जे कार्य केल्याने किंवा त्या कार्याच्या कल्पनेनेसुद्धा मिळणारा आनंद म्हणजे त्या कार्यातील रुची. आपल्याला एखादा विषय आवडत असतो आणि त्याच कर्मात रत राहण्यात किंवा त्यातच मग्न राहण्यात देहाला बुद्धीला व मनाला मिळणारा मोद किंवा आनंद म्हणजे रुची.  असा आनंद ही मुख्यत्वे आपल्याला, त्या विषयात मिळतो, ज्यामध्ये मन सहज ओढलं जातं. सर्वसाधारण पणे विषयाचा, विकासाचा, उपभोगाचा, वासनेचा आणि अहं सुखवण्याचा आनंद देणाऱ्या कर्मांकडे, मनाचा ओढा सहसा असतो. जे मनाला व देहाला, क्षणिक का होईना,  सुखावते, त्याकडे मन सहज झेपावते. म्हणजेच सुखोप भोग, विलास व सहजप्राप्त सुखासीनता हा मानवी मनाचा केंद्रबिंदू आहे.  कारण सर्वांचा जीवनप्रवास हा सुखाच्या शोधार्थआहे. त्यामुळे  सुख हे,  रुची किंवा आवड निर्माण करणारी एक प्रेरणा आहे. सहसा ही प्रेरणा बाह्य जगतातून वा देहा बाहेरील वस्तूतून प्राप्त करण...

भोग आणि ईश्वर ४६७

भोग आणि ईश्वर  ४६७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  खरंतर हा शक्तीचा आघात वा शक्तिपात ज्याला म्हटलं जातं, तो अनेक मार्गांनी व अनेक प्रकारांनी होतो, किंवा होऊ शकतो, हे मागे आपण जाणलंच. त्याचे मार्ग भिन्न आहेत, पद्धती वेग वेगळ्या आहेत आणि प्रकार अनेक आहेत.  तरीही सर्वांचा अंतिम उद्देश आहे, त्या अणूरूप आत्म्याच्या केंद्रकातील गाभा अर्थात केंद्रक भेदून, ते विश्वमय ज्ञान बाहेर काढून, त्यातून आत्मजागृती, आत्म प्रचिती घडवून, त्या देहातील आत्मतत्वाला, त्याच्या हिताच्या अंतिम मार्गावर स्थापित करणं.  पण या सर्वात, कोणत्याही मार्गाने,  मुख्य प्रक्रिया ही, मूलाधार चक्रात स्थापित असलेली , कुंडलिनी शक्ती, जागृत करून, तिला हृदयमार्गातून, सहस्त्रार चक्रात नेऊन स्थिर करणं किंवा पोचवणं. यात मुख्य क्रिया आत्मतत्वात अणूरूपात असलेलं ज्ञानकवच भेदून, ते जागृत झालेलं आत्मतत्त्व सहस्त्रार चक्राशी संलग्न करणं. हा अंतिम उद्देश सर्व मार्गांचा आणि प्रकारांचा आहे आणि असतो.  तो साधण्यासाठी, मनाला निवृत्तीप्रत नेऊन, मग त्याला आत आत्मतत्वात वळवणं गरजेचं आहे. मन निर्विकल्प, निराकार व निवृ...

भोग आणि ईश्वर ४६६

भोग आणि ईश्वर  ४६६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  शक्तीचा आघात किंवा प्रहार किंवा पात करून, अणूसम आत्म तत्वातील  ज्ञानाच्या अग्राला छेदून किंवा भेदून, आतील अलौकिक,, अद्वितीय आणि अमर्यादित ज्ञान, बाहेर प्रसारित व्हायला सुरुवात होते. इतक्या सूक्ष्म अंशात्मक आत्म्याच्या गाभ्यात, इतकं विशाल चिरंतन आणि अद्भुत ज्ञान कसं काय सामावलेलं असतं, हा प्रश्न वास्तविक संगणक युगात पडता कामा नये.  कारण संगणकातील एखाद्या काही किलोबाईट्सच्या सॉफ्ट वेअरमध्ये, एखादा प्रोग्रॅम, ज्याप्रमाणे झिप फॉरमॅटमध्ये सामावलेला असतो, त्याप्रमाणे हे अमर्यादित ज्ञान, सुक्ष्मरूप स्वरूपात अर्थात झिप फॉरमॅटमध्ये साठवलेलं असतं. आता हे सॉफ्टवेअर उघडायला, एखादी छोटीशी exe file, त्यात समाविष्ट केलेली असते. ज्यावेळी आपण ते exe अँप्लिकेशन ओपन करतो.  त्यावेळी त्या exe file मधील प्रोग्रॅम run होतो आणि ते संपूर्ण सॉफ्टवेअर, आपल्या संगणकातील हार्डडिस्क मधील, प्रोग्रॅम फोल्डरमध्ये, स्थापित अर्थात डाउनलोड होतो. हीच गुंतागुंतीची प्रक्रिया, ज्यावेळी एखादा आघात वा प्रहार किंवा पात, मनाच्या मार्गे आत्मतत्वातील या ...

भोग आणि ईश्वर ४६४

भोग आणि ईश्वर  ४६४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  अनेक विषय कालच्या एका लेखात मांडले होते. त्यातील एकेका मुद्द्यावर विस्तृत विवेचन आपण सुरू करू. वृत्ती व प्रवृत्ती यांतून निवृत्ती व्हावी, असा उल्लेख काल आला होता.ही निवृत्ती विषयातून,वासनेतून,संसारातून,मनातील  षड्रिपूंच्या अस्तित्वातून अशी सर्वव्यापक निवृत्ती असावी, असा याचा अर्थ आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे, मन निर्विकार आणि निर्विचारी झाल्यानंतरच ते अंतर्मुख होऊन,  आत्मशोधास्तव कार्यरत होतं.  कारण सर्व शास्त्र, पुराणं, वेदादी वाङ्मय संत महंत यांच्या सांगण्याचा मतितार्थ वा गुह्यर्थ एकच आहे की, जे शोधायचं आहे, ज्यासाठी हा परमभाग्याचा मानवी देह मिळाला आहे, तो ईश्वराकडे जाण्याचा मार्ग, हा देहात वसलेल्या चैतन्याच्या गाभ्यातून जातो. किंबहुना तोच मार्ग आहे.  म्हणून सर्व योग याग, साधनं मनाला आत घेऊन जाण्यासाठीच निर्माण करण्यात आली आहेत.  यातून विधात्याचा स्पष्ट उद्देश व संकेत आहे की, मला प्राप्त करण्याचं सर्व ज्ञान, विज्ञान, गुह्य मार्ग, सर्व विकल्प मी तुझ्या हृदयातील, माझ्या अंशरूप आत्म्याज्योतीमध्ये अ...

भोग आणि ईश्वर ४६५

भोग आणि ईश्वर  ४६५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  वास्तविक आत्म्याची शुद्धता जितकी अधिक, तितकी, साधनेची ईश्वराप्रत पोचण्याची गती किंवा लहरींची त्या सर्वशक्तिमान परमांशाप्रत जाण्याची शाश्वती अधिक. खरं पाहिलं तर, ईश्वर किंवा ती शक्ती अंशरूपात या देहातच आहे. तो अंश हा अणूसम असल्यामुळे, अणूचा सिद्धांत, जो मानवाने विसाव्या शतकात शोधून काढल्यानंतर आपण जाणलं की, अणुचं विघटन केल्याशिवाय त्यातील शक्ती आपण प्राप्त करू शकत नाही.  किंवा त्या शक्तीप्रत आपण पोचू शकत नाही. पण हा अणू ईश्वरीय अंश असल्यामुळे, आपल्याला त्याच्या प्रत जावं लागेल. म्हणजेच या आत्मरूपातील अणूचं विघटन करणं महत्वाचं ठरतं. सर्व योगयाग ही अष्टांग साधनं, नामजप इत्यादी सर्व त्या अणुचं विघटन करण्यासाठीची पूर्वप्रक्रिया आहे, असं म्हटल्यास ते योग्य ठरेल. परंतु इतक्या गूढ आणि गुह्य स्थानी अर्थात हृदयस्थ असलेल्या अणूरूप आत्म्याच्या शक्तिकेंद्रापर्यंत अर्थात गाभ्यापर्यंत पोचून, त्याचं विघटन करून, त्यातून ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्तम सात्विक शुद्ध स्वरूपातील चित्ताची आवश्यकता असते.  या चित्तशुद्धीसाठी अनेक...

भोग आणि ईश्वर ४६३

भोग आणि ईश्वर  ४६३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जाणीवा व त्यांची जागृती यासाठी एखादा सौम्य किंवा मोठा धक्का जरुरी असतो. याचं कारण म्हणजे मुळात ज्ञान आतच साठवलेलं आहे. ते अनेक जन्म व अनेक शतकं, आत्म्याच्या कोषात बद्ध आहे.आपण हे जाणतोच की,एखादा डब्बा अनेक वर्षे किंवा बराच काळ बंद असेल आणि तो उघडायचा असेल तर त्याला विशिष्ट कोनातून, विशिष्ट शक्ती लावून, त्या झाकणा वर प्रहार करणं जरुरी असतं. त्यानंतरच त्या डब्ब्याचं झाकण उघडू शकतं.  अगदी हीच प्रक्रिया, अनेकदा सहजपणे किंवा ज्ञान जागृतीच्या काळात, विशेषतः घडवून आणली जाते वा घडते. ही प्रक्रिया, आतून ज्ञानजागृतीच्या माध्यमातून घडते किंवा बाहेरून सद्गुरू कृपेच्या, साधनेच्या द्वारे घडवून आणली जाते. म्हणजे यामध्ये मुळात बाहेरून काही ज्ञान घातलं जातं आणि मग ते जाणिवांना समजतं, अशातला भाग नाही. ते आतच बद्ध असतं. फक्त ते बंद असल्यामुळे विशिष्ट प्रकारे आघात करून, त्या ज्ञानकेंद्राचं अग्र भेदून वा छेदून  उघडलं जातं.  यामध्ये साधनेची व सद्गुरुकृपेची अमूल्य मदत होते. किंबहुना त्याच माध्यमातून हा पात वा आघात वा प्रहार घडवून आ...

भोग आणि ईश्वर ४६२

भोग आणि ईश्वर  ४६२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपल्यातील बलवान व सहाय्यक अर्थात supportive तत्व जाणल्यानंतर, त्यावर नियंत्रण मिळवून,किंवा त्याला योग्य दिशेने वळवून किंवा त्याजागी योग्य त्या तत्वाला प्रोत्साहित करून मनाला शांत करणं, हे प्राथमिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून, विस्तृत व दीर्घ चिंतन आपण, गेल्या काही भागात, करत आहोत. त्यात, स्वतःबद्दल जाणण्या साठी, सर्व तत्वांची माहिती, त्यातील आपल्यावर मुख्यतः व दुय्यमपणे प्रभाव टाकणारी तत्त्वं, याचा आपण परामर्ष घेतला.  त्यानंतर आपण कोणत्या श्रेणीत येतो व त्यानुसार आपण मनःशांतीसाठी काय करायला हवं, हे ठरवू शकतो.  पण इथे एक प्रश्न उपस्थित राहू शकतो. तो म्हणजे जरी हे जाणलं तरी प्रत्यक्षात ते साधणं कितपत सोपं वा किती कठीण आहे, हे ईश्वर जाणे. पण इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे.  एखाद्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त झालं वा जाणीव जागृत झाली की, कोणतीही गोष्ट पन्नास टक्के साध्य व्हायला हरकत नाही. कारण जाणिवेने मनाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं जातं. एकदा ज्ञान प्राप्त झालं की, आपला त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो व...

भोग आणि ईश्वर ४६१

भोग आणि ईश्वर  ४६१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल अग्नीतत्वासह इतर सहाय्यक तत्व अर्थात supportive element यावर विचार करत होतो. यामध्ये अग्नी या मुख्य तत्वसोबत पृथ्वी, वायू व जल यावर आपण विचार केला. आता अग्नीतत्वासह आकाश तत्व सहाय्यक तत्व असेल तर, अशी व्यक्ती क्रोधीत आणि अव्यक्त वा गंभीर किंवा क्रोधीत पण सखोल विचार करणारी किंवा क्रोधीत व बरसणारी असू शकते.  म्हणजे राग अनावर झाला तरी तो मनातील आकाशात धुमसत राहून, कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो. किंवा असाच अव्यक्त पणे मनाच्या कृष्णविवरात राहून, अव्यक्तच देहासह मनातच विलीन होऊन, देहापश्चात मनोमय कोषातून आत्म्यासह पुढे जाऊ शकतो. पण हे मनातील supportive element असलेल्या आकाशाच्या स्वरूपावर आणि स्थिती किंवा श्रेणीवर अवलंबून आहे.  कारण आकाश हे सर्वसमावेशक असू शकतं किंवा पावसाळ्या प्रमाणे सर्व बरसून टाकणारं असू शकतं. म्हणजेच सहाय्यक तत्वाच्या श्रेणीवरसुद्धा हा स्वभावाची वा मनाच्या अवस्थेची स्थिती असू शकते.वास्तविक ही पंचमहाभूतरुप देह बुद्धी व मन या त्रयीतसुद्धा कोणतं तत्व बलवान,कोणतं दुय्यम पण सहाय्यक आहे, यावर बऱ्याच गोष्...

भोग आणि ईश्वर ४६०

भोग आणि ईश्वर  ४६०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जल व वायू तत्वांच्या व्यक्तींनी, मनःशांती, मनोबल व ऊर्जा यासाठी काय करावं, हे आपण मागील दोन भागात पाहिलं. आज पृथ्वीतत्वाच्या स्थिर अचल आणि काही प्रमाणात rigid मतं व मन असलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे ते पाहू. मुळात हे static म्हणजे स्थिर मतांचे, मनाचे असल्यामुळे, सहसा यांच्या मतांमध्ये, विचारांमध्ये, आचारांमध्ये बदल संभवत नाही. म्हणजेच एक विचार, मत त्यांना एकदा पटलं की, त्यापासून ते सहसा परावृत्त होत नाहीत, ढळत नाहीत.  वास्तविक ही एका अर्थाने फायद्याची गोष्ट वा वृत्ती आहे. पण जर हे योग्य विचारात वा दिशेकडे जात असतील तरच.अन्यथा अश्या व्यक्ती फांदी तुटो वा पारंबी, आपली भूमिका वा विचार आणि अर्थातच आचार म्हणजे कृती बदलत वा सोडत नाहीत. म्हणून या लोकांना चांगल्या विचारांकडे, इच्छाकडे वळवणं हेच एक महत्वाचं कार्य आहे. पुढे, अश्या व्यक्ती दृढतेने व स्थिरतेने त्याकडे वाटचाल करतात.  म्हणून अश्या व्यक्तींनी स्थिर वा शांत बसण्याची सवय लावून घेण्यापेक्षा,सतत चांगल्या विचारांचं,शुद्ध सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या विचारांचं चि...

भोग आणि ईश्वर ४५७

भोग आणि ईश्वर  ४५७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कोणत्याही वृत्तीचा, प्रवृत्तीचा, स्वभावाचा वा तत्वाचा माणूस असो, चित्तशुद्धी व आत्मशुद्धीचा मार्ग, मनाला शांत करून, त्या मनाला, चिंतन आणि साधना यात गुंतवूनच पुढे जातो. म्हणजेच एका अर्थाने पाहिलं तर व्यक्तीच्या वृत्तीमुळे पुढे जाण्याचा मार्ग बदलत नाही. पण त्यामुळे, मनाला शांत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांना मात्र कमी अधिक वेळ लागू शकतो.  जसं जलतत्वाच्या व्यक्ती, हे सहजी साध्य करून, त्या प्रवाहात पुढे जाऊ शकतात. पण पृथ्वीतत्वाच्या प्रभावा तील व्यक्तींना, महत्प्रयास लागतील, हे करावं की न करावं हे ठरवण्यासाठी. म्हणजे उद्देश ठरवण्यासाठी लागणारं चिंतन, त्यांच्याकडे नसल्यामुळे, त्यांना आधी मनाला, काही विचार स्वीकारायला लावून, ते आत्मसात करावे लागतील व काही विचारांचा त्याग करून, त्यासाठी पूर्वतयारी करावी लागणार.  अग्नीतत्वाने युक्त व्यक्तींना अजून गहन समस्येला तोंड द्यायचं आहे. कारण मनाला शांत करून, अंतर्मुख होण्या साठी अग्नितत्वाचा प्रभाव कमी करून, आकाश तत्वाचा स्वीकार मनाला करावा लागणार. म्हणजे त्यांच्यासाठी संघ...

भोग आणि ईश्वर ४५८

भोग आणि ईश्वर  ४५८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाचं श्रेष्ठत्व आणि त्यावर आधारित संपूर्ण आध्यात्म विज्ञान हा सगुण ते निर्गुण सर्व मतांचा, शास्त्राचा, वेद पुराणं, संतवाङ्मय, या सर्वांचा पाया आहे. किंबहुना अध्यात्मविज्ञानातील कोणत्याही मार्गाचा  मूळ पाया आणि त्यावर आधारित सर्व कर्मकांड ते योग इत्यादी जे केले जातात त्याचाही मूळ पाया मनावर आधारित आहे.  ईश्वराने स्वतः रचलेल्या या संकल्पित ब्रह्मांडाला भेदून, निर्गुण रूपातील ईश्वरी तत्वाला प्राप्त करण्याची किल्ली किंवा किलक, हे स्वतः ईश्वराने, मन या इंद्रियरूपात स्वतःला गुंफून, म्हटलं तर एकप्रकारे माणसाचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न स्वतः ईश्वरानेच केला आहे. मानवी देहातील सर्वात चंचल, पण देह बुद्धी यांना आपल्या कवेत सामावून, त्यांच्याकडून निहित कार्य करवून घेण्याची क्षमता या मनात आहे. मनात आणलं तर काहीही करू शकणारं मन, अनेक गोष्टी लीलया करतं.  या मनाची शक्ती इतकी अमर्याद आहे की, प्रसंगी देहाची मर्यादा या मनाला बांधू शकत नाही. म्हणजेच मनाच्या शक्तीने प्रसंगी भौतिक व भौगोलिक अंतरसुद्धा सहज पार करून, हेच मन, देह ...

भोग आणि ईश्वर ४५९

भोग आणि ईश्वर  ४५९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  वायूत्वावर आधारित देहरचना प्राप्त जीव चंचल आणि बदलत्या मतांचा असतो. त्यामुळे अश्या व्यक्तीला सर्वात प्रथम त्याची चंचलता सोडून,शांतता स्वीकारण्याचा सराव करावा लागेल. यासाठी, सुरवातीला, दिवसातून ठराविक वेळ निवडून, काही क्षण शांत बसून राहण्याचा सराव करावा लागेल. अश्यावेळी काही जप, मनन वा चिंतन सुद्धा न करता, फक्त निर्विचारी व स्थिर होण्याची सवय मुद्दामहून लावून घेण्याचा सराव करणं क्रमप्राप्त आहे.  कारण अश्या व्यक्तीला सुरवातीलाच काही विचार वा नाम वा तत्सम काही करावयास दिलं तर, त्यातही त्या व्यक्तीची चंचलता आड येऊन, एका विचारातून, दुसऱ्या विचारात आणि एक नाम वा जाप यातून, संभ्रमावस्थेत येऊन, हे करू की ते, असा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे चंचल स्वभावाच्या व्यक्तीला एकतर काहीच पटत नाही किंवा सर्वच पटतं. पण त्यामुळे निश्चित मत वा विचार मनात ठाम राहात नाही.  याचसाठी फक्त बैठकीचा सराव खूप महत्वाचा आहे. अश्या वेळी अश्या प्रयत्नात, देह, बुद्धी व मन हे तिन्ही घटक, स्थिर होणं महत्वाचं आहे. कारण अश्या चंचल व्यक्तीची बुद्धी, मन आणि देह...