भोग आणि ईश्वर ४८७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्। विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। कोणतीही चल वा अस्थिर गोष्ट,वस्तू वा शक्ती, नियंत्रित करण्यासाठी, एखादी अचल, स्थिर आणि तितकीच किंवा त्याहून जास्त शक्तीची गरज असते, हे तर वैज्ञानिक सत्य आहे. जसं एखादा ताकदवान वळू वा बैल किंवा घोडा बांधण्यासाठी, तितकाच मजबूत आणि घट्ट रोवलेला, अर्थात स्थिर असलेला खुंटा लागतो, हे तर सत्य आहे.त्याचप्रमाणे अस्थिर,अविवेकी आणि अकस्मात क्षणात माया मोह, लोभ मत्सर दुःख या अनेक भावात लुप्त होणाऱ्या, वायुगतीने चल असणाऱ्या मनाला बांधणं, हे महाकर्मकठीण काम आहे. भले भले आयुष्य घालवूनही हे जमवू शकतील याची खात्री देणार नाहीत. त्यामुळे अश्या मनाला स्थिर करणं जमेल याची शक्यता नाही. त्यातही आपण हे जाणतो आणि अनुभवतो की, मनात अपार शक्ती आणि ऊर्जा आहे. ते पाऱ्यासमान आहे. म्हणजे नियंत्रित करायला गेल्यावर तितक्याच वेगात व कल्पना तीतपणे कधी निसटून जाईल, हे सांगता येणार नाही. म्हणजे नियंत्रणाच्या नुसत्या कल्पनेने आधीच अस्थिर असलेलं मन, ...