Skip to main content

भोग आणि ईश्वर ३९९

भोग आणि ईश्वर  ३९९ 

कलियुगाच्या सुरवातीलाच त्याच्या लक्षणांची कल्पना  भगवंतांना आली होती म्हणूनच सगुण आणि निर्गुण भक्तीची अनेक उदाहरणं आपल्या जीवनात प्रभुनी घडवून आणली, जेणेकरून ती, कलियुगाला मार्गदर्शक ठरतील. वृंदावन, गोकुळ, मथुरा, इथला समस्त गोप गोपी परिवार हा प्रभूंच्या सगुण रूपावर निस्सीम प्रेम करत होता. 

पण त्याच वेळी व त्याच परिसरात राधा कृष्णावर सगुणा च्याही पलीकडे प्रेम करत होती. कृष्णभेटीची ओढ ही सर्वांनाच सारख्या पद्धतीने कृष्णाभोवती बांधून ठेवत होती. पूर्वायुष्यात घडलेल्या या अद्भुत लीलानंतरसुद्धा, प्रभूंना अर्जुनासारखा निर्व्याज प्रेम करणारा सखा मिळाला, ज्याच्यावर प्रभूंनीसुद्धा अद्भुत पद्धतीने प्रेम केलं. 

त्याला कारण करून, संपूर्ण जगताला, अनंत काळापर्यंत मार्गदर्शक ठरेल, असं श्रीमद्भगवद्गीता यासारखं,  अद्वैत तत्वज्ञान जगताला दिलं. ती श्रीविष्णूच्या या अवतार कार्याची अलौकिक देणगी होती. त्यानंतरसुद्धा या अलौकिक तत्त्वज्ञानावर धर्मांधतेचा व संकुचिततेचा शाप लागल्यावर, कृष्णजन्मानंतर चार हजार वर्षांनी, श्रीज्ञानोबाराय जन्मात येऊन, ते ज्ञान स्वहस्ते सामान्यांना, स्वहस्ते खुलं करून दिलं. 

म्हणजे आपल्या स्वतःच्या निर्मितीसाठी अर्थात जगासाठी,त्यातील सामान्य जनांच्या मुक्ती व मोक्षासाठी, या समस्त ब्रह्मांडाचा निर्माता व पालनकर्ता अखंड झटत आहे, हेच यातून सिद्ध होतं. म्हणजेच ज्यावेळी तो कर्म करा तेच श्रेष्ठ आहे असं स्वतः सांगतो, त्याचवेळी आवश्यक आहे तिथे, निर्गुणातून व जिथे अत्यावश्यक आहे तिथे, सगुणात येऊन आणि देह धारण करून, अनेक कर्म नित्य करून, पूर्ण एक जन्म जगून दाखवतो. 

अश्या अनेक उदाहरणातून जगाप्रती व जगतातील मानवाप्रती आपली आस्था, अनेक रुपात, ईश्वर प्रकट करतो. यावरून आपल्या कर्माचा भाग नसूनही, अविनाशी तत्वातील, निर्गुण परब्रह्म, या जगताला उदाहरण घालून देतं. आता एवढं सगळं जाणल्यानंतर, आपण स्वतः या तुलनेत, किती संकुचित व देहभावनेत गुंतलेले आणि त्यापलीकडे काहीही न जाणणारे व न पाहणारे आहोत, ध्यानात येईल. 

ही संकुचित वृत्ती टाकून, विषयातीत होऊन, सृष्टीच्या निर्मात्या कडे, जाण्याची, त्याला जाणण्याची बुद्धी जागी होऊदे, ही सदिच्छा जागृत व्हावी, यासाठी नित्य चिंतन करणं किती गरजेचं आहे, ते लक्षात येईल.  याचसाठी वृत्ती, चित्त शुद्ध करून, शुद्ध अंतःकरणाने ईश्वर स्मरण करत, ईश्वराला आपल्या समीप जाणून, साधना करत गेल्यास, या जन्मात येण्याचा बराचसा कार्यभाग साधण्याकडे वाटचाल सुरू होईल. 

यावर अजून सखोल चिंतन, उद्याच्या भागात करू, तोपर्यंत नामातून ईश्वर स्मरण करत राहू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...