Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०३

भोग आणि ईश्वर  ४०३ 

काल पाहिल्याप्रमाणे, दूध ते साजूक व सात्विकतेचा परामांश असलेल्या तुपापर्यंत घडणारा प्रवास हा विविध माध्यमातून होत असतो. म्हणून ते माध्यम तितकंच महत्वाचं आहे. आज त्यावर विचार करू.आपण कमी प्रतीच्या, हलक्या,अस्वच्छ पातेल्यात किंवा भांड्यांमध्ये जर दूध तापवलं, त्याला पुरेसा व मंद आंच नाही दिला, जमलेल्या सायीची हेळसांड केली तर, त्या पुढील प्रत्येक टप्प्यावर मिळणारं उत्पादन हे त्याच प्रतीचं असणार. 

म्हणजे पुरेशी न जमलेली साय, दुध वा साय खराब होण्याची शक्यता या सर्व गोष्टी नक्कीच घडतील आणि ते नैसर्गिक आहे. त्याचप्रमाणे पुढच्या टप्प्यावर मिळणारं दही, त्याचं ताक हे निकृष्ट दर्जाचं व कमी प्रतीचं असेल. त्यामुळे लोणी कमी मिळून, सरतेशेवटी आपण ज्यासाठी हा आटापिटा केला , ते सात्विक व साजूक तूप निकृष्ट असेल, किंवा लोणी मिळणार सुद्धा नाही. म्हणजेच प्रत्येक टप्प्यावर वापरण्यात येणारं भांड वा पातेलं हे चांगलंच असावं आणि 

त्यासाठी केली जाणारी प्रक्रिया उत्तम प्रतीची व योग्य काला वधीची हवी, यासाठी प्रत्येक गृहिणी नक्कीच प्रयत्नशील असतेच असते. या सर्व प्रक्रियेत माध्यम व प्रक्रिया याबाबत कोणतीही तडजोड करणं गैर आहे, हे लक्षात येईल.  आता यावरून आत्मशुद्धी व आत्मोद्धार करवून घेण्याच्या प्रक्रियेत, माध्यम असलेल्या, देह व त्याहीपेक्षा महत्व असलेल्या मनाला किती महत्व आहे, हे आपल्या ध्यानात आलं असेल. 

त्यासाठीच म्हटलं आहे की जिथे अंतःकरण शुद्ध आहे, तिथे भाव शुद्ध असेल, जिथे भाव शुद्ध असेल तिथे श्रद्धा व भक्ती शुद्ध स्वरूपाचीच असेल आणि जिथे भक्ती व श्रद्धा शुद्ध आहे तिथे, या सर्वांचा परिणाम म्हणून प्रकट होणारं ईश्वरी नाम किती शुद्ध असेल, याची कल्पना केलेली बरी. म्हणून शुद्ध अंतःकरण प्राप्तीची पहिली पायरी म्हणून, दुसऱ्याप्रती असलेले भाव अर्थात प्रतिक्रिया शुद्ध असाव्यात किंवा त्या शून्य असतील तर उत्तम. 

प्रतिक्रियेच्या शून्यत्वा मुळे मनातून उत्पन्न होणाऱ्या नकारात्मक लहरी, नामशेष होतील, ज्यामुळे शुद्ध अंतःकरणाकडे वाटचाल सुरू व्हायला मदत होईल. वास्तविक शुद्ध अंतःकरण हा एक दैवी दागिना आहे. तो ज्यांना जन्मतः प्राप्त होतो, त्यांची दूध ते तूप या प्रक्रियेतील काहीतरी प्रगती नक्कीच झालेली आहे, असा निष्कर्ष काढता येतो. 

यातील अजूनही काही आवश्यकता आहेत, ज्या आपण पुढील भागात जाणून घेऊया. तोपर्यंत नामाचा नेम सुरूच ठेवू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...