Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०१

भोग आणि ईश्वर  ४०१ 

वास्तविक पाहिलं तर, ईश्वर हा देहाच्या सर्वात निकट म्हणजे हृदयस्थ आहेच आहे. पण आपण तो देऊळ,  मूर्ती, प्रतिमा यांमध्ये पाहतो, शोधतो आणि जाणतो. सगुण रूपाने मनाला पूजन व अर्चन यांची सवय लागते हे मान्य. पण काही काळानंतर मन निर्गुणाकडे गेलं पाहिजे. 

ते निर्गुण रूप परब्रम्ह आत आत्म्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.   एक लक्षात घ्या, आत्मा हा अणू रूपात, त्या ईश्वराचा अंश आहे. अणूपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, हे हनुमंता इतकंच या देहातील आत्म्यालासुद्धा लागू पडतं. कारण अंतरात्म्याची ती शक्ती आहे, जी हनुमंताने सिद्ध केली होती, रामनामाने. 

त्यासाठी सर्वात महत्वाची पहिली आवश्यकता आहे ती म्हणजे शुद्ध सात्विक मनाची. चित्तशुद्धी ज्याला म्हटलं जातं, ते नितांत आवश्यक आहे. चित्तशुद्धी हा या सर्वाचा मूलमंत्र आहे म्हटलं तरी वावगं ठरू नये.  कारण हृदयस्थ भगवंताला अंतरात्म्यात जागृत करण्यासाठी, अत्यंत शुद्धतेची जरुरी असते. म्हणून सर्वात प्रथम चित्तशुद्धी महत्वाची. ज्याप्रमाणे xray किंवा सोनोग्राफी यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या किरणांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आत्म्यातील ईश्वराला पाहण्यासाठी शुद्ध सात्विक मनाची आवश्यकता असते. 

हे साध्य करण्यासाठी उपाय म्हणजे स्थिर बुद्धीने व विकाररहीत घेतलेलं नाम, मनाला शुद्धस्वरूपात प्रकट करतं. परंतु यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे ते नाम अहेतुक असावं, सहेतुक नसावं. याचं कारण म्हणजे सहेतुक नामात, मन आणि मनातील वासना व विकार गुंतले जातात . ज्यामुळे शुद्धता लोप पावते. म्हणून सर्वात प्रथम, त्या नामामागील उद्देश फक्त नाम हाच असावा. म्हणजे कोणत्याही हेतूसाठी वा साध्यासाठी नाम न घेता, 

मात्र नाम साधण्यासाठी नाम घ्यावं. म्हणजे मनातील कोणतेही विकार,गैरभाव व वासना त्यात गुंतणार नाहीत. अगदी मी नाम घेतो, हा भावसुद्धा, त्यामध्ये येता कामा नये. अन्यथा या एका गैर भावापायी, अनेक वर्षांची साधना धुळीस मिळू शकते. शिवाय, परमार्थाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे मी अर्थात अहंकार. अहंकार हा वृथा असो वा त्याला कर्तृत्वाची किनार असो, सर्वकाही जाळून भस्म करते. 

यावर अजूनही चिंतन करूया, उद्याच्या भागात, तोपर्यंत मनाची शुद्धता साधण्यासाठी नाम घेऊया, अहेतुक नाम घेत राहू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...