Skip to main content

भोग आणि ईश्वर ४१८

भोग आणि ईश्वर  ४१८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)

वास्तविक स्वप्नरंजन म्हणजे काय, तर काही काल्पनिक विचारांच्या मागे मनाला जाऊ देऊन, त्याद्वारे, मनाला एका विशिष्ट तरंगावर व पातळीवर स्थिर करणं. अश्या स्वप्न रंजनात मनाला एका गतीत स्थिर करण्यात आलेलं असतं. हेच कार्य चिंतनातून घडतं. 

फरक इतकाच की स्वप्नरंजनात आपण, नैसर्गिकरित्या येणाऱ्या, विचारांच्या मागे मन व बुद्धीला जाऊ देऊन साधतो, किंवा त्या विचारांच्या ओढीने वा आसक्तीने सांधलं जातं.  चिंतनात यांच्या विरुद्ध कार्य आहे. म्हणजे स्वप्न रंजनात आपोआप घडणारं चिंतन, चिंतनात मुद्दाम हून व चांगल्या विचारांनी घडवून आणायचं आहे वा असतं. 

विचार करून बघा स्वप्नरंजनातील कल्पना आणि त्यातून प्राप्त होणारा आनंद, मनाला काही काळासाठी का होईना पण, सुखावून जातो. ते अशाश्वत सुख किंवा रंजन असतं. म्हणजे वास्तवात आल्यावर, आपण भानावर येतो आणि पुन्हा वास्तवातील जगतात हरवून जातो. पण मनाला ते सुख एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातं. 

हेच चिंतनातून साध्य होतं. पण ते जर शाश्वत आणि चिरंतन सुख देणाऱ्या किंवा खऱ्या निर्गुण अस्तित्वाचं चिंतन असेल तर, त्यातून मिळणारा आनंद हा मनाला, बुद्धीला आणि त्या द्वारे आत्म्याला एका वेगळ्या तरंगांची अनुभूती देतो. 

चिंतनातून आणखीन एक गोष्ट साध्य होते. ते म्हणजे मनाला बुद्धीला एकाग्रता मिळते आणि ते चिंतन आत्म्याला आपल्या मार्गावर पुढे जाण्यास सहाय्यभूत ठरतं. चिंतनाचा अजून एक लाभ म्हणजे विचारांना दिशा मिळते, चांगल्या वाईटाची जाण होऊन, त्याद्वारे जाणीवा जागृत होऊ शकतात. विचारांच्या माध्यमातून मनाची खोली विशाल होऊ शकते. अजून एक लाभ मनाचा शांतपणा वाढून, क्रोधावर नियंत्रण मिळू शकतं. 

अनावश्यक चर्चेत वा विचारात देहाची, बुद्धीची व मनाची निष्कारण होणारी झीज थांबते. कारण अनावश्यक विचार चक्र थांबतं, त्यामुळे विनाकारण होणारं रक्ता भिसरण थांबतं, रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्यातून उद्भवणारे इतर काही आजार, किंवा येणाऱ्या व्याधी नियंत्रणात राहू शकतात. अजूनही अनेक सुप्त लाभ जे देहाच्या बुद्धीच्या व मनाच्या पलीकडे, आहेत, ते लाभ प्राप्त होऊ शकतात.त्यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तोपर्यंत नाम हेच साध्य आहे हे मानून, नाम स्मरत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...