भोग आणि ईश्वर ३९७
कालच्या चिंतनाचा विषय पुढे नेताना, असं म्हणता येईल की, याच भूतलावरील तत्वांप्रमाणे भूलोकांवरील सर्व लोकांना, त्यांच्या त्यांच्या ऊर्जा व शक्तीप्राप्तीसाठीच्या व्यवस्था, ईश्वरीय व्यवस्थेने निर्माण करून दिल्या आहेत. यातील देहधारी मानवाचं महत्व व कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण भूलोकांवरील बाकी सर्व लोकांतील, सर्व देहातीत व देहरहीत जिवात्मे हे मानवांच्या कर्माच्या आधीन आहेत.
म्हणजेच देहप्राप्ती न झालेले आणि वरच्या लोकांत न गेलेले जीव, पुढील लोकांत जाईपर्यंत किंवा पुन्हा देह प्राप्त करेपर्यंत, पितर योनीत वास्तव्य करून असतात. त्यांच्या दिनक्रमात, त्यांचा एक दिवस हा आपल्या एका वर्षासमान असतो. म्हणून वार्षिक एकदा केलेलं श्राद्ध व तर्पणकार्य त्यांना त्यांच्या, त्या योनीतील, सुस्थित संचारासाठी आवश्यक आहे.
त्यावरील लोकांतील, म्हणजेच देवलोकातील देव सुरवर व गण जे भगवंताच्या ब्रह्मांड श्रुष्टींबाहेर आहेत, पण जगाच्या सुरळीत संचलनाचा भाग आहेत, त्यांच्या ऊर्जा व शक्तीची व्यवस्था व गरज ही,मानवी धर्मकार्य, ईश्वर स्मरण, यज्ञयाग, नवविधा भक्ती यांतून निर्माण होणाऱ्या शुद्ध, सात्विक तरंग लहरीतून होते.
म्हणजेच ईश्वरीय व्यवस्थेनुसार आणि ईश्वरी व्यवस्थेत, धर्मकार्य, ईश्वर व सद्गुरू सेवा, ईश्वर स्मरणाचं महत्व किती श्रेष्ठ आहे, याचा आता अंदाज आला असेल. हे कर्म जसजसं कमी कमी होत जाईल, तसतसं देवाचं व सुरांचं असुरशक्तींशी लढण्याचं बळ क्षीण होत जाईल. परिणामी असुर शक्तीचं प्राबल्य वाढत जाऊन, कलियुग अजूनच घोर होत जाईल.
म्हणूनच आपण पाहतो की, दिवसेंदिवस नकारात्मक, नीच, नतद्रष्ट, दुष्ट व असुरी विचारांचा प्रभाव, प्राबल्य वाढत आहे. म्हणजेच त्या शक्तींशी लढण्याची इच्छा व पात्रता असलेले देव व सुरवर इत्यादी, आपल्या कार्यात सक्षम असूनही, हे कार्य करण्यास दुर्बल होत आहेत. कारण जशी प्रत्येक जीवाची लढण्याची व प्रतिकार करण्याची शक्ती, काही ठराविक घटकां मधून मिळते, त्याप्रमाणे जगतातील देहरहीत आत्म्यांची शक्ती प्राप्तीची व्यवस्था, ईश्वराने निर्माण करून ठेवली आहे.
म्हणजेच मानवी देहाचं कार्य हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याला पितरांच्या अर्थात आपल्या वाडवडिलांच्या प्रगतीसाठी व असुर शक्तींशी लढण्यासाठी बळ देणं गरजेचं आहे. म्हणजेच देहधारी मानव, हा, देहरहीत आत्मे व पुण्यात्मे यांच्यामधला खूप मोठा दुवा आहे. हे कार्य मानवासाठी स्वार्थ आणि परमार्थ या समान आहे. म्हणजे असं की, ईश्वर व सद्गुरू सेवा, ईश्वर स्मरण, इत्यादी मार्गांनी आपल्या स्वतःच्या कर्माचे दोष जाळून, पुढील कर्मफल सुधारण्यासाठी प्रयत्न करणं, त्याच बरोबर यज्ञयागादी कर्मे कमी कमी होत असताना, सुर शक्तींना आत्मिक बल व ऊर्जा प्रदान करत राहणं.
यावर अजूनही चिंतन आवश्यक आहे, जे आपण उद्या करणार आहोत. पण आपलं नित्य नामस्मरण करत करत.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment