Skip to main content

भोग आणि ईश्वर ४२६

भोग आणि ईश्वर  ४२६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कालच्या भागात पाहिलेला विषय पुढे नेऊया. संगतीचा एक भाग जो अपरिहार्यपणे आपल्यासोबत प्रारब्धाने, सचितातून येतो तो आपण काल जाणला. पण तो जाणूनही आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार वा आनंद किंवा दुःख करून काहीही उपयोग नाही. पण संगतीचाच दुसरा भाग जो आपल्या नियंत्रणात आहे किंवा असू शकतो, त्याचा आज विचार करूया. 

संगती जी आपल्याला आपल्या निवडीतून किंवा निर्णयाने ठरवता येऊ शकतो, त्यातील महत्वाचा घटक म्हणजे स्नेही, मित्रसंबंधी हा आहे. स्नेही वा मित्र यांचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक हितसंबंधी आणि हितशत्रू. मुळातच स्नेही वा मित्र या घटकाचं, आपल्या आयुष्या तील स्थान किती महत्वाचं आहे, हे आपण सर्वजण जाणतो.  म्हणूनच यातून मनाला, बुद्धीला मिळणारी किंवा त्यामुळे वाया जाणारी ऊर्जा व शक्ती ही मिळवणं व घालवणं पूर्णपणे आपल्या हातात नसेलही. 

तरीही हितशत्रू व चुकीच्या मैत्रीला वा संबंधाना दूर ठेवून, आपण निदान होऊ शकणारा, ऊर्जा व शक्ती यांचा ऱ्हास, नक्कीच कमी करू शकतो. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट जी बरेचवेळा लक्षात येत नाही की, आपल्या हिताचा खरा संबंधी किंवा शत्रू कोण आहे हे पारखणं कठीण असतं किंवा कठीण जातं. अनेकदा एखाद्या संबंधी किंवा स्नेही यांच्याकडून काही नुकसान वा फसवणूक अथवा मानसिक त्रास वा छळवणूक झाल्या नंतर, त्या तापत्रयातून आपण काही शिकून पुढे जातो. 

पण यात आधीपासून, खबरदारी घेऊन व बुद्धी आणि मन यांचे नेत्र उघडे ठेवून, अनुभव येण्याआधी स्वतःला सावध करून सावरू शकतो. अर्थात अशी बुद्धी होणं आणि मन त्यासाठी जागृत असणं, हा साध्य करता येणारा योग आहे. त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टींचं, प्रत्येक संबंधी व स्नेही यांचं किंवा यांच्या स्वभावाचं नियमित चिंतन करत राहून, त्यातून योग्य व अयोग्य व्यक्तींची ओळख वा पारख केली पाहिजे. यासाठी मनाची जागृती असणं व जाणीव येणं महत्वाचं आहे. 

या संगतीतील आपल्या अपेक्षांचा आलेख, त्याचवेळी आपल्या हितासाठी कार्यरत असेल वा होईल, ज्यावेळी आपणही याच हिताने, आपल्या सहवासात आलेल्या, चांगल्या स्नेही व संबंधी यांच्या बाबत तसाच विचार करत गेलो आणि तशाच प्रकारचं कर्म करत गेलो तर. कारण हा सर्व खेळ कर्माच्याच सिद्धांताने साधतो किंवा सिद्ध होतो. म्हणजेच इथे सुद्धा give and take अर्थात कर आणि भर याच तत्वाने जग आणि आपण चाललो आहोत, चालत राहणार. 

तरीही एकदा या तत्वाने चालायचं ठरवल्यानंतरसुद्धा आधीच्या संगतीतून चांगला वाईट अनुभव येऊच शकतो. पण मनाच्या कार्यशक्ती व ऊर्जा यावर परिणाम होऊ देता कामा नये. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे आपण आता जागृत होऊन आपलं संगतीबाबतचं कर्म, विचार वा वागणुक बदलणार आहोत, पूर्ण जाणिवेने. पण दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण आधीच्या कर्मांना किंवा चुकांना बदलू शकत नाही. 

त्यामुळे ते परिणाम वा फल येईल आणि येऊ शकतं हे गृहीत धरावच लागेल. पण पुढचं घडवण्यासाठीची संगतीची आपल्या हातात असलेली जागृती व जाणीव, मनात धरूनच, आपण वाटचाल केली पाहिजे.  संगती बाबत अजून विचार उद्याच्या भागात करून झाल्यावर, आपण, आपल्या नियंत्रणातील दुसऱ्या घटकाचा विचार करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...