भोग आणि ईश्वर ३९६ ईश्वर आराधना, स्मरण प्रार्थना हा सर्वात मोठा बीजमंत्र आहे, मुख्यतः कलियुगातील भक्तिमार्गाचा. पण याची बुद्धी होणं, त्यानुसार लक्षात येणं आणि प्रत्यक्ष त्यानुसार कर्म करणं, या तिन्ही गोष्टी एकत्रित घडणं, सद्गुरूकृपे आधीन आहेत. कारण बुद्धी भ्रमित करायला आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी होण्यासाठी, पुन्हा आपल्याच कर्मफलाची गती कारण आहे. म्हणजे योग्य कर्म आणि अयोग्य कर्म करण्याची बुद्धी व इच्छा उत्पन्न होणं, आपण कर्माने लिहू शकतो. पण त्यानुसार प्रत्यक्ष कर्म घडू शकण्यासाठी वृत्तीची, चित्ताची शुद्धता ही सहजसाध्य गोष्ट नाही. कारण मन व बुद्धी हे, क्षणक्षण काहीनाकाही चिंतन व चिंता यांचं स्मरण करतच असतात. याशिवाय, संचित, या जन्मातील कर्म, प्राप्त परिस्थिती, आपला संपर्क येतो, त्या माणसांच्या विचार व आचार लहरींचा सामूहिक परिणाम, या सर्वांचा दबाव मनावर आणि बुद्धीवर प्रचंड प्रमाणात असतोच. या सर्वांतून मन बुद्धी व देह यांची सांगड घालून योग्य कृती वा कर्म करणं हे फक्त प्रारब्ध वा संचित यावर अवलंबून ठेवलं, तर घडणारं प्रत्येक कर्म, हे योग्य वा अयोग्य दोन्हीपै...