Skip to main content

Posts

Showing posts from 2021

भोग आणि ईश्वर ३९६

भोग आणि ईश्वर  ३९६  ईश्वर आराधना, स्मरण प्रार्थना हा सर्वात मोठा बीजमंत्र आहे, मुख्यतः कलियुगातील भक्तिमार्गाचा. पण याची बुद्धी होणं, त्यानुसार लक्षात येणं आणि प्रत्यक्ष त्यानुसार कर्म करणं, या तिन्ही गोष्टी एकत्रित घडणं, सद्गुरूकृपे आधीन आहेत. कारण बुद्धी भ्रमित करायला आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी होण्यासाठी, पुन्हा आपल्याच कर्मफलाची गती कारण आहे.  म्हणजे योग्य कर्म आणि अयोग्य कर्म करण्याची बुद्धी व इच्छा उत्पन्न होणं, आपण कर्माने लिहू शकतो. पण त्यानुसार प्रत्यक्ष कर्म घडू शकण्यासाठी वृत्तीची, चित्ताची शुद्धता ही सहजसाध्य गोष्ट नाही. कारण मन व बुद्धी हे, क्षणक्षण काहीनाकाही चिंतन व चिंता यांचं स्मरण करतच असतात. याशिवाय, संचित, या जन्मातील कर्म, प्राप्त परिस्थिती, आपला संपर्क येतो, त्या माणसांच्या  विचार व आचार लहरींचा सामूहिक परिणाम, या सर्वांचा दबाव मनावर आणि बुद्धीवर प्रचंड प्रमाणात असतोच.  या सर्वांतून मन बुद्धी व देह यांची सांगड घालून योग्य कृती वा कर्म करणं हे फक्त प्रारब्ध वा संचित यावर अवलंबून ठेवलं, तर घडणारं प्रत्येक कर्म, हे योग्य वा अयोग्य दोन्हीपै...

भोग आणि ईश्वर ३९५

भोग आणि ईश्वर  ३९५  सत्ययुगातील परिस्थितीबाबत आपण लेख क्र ३९३ मध्ये बोललो,त्या लेखाचा पुढील भाग आज पाहूया. सत्ययुगा तील परिस्थिती, नंतरच्या प्रत्येक युगात हळूहळू बदलत गेली. मानवी मनाचा विचार करता,साधनेची आवश्यकता आणि आजूबाजूची परिस्थिती यांचं प्रमाण हे मनाबाबत व्यस्त आहे. सत्ययुगात माणसं ही बहुतांशी पापभिरू, दैववादी,साधी व सरळ असल्या मुळे आणि राज्यव्यवस्था उत्तम असल्यामुळे आणीबाणीचे किंवा युद्धाचे प्रसंग हे सर्वसामान्य जीवांपर्यंत फारसे जाऊ दिले जात नसत.  परकीय संकटं झेलायला व शत्रूशी समरात दोन हात करायला राजा आणि सैन्य हे सक्षम होते आणि त्यांच्या कर्तृत्वावर जन सामान्यांचा असलेला विश्वास सार्थ होता. सूर असुर आणि मानव यांचं, निश्चित ओळखता येणारं वेगळं अस्तित्व होतं. त्यामुळे आपला हितकारक कोण व हितशत्रू कोण हे जनांना ज्ञात होतं. या सर्व गोष्टींमुळे रोजच्या जीवनात , देवांच्या किंवा राजाच्या सहाय्यची आवश्यकता कमी जरूरीची वाटे.  याच व्यवस्थेत, प्रत्येक युगात, प्रत्येक टप्प्यात होत गेलेल्या स्थित्यंतरातून, सामान्यांच्या जीवनाची वाटचाल अभय स्थितीकडून भयग्रस्ततेकडे होत गेली...

भोग आणि ईश्वर ३९४

भोग आणि ईश्वर  ३९४  वास्तविक आज ३९३ व्या भागाचा विषय पुढे न्यायचा आहे. परंतु आज माझे सद्गुरू, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस असल्यामुळे, त्यांना प्रिय असलेले नाम, या विषयावर आज चिंतन करूया आणि ३९३ भागाचा विषय, उद्या ३९५ भागात पुन्हा सुरू करूया.  महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य, फक्त एक नाम या विषयासाठी वाहिलं. देहत्यागापश्चात सुद्धा, चैतन्यमय स्वरूपात, त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती, आजही साधकांना येते.  मुळात नाम का घ्यावं, याचं एक महत्वाचं संयुक्तिक कारण म्हणजे जीवाची गती काय आहे आणि कर्म फलाचा व्याप किती आहे, हे ईश्वर व सद्गुरू दोघेच जाणतात. प्रारब्ध व संचितातील जमा पुंजी, हा आपणच जमा केलेला पसारा आहे. त्यामध्ये विषयात राहून केलेल्या कर्माची बीजं, किती व सत्कृत्याची बीजं किती, हे काळाला ज्ञात आहे. पण ते फलस्वरूपात समोर येईल त्यावेळी, आपण अत्यंत हर्षभरीत किंवा अतिशय दुःखी होऊ.  वास्तविक दोन्ही स्थिती या चुकीच्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून, आपण त्या आनंदात वा दुःखात सद्यस्थितीचं कर्म हरवून बसतो. म्हणजेच वर्तमान कर्म करताना, भोगत असल...

भोग आणि ईश्वर ३९३

भोग आणि ईश्वर  ३९३  इतकं प्रदीर्घ विश्लेषण, कलियुगाच्या गुणधर्माचं, करत असताना अजून काही मुद्दे लक्षात येतात, त्याचं चिंतन आवश्यक आहे.  जपतप, साधना आणि ईश्वरप्राप्तीच्या वा मोक्षप्राप्तीच्या मार्गाचा प्रवास हा युगांच्या प्रवासात खडतरपणाकडून सुलभतेकडे झाला आहे.  मोक्षाची वाट सत्ययुगात अत्यंत तापदायक, खडतर आणि कष्टसाध्य होती. पुराणं आणि रामायणासारखी महाकाव्य वाचताना जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याकाळी आयुष्याचा काळ हजारो वर्षांचा होता.  त्यामुळे त्याच प्रमाणात तप जप व साधनेच्या सर्व मार्गां वरील मार्गक्रमण करावं लागत असे. मुळात अश्या साधनेच्या मार्गात अनेक व्यवधानं पाळावी लागत. गुरुकृपा प्राप्ती हा सर्वात कठीण टप्पा होता.  हजार हजार वर्षे वाट पाहून, त्यानंतर सद्गुरू एखाद्याला असीम कृपेची अनुभूती देत असत. याचं महत्वाचं कारण सर्वसाधारण जन हे पापभिरू आणि पुण्यमार्गी असल्या मुळे, त्यातून योग्य निवड करून, त्या पात्र जीवाला मोक्ष मार्गावर अग्रेषित करणं,ही महत्वाची जबाबदारी सद्गुरूं वरील खरं उत्तरदायित्व होतं.  यामागे सर्वात महत्वाचा उद्देश, साधनेची, मार्गा...

भोग आणि ईश्वर ३९२

भोग आणि ईश्वर  ३९२  गेल्या सात आठ भागातील, कलियुगाबाबतच्या विस्तृत कथेमधून लक्षात येणारे काही ठळक मुद्दे आपण आज बघूया.  प्रत्येक युगाची वा त्या त्या युगांच्या स्वामींची स्वतःची मालकी, त्या त्या काळावर असते. म्हणजेच त्या संपूर्ण काळावर त्या युगास्वामींची सत्ता असते हे निर्विवाद. तो स्वामी त्या काळातील ब्रह्मांडाचा प्रबंधक अर्थात मॅनेजर असतो.  यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, भगवंत ज्यावेळी एखादी रचना वा निर्मिती करतात, त्यावेळी, त्या रचनेला व त्यातील प्रत्येक घटकाला,  पूर्ण स्वातंत्र्य प्रदान करतो. त्या काळाला व्यक्त होण्याची व त्या त्या युगानुसार सर्व घडण्याची पूर्ण व्यवस्था वा मुभा त्या युगास्वामींला असते.  म्हणजेच आज आपण लोकशाहीबद्दल जे बोलतो, वास्तविक त्या लोकशाहीचा खरा जनक वा त्या संकल्पनेचा उद्गाता स्वतः भगवंत आहे. आपल्या इथल्या व्यवस्थेप्रमाणे ईश्वरनिर्मित या व्यवस्थेत काय काय गोष्टी आहेत, हे आपण आता तपासून पाहू.  व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, वर्तणुकीचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अशी आज अस्तित्वात अस...

भोग आणि ईश्वर ३९१

भोग आणि ईश्वर  ३९१  श्रीब्रम्हाजी म्हणाले, वास्तविक पाहता,  जो संघर्ष, प्रत्येक युगात आहे, तोच कलियुगातसुद्धा आहे. सत्य, धर्म, न्याय व नीती, या चार मूल्यांचा संघर्ष प्रत्येक युगात, मानवी रुपात प्रकट झालेल्या, विश्वात्म्याच्या परामांशाला, मानवी देहात, असताना करावाच लागणार. प्रत्येक युगातील, तात्कालीन राजकीय , सामाजिक परिस्थिती व नैतिक, आर्थिक मूल्य, त्यामधून, कोणाचा विजय होणार हे ठरत जाईल.  आधीच्या तीनही युगात, जपतप, साधना, पुण्यकर्म इत्यादींचं सामर्थ्य हे निर्विवाद असेल. कारण ही मूल्य जपली जावीत, जोपासली जावीत आणि याच मूल्यांच्या आधारे धर्म व न्याय हे वृद्धिंगत होत जावेत, अशी त्या त्या युगांच्या इष्टदेवतेची अर्थात युगांच्या स्वामींची इच्छा असेल.  पण कलियुगात प्रत्यक्ष त्या युगाचा स्वामी कली, हाच अधर्म अनीती, अनाचार या सर्वांच्या मागे ठामपणे उभा असेल. फक्त उभाच नसेल, तर त्यांना प्रोत्साहित करून, त्यांची गती वाढवेल. त्याद्वारे त्या युगातील कर्मांना, न्यायाला, नीतीला, धर्माला व आचाराला भ्रष्ट करून, आपली इच्छा व वासना तृप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल व करत राहील....

भोग आणि ईश्वर ३९०

भोग आणि ईश्वर  ३९०  श्रीब्रम्हाजी पुढे सांगत होते. हे संपूर्ण जगत एका तराजू प्रमाणे आहे. सत्य आणि असत्य, सुख आणि दुःख, हास्य आणि कारुण्य या त्या तराजूच्या दोन तागड्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही कर्माचा भाग  आहेत. तराजूत एका बाजूला वजन आणि दुसऱ्या बाजूला त्या तुलनेत वस्तू, धान्य, इत्यादी जिन्नस ठेवण्यात येतात.  हे जिन्नस तिथपर्यंत टाकण्यात येतात, जोपर्यंत ती बाजू, वजन ठेवलेल्या बाजूसमान होतं नाही. कलियुगात हीच गोष्ट खरतर एक गुह्य असेल आणि जो हे जाणेल, त्याला या सर्व गुंत्याची तोड माहिती असेल वा माहिती होईल. जसजसा पाप, अपराध, प्रमाद, अत्याचार, अनीती, अन्याय इत्यादी तागडीच्या दुसऱ्या भागाला खाली नेतील त्यावेळी तागडीच्या दुसऱ्या बाजूत, पुण्य वाढण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून ईश्वरी प्रयत्न वेगवेगळ्या स्वरूपात होतील.  म्हणूनच साधनांची सुलभता वा साधनांनी साध्य होणारं, सहज वा कमी श्रमांनी प्राप्त होण्याची व्यवस्था वा तरतूद  कलियुगा चाच परिणाम म्हणून आपोआप होईल. त्यामुळे आधीच्या युगात पाप करणं हे हीन निंदनीय कमी दर्जाचं कृत्य समजलं जायचं, तेच कलियुग...

भोग आणि ईश्वर ३८९

 भोग आणि ईश्वर  ३८९  श्रीब्रम्हाजींच्या कथनाने सभागृहात,कलियुगातील जन सामान्यांबाबत अतीव चिंता, प्रत्येकाच्या चर्येवर स्पष्ट दिसत होती. श्रीब्रम्हाजी हे जाणूनच पुढे सांगू लागले. ही सर्व नकारात्मकता हे एक कटू, पण कलियुगातील एक वास्तव असेल, हे नक्की. पण काही बाबतीत कलियुगात, आशादायक आणि वरदायक चित्र, नक्की दिसेल.  म्हणजेच आधीच्या तीनही युगात विशेषतत्वाने ईश्वर भक्तीसाठी कठोर जपतप साधना दानधर्म इतर पुण्यकर्म करावे लागतील. यातील अनेक मार्ग घोर तपश्चर्येने व दृढतेने आचरल्यानंतर, ईश्वरीय मार्गावर काही प्रमाणात मार्गक्रमण होऊ शकेल. पण कलियुगात हीच परिस्थिती अत्यंत सुलभ असेल.  श्रोतृवर्गातून एक विनम्र स्वरात प्रार्थना आली की, सृष्टी कर्ता श्रीब्रम्हाजी आपण हा मुद्दा अजून विस्ताराने सांगावा, ही आपल्या चरणी प्रार्थना. श्रीब्रम्हाजी स्मित करत म्हणाले, अवश्य सांगतो, ध्यान देऊन ऐका. आपण उदाहरण घेऊ म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल. उदाहरणार्थ सत्ययुगात जे पुण्य, दहा हजार वर्षे तप केल्यानंतर साध्य होईल, तेच पुण्य,त्रेतायुगात, भूतलावरील प्राण्यांना, हजार वर्षे, तपसाधना केल्यानंतर...

ज्ञानेश्वरीतील चवथ्या अध्यायातील दोन ओव्याचा भावार्थ !!!

ज्ञानेश्वरीतील चवथ्या अध्यायातील दोन ओव्याचा भावार्थ !!!  अथवा नावें हन जो रिगे।तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥४. ९७॥  आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥४. ९९॥  ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात ओवी क्र ९७ आणि ९८ मध्ये खूप मोठं वैज्ञानिक सत्य माऊली सांगून गेले आहेत. हे वैज्ञानिक सत्य पाश्चात्य विज्ञानाला सतराव्या वा अठराव्या शतकात सापडलं आणि मांडता आलं. किंवा विज्ञान त्यापाशी अठराव्या शतकात पोचलं.  विज्ञानात दोन प्रकार आहेत. एक प्रकार शोध आणि दुसरा प्रकार म्हणजे संशोधन. संशोधन अर्थात जे अस्तित्वात नाही, ते संशोधनाने जगाला देणं. ज्याला इंग्रजीत इन्व्हेन्शन म्हणतात ते. शोध म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात आहे, पण जी जगाला माहीत नाही. याला इंग्रजीत डिस्कव्हरी म्हणतात.  या दुसऱ्या प्रकारात पुन्हा दोन उपप्रकार येतात. एक म्हणजे कदाचित बहुसंख्य लोकांना माहीत नाहीत अश्या गोष्टी शोधणं आणि दुसरं म्हणजे  काही ठराविक भागा तील लोकांना माहीत नाहीत अशा गोष्...

भोग आणि ईश्वर ३८८

भोग आणि ईश्वर  ३८८  श्रीब्रह्मदेव आपलं कथन करत असताना श्रोत्यांकडे लक्षपूर्वक पाहून त्यांच्या प्रतिक्रिया निरखत होते. त्रिकाल दर्शी व त्रिकाल ज्ञानी श्रीब्रम्हाजी हे जाणून होते की,  जे देव सुरवर आणि जमलेले सर्वच, सात्विकतेच्या परम उंचीवर पोहोचलेले पुण्यवान आहेत. त्यामुळे, कलियुगा बद्दल,ज्या गोष्टी, मी सांगत आहे किंवा कलियुगात काळाच्या उदरात दडलेल्या रहस्यातील अतिगृह्य भाग, जो कलीने कथन केला, तोसुद्धा, मात्र कल्पनेने उमजून येणं महाकठीण आहे.  म्हणून त्यांनी अजून सखोलपणे विश्लेषित करताना सांगायला सुरुवात केली. आज ज्या गोष्टी अकल्पनिय वाटतात आणि ज्यांच्या घडण्याबद्दल अजूनही सभागृह साशंक आहे, त्यामुळे, त्यावर अजून प्रकाश टाकणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भाऊ भाऊ एकमेकांचे वैरी होऊन, त्यातून वाद ते महायुद्ध ही वैचारिक व नैतिक अधोगती, कलियुगाच्या आधीच विश्वाला पहायला मिळेल.  त्यामुळे तद्नंतर नैतिक, वैचारिक, ज्ञान विज्ञान, निष्ठा, श्रद्धा, विश्वास, परमार्थ, परोपकार, सत्य इत्यादी सर्वच पातळीवर, अकल्पनिय अधोगती होत जाईल. असं समजा की, पाण्यात अशुद्धता मिसळल्यावर, ज्याप्रमाणे प...

भोग आणि ईश्वर ३८७

भोग आणि ईश्वर  ३८७  श्रीब्रह्मदेव आपलं कथन करत होते आणि सभा शांत चित्ताने, मन एकाग्र करून, त्याचं श्रवण करत होती. श्रीब्रह्मदेव पुढे म्हणाले  राजसी आणि तामसी शक्तींचा प्रभाव, अर्थातच हळूहळू वाढत जाईल. संपूर्ण भूतलावर त्या तामसी राजसी व भोगी शक्ती माया मोहाचं धुकं तयार करतील. याचं कारण आधीच्या तीनही युगात सात्विक व पुण्यवान जिवात्मे आपला प्रभाव समस्त सृष्टीवर पाडून, तामसी शक्तींना प्रभावहीन करण्यात यशस्वी असतील.  पण काळाच्या ओघात, कर्माच्या गतीने आणि पुण्य प्रभावाने हे सर्व सात्विक आत्मे आपल्या निजधामाला प्राप्त होऊन, सप्तस्वर्गाचा आनंद उपभोगत असतील. त्यामुळे भूतलावर हीन व दीन असे दोनच गुण जन सामान्यांमध्ये प्रभावित असतील. हीन म्हणजे तामसी, असुर शक्ती प्रभावित, माया मोह काम व क्रोध यांच्यामुळे मत्त झालेले, दूषित आत्मे असतील.  तामस हा गुण जो आधीच्या युगात सात्विक गुणाने दबावाखाली असलेला त्रिगुणातीत एक गुण,आपला प्रभाव या युगात पूर्णपणे दाखवेल. म्हणजे असं की, तुरटीच्या प्रभावाने तळाशी गेलेला साका, पात्रातील जलाची पातळी जशी कमी कमी होत जाईल, तसतसा पुन्हा प्रभावी भासे...

भोग आणि ईश्वर ३८६

भोग आणि ईश्वर  ३८६  कलीचं संपूर्ण कथन सभेने ऐकलं. सभा स्तब्ध होती. खरंतर इतकं स्पष्ट,काही काही ठिकाणी उद्दाम व दर्पोक्तीपूर्ण वर्तन आणि कथन याआधी सभेने ऐकलं नव्हतं. त्यामुळे या कथनावर आता श्रीब्रह्मदेव काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आपल्या कथनानंतर कली, कोणालाही नमन प्रणीपात न करता, अहंकारयुक्त नजर सर्वांवर टाकून, आपल्या जागेवर जाऊन बसला.  श्रीब्रह्मदेव शांतपणे सभेला संबोधत म्हणाले. उपस्थित सर्व देव सुरवर यक्ष किन्नर गंधर्व आणि श्रोतृजनहो, खरंतर काळाच्या परिघावर फिरण्यासाठी सुसज्ज असलेल्या चारही कालप्रवाहांनी आपापल्या युगात घडणाऱ्या गोष्टी, गुह्यार्थ, त्या त्या काळात सामान्य जनांनी ईश्वरप्राप्ती व मोक्षप्राप्तीसाठी काय करावं, यावर विस्तृतपणे कथन केलं. ते पूर्ण योग्य व विस्तृत असल्या मुळे पुन्हा त्यावर मी भाष्य करणं आवश्यक आहे, असं मला वाटत नाही.  परंतु सर्वात शेवटी चवथ्या व सर्व युगांच्या मागून येणाऱ्या कलीने केलेलं कथन हे सभागृहाला अत्यंत आश्चर्यकारक, भेदक व कठोर वाटलं असेल. पण यात कलीचा दोष नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की आधीच्या प्रत्येक युग...

भोग आणि ईश्वर ३८५

भोग आणि ईश्वर  ३८५  कलीच्या या स्पष्ट आणि विखारयुक्त बोलांनी, सभागृहात भंग पावलेली शांतता, पूर्ववत करण्यासाठी आणि वाता वरणातील ताण कमी करण्यासाठी, श्रीब्रह्मदेव विचारते झाले. पण या सर्वात आशेचा किरण किंवा आशादायक परिस्थितीला वाव आहे की नाही.  यावर, प्रणाम करून कली  म्हणाला  सृष्टीकर्ता परिस्थिती ही गंभीर आणि खेदजनक असेल, यात शंका नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे यामध्ये खरे कर्ममार्गी, धर्ममार्गी, ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी जन हे हळू हळू सापडण्यास थोडे होत जातील. यामध्येसुद्धा खरे ज्ञानी व धर्मज्ञ ओळखणं हे कठीण असेल.  कारण कलियुगात कलीचा प्रभाव असणारे व संधीचा गैरफायदा घेणारे जन, जसे सर्वच क्षेत्रात असतील, तसेच या क्षेत्रातसुद्धा असतीलच. ज्यांची भ्रष्ट मती, अडलेल्या जनांना नाडून, आपला स्वार्थ, हेतू व लाभ साध्य करणं हाच असेल. अश्या पाखंडी लोकांमुळे धर्ममार्गावर निस्वार्थीपणे चालणारे जनसाधरण त्रस्त होऊन, चुका करण्याची शक्यता असेल. ज्याचा लाभ पुन्हा अश्या ढोंगी व दांभिक लोकांना होईल.  एकूणच काय तर सर्वच क्षेत्रातील स्वार्थ, दंभ, ढोंग, अप्पलपोटे पणा सर्वत्र, आप...

भोग आणि ईश्वर ३८४

भोग आणि ईश्वर  ३८४ कलीचं कथन सर्व श्रोतृवर्ग शांत चित्ताने, पण दिगमूढ होऊन ऐकत होता. सद्गुरुकृपेचा महिमा कलीकडून जाणून घेतल्या नंतर, समस्त सभागृह याबद्दल अजून ऐकण्यास उत्सुक होता. सभागृहाची ही मनःस्थिती जाणून श्रीब्रह्मदेवांनी कथन करण्यास आरंभ केला. हे कली यावर अजून विस्ताराने जाणण्याची समस्तांची इच्छा आहे. त्यामुळे आपण कृपेकरून यावर अधिक विस्ताराने कथन करावे, अशी मी विनंती करतो.  कली पुढे सांगू लागला. मुळात हे सद्गुरुतत्व कामधेनू सम, या भूतलावर, कलियुगाच्या अंतापर्यंत, आपला कृपेचा ओघ, आपल्या साधक व हरिभक्तांवर प्रभावित ठेवेल. म्हणजे जे साधक गुरुभक्तीत आणि गुरूसाधनेत लीन राहून, भौतिक सुखा साठी नव्हे तर आत्मिक उन्नती साठी रत असतील, त्यांना तर  ही गुरुकृपा साध्य होईल. परंतु जे भक्त हरीची वा परम ईश्वराची भक्ती करण्यात मग्न आहेत, त्यांना शोधत, त्यांना योग्य मार्गावर आणून, त्यांना आत्मज्ञान देऊन, सदगतीप्रत नेण्याचं कार्य हेच सद्गुरुतत्व करेल.  यामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे, जे आपल्या संचिता नुसार प्राप्त भोग वा उपभोग यांनी, अतिदुःखात वा अतिसुखात निमग्न होऊन, मात्र भौतिक ...

भोग आणि ईश्वर ३८३

भोग आणि ईश्वर  ३८३  कलीच्या, कलियुगातील भयंकर उत्पादांच्या नुसत्या कल्पनेने सृष्टीरचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित सर्वजण अचंबित व भयकंपित झाले होते. कलीने आपले कथन पुढे सुरू ठेवले.  उत्तेजकता हाच सामूहिक मूलमंत्र होईल. काळानुरूप व हळूहळू अग्रेषित होत जाणारा हा प्रवाह सामूहिक स्वरूप धारण करत जाईल. थोर वृद्ध वयस्कर व अनुभवी लोकांना बाजूला सारण्यात येईल. प्रत्येक एकेका पिढीनंतर अहं स्व व अहंकार हा दृढ होत जाईल. निर्जीव वस्तूंप्रमाणे सजीव गोष्टीसुद्धा तुच्छ व त्याज्य ठरवण्यात येतील. किंबहुना प्राणी व मानव यांच्यातील फक्त देहाचे भेद शिल्लक राहतील. स्वतंत्रपणा हा स्थायीभाव होईल. आज्ञापालन व आज्ञाधारकपणा हा सद्गुण मनातून हद्दपार होऊन, त्याची जागा अहंकार अपमान, तिरस्कार व तुच्छता घेईल.  अहंकार इतका पराकोटीला जाईल की, त्या नादात स्वतःला किंवा दुसऱ्याला संपवणं, माणूस सहज सध्या करेल. मानवी मन हे विचित्र गुंता होऊन जाईल. सरळ साध्या निरलस निरपेक्ष या स्वभावाच्या माणसांची वानवा होईल. सर्व प्रकारच्या हत्या या सहजी करायला मानवी मन निर्ढावेल. कोणतीही बंधन व त्यांच्या मर्यादा यांची जाण...

भोग आणि ईश्वर ३८२

भोग आणि ईश्वर  ३८२  कली ब्रह्मदेवांच्या पृच्छेनुसार, आपलं कथन पुढे सुरू ठेवून सांगू लागला  पण माझ्या प्रभावामुळे लोकांना सर्व मोह लोभ होणार असल्यामुळे, बहुतांश लोक, सर्व प्रकारे म्हणजेच भौतिक व आत्मिक दृष्टीने अशुद्ध व विकारग्रस्त होत जातील. कारण मुख माध्यमच असं आहे.माझ्या प्रभावाने, जीवनात संस्कृतीत वर्तणुकीत विचारात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. जगण्याची परिमाणं, प्रमाणं माध्यमं, दृष्टी व दृष्टिकोन, संस्कृती यात कल्पनातीत परिवर्तन होईल.  त्यामुळे अनेक प्रकारचे मोह व प्रलोभनं हे सर्वसामान्य मानवाला सहजी प्राप्त होईल. धनसंपत्तीला अति व अवास्तव महत्व प्राप्त होईल. मद्य मादकता व मंचक  यांचा प्रभाव अमर्यादित वाढेल. जिव्हेच्या जोरावर खाणं पिणं यांच्या सवयी, वेळा व मर्यादा यांचा कोणताही धरबंध उरणार नाही. याच प्रभावातून पुढे भ्रष्ट विचार आचार उच्चार, उपचार होऊन, यामध्ये न अडकलेला पथभ्रष्ट समजला जाईल. अश्या संयमात व मर्यादेत राहणाऱ्यांना नियमबाह्य ठरवलं जाईल आणि असे जन हे चेष्टेचा, थट्टेचा व टवाळीचा विषय होतील.  अनेकविध  मार्गानी धनप्राप्ती होईल. यामध्ये अवैध म...

भोग आणि ईश्वर ३८१

भोग आणि ईश्वर  ३८१  यावर ब्रह्मदेवांनी विचारलं, पण हे लिंग व जिव्हा हातात धरण्याचं प्रयोजन काय आणि हे कली तुझ्या कार्यकाळा तील या युगात कोणीही या प्रभावातून वाचणार नाही का आणि धर्म न्याय नीती या मार्गावर चालणारे खरे भक्त कसे काय या प्रभावातून वाचू शकतील.  यावर कलीने उत्तर दिलं  श्रीब्रम्हाजी आपल्या प्रश्नातच आपलं उत्तर दडलेलं आहे. ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की, सरळ न बोलता तिरकस बोलणं, विनम्रतेचा अभाव असणं, हे कलियुगातील दुर्गुण बहुतेक इथूनच सुरू झाले आहेत. कलियुगातील सज्जन, चरित्रवान मानवाची स्थिती काय असेल, याची कल्पना करून,  ते मनोमन थोडे दुःखी झाले. पण तरीही आपली सात्विकता न सोडता ते म्हणाले.  हे कली तूच जर स्पष्ट करून सांगितलेस तर सर्वांना समजण्यास सोप्प जाईल, असं मला वाटतं.  श्रीब्रह्मदेवांच्या या कथनावर कुत्सितपणे हसून कली म्हणाला  माझ्या त्या कृतीचा अर्थ असा आहे श्रीब्रम्हाजी की, ज्यांना आपलं तोंड अर्थात भाव , बोलणं, क्रोधाचं प्रकटी करण, मोहवष व विकारवश बोलून जाणं, हलक्या कानाने ऐकून, विचार न करता, बोलून जाणं, उदरभरण अर्थात अन्नग्रहण या सर...

भोग आणि ईश्वर ३८०

भोग आणि ईश्वर  ३८०  खरंतर कलियुगातील परिस्थिती ही इतर तीन युगातील परिस्थितीहून भिन्न आहे अशातला भाग नाही. सुरासूर संग्राम, चांगल्या वाईटाची लढाई हा युगानुयुगे चालू असलेला संघर्ष आहे. पण प्रत्येक युगागणिक यात होत असलेला बदल हा भागवंतांसाठी  चिंतेचा मोठा विषय होता, आहे आणि असेल. याचं महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या तीन युगात असलेली ही भिन्न देहातील लढाई या युगात एकाच देहात सूर व असुर रूप धारण करून आली आहे.  आतापर्यंतच्या युगात वेगवेगळे असलेले सुष्ट व दुष्ट असे हे दोन गुण, एकाच देहातील चित्तात विराजित होऊन आले आहेत. हाच या युगातील कलीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे विकारांना वश होऊन, त्यांच्या विळख्यात अडकताना, ते तटस्थपणे निरखून त्यावर नियंत्रण मिळवणं हे खूप मोठं कसब आत्मसात असणं आवश्यक आहे. यात भलेभले अनियंत्रित होऊन, मायेसोबत कलीच्या फेऱ्यात कधी अडकतात त्यांचं त्यांनाही कळत नाही.  याबद्दल पुराणातील एक गोष्ट आठवते. सृष्टीच्या आरंभी, एकदा स्वर्गात ब्रह्मदेवांच्या सभागृहात, सर्व सुरगण, यक्ष, गंधर्व आणि इंद्रादी देव उपस्थित असताना, प्रत्येक युगाला आपली महती सां...

भोग आणि ईश्वर ३७९

भोग आणि ईश्वर  ३७९  भगवंत हृदयातून पाझरणाऱ्या प्रेममय लहरी प्राप्त करून, ईश्वरी कृपेच्या छायेचा लाभ घेण्याचा अधिकार, सर्व जीवांना आहे, अगदी सर्व जीवांना. प्रभू आपल्या कृपाप्रसादाने प्रत्येक जीवाला जीवनमुक्त  करण्यासाठी अत्यंत आतुर आहेत आणि सदैव असतात. प्रश्न त्या कृपेच्या झऱ्यात न्हाऊन निघण्यासाठी जीव आतुर असणं आवश्यक आहे. ती आत्मीयता, ती कळकळ, ती जाणीव,जीवांच्या हृदयात जागृत होणं आवश्यक आहे. ती जागृतता येण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात, हे ध्यानात राहुद्या.  याचसाठी, अत्यंत कृपाळू ईश्वराने, जो जीव या मार्गाकडे वाटचाल करून, मार्गक्रमण करेल, त्या प्रत्येकाला, आत्म साक्षात्कार देऊन, आत्मसंतुष्ट करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. हे विविध वेळी, विविध काळी आणि विविध उदाहरणं व शास्त्र पुराणं यातून अनेकदा सांगितलेलं आत्मज्ञान पुन्हा एकदा कलियुगाच्या वेशीवर व द्वापार युगाच्या समाप्तीच्या काही काळ आधी, अर्जुनाला व महाभारत युद्धाच्या समारंगणाला निमित्त करून व साक्षी ठेवून, स्वमुखे कथन केलं.  याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे कलियुगात निर्माण होणारी भ्रांत, संशय, भ्रष्ट व्यवस्थ...

भोग आणि ईश्वर ३७८

भोग आणि ईश्वर  ३७८  खरतर एखाद्या आदर्शाला शरण गेलं की काम पूर्ण झालं असं म्हटलं जातं. पण त्याने काय साध्य होतं. तर आपण आपल्यातील अहंकार, गर्व मोह क्रोध काम इत्यादींना नियंत्रीत करू शकतो. कसं याकडे आपण आता वळूया. मुळात माणसाचं मन हे अतिचंचल अवकाश आहे. अवकाश म्हटलं की त्याला अथांगता व विशालता ओघानेच आली. अश्या या विशाल अवकाशात एखादी लकेर वा नाद किंवा आसूड चटकन घुमून आपल्या अस्तित्वाने पूर्ण अवकाश व्यापून टाकतो.  याचं कारण की, ते अवकाश रिक्त असतं. पण मनाचं तसं नाही. कारण ते रिक्त नसून सतत प्रवाही आहे. सतत वाहत राहणं हा त्याचा स्थायीभाव आहे. खरतर स्थायी म्हणजे स्थिर किंवा static पण इथे तर चंचलता हा स्थायी म्हणजे स्थिरभाव आहे. मुळात हेच एक विचित्र कोडं आहे.  बरं अश्या या चंचलतेला अविचार, क्रोध अविवेक अशी अनेक मित्रमंडळी असतील तर , मग काय अश्या देहाला अनेक व्यापातून जावंच लागतं. पण मग अश्या जन्मो जन्मी फिरत असलेल्या व कोणताही ठावठिकाणा माहीत नसलेल्या आणि कर्माचा गुंता करून ठेवलेल्या सर्व सामान्य जीवाला फक्त जन्म मृत्यू या चक्रातून फिरत राहणं हा एकच पर्याय उरतो का.  वा...

भोग आणि ईश्वर ३७७

भोग आणि ईश्वर  ३७७  खरंतर मनाला नियंत्रणात आणून त्याद्वारे त्या मनाला शुद्ध करून त्यातून आत्मानंद मिळवण्याकडे वाटचाल करू शकतो. ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्यातून जाण्या साठी, काही काळ ते काही जन्म जाऊच शकतात. पण मग या मार्गावर चालता कामा नये का. कारण अर्धवट राहून मन खट्टू होऊ शकतं किंवा मन नियंत्रणात येण्या ऐवजी अजून अनियंत्रित व अनियमित होऊ शकतं.  त्यामुळे  या प्रक्रियेत काही साध्य होत असतानाच देह नष्ट झाला तर काय अशी एक शंका मनात येऊन, माणूस प्रयत्नच करणार नाही, हे देखील घडू शकतं. कारण आधी मन शांत करून, त्याला शुद्धीप्रक्रियेतून जाऊ द्यायचं, हा एक योग आहे. योग म्हटलं की, त्याची नीती, त्याचे नियम, त्या नियमांचं पालन हे सर्व ओघानेच आलं आणि त्यासोबत आली, त्यावर नियमित वाटचाल. या सर्व प्रक्रियेतून जाताना मन पूर्ण नियंत्रणात राहूनही, पूर्ण क्षमतेने काम करत राहणं अत्यंत आवश्यक आहे.  म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग हा नीतीनियम पाळून, कठोर तप योग याग करून, साचेबद्ध आहे का. धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांना प्राप्त करण्यासाठी, नीतिनियम, शास्त्रवचनं इत्यादी पा...

भोग आणि ईश्वर ३७६

भोग आणि ईश्वर  ३७६  चित्तशुद्धीसाठी काय आवश्यक आहे,त्याबद्दल विस्तृत पणे चर्चा करण्याआधी, मुळात चित्ताची शुद्धता का साधायची, यावर जरा चर्चा करूया. जेणेकरून उद्देश वा ध्येय लक्षात आलं की, त्या दृष्टीने मार्ग शोधायला आणि त्यावर मार्गक्रमण करायला, मनाची तयारी होऊ शकेल. ईश्वरी तत्व, निर्गुणरूपात किंवा सगुणात, शुद्ध आणि गुणरहीत आहे. त्यामुळे, त्या तत्वाशी एकरूप होण्या साठी, त्याच पातळीवरील शुद्धता साधणं आवश्यक आहे.  अशी शुद्धता गुणातीत वृत्ती धारण करून, आत्म तत्वाला शुद्ध करणं, हे महत्वाचं आहे.  मन ही एकच गोष्ट आत्म्याशी निगडित आहे. आत्म्याची शुद्धता साधण्यासाठी, मनाची किंवा चित्ताची शुद्धता घडणं,ही, म्हणूनच सर्वप्रथम पायरी आहे. यासाठीच, चित्तशुद्धी ही आधी साधून, मग भगवतमार्गावर मार्ग क्रमण करणं, हे श्रेयस्कर आहे. अशी शुद्धता साधण्या साठी, अनेकानेक उपाय अनेकांनी सांगितले आहेत.  त्यासाठी प्रथम विषयाची आस, ओढ, मोह हे सर्व त्यागणं हा सर्वात आधीचा उपाय अथवा सर्वात आधीची पायरी आहे. यासाठीची सुरवात कशी करावी, तर सर्वात प्रथम, दुसऱ्यातील दोष पाहणं सोडून दिलं पाहिजे. कारण मा...

भोग आणि ईश्वर ३७५

भोग आणि ईश्वर  ३७५  चित्तशुद्धीसाठी महत्वाचं आहे निर्विषयी होणं म्हणजेच विषयरहित होणं. विषय म्हणजे फक्त वासना नव्हे तर, सर्व प्रकारच्या विकारातून मनाला बाहेर काढून, एका ध्येयावर त्याला केंद्रित करून, आत्ममार्गी होणं. देहाची शुद्धता ही जितकी महत्वाची आहे, तितकीच किंबहुना त्यापेक्षाही महत्वाची मनाची शुद्धता गरजेची आहे.  विषयांची मनाला असलेली ओढ आणि वेगवेगळ्या भाव भावनेत मनाचं गुंतणं हे संसाराच्या वाटेवर कदाचित उत्तम लक्षण मानलं गेलं, तरी पारमार्थिक किंवा ईश्वरी मार्गावर मन असं विषयात, भावनेत वा समोर येणाऱ्या सर्व प्रकारच्या लहरींमध्ये गुंतत राहणं गैर आहे.  पारमार्थिक भाषेत ही प्रलोभनं आहेत. कर्मफलाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी, ईश्वराने स्वतः सांगितलेला उत्तम मार्ग म्हणजे फलाशा सोडून देणं. म्हणजे कर्म तर करायचं पण त्यातून प्राप्त होणाऱ्या किंवा मिळणाऱ्या फलातून मनाला बाहेर काढायचं. पण म्हणजे नक्की काय, हा प्रश्न उरतोच. असं खूपवेळा होतं की, एखादी संज्ञा वा व्याख्या म्हणायला फार सोपी वाटते.  पण त्याचा वास्तविक अर्थ समजत नाही. कर्म करून त्यातील फलावरील हक्क सोडून ...