Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २९ व अंतिम

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २९ व अंतिम  || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |  रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७|| पंधरा श्लोकात मांडलेलं मारुतीस्तोत्र. म्हणजे तेरा श्लोकात स्तोत्र आणि दोन श्लोकात फलश्रुती सांगून समर्थ सोळाव्या श्लोकात त्याचं पठण कसं करावं हे संख्या चंद्रकळा गुणे यात पद्धत सांगून समाप्तीच्या श्लोकात हनुमंताचं कौतुक करणारे तीन सुंदर अलंकारिक शब्द वापरतात.  रामदासी अग्रगण्यू. अर्थात रामाच्या दासांमध्ये म्हणजेच रामाच्या भक्तगण, साधक, रामाला श्रद्धेने पुजणाऱ्या भजणाऱ्या जनांमध्ये अग्रणी अर्थात अग्रेसर असणारा. म्हणजेच रामभक्तां मध्ये श्रेष्ठ असणारा. ही उपाधी समर्थ नक्कीच हनुमंताचं संपूर्ण जीवनकार्य पाहून आणि अभ्यासून जाणीवपूर्वक देतात. हनुमंत हा श्रीरामांचा दास, भक्त, सखा, भरतासम, हृदयस्थ, सर्वात जवळचा जणू आत्माच आहे. इतकं विलक्षण एकरूप हनुमंताने स्वतःला श्रीरामामध्ये सामावून घेतलंय.  इतकी श्रेष्ठ भक्ती रोमारोमात रामनाम भिनवून सिद्ध केली आहे. म्हणून रामदासी अग्रगण्यू. कपिकुळासि मंडणू. हनुमंत हा...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २८

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २८ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |  दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||   या स्तोत्राच्या पठाणाचा दृढसंकल्प संदेहरहित भावाने मनात योजून तो कार्यान्वित करावा. कश्या प्रमाणात याबद्दल माझा तर्क पुढील प्रमाणे. संख्या चंद्रकळा गुणे. याचं मी वाचलेलं विवेचन असं आहे की,  शुक्ल पक्षात  चंद्राची जशी प्रतिपदा ते पौर्णिमा कला वाढत जाते, तशी या स्तोत्रपठणाने साधकाची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. पण यातून दुसरा अर्थ असा निघू शकतो की कृष्ण पक्षात जश्या चंद्राच्या कला कमी कमी होत जातात त्याप्रमाणे अधोगती होऊ शकते का?. समर्थांनी फक्त उपमा देण्यासाठी या दृष्टांताचा वापर केला असेल हे संभवत नाही.  म्हणजे मग नक्की काय अर्थ अभिप्रेत असेल, याचं संशोधन करूया. यात संख्या शब्द आला आहे आणि संख्या  म्हणजे गणना, मोजणी, अर्थात किती वेळा, असा अर्थ अभिप्रेत आहे असा माझा तर्क आहे. गुणे म्हणजे गुणोत्तरीत उत्तर अर्थात गुणाकार करणे. कसा तर चंद्राच्या जशा कला आहेत त्याप्रमाणे गुणोत्तर काढून. अर्थातच ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २७

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २७ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |  दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||   अश्या या भीमरूपी वज्र हनुमंताच्या स्तोत्रात त्याचं गुण व कार्यवर्णन करून समर्थांनी हनुमंताच्या चरणी लीन होऊन प्रार्थना करायला सांगितली. या स्तोत्राच्या पठणाची फलश्रुती १४ व १५ या श्लोकात सांगून, १६व्या श्लोकात एक गणित समर्थ मांडतात असा माझा अंदाज वा माझं अनुमान आहे. बघूया. हे पंधरा श्लोकी मारुतीस्तोत्र म्हणण्याचा संकल्प मनात धरा. हे धरा म्हणजे हे जनहो ह्या पंधरा श्लोकी मारुतीस्तोत्राच्या पठणाचा संकल्प मनात धरा, योजा आणि कृतीत आणा. असा अर्थ या पहिल्या भागाचा आहे. हे धरा पंधरा श्लोकी.  आता पुढचा भाग बघूया. लाभली शोभली बरी. बरी म्हणजे उत्तम, अत्युत्तम, चांगलं. पूर्वीच्या काळी स्तुती ही बेतानेच केली जायची. उद्देश हा की फार स्तुतीने सदर व्यक्ती उगीचच वर चढून जाऊ नये आणि त्या व्यक्तीचे पाय जमिनीवर रहावेत आणि त्याला पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी.  उद्देश उत्तम असायचा. म्हणून बरे दिसताय आज, असं पूर्वी म्ह...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २६

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २६ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |  पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४|| भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |  नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५|| आत्म्याच्या अनुभूतीद्वारे स्व-रूपाचा विकास होऊन, विकारांचं उच्चाटन झाल्यानन्तर तो मनुष्य बौद्धिक विकास साधेल. हे जितक्या कमी वयात घडेल तितकी मारुतीस्तोत्रा द्वारे शरीर, बुद्धी  यांची कार्यक्षमता वाढून प्रबळ व शुद्ध मनाची अनुभूती झाल्यावर आत्म्याची उन्नती साधता येईल. जीवन कृतकृत्य होईल. त्यानंतर असा जीव बौद्धिक विकासाद्वारे उत्तम विद्या प्राप्त करून धनधान्य, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त करेल.  पशुधन वाढीस लागेल, पुत्र पौत्र यांचाही उद्धार त्याद्वारे साधता येईल. समग्रही मध्ये इतर सर्व विकास असा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे. इतर सर्व म्हणजे आर्थिक, सामाजिक इत्यादी. यासाठी खूप लहान वयात मुलांना या स्तोत्राच्या पठणाची सवय लावणं गरजेचं आहे. कारण जे लाभ या स्तोत्राद्वारे अपेक्षित आहेत, ते आध्यात्मिक नसून, शास्त्रीय, वैज्ञानिक स्वरूपाच...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २४

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २४ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |  वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३|| आधीच्या दोन भागात या एका श्लोकाचं विस्तृत विवेचन पाहिलं. आता थोडा इतर काही मुद्द्यांचा अभ्यास करूया. रामदासांच्या या एका स्तोत्रात अनेक गणितं व गुह्य ज्ञान अर्थात विज्ञान दडलं आहे असा माझा कयास आहे. कदाचित आपण फक्त अध्यात्मिक विवेचनात समर्थांचा मूळ उद्देश गेल्या चार शतकात मागे ठेवलाय असा माझा दावा आहे.  जरी अध्यात्म असेल तरी ते योग, कुंडलीनी जागृती, खगोलीय ज्ञान अश्या शास्त्रशुद्ध गोष्टी मांडण्यासाठी समर्थांनी या स्तोत्राचा संकल्प केला असावा. मुळात समग्र समर्थ आणि त्यांचं लिखाण व कार्य डोळ्यासमोर आणले तर दासबोध, मनोबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक हे सर्व वाङ्मय साधारण मानवाला मनाच्या माध्यमातून प्रगत , सुसंस्कृत, सुसंस्कारित करण्यासाठी लिहिलेले समर्थ, मारुतीस्तोत्र फक्त अध्यात्मिक पातळीवर लिहितील हे पटत नाही. मनाला, आत्म्याला संस्कार करता करता तेच समर्थ शक्ती, युक्ती, बुद्धी, चैतन्य, निरागसता, दास्यत्वाची अत...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २५

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २५ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |  वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३|| धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |  पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४|| खगोलीय ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि आध्यत्मिक ज्ञानाचा असा सर्वप्रकारचा उत्तम स्वयंपाक समर्थांनी मारुतीस्तोत्र रुपात मांडलाय,  हे तर आतापर्यंत आपल्याला लक्षात आलं असेलच. त्यापासून थोडं बाजूला होऊ.  मारुतीस्तोत्र म्हणजे काय तर, आपलं सर्वांचं आराध्य असलेला हनुमंत जन्मतः सूर्याला गिळंकृत करून आपल्या शक्तीची चुणूक दाखवून पुढील आयुष्य काय असेल याचाच प्रत्यय जगताला देता झाला, याची महती आहे. अनेक दिव्य शक्ती प्राप्त हनुमंत शून्यमंडळ अर्थात गुरुत्वाचा परीघ भेदून उत्तरेच्या बाजूने पृथ्वीच्या परिघाबाहेर गेला, असा याश्लोकाचा सरळ अर्थ आहे. पण यात हे नक्कीच सिद्ध होतं की, समर्थांना, शून्यमंडळ माहीत असल्याने गुरुत्वाकर्षण नक्कीच माहीत होतं. अर्थात यात हनुमंताची महती अजून द्विगुणित होते. पृथ्वीकक्षेबाहेर जाऊन सुर्यापर्यंत झेपा...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २३

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २३ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |  वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३|| तर अश्या प्रकारची तयारी करून एखादं क्षेपणास्त्र झेपावतं त्यांनतर त्याचं उड्डाण , प्रयाण, प्रवास आणि पोहोचणे या क्रिया घडतात. ज्या हनुमंताच्या बाबत क्षणात म्हणजे जन्मतः काही मिनिटात घडल्या आणि हनुमंत सूर्याच्या दिशेने झेपावला. कसलं अंतराळवीराचं प्रशिक्षण नाही, तसला पोशाख नाही, यानाची, क्षेपणास्त्राची गरज नाही, स्वयंसिद्ध हनुमंत सूर्याचं फळ खाण्याच्या उद्देशाने झेपावला.   इथे अजून एक गोष्ट दडलेली दिसते, ती म्हणजे, अनेक अतर्क्य गोष्टी कुंडलिनी जागृतीमुळे शक्य असतात. याची प्रचिती म्हणजे जन्मतः सूर्याकडे झेपावणे. मला स्वतःला यात कोणतेही खगोलीय ज्ञान, प्रशिक्षण न घेतलेले एक बालक जन्मतः अवकाशाचा पडदा भेदून सूर्यमालेत प्रवेश करते आणि सूर्य, ज्याकडे आपण बघूही शकत नाही ठराविक अंतरापलीकडे, त्याकडे झेपावून, त्याला आपल्या स्थानापासून, (जे स्थान स्वयंसिद्ध आहे आणि स्वकेंद्रित असा सूर्य हा तारा आहे), हलवून गिळंकृत ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २२

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २२ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |  तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२|| आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |  वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३|| हनुमंताची महती, शक्ती याबद्दल कथन करताना उदाहरण देऊन समर्थ सांगतात की हनुमंत त्याचे पुच्छ अर्थात शेपूट जे वज्रासम ते इतकं मोठं करू शकत असे की, त्याच्या वेटोळ्याने तो संपूर्ण ब्रह्मांडाभोवती त्या शेपटाने वेढा घालू शकतो. हनुमंताचं पुच्छसुद्धा कसं आहे की, वज्राची ताकद त्यामध्ये सामावली आहे. याचा प्रत्यय सीताशोधनासाठी लंकेत गेला असताना आपल्या पुछाच्या ताकदीची प्रचिती हनुमंताने रावणासह समस्त असुरांना दिली.  यात अजून एक गोष्ट मला आढळते ती म्हणजे माणसाची कुंडलिनी शक्ती माकडहाडाच्या खालीच वेटोळे करून दडलेली असते आणि ती ज्यावेळी जागृत होते त्यावेळी त्यातून जे दडलेलं ज्ञान सदर व्यक्तीस प्राप्त होतं ते समस्त ब्रह्मांडास व्यापून उरतं. हाच कुंडलिनीच्या शेपटीचा ब्रम्हाडाला गवसणी घालणारा विळखा समर्थांना अभिप्रेत नसेल ना. बा...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २१

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २१ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |  तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११|| अकराव्या श्लोकात खूप ज्ञानभांडार आहे, असं मला स्वतःला वाटतं. मुळात अणू ही संकल्पनाच ज्यावेळी युरोपात अस्तित्वात नव्हती आणि एकोणिसाव्या शतकात ही कल्पना प्रथम मांडली गेली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही संकल्पना मांडली गेली की, अणूचा विस्फोट घडवून त्यातून ऊर्जा व वीजनिर्मिती होऊ शकते. अणूचं महत्व लक्षात आल्यानन्तर मानवाचा अनेक क्षेत्रात विस्तार झाला. अर्थात चुकीच्या वापराने होणारा विध्वंससुद्धा पाहायला मिळाला.  या व्यतिरिक्त अजून एक संकल्पना ज्यावर शास्त्रज्ञ अजूनही काम करत आहेत. ती कल्पना म्हणजे अणूच्या वा एखाद्या कणाच्या विस्फोटातून समस्त ब्रह्मांड निर्मिती झाली आहे. त्या कणाला त्यांनी देवकण अशी संज्ञा देखील दिली. अश्या संकल्पनेला मानणाऱ्या काही काही गोष्टी पुराणात, प्राचीन ते अर्वाचीन इतिहासात सापडतात. यात मुख्यतः ऋषीमुनी, वेद यातील दाखले उदाहरणार्थ कृष्णविवरे, ब्रह्मांड या फक्त संज्ञा नव्हत्या तर याबाबत बरी...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २०

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २० || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||   आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |  मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०|| आपला देह महाकाय करत, वज्रबाहूंच्या बळाने आणि रावण,  राक्षस , असुर, सीतामातेला छलकपट करून पळवून नेलं, त्याचा प्रभूंना झालेला त्रास आणि लक्ष्मणाची मूर्च्छा आणि आपल्या हाती उरलेला वेळ यांच्या आठवाने क्रोधयुक्त अंतःकरणाने  हनुमंताने क्षणार्धात मंदार पर्वतासम विराट असा द्रोणागिरी पर्वत लीलया उचलून डाव्या  हातात तोलून धरला.  उजव्या हातात गदा धरून जय श्रीरामच्या घोषात पुन्हा दक्षिणेकडे उड्डाण करत लंकेच्या दिशेने प्रयाण केले.  शांततेच्या काळात व पर्वात शांत राहून रामनाम जप हाच जीवन उद्देश मानणारा हनुमंत युद्धजन्य परिस्थितीत आणि प्रभू आदेशान्वये आपल्या अंतःकरणातील  क्रोधाग्नि असुरांवर दानवांवर आगीप्रमाणे बरसत होता. म्हणून यमदूतसुद्धा या रुपाने भयभीत झाले होते. तोच क्रोध पर्वत उचलताना कामी आला. आता हा भीमपराक्रम आताच्या माजमोपात मांडता येतो का बघूया. श्रीलंका ते हिमाचल हवाई अंतर साधारण २४०० कि. म...

गुपकर गँगमागची एक कारणमीमांसा !!!

गुपकर गँगमागची एक कारणमीमांसा !!!  The Jammu & Kashmir State Land (Vesting of Ownership to the Occupants) Act, 2001 अर्थात रोशनी ऍक्ट हा कायदा गव्हर्नर जनरल सर्वश्री मनोज सिन्हाजी यांनी, नुकताच,  ऑक्टोबर 2020 मध्ये आलेल्या High Court ऑर्डर नन्तर, पूर्वलक्षी प्रभावाने रद्द ठरवला आहे. या आदेशामध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्याही उच्चपदस्थ वा मंत्रीपदावरील तत्कालीन राजकारण्याला सोडण्यात येणार नाही. ज्याप्रकारे फारूख, उमर आणि मेहबूबा यांना नजरकैदेत ठेवलं होतं त्यावरून हा आदेश, कठोरपणे,  राबवण्यात येईल, हा विश्वास आहे.  जम्मू काश्मीर मधील या 25,000 करोडच्या घोटाळ्याचा पर्दाफाश उच्च न्यायालयाच्या निकालानंतर झाला. आता या निकालामुळे हे सर्व प्रकरण सी बी आय कडे कोर्ट देखरेखीखाली सुपूर्द करण्यात आलंय. या निकालाला पूर्ण स्वरूप देण्यासाठी गव्हर्नर जनरल साहेबांनी मुख्य सचिवांना आदेश देऊन या अनधिकृत ताब्यातील सर्व जमीन ताबाधारकांना हुसकावून सहा महिन्यांच्या आत सरकारी ताब्यात घेण्याचे  आदेश द्यायला लावलेत. परंतु या षडयंत्राअंतर्गत 20 लाख कनाल, (उत्तरेत जागा मोजण्याची पद्धत. एक ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १९

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १९ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |  चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८|| कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |  मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९|| सडपातळू कसा तर त्याच अंग चपळ आहे.या सडपातळ शब्दाचा वापर समर्थानी तुलना करण्यासाठी वापरला आहे. सहसा सडपातळ व्यक्ती ही स्थूल व्यक्तीपेक्षा चपळ असते म्हणजेच हनुमंताचं वर्णन जे समर्थांनी केलं आहे त्याचा मतितार्थ नेटका आणि अंगापिंडाने भलामोठा असूनही चपळता इतकी की त्या चपळतेपुढे विद्युल्लतेची चपळता देखील कमीच भासेल.  या वर्णनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपण समजतो तसा सडपातळ हनुमंत नसून, नेटका अंगाने विशाल असूनही एखाद्या सडपातळ व्यक्तिप्रमाणे चपळ आहे. बर ही चपळता इतकी की त्यापुढे गगनात क्षणभरात लाखो योजने अंतर पार करून जाणाऱ्या निमिषात आपलं तेज व शक्ती प्रकट करणाऱ्या विजेप्रमाणे चपळ असा हा हनुमंत आहे. म्हणून त्याच्यासमोर मोठे मोठे असुर दानव राक्षस इत्यादी क्षणभर सुद्धा टिकू शकत नाहीत.  प्राणदाता शब्द पाहताना द्रोणागिरी प...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १८

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १८ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |  चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८|| एखादी व्यक्ती नेटकी असते म्हणजे नक्की कशी. तर टापटीप, स्वच्छ, कपडे, जे असतील ते व्यवस्थित स्वच्छ धुतलेले, शिस्तशीर, वक्तशीर, मनाने प्रसन्न, खिन्न उदास कधीही दिसणार नाही,  कधीही जवळपास अशी व्यक्ती आली तरी मन प्रफुल्लित आणि ताजतवानं होतं. अश्या व्यक्तीच्या कामात सुद्धा नेटकेपणा हा गुण आणि परिणाम दिसून येतो. अशी माणसं फार अघळपघळ बोलणार नाहीत, उगाच इथे तिथे फिरत, थांबत, तिष्ठत बसणार वा उभी राहणार नाहीत, अशी असतात.  मारुती हा नेटका म्हणजे शिस्तशीर, वक्तशीर आणि इंग्रजीत ज्याला वेल ऑर्गनाईझड म्हणतो तसा आहे. शिस्तशीर आहे म्हणूनच श्रीरामांचं सीताशोधन हे महतकार्य  हनुमंत करू शकला. वक्तशीर होता म्हणूनच संजीवनी प्रसंगी द्रोणागिरी सह ठरलेल्या वेळेत घेऊन आला. त्याचा कामाचा प्राधान्यक्रम ठरलेला होता, योजनाबद्ध पद्धतीने काम करण्याची सवय व तयारी केलेला होता. कोणत्याही कार्याला सुरवात करण्याआधी त्याबद्दल पूर्ण विचार केलेला होता आ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १७

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १७ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं |  सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७|| ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |  चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८|| किरीट म्हणजे मुकुट जो हनुमंताच्या मस्तकावर विराजित असल्याचं, आपण प्रतिमस्वरूपात नेहमी पाहतो. सुवर्णाचे मुकुट अर्थात किरीट त्याकाळी राजे राजवाडे, त्यांचे अधिकारी, प्रधान, सेनापती इत्यादीनी  घातलेले, अर्थातच प्रतिमेत, आपण पाहतो. त्याशिवाय अनेक ऐतिहासिक, पौराणिक दस्तऐवजातून वाचायला मिळतं.  इथे समर्थ किरीट हा शब्द न वापरता किरीटी हा शब्द वापरतात. त्याचा मतितार्थ असा आहे की किरीटावर. याचा संदर्भ अर्थातच पुढच्या शब्दाला धरून आहे. किरीटावर कुंडले म्हणजे कानात पुरुषांनी घालायचा दागिना. ज्याची घडण रेखीव पण दमदार आणि त्या त्या पुरुषाची शरीरसंपदा, शौर्य, पराक्रम, समाजातील स्थान, वर्णव्यवस्था या सर्वांवर अवलंबून असायची.  हनुमंताने मस्तकी किरीट आणि त्या किरीटावर बरी म्हणजे शोभून दिसणारी, शोभिवंत, सुशोभित अशी कुंडलं आपल्या कानात घात...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १५

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १५ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||  ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती |  नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६|| चवदाव्या भागात एक शंका व्यक्त झाली म्हणून फक्त जाता जाता उल्लेख करतो. काळाग्नी काळरुद्राग्नी अशी द्विरुक्ती समर्थांनी का वापरली असेल.मी एकदा याचा संदर्भ वाचल्याचं आठवतंय की हे दोन यमाचे पुत्र होतेआणि अर्थातच यमदूत. म्हणून  त्यासंदर्भात समर्थ असं म्हणतात की, प्रत्यक्ष यमाचे पुत्र असलेले आणि मृत्यूचे दूत असलेले हे दोन महाभयंकर असे प्रतिनिधी काळाग्नी आणि काळरुद्राग्नीदेखील हनुमंताच्या असुरांवरील चढाईच्या पावित्र्याने भयकंपीत झाले आहेत. देखता म्हणजे पाहून.  परंतु सध्या याचा संदर्भ शोधून सापडत नव्हता म्हणून लिहिण्याचं टाळलं. समर्थांनी सहाव्या श्लोकाच्या सुरवातीलाच एक शब्द वापरला आहे, ब्रह्मांडे.  याचा खूप गहन अर्थ होतो. मुळात चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी खगोलशास्त्राचं कोणतंही ज्ञान पाश्चात्य जगतात फार प्रचलित नसताना समर्थांनी वापरलेला हा शब्द त्यांच्या अलौकिक व जगतापार ज्ञानाची कक्षा दर्शवत...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १६

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १६ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||  ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती |  नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६|| पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं |  सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७|| आपल्या विस्फारलेल्या डोळ्यात ब्रह्मांडे मावतात हे दाखवून असुरांना भयकंपित करून सोडणाऱ्या हनुमंताचा युद्धातील पवित्रा सांगताना समर्थ पुढील वर्णन करतात. आवळे दंतपंगती. शत्रूवर विशेषतः माता सीतेल्या अपहृत करून श्रीरामांना त्रस्त करून सोडणाऱ्या राक्षस, असुर व दानावांवर तुटून पडणाऱ्या हनुमंताच्या मनातील हा सर्व राग, हनुमंत  आपल्या कृतीतून व्यक्त करताना, निसर्गतः दात ओठ खाऊन आवेशात पुढे जाऊन तुटून पडतोय हेच समर्थांना सुचवायचं आहे.  प्रत्यक्ष हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर देतांना, सात्विक संताप व तामसी क्रोध यात फरक आहे हे जाणून असणारे समर्थ हनुमंताच्या रौद्र रुपाचं मात्र अचूक वर्णन करतात. ध्वजासह सैन्याच्या इतर बाजूना सांभाळत समोरून येणाऱ्या असुरांवर आवेशाने तुटून पडत, प्रत्यक्ष यमदूतांना भय वाटेल अश्या...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १४

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १४ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |  काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||   रामरावण युद्धात श्रीरामांच्या सैन्यातील ध्वजरक्षक तुकडीच्या संरक्षणासाठी सिद्ध झालेल्या हनुमंताने सदर सेनेसह ध्वजाचं रक्षण स्वशिरावर घेऊन आपल्या समर्थ वज्रबाहूंच्या साहाय्याने महाबलिष्ठ आणि महापराक्रमी राक्षस सेनेपासून त्या ध्वजाचे रक्षण तर केले. कारण कोणत्याही युद्धात ध्वज हा जणू त्या सेनेच्या नायकाच्या प्राणासमान महत्वाचा असतो. म्हणूनच त्याचं रक्षण करणाऱ्या अंगाचं अर्थात सैन्याच्या एका अंगाचं अथवा विभागाचं किंवा भागाचं रक्षण हनुमंताने प्राणपणाने केलंच. परंतु हे करत असताना प्रत्यक्ष युद्धात महत्वपूर्ण सहभाग देखील घेतला. या ध्वजरक्षणासाठी प्रसंगी आवेशाने पुढे जात, त्या दिशेने येणाऱ्या असुरांना परास्त करण्याचं अथवा रोखण्याचं कार्यदेखील हनुमंताने केलं. समस्त सैन्याच्या रक्षणार्थ आणि उत्तेजनार्थ सुग्रीव, अंगद, नल, नील जांबुवंत यांसारखे बलाढ्य आणि पराक्रमी वीर उपस्थित होते. हनुमंत देखील सैन्याच्या चहू अंगांनी द...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १३

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १३ सर्वांना दिपावलीच्या मंगलमय अर्थपूर्ण आणि हर्षदायी शुभेच्छा. ही दिपावली सर्वांचा आनंद द्विगुणित व अर्थ पंचगुणीत करणारी जावो, हीच रामरायाचरणी प्रार्थना.!!  || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४|| ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |  काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||   पावन या शब्दाचा अर्थ पवित्र शुद्ध निर्मळ स्वच्छ स्फटिका सम. मुळात पावन हा शब्द दोन शब्दांची संधि आहे, पौ आणि अन म्हणजे पावन. पौ म्हणजे पहाटेचा संधीप्रकाश आणि अन म्हणजे श्वासप्रश्वास किंवा विना. म्हणजे या विच्छेदाप्रमाणे पावन म्हणजे ज्याचा श्वासप्रश्वास हा पहाटेच्या संधीप्रकाशाप्रमाणे शुद्धस्वरूप आहे, निर्मळ आहे, तो म्हणजे पावन.  कारण पहाटेची संधीप्रकाशाची वेळ ही संपूर्ण दिवसातील सर्वात शुद्ध आणि निर्मळ वेळ मानली जाते.  त्यावेळी कोणत्याही प्रकारची अशुद्धता असत नाही. श्वासाला लाभलेली त्या हवेतील प्राणवायूची शुद्धता अंतरात्मा आनंदित करून जाते आणि सर्व दिवस तो आनंद ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ११

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ११ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३|| लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||  पातलादेवताहंता. इंद्रजित वधानंतर, रावण आता रामलक्षण यांना कशाप्रकारे परास्त करता येईल यावर विचार करत असताना, रावणाला अहिरावण आणि महिरावण या मित्रांची आठवण झाली. त्यांना त्वरित उपस्थित होण्याची आज्ञा होते. त्यांच्या सहाय्याने रावण, श्रीरामलक्ष्मण यांचं रात्रीत अपहरण करून, त्यांना पाताळात नेऊन, त्यांना कामाक्षी देवीला भल्या पहाटे बळी देण्याची योजना अहिरावण महिरावण यांनी केली आहे.  अश्या परिस्थितीत विभीषणाच्या सल्ल्यानुसार आणि त्याने सांगितलेल्या मार्गाने पाताळात जाण्यास सिद्ध झाला. सप्त लोकांमधील सर्वात खालचा तळ म्हणजे पाताळ. त्या पाताळाचे भगवान अर्थात त्या लोकाचे स्वामी अहिरावण आणि महिरावण होते. त्या दोघांना मिळालेल्या वरदानाचा मान ठेवून त्या शर्तीत राहून भगवंताचं रक्षण करत, अहिरावण महिरावण यांचा वध करून त्यांचा बळी कामाक्षी देवीला अर्पण करून,...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १२

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १२ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषिका ||४|| प्राणनाथा. मरुत अर्थात वायूदेवतेचा पुत्र असल्याकारणाने पवनपुत्र हनुमान हा जगतात श्वासोच्छ्वास रुपात सर्व अंतरात्म्यात वास करून असतो. अर्थात प्राणरूपात हनुमान या जगतात समस्त प्राणीमात्रांचं जीवन चालवतो. म्हणून जगतातील प्राणिमात्रांच्या प्राणांचा स्वामी वायूपुत्र हनुमान असल्यामुळे जगताचं चलनवलन हे हनुमंत नियंत्रित करतो. कलियुगात जगताची सुव्यवस्था हनुमंताकडे सुपूर्द केली असल्याकारणाने जगताचं जीवन हनुमान आहे. म्हणून प्राणनाथा.  हनुमंताचं अस्तित्व हे रामायण काळापासून म्हणजेच त्रेतायुगापासून असल्यामुळे समर्थ हनुमंताला पुरातना म्हणत असतील का. मुळात हनुमंताचं देहरुप अस्तित्व हे भलेही त्रेतायुगापासून असेल तरीही रुद्राचा अंश असल्याकारणाने हनुमंत हा अनादी काळापासून अस्तित्वात आहेच. त्याचं प्रकट होणं त्रेतायुगात घडलं. त्याशिवाय नुसत्या युगांचा जरी विचार केला, तरी प्रत्येक चार युगांच्या नन्तर, प्रलयाच्या पश्चात सर्व रचना पुनः निर्माण होत...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १०

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १० || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||  दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३|| सुंदरा. वास्तविक प्रथमदर्शनी या शब्दावरून समर्थ हनुमंताला उद्देशून हे विशेषण वापरत आहेत असच भासतं. किंवा हनुमंताच्या एकूण कार्यावरून त्याला समर्थ सुंदरा हे विशेषण वापरतात की काय असा एक समज होऊ शकतो, किंवा हनुमंत सुंदर आहे म्हणून तसे संबोधन समर्थांनी वापरले आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी तश्या अर्थाने विवेचन केल्याचे मीदेखील वाचले आहे.  त्यात तथ्यांश नसेल असं मी म्हणणार नाही. परंतु माझ्या अनुमानानुसार दिसण्याबद्दल समर्थ असं विशेषण वापरतील असं सकृतदर्शनी मला वाटत नाही. कारण समर्थांसारखा संत सौन्दर्य वा सुंदरता यावर लिहितील असं मला तरी वाटत नाही.  त्यामागे वाल्मिकी रामायणातील कथा अथवा कांड असून त्या अर्थाने ते हनुमंताला सुंदरा असे संबोधत आहेत असं माझं अनुमान आहे.  वास्तविक संपूर्ण रामायणात सर्व प्रकरणं किंवा भाग वाल्मीकींनी कांड या प्रकारात मांडले. जसं महाभारतात पर्व या प्रकारात त्यांना समाविष्ट करण्यात ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ९

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ९ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम ||  दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३|| रामावतार समाप्तीच्या वेळी श्रीरामांनी,  हनुमंताला कार्य सुपूर्द केलं आणि आज्ञा केली की कलियुगाच्या अंतापर्यंत तू या जगात राहशील आणि ज्या ज्यावेळी धर्मध्वजा उतरताना दिसेल, श्रद्धा भक्ती क्षीण होईल आणि लोकांचा देवावरील विश्वास ढळताना दिसेल, त्यावेळी तू येऊन या सर्वांची घडी नीट बसवशील. मारुतीने अर्थातच,  प्रभूआज्ञा शिरसावंद्य मानून, जगतात रामनामाच्या प्रसाराचा भार आपल्या शिरावर अत्यानंदाने घेतला आणि प्रत्येक काळात विविध रुपात ह्या कार्याची धुरा अनेक मार्गाने यथोचित  सांभाळली आणि पुढेही सांभाळेल. द्वापारयुगामध्ये स्वतः प्रभू पुनः श्रीकृष्ण रुपात अवतरल्या मुळे हनुमंताचं कार्य खऱ्या अर्थी कलियुगात जास्त गरजेचं आहे,  हे जाणूनच प्रभूंनी कलियुगाच्या अंतापर्यंत हनुमंताला चिरंजीवित्व दिले आहे. मुळात धर्मरक्षण हे सर्वोच्च ब्रीद प्रभूंचं. मग हनुमंताला हे कार्य देण्याचं कारण काय, हा प्रश्न उपस्थित होतोच.  याचं उत्तर हनुमं...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ८

 मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ८ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दु:खहारी, धूर्त, वैष्णवगायका ||२|| llभोळाभाव जगती जाणतो आत्माll llअवनीवर सर्वत्र जाणिजे परमात्माll.  या संकल्पनेला मानणारे भक्त साधक श्रद्धाळू हे विनाअपवाद साधे सरळ सन्मार्गी असतात.  कालच्या भागात मी मांडलेली संकल्पना वादातीत एखाद्या भगवत्भक्ताची आहे. तरीही याचा हनुमंत, मारुती स्तोत्र व  धूर्त  या शब्दाशी  काय संबंध असा प्रश्न काल बऱ्याच वाचकांना आणि साधकांना पडला असेल. म्हणूनच काल  पारंपरिक श्रद्धायुक्त व भक्तिमार्गी साधकाची, दासाची वृत्ती विषद केली आणि लेखात मुद्दाम थोडी उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  आता समर्थांकडे वळूया. त्रेतायुगात ज्यावेळी मानववृत्ती व प्रवृत्ती या सद् व सनद् मार्गावर प्रामुख्याने अग्रक्रमित होत्या, त्या काळात असुर वृत्तीशी प्रवृत्तीशी लढण्यासाठी देवपणाचा वा तत्सम दैवीशक्तींचा प्रभाव असणं गरजेचं आहे असा एक समज दृढ होता.  तो तसा समज आजही बऱ्याच प्रमाणात कायम आहे. यात एक भजन...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ७

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ७ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम जय जयराम || महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दु:खहारी, धूर्त, वैष्णवगायका ||२|| खरतर सुख या शब्दाची निश्चित व्याख्या करणं महाकठीण काम आहे. एखाद्याला महालात सुद्धा सुख मिळणार नाही आणि एखादा साध्या खोपटातसुद्धा चिरंतन सुखाची अनुभूती घेऊ शकेल. म्हणजेच व्यक्तिसापेक्ष असलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही एका निकषावर सुखाची संकल्पना वा व्याख्या करणं कठीण आहे, हे नक्की. अन्यथा सर्वात श्रीमंत माणसाला काहीही दुःख नाही हे ठामपणे सांगता आलं असतं.  मग सुख हे नक्की भौतिक गोष्टीवर अवलंबून असतं का. नाही. तरीही काही मूलभूत गरजा ज्या देहाच्या चलन वलना साठी  आवश्यक  असतात, त्या भागल्या की माणूस सुखाच्या नवनवीन संकल्पना साकारत जातो.त्यांनतर ही साखळी तयार होते,  जी अंतहीन असू शकते. म्हणूनच या सर्वात मानसिक आणि आत्मिक सुखाची मनुष्याला नितांत आवश्यकता असते. त्यावरच पुढील संचिताची शिदोरी अवलंबून असते. कारण जितकी भौतिक सुखाची भूक जास्त तितका वासनेचा जोर जास्त. तितकीच त्यामागे धाव जास्त. याच धावण्याच्या नादात आ...

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ६

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ६ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम उय जयराम || महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णवगायका ||२|| मारुतीची संपूर्ण कसोटी पाहणारा हा सर्वात कठीण प्रसंग. पार्श्वभूमी बघा.  प्रभू शोकाकुल अवस्थेत सर्व भान हरपून फक्त अश्रूमय अवस्थेत बसलेत. राजा सुग्रीव, बिभीषण यांना काही सुचत आणि सुधरत नाहीये. वैद्य सुशेणाबद्दल बिभीषण बोलले. हनुमंताने त्वरित उड्डाण करून सुशेण यांना घरासह प्रकट केलं. सुशेणाने नाडीपरिक्षेनंतर उपाय सांगितलाय. फक्त एकच औषधी वनस्पती जी हिमालयात मिळते, त्याने लक्ष्मणाचे प्राण वाचू शकतात. तीदेखील सूर्य उगवायच्या आत आणून पहिल्या किरणाआधी देता आली तरच.  प्रभूंची स्थिती अवर्णनीय आहे. भ्राता प्राण संकटात आहे, मातेचे शब्द कानी घणाचे घाव घालत आहेत. इथे या ठिकाणी फक्त माताच नव्हे तर देवी सीता देखील विचारणार आपण असताना कसं झालं हे. कार्य इतकं जोखमीचं, जणू अशक्यप्राय भासणारं.  वायूवेगाने जाऊन वनस्पती घेऊन वायूवेगाने परत येणं. अंतर लंका ते हिमालय आणि पुन्हा लंका. सुग्रीव आणि जांबुवंत सल्ला देतात हनुमंत हे कार्य करू शक...