Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

भोग आणि ईश्वर ४५५

भोग आणि ईश्वर  ४५५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जलतत्व प्रभावित व्यक्तींचा एक स्वभाव आपण बघितला की, त्यांना, स्वतःला, सहसा कुठेही सामावून घ्यायला, समस्या येत नाही. म्हणजे अश्या व्यक्ती, जलाप्रमाणेच असतात. जसा प्रवाह, मार्ग, काळ, संगत असेल त्या प्रमाणे ते, त्या त्या प्रसंगात, समूहात व साच्यात स्वतःला सावरून व सामावून घेतात. यांना सहसा क्रोध वा नैराश्य येत नाही. कारण जसा काळ तसा स्वतःमध्ये, विशेषतः स्वतःच्या आचार, विचार व उच्चारात आवश्यक बदल करण्याचं कसब, त्यांच्याकडे जलतत्व प्रभावाने आलेलं असतं.  या लोकांना समूहात सामूहिक मानसिकता व एकांतात एकाग्रता, दोन्हीही साध्य होतं.म्हणजे विचारांचा ठामपणा असूनही, आपलाच हेका न चालवता, जसं सर्वमताने ठरेल, त्यानुसार करण्याचं तंत्र यांना जन्मतः अवगत असतं. पण कधीकधी अश्या व्यक्तींना समूहात स्वत्व गमावून, असेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. अर्थात यामध्ये आपण काही गमावत आहोत किंवा आपलं काही नुकसान करून घेत आहोत, असा कोणताही भाव, यांच्या मनाला स्पर्श करत नाही.  या गोष्टीचा एक फायदा असाही आहे की, बरेचवेळा मनात येणारे, भय, निर...

भोग आणि ईश्वर ४५४

भोग आणि ईश्वर  ४५४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  प्रत्येक पंचमहाभूतरुप देहात, पाच शक्तींमधील, कोणती तरी एक किंवा अधिक शक्ती, त्या देहात, प्रारब्धवश, बलशाली असते. ती शक्ती मनाचा, बुद्धीचा आणि देहातील इंद्रियांचा ताबा, घेऊन, त्यातील मन, बुद्धी याना आयुष्यभर ग्रस्त करून, त्या मानवाचा स्वभाव वा वृत्ती ठरवते. म्हणून एखादी व्यक्ती लहानपणापासून शांत, एखादी धीरगंभीर, एखादी व्यक्ती उथळ, एखादी व्यक्ती बलशाली, एखादी विकृत असते.  अश्याप्रकारे विविध शक्तींच्या प्रभावाने मन आणि मनाचे खेळ चालतात. अर्थात त्या व्यक्तीचं बाह्यांगी व्यक्त झालेलं मन म्हणजे त्याचं व्यक्तित्व असतं. म्हणजे बाहेर जगताला दिसणारं व्यक्तित्व पाचातील एखाद्या स्वरूपाचं प्रकट रूप आहे आणि तो त्याच्या वृत्तीचा व स्वभावाचा भाग आहे. याबाबत आपण, दोन प्रकारे बघू शकतो.  एक म्हणजे, जर तो दोषपूर्ण स्वभाव व वृत्ती समोरच्या व्यक्तीचा वा आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचा असेल तर, आपण सर्वात प्रथम, स्वतःला त्या लहरींच्या प्रभावा पासून, दूर ठेवण्याच्या प्रयत्न करूया. दुसरं त्याच्या दोषांना जाणून आपण स्वतःत आणि त्या व्यक्...

भोग आणि ईश्वर ४५३

भोग आणि ईश्वर  ४५३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  पंचमहाभूतरुप देहातील पाच तत्वाचं एकत्रित अस्तित्व आणि त्यांच्या संयुक्त समिकरणातून अखंड उभं राहिलेला स्वभाव, व्यक्तित्व, देहरचना, बुद्धीची झेप, मन आणि मनाची खोली, याचा एकत्रितपणा माणूस कोण आहे, कसा आहे व काय आहे, हे ठरवतो.पण यावरसुद्धा सर्वात प्रथम प्रारब्ध अर्थात पूर्वसंचित याचा मूलतः प्रभाव असतो आणि आपल्याला या एकत्रित समिकरणातून, जे व्यक्तित्व प्राप्त झालं, त्याला घडवणं वा बिघडवणं हे आपण, पुन्हा आपल्या कर्मभाराने ठरवतो किंवा लिहितो.  या पाच घटकातील जो घटक सर्वात प्रभावी व बलशाली आहे, तो घटक, त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक हे सर्व ठरवतो. आता कोणता घटक जास्त प्रभावी, तेसुद्धा आपण पूर्वकर्माने ठरवत असल्यामुळे, हे पक्कं ध्यानात ठेवावं की,आज जसे आपण जगतो,वागतो वा कोणत्या गोष्टी आपल्या मनाला व बुद्धीला प्रेरित करून कर्म करवून घेतात, त्यानुसार, या जन्मातून जाताना आपण, पुढील जन्माचा आपला मनाचा आलेख लिहून ठेवतो.  आधीच्या जन्माबद्दल, काही क्षण आपण विसरून जाऊ. पण या जन्मात जसं वागतोय किंवा जसं पुढे वागू, त्या नुसार आपला स्...

भोग आणि ईश्वर ४५२

भोग आणि ईश्वर  ४५२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जल आणि मन यांचं तप्त होण्यातील साम्य आणि फरक पाहण्यासाठी दोघांचा तौलनिक अभ्यास करणं गरजेचं आहे. जल हे उशीरा तप्त होऊन, उशीरा थंड होतं, हे सर्वसामान्य विज्ञान, आपण लहानपणी शिकलो आणि थंडीत वा उन्हाळ्यात याचा प्रत्यय आपण, नैसर्गिक पाणीस्रोत असतात तिथे,घेतो वा अनुभवतो.घरी येणाऱ्या जलाला, तो प्रत्यय तितका सार्थपणे घेता येत नाही.  कारण घरचं पाणी अनेक माध्यमातून पोचत असतं. जसं, पाण्याच्या वाहिन्या, ज्या बहुतेक धातूच्या असतात आणि ज्या टाक्यांमध्ये ते साठवलं जातं,त्या सिमेंटच्या असतात. त्यामुळे घरात येणाऱ्या जलाच्या तांपमानवर, त्या माध्यमांचा प्रभाव असतो. पण सर्वसाधारणपणे जलाचं तापमान उशिरा चढतं आणि उशिरा उतरतं. त्या जलाला उष्ण करणारा घटक, म्हणजे सूर्याची उष्णता. ती उष्णता जशी चढत जाईल, तसतसं जलाचं तापमान चढत जातं. पण  सूर्य मावळल्यानंतरही, ते उष्ण असतं आणि उशिरा थंड होतं.  देहात जवळजवळ सत्तर टक्के पाणी असल्यामुळे, वास्तविक ते देह बुद्धी व मन, हे या नियमानेच, उशिरा कोप पावून, उशिरा शांत होणं गरजेचं आहे. पण तसं प्रत्यक...

भोग आणि ईश्वर ४५०

भोग आणि ईश्वर  ४५०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  अहं हा एक प्रकारचा नकारात्मक, ऋणभारित भाव आहे, जो मनात जन्मतः रुजतो आणि देहाबरोबर वाढतो. सरतेशेवटी तो मृत्यूला तात्पुरता विश्राम घेतो, पण मनबकोषातून तो आत्म्यासह, चैतन्यावस्थेत विहरत राहून, आत्मा ज्यावेळी, पुनः एखाद्या गर्भात प्रवेश करतो, त्यासमयी मनकोषात स्थापित होतो. स्थापित होतो म्हणण्यापेक्षा, जो चेतानावस्थेत अर्थात निर्गुणावस्थेत असतो, त्याला मूर्त अर्थात सगुणरूप प्राप्त होतं.  देह गर्भातून बाहेर येताच, पूर्वजन्मातील संस्कारानुसार, हा पुनः कार्यरत होतो. म्हणून याला बाहेर काढायचं म्हटलं तर, त्याची मुळी इतकी खोलवर गेलेली असते, की मोठं कठीण काम होऊन बसतं. कारण ती मुळी एका जन्माची नसून, अनेक जन्मांतून वाढत आलेली, वटवृक्षा सम  घट्ट रुजलेली मुळी असते. वटवृक्षाच्या पारंब्यां प्रमाणे, याला अनेक अंग आणि प्रत्यंग असतात आणि त्या सर्वांची आपापली अंतरंगंसुद्धा असतात.  म्हणून याला काढण्यासाठी सर्वात प्रथम,लीनता अर्थात विनम्रता, हा सद्गुण अंगी धरला पाहिजे. विनयशील व्यक्तीला यश आणि अपयश दोन्ही सहजी पचवता येतं. पंचवणं म्...

भोग आणि ईश्वर ४५१

भोग आणि ईश्वर  ४५१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  विनम्रता किंवा लीनता अर्थातच इंग्रजीत ज्याला low profile राहणं म्हणतात, त्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुमच्या मनाचा वारू, अकारण वा सकारण उधळत नाही आणि दोन त्यामुळे मनात ऋणभारित आयर्न निर्माण न होता धनभारीत आयर्न तयार होतात. ज्यामुळे मनातील मूळ स्वभावाच्या अवगुणांना, फार डोकं वर काढायची संधी मिळत नाही.  म्हणजेच जर स्वभावात अहंचा प्रादुर्भाव असेल, तर त्या अहंला वेळीच नियंत्रणात ठेवण्याचं महत्वाचं कार्य, ही विनम्रता करते. त्यामुळे त्याचा अंगीकार केल्याने, मन सुध्दा शांत आणि शीतलतेचा अनुभव करतं. मनाला प्रसन्नता आणि आल्हादता यांच्या अनुभूतीची सवय लावून घेतली तर, मन त्या वातावरणात कायम राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय आपल्याकडे परंपरेने म्हटलच आहे की, विद्या विनयेन शोभते.अर्थात ज्ञान आणि त्या ज्ञानाची उपाधी विनयशील व निरूपाधिक असणाऱ्यांना शोभते.  अहं प्रमाणेच स्वभावातील दुसरा अवगुण जो, अनेक मार्गांनी घातक ठरतो आणि मनातील ऋणभार क्षणात प्रचंड प्रमाणात आणि अनियंत्रितपणे वाढवतो, तो म्हणजे क्रोध वा अतिराग. मुळात क्रोध वा राग...

भोग आणि ईश्वर ४४९

भोग आणि ईश्वर  ४४९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनातील इच्छा, आकांक्षा व मनीषा यांना गैर व अवास्तव अनावश्यक व अनियंत्रित आणि योग्य व प्रस्तुत या तीन विभागात मोजण्याआधी त्यांचे निकष काय यांचा विचार करूया गैर म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी किंवा जगण्याच्या मूलभूत गोष्टीसाठी गरजेच्या नसलेल्या इच्छा.यामध्ये पूर्णपणे काल्पनिक आणि आपल्या स्वतः बद्दलच्या चुकीच्या कल्पनांमुळे आपण स्वःतबद्दल स्वतः कडून किंवा इतरांकडून गैर व अवास्तव अपेक्षा व इच्छा बाळगतो.  ज्या अप्रस्तुत तर असतातच, पण स्वबद्दल गैरसमज करून आपण त्या मनात बाळगलेल्या असतात. उदाहरणार्थ आपल्या पैकी अनेकजण अशी इच्छा बाळगून असतो की, माझं लोकांनी कौतुक करावं, माझी वाहवा करावी आणि मला मान द्यावा अशी किंवा तत्सम सुप्त इच्छा आपण सर्वच, मनात बाळगून असतो. त्या तुलनेत, कमी मिळणारा मान वा अजिबात न मिळणारा मान, मनात नैराश्याचं वातावरण निर्माण करतो. ज्यातून एक प्रकारची खिन्नता येत जाते. स्वतःबद्दल निराश भाव जागृत होऊन, त्यातून आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो.  आपल्याला समजायला लागल्यापासून, ही सुप्त स्वरूपा तील इच्छा, मनात घर क...

भोग आणि ईश्वर ४४८

भोग आणि ईश्वर  ४४८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  योगाचा जसा दृढतेने अभ्यास करून, नित्य प्रयास करावा लागतो. त्यानंतर कालांतराने, आपण त्यामध्ये, एक एक पायरी पुढे जाऊन, ठराविक काळानंतर ते आत्मसात करतो.  आत्मसात करणे म्हणजे देह, बुद्धी व मन, यांच्या पलीकडे जाऊन, एखादी कृती वा कर्म सातत्याने करणे, जेणेकरून एका ठराविक काळानंतर, त्या कर्माला वा कृतीला करण्याची सवय देह बुद्धी व मन या त्रयीला जडते आणि त्या कर्मावर वा कार्यावर कर्त्याची घट्ट पकड बसते.  म्हणजेच प्रत्येक कृतीनंतर, पुढे काय होणार आणि काय घडल्या वर  काय काळजी घ्यावी, काय कृती करावी, काय धोके आहेत आणि काय पायऱ्या पुढे आहेत, हे ज्ञात होतं. म्हणजेच त्या कर्मातील, त्याच्या प्रत्येक कृतीतील पायऱ्यांची पूर्ण माहिती आणि त्यावर पूर्ण नियंत्रण, मिळवण्यात, कर्ता यशस्वीच होत नाही, तर त्याला त्यातील तज्ञ पदापर्यंत जाण्याचा अधिकार प्राप्त होतो.  योग वा अन्य कोणतीही कृती वा कर्म, नित्य करत गेल्यास, ठराविक काळाने, त्यात कर्त्याला प्राविण्य मिळते. एकप्रकारे अधिकार प्राप्ती होते. पण आत्मसात करणे याचा गुह्यर्थ हा आहे...

भोग आणि ईश्वर ४४७

भोग आणि ईश्वर  ४४७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  उपवास म्हणजे मनाला, आसक्तीपासून, दूर करून, त्या मनाला, एका वेगळ्या पातळीवर नेऊन, ज्या उद्देशासाठी ईश्वराने या आत्म्याला या पंचमहाभूतरूप देहात धाडलं आहे, तो उद्देश साध्य करण्यासाठी पाऊल टाकलं जाईल. कारण वासनेसह माया, मोह, लोभ यांना जिंकूनच आपण आत्मशुद्धी साधून आत्मशोध घेऊ शकतो.  कारण ज्यावेळी मनात उठणारे तरंग, लहरी व कंपनं ही नियंत्रित होऊन, मन एका विशिष्ट पातळीवर स्थिर होईल, तिथेच, आपण या जगतातून पार जाण्याच्या मार्गाकडे जाऊ शकतो. याच मनाला देहाच्या व आत्म्याच्या अनेक शत्रूंना नियंत्रित करण्या साठी, आपण उपवासाचा आधार घेऊन या मनाला भरकटण्या पासून थांबवू शकतो.  या देहाच्या आत दडलेल्या मनाला, प्रारब्ध, दुःख, दैन्य, भोग याबरोबर,सुख,शांती,समाधान,उपभोग अश्या अनेक स्थित्यंतरा तून जावं लागत असताना, या मनाचा तोल सांभाळणं, हे अत्यंत कठीण काम आहे. म्हणूनच हे मन, लोभ मोह यांनी मोहित होतं, काम क्रोध यांनी उत्तेजित होतं, दुःखं, भोग यांनी कष्टी व निराश होतं, तर आनंद, उपभोग यांनी सुखावून जातं.  पण या सर्व भावभावनांच्या डोलऱ्...

भोग आणि ईश्वर ४४६

भोग आणि ईश्वर  ४४६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  उपवास हा पारंपारिक अर्थाने मात्र, देहासाठी आणि देहासंबंधी वापरला जाणारा शब्द. त्याचा आपण जाणलेला अर्थ म्हणजे, देहाला रोजच्या जीवनातून मुक्त करून, काही काळ वा वेळ भोजनात बदल वा रुचित बदल करून, देहाला आसक्तीतून बाहेर पडण्याची सवय लावून, काही काळ मनाला निश्चयी व दृढ बनवत जाणं.  म्हणजे भुकेच्या मर्यादा पाळण्याची सवय लावून, देहाला व मनाला वासना, क्रोध, मोह,लोभ या सर्वांवर नियंत्रण मिळवून, मनाला योगयुक्त राहण्याची सवय लावणं. उपवास हा मुळातच एक योगप्रकार आहे. ज्याचा अंतिम उद्देश, देहाचे चोचले ठराविक वेळा वा ठराविक दिवशी, नियंत्रणात ठेवणं. यातून आधी देहाला लागलेली सवय, बुद्धीला नियमित लागून, त्यातून ती सवय मनापर्यंत उतरवून, शेवटी आत्मतत्वाला शुद्ध करणं.  कारण देहशुद्धी, बुद्धीचं तेज वाढवून, त्याद्वारे, मनाला शुद्ध करते. चित्तशुद्धी हाच योगाचा एक उद्देश आहे. कारण चित्त शुद्धीद्वारे, आत्मशुद्धी साध्य करता येते. विश्वनियंत्यापर्यंत जाण्यासाठी आत्मशुद्धी अत्यंत गरजेची आहे. म्हणजे वासना, माया, मोह, लोभ, क्रोध यांसारखे शत्रू नम...

भोग आणि ईश्वर ४४५

भोग आणि ईश्वर  ४४५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  उपास किंवा उपवास याचा खरा अर्थ किंवा खरं प्रयोजन, या तीन भुका अर्थात देह बुद्धी व मन, यांना वाढण्या पासून नियंत्रित करण्यासाठी आहे. म्हणजे शरीराला अन्न पाणी यांची असलेली आवश्यकता, ही काळ वय यानुसार नैसर्गिक जितकी असेल तितकी ती भागवणं, हा पुरुषार्थ आहे.म्हणजे अर्थ आणि काम यामध्ये देहाच्या,गरजांची काळजी विधात्याने घेतलेली आहे.  पण त्यापुढे, ती भूक अनियंत्रित वाढणं आणि त्यानंतर, मग त्यासाठी आयुष्याचं चक्र व नेम बदलत जाणं, हा प्रवास देहाला, बुद्धीला व मनाला अनेक प्रकारच्या गुंत्या तून नेतो.वास्तविक निसर्गाने दिलेल्या सर्व प्रकारच्या भुका या मात्र देह चालवून, त्यातून आत्महित साधून, पुढील जन्मात अजून उन्नत्ती करण्या साठीची बेगमी करत जाणं, इतपतच भागवल्या पाहिजेत. म्हणजेच त्या मर्यादेतच भोगल्या वा भागल्या पाहिजेत.  पण माणूस हा प्राणी सर्व प्राणीमात्रांमध्ये वेगळा, पण विचित्र आहे. मानवेतर सर्व प्राणी, आपली देहाची भूक भागल्यानंतर, सावज वा शिकार समोर आली तरी, त्याकडे ढुंकूनही पाहात नाही. म्हणजे पुढील भूक लागे पर्यंत तो तृप्त...

ज्ञानेश्वरी भावार्थ ६

ज्ञानेश्वरी भावार्थ ६  पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे । ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥६-६८॥  ज्ञानेश्वरीतील सहाव्या, आत्मसंयमयोग या अध्यायातील, हा अडूसष्टावा श्लोक.या एका श्लोकात माऊलींनी खूप मोठं तत्वज्ञान, सार आणि दिशादर्शक विचार मांडला आहे. मला वाटतं, या एका श्लोकातून जन्ममरण कारण आणि उपाय सांगून, माऊलींनी, अनंत गोष्टी फक्त साडे तीन ओळींच्या श्लोकात सांगितल्या आहेत. ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका, ही श्रीमद्भग्यवद्गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका लिहिताना,गीतेतील एकेका श्लोकाचा अर्थ, भावार्थ व गुह्यअर्थ सांगताना, अनेक दाखले, दृष्टांत आणि अनेक ओव्या मांडल्यात.  त्यांचा अर्थ लावण्यासाठी अनेकांनी ज्ञानेश्वरीचं पुन्हा विस्तृत विश्लेषण आपापल्या परीने केलं आहेच. पण मला या श्लोकातून जो अर्थ समजला, तो मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. इथे आलेला पहिला शब्द आहे व्यामोह. व्यामोह या शब्दाचा अर्थ अतार्किक भयाने ग्रस्त असल्या मुळे, असलेली मानसिकता. व्यामोह म्हणजे काल्पनिक भीतीने एखाद्याला ग्रासल्यानंतर, त्याला सतत, सर्वकाळ तशाच प्रकारची स्थिती वा दृश्यता ...

भोग आणि ईश्वर ४४४

भोग आणि ईश्वर  ४४४  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता ह्या तीन भुकांचा जो त्रिकोण आहे, ती या भूतलाची त्रिमिती आहे. कारण या भूलोकाबाहेर, या तिन्ही प्रकारच्या भुका नाहीत. त्यामुळे त्यासाठीची आसक्ती, अतृप्ती, ओढ इत्यादी काहीही नाही. म्हणजे तिथे वासना नाही त्यामुळे वासनांमागे पळणारी बुद्धी, पाळणारा देह व पळणारं मन नाही.म्हणजे देह तो, बुद्धी ती आणि मन ते, असे तिन्ही सामान्य जन नाहीत.  म्हणजेच कोणत्याही प्रकारची भूकच जर अस्तित्वात नाही, तर मग त्यासाठीची धडपड, ओढ, मनाचा व देहाचा संबंध व त्यासाठी बुद्धीची धावपळ नाही व मनाची ओढाताण नाही. याचा अर्थ असा होतो की, जिथे अशी शून्यवस्था येते किंवा सुख, दुःखं लाभ हानी, भोग उपभोग याबाबत उदासीनता येते, तिथे स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होते. कारण तिथे बुद्धीला मनाला स्थिरता येते.  स्थिरता कशी, तर कोणत्याही प्रकारच्या भावनेचा, तरंगांचा, कर्माच्या कसल्याही गोष्टीचा, दुःखाचा वा सुखाच्या बारीक ते मोठ्या आघाताचा काहीही परिणाम होत नाही किंवा त्याने मनाचा तोल कणभरसुद्धा ढळत नाही. कारण तिथे कर्म करण्याचा आपला अधिकार, ज्ञानाने मान्य झालेला असत...

भोग आणि ईश्वर ४४३

भोग आणि ईश्वर  ४४३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचाच विषय पुढे नेताना, आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की, एखाद्या विषयाचं, एखाद्या गोष्टींचं ज्ञान असेल, तर आपण त्याबाबत निश्चिन्त असतोच, पण आपण दुसऱ्यांनासुद्धा सावध करू शकतो. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण स्वतः त्याबाबत निश्चिन्त असतो. आपण कोणतीही घाई वा नसती उठाठेव करत नाही.  म्हणजेच मन शांत असतं आणि मनाला अविचल करणारे तरंग वा लहरी कार्यरत होऊ शकत नाहीत. याचाच अर्थ ज्ञान आपल्या मनाला निश्चिन्त करून, मनाच्या जल प्रवाहात उठू शकणारे वा उठणारे तरंग शांत करतं. तरीही काही गोष्टींचं ज्ञान मिळून वा त्यातील धोक्यांची जाणीव करून दिली तरीही, मनाचा ओढा त्या विषयांकडे जातोच. यालाच मनाचा नैसर्गिक ओढा म्हणता येईल. कितीही ज्ञानप्राप्ती झाली अथवा धोक्याचा अंदाज किंवा क्वचित प्रसंगी अनुभव आला तरीही, मन त्यापासून धळायला तयार होत नाही.  असा हा नैसर्गिक ओढा, सहसा विषयांचा किंवा अनिष्ट गोष्टींचा, विचारांचा असतो. याला कारण म्हणजे देहाची भूक प्रदीप्तीत करणाऱ्या गोष्टीकडे मन सहज आकर्षित होतं किंवा देहाची गरज, मनाला त्याकडे आकर्षित करत...

भोग आणि ईश्वर ४४१

भोग आणि ईश्वर  ४४१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल आपण पहिलं की, आपल्या मनातील अनिष्ट, अप्रस्तुत व नकारात्मक प्रसंगांचे, कर्माचे,  तरंग बराच काळ मनात ठेवणं, हे मानसिक दुर्बलतेचं लक्षण आहे. कारण त्यामुळे आपणच आपल्या मनाला अजूनच कमकुवत, बलहीन  करतो. पण मुळात असे तरंग मनात दीर्घकाळ राहू देणं, हेच मनावर आपलं, नियंत्रण नसल्याचं लक्षण आहे.  एक गोष्ट लक्षात ठेवा की, दुर्बल मनाची माणसं, अश्या प्रसंगात, आपल्या घडलेल्या चुकीला झाकण्याचा किंवा त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. याऊलट सबल मनाच्या व्यक्ती,आपल्या हातून घडलेली चुक मान्य करून त्याबद्दल कोणताही अहं न बाळगता, आपलं मन मोकळं करतात.  असं स्वच्छपणे मान्य करायचं धैर्य सबळ, सशक्त आणि सुदृढ मनाच्या व्यक्ती दाखवतात. मानसशास्त्रसुद्धा अश्या व्यक्तींना सशक्त व सकारात्मक व्यक्ती म्हणून मानतो. समाजातसुद्धा अश्या व्यक्तींना वेगळ्याच सन्माननीय नजरेने पाहिलं जातं. याऊलट आपली चूक मान्य न करता त्याचं समर्थन वा त्यावर पांघरूण घालून, लपवू पाहणारी व्यक्ती,मनाने उथळ,दूरदृष्टीचा अभाव असणारी घाबरट मनाची आणि सत्याचा सामना...

भोग आणि ईश्वर ४४२

भोग आणि ईश्वर  ४४२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  Have patience म्हणजेच जरा सबुरीने घ्या,हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल किंवा कोणाला बोललो सुद्धा असू. वास्तविक आपण असं कोणाला बोललो, म्हणजे आपल्याकडे जास्त सबुरी किंवा पेशन्स असेलच असं नाही.पण त्या प्रसंगात वा त्या गोष्टीपुरतं आपल्याला समोरच्या व्यक्तीची अधीरता किंवा impatience जाणवलेली असते. म्हणजे ती आपली जागृत दृष्टी असते, भले प्रासंगिक असो, पण असते.  म्हणून आपण त्या प्रसंगात त्याला त्याची अधीरता दाखवून देतो. अगदी अधिकाराने. पण याचा अर्थ आपण कायमस्वरूपी तसे असूच, असं शंभर टक्के, सांगता येणार नाही.कारण आपल्याला जाणवलेली,त्या व्यक्तीची अधीरता ही, त्या प्रसंगात आपली जाणिवेची खिडकी उघडली होती म्हणून आलेली, त्या प्रसंगापूरतीची जाग म्हणू शकतो. पण म्हणजे आपण लोका सांगे ब्रह्मज्ञान या प्रकारात मोडतो का.  तर नक्कीच नाही. कारण त्यावेळी काही कारणास्तव आपण जाणिवेबाबत, त्या व्यक्तीच्या उच्च स्थानी असू. कारण जी गोष्ट घडत असेल वा घडत आहे किंवा जी गोष्ट आपण त्याला सांगत असू, त्याबद्दल, त्याच्या कारणां बद्दल किंवा परिणामांबद्दल, ...

भोग आणि ईश्वर ४४०

भोग आणि ईश्वर  ४४०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कर्माच्या संदर्भात पुढे चिंतन करताना लक्षात येईल की, प्रत्येक कर्माचा मनावर परिणाम होतोच. कारण शेवटी प्रत्येक कर्म, आपलं अस्तित्व, लहरी स्वरूपात मांडून, त्याची नोंद सुप्त वा जागृत नोंदवून जातं. त्याला फल स्वरूप प्राप्त झाल्यानन्तर किंवा होण्याआधी, त्याचे तरंग मनात उमटवत, आपल्याला प्रतिसादाला किंवा प्रतिक्रियेला प्रवृत्त करतं.  त्यामुळे प्रत्येक कर्म आपलं अस्तित्व नोंदवून फलाच्या प्रतीक्षेत तटस्थ आणि शांत बसतं. आता ते कर्म शांत आणि तटस्थ बसलं तरीही, त्याचे तरंग मनाला आकर्षित वा प्रतिकर्षित करत असतातच. म्हणजे एखादी घटना, चांगली -वाईट, आनंदाची-दुःखाची, रागाची-लोभाची घडली की, मन त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो. विशेषतः ती घटना वा गोष्ट मनात किती खोलवर तरंग उठवून गेली आहे, त्यानुसार, हे ठरतं.  म्हणजे जितका काळ त्याचे विचार मनात फिरत राहतात, तितका काळ, त्याचे तरंग मनातील शक्ती व ऊर्जा यांना कार्याला लावून, त्यांत क्षय वा वृद्धी करतात. आता एखादी घटना असेल तर ती आपल्याच एखाद्या कर्माचं फल असणार, हे नक्की. म्हणजे हे कर्म...

भोग आणि ईश्वर ४३९

भोग आणि ईश्वर  ४३९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  संगती आणि विचार या, मनातील ऊर्जा व शक्ती यांच्या वर परिणाम करणाऱ्या दोन घटकांविषयी, आपण प्रदीर्घ चिंतन केल्यानंतर, हे नक्की जाणलं असेल की, उत्तम संगती जोपासली आणि चांगल्या विचारांची बीजं, आपण प्रयत्न पूर्वक रुजवली तर, आपण नक्कीच मनाच्या उभारीला सकारात्मकरित्या हातभार लावू शकतो किंवा हाताळू शकतो.  आता याच साखळीतील तिसरा घटक, जो आपल्या मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर योग्य वा अयोग्य परिणाम करतो आणि जो काहीप्रमाणात आपल्या नियंत्रणात आहे, तो म्हणजे कर्म. कर्म हे केलेलं वा न केलेलं दोन्ही प्रकारचं असतं. दोन्हींचे प्राप्त परिणाम फलस्वरूपात भोगावे लागतात. काही कर्माचे परिणाम लगेच किंवा काही ठराविक काळात समोर येतात. तर काहींचे परिणाम, त्या कर्माच्या परिपक्वतेनंतर समोर येतं.  लगेच परिणाम देणारी कर्म म्हणजे एखाद्या चिडखोर वा पिसाळलेल्या जनावराला छेडलं तर,तो अंगावर लगेच येणार. किंवा शांत बसून टाळलेलं कर्म, हे अंती कर्मच आहे याचं उदाहरण म्हणजे एखादी भिंत वा वजनदार वस्तू पडत असताना, काहीच हालचाल न करता तिथेच थाबणं. यात कर्म न क...

भोग आणि ईश्वर ४३८

भोग आणि ईश्वर  ४३८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाला श्वासांच्या तालावर डोलायला लावत, श्वासांना शांत करत करत, एका अश्या ठिकाणी मन व श्वास, एक होतात की, त्यातील आनंद हा अवर्णनीय आहे. एखाद्या शास्त्रीय रागदारी तील संगीताच्या नादावर, गुंग होताना, याचा अनुभव आपल्या पैकी अनेकांनी घेतला असेल. इथे संगीताच्या ऐवजी, आपण आपल्याच, श्वासांचा आवाज व लय यांचा आधार घेत आहोत.  कारण मन अंतर्मुख करण्याच्या प्रयत्नात आपण आतील नादाचा सदुपयोग करून घेतल्यास, मन सहज आतमध्ये डोकावतं किंवा आत नेलं जातं. असच शांतपणे बसलेलं असताना, आपण स्वतःच्या मनातील,मेंदूतील व त्यायोगे देहातील त्याज्य व नकारात्मक गोष्टी काढून टाकत आहोत, अशी कल्पना करावी.  मनाच्या गुणधर्मानुसार, कल्पनेतील अनेक गोष्टी, मन इछा उत्पन्न करून साध्य करू शकतं. अश्याच प्रकारे, शक्य होईल तेंव्हा किंवा निदान आठवड्यात एकदातरी, हा प्रयोग करून बघितल्यास, मनातील अनेक चुकीचे, नकारात्मक व त्याज्य विचार, आठवणी नष्ट झालेल्या आढळतील. गघरातील कचरा, धूळ इत्यादी काढून, घर स्वच्छ केल्यानंतर जो आनंद मिळतो, त्याच आनंदाचा प्रत्यय, आपल्याला अश्...

भोग आणि ईश्वर ४३७

भोग आणि ईश्वर  ४३७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालच्या विषयात पुढे जाऊया. मुळात श्वास व मनाची गती शक्ती आणि वेग यांचा ताळमेळ जमवतांना त्रास सुरवातीच्या काही दिवसात होऊ शकतो. म्हणजे विचारांचा आवेग गती, विषय अचानक वाढून, एकाग्रता न होता, उलट मन जास्तच भाराऱ्या मारतं. पण हा सुरवातीचा टप्पा आहे.यामध्ये बैठक न सोडता, नेटाने प्रयत्न करत राहणं हाच उत्तम उपाय आहे. कोणत्याही कर्मात प्रयत्नांना पर्याय नसतो.  त्यामुळे, इथेही तो नेटाने करावा. यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे, मन हे सवयीचं गुलाम आहे. म्हणूनच एखादी नवीन चांगली व लाभदायक सवय लावायला, सुरवातीला नक्कीच त्रास होऊ शकतो. पण काही दिवसांनंतर आपण मन व श्वास यांना, एका लयीत आणण्यात, यशस्वी होणार हे  ध्यानात ठेवावं. यात एक महत्वाचं सूत्र म्हणजे आपलं लक्ष श्वासांवर केंद्रित असावं किंवा तसा प्रयत्न करत राहावं.  म्हणजे श्वासांची वाढलेली गती, हळूहळू नियंत्रित होताना मनाचं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करण्यास, आपण प्रयत्नपूर्वक यशस्वी होऊ. आधी श्वास वेगात असल्या मुळे, श्वासांचा आवाज व कंपनं गतीपूर्वक घडताना जाणवता...

भोग आणि ईश्वर ४३६

भोग आणि ईश्वर  ४३६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण विचार या घटकावर चिंतन करत आहोत. काल पर्यंत आपण विचारांचा मनावर परिणाम, त्यांची नकारात्मक व सकारात्मक बाजू पाहिली. त्या सर्वांचा विचार करता, या निष्कर्षाला आलो की, नकारात्मक, अनिष्ट आणि अप्रस्तुत विचार जमा होत गेल्यास, त्याने देहाप्रमाणे मनातसुद्धा अविचार, वासना, गैर इच्छा वा अप्रस्तुत व त्याज्य विचार बलिष्ठ होतात वा होऊ शकतात.  मुळात आपण संन्यस्त वा स्थितप्रज्ञ नाही. चांगले वा वाईट, चुकीचे, बरोबर व गैर असे अनेक प्रकारचे विचार मनात, बुद्धीत येतच राहणार. आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा.पण सुप्त मन ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे, बाह्य मनाने त्याज्य समजलेल्या अनेक गोष्टी, नकळतपणे त्या सुप्त मनामध्ये साठवल्या जातात. म्हणजे आपल्याला जाणीव नसतानाही, काही चुकीचे विचार व नकारात्मक गोष्टी, हे मनातून सुप्त मनापर्यंत झिरपतं.  याचं मुख्य कारण, साध्या फडक्यातूनसुद्धा द्रवपदार्थ गाळताना काही बारीक बारीक कण झिरपून, खालच्या पातेल्यात, द्रव पदार्थांबरोबर जाऊच शकतं. मग मन व लहरीस्वरूपात असलेले विचार वा घटना,आठवणी दुःख...

भोग आणि ईश्वर ४३५

भोग आणि ईश्वर  ४३५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण विचारांवर विचार करत आहोत. म्हणजेच मनाची ऊर्जा व शक्ती यांना क्षती पोचवणाऱ्या किंवा त्यांची शक्ती कमी करणाऱ्या गोष्टी,नकारात्मक,अनिष्ट अप्रस्तुत विचार आचार व उच्चार कसे टाळावेत आणि त्यायोगे मनातील ऊर्जा व शक्ती यांचा क्षय कसा रोखवा, हे पाहिलं. मुळात अप्रस्तुत या शब्दात सर्व सार आलं आहे.म्हणजे ते विचार आपल्या दृष्टीने, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध किंवा नकारात्मक असल्यामुळे अनावश्यक असतात, ते अप्रस्तुत. म्हणून ते स्वीकारणं हे मुळातच टाळायचं.  आता हे झालं आपण न करण्याच्या किंवा टाळण्याच्या गोष्टी वा मुद्दे. पण यातून पन्नास टक्के काम होईल. म्हणजे जसं घट किंवा क्षती होऊ नये, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, त्याच प्रमाणे. पण त्यात वाढ होऊन, मनाची ऊर्जा व शक्ती कायम उत्तम पातळीवर राहील यासाठी विचारांच्या माध्यमातून काय करता येईल, हे आता पाहू. म्हणजे या विषयाचा अभ्यास परिपूर्ण होईल.  मनाची ऊर्जा व शक्ती सकारात्मक व उच्च राखण्यासाठी उत्तम, सकस, शुद्ध आणि सात्विक विचार ऐकणं आणि तसेच वा त्या प्रकारचे विचार कानावर, कानातून ...

भोग आणि ईश्वर ४३४

भोग आणि ईश्वर  ४३४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचाच विषय पुढे सुरू करू.  म्हणजेच आत्मविश्वास आल्यानंतर आपण आपल्या देह, बुद्धी व मन या माध्यमातून, सवयीचा भाग म्हणून प्रयासाने हे ठरवू शकतो की, जरी माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या विचारांवर, उच्चार व आचार यांवर माझं नियंत्रण नसेल, तरी त्यातील कोणते स्वीकारायचे आणि कोणते त्यागायचे हे मीच ठरवू शकतो.  म्हणजे जरी श्रवणात असे त्याज्य विचार उच्चार आले तरी, त्यातील कोणते बुद्धिपर्यंत व कोणते मनापर्यंत जाऊ द्यायचे, हे मीच ठरवू शकतो. यासाठी आत्मविश्वास आणि आत्मचिंतन हे खूप सहाय्यक ठरतात. आत्म चिंतनी व्यक्ती आपल्या विचारांच्या त्रिज्येत मग्न असतो. ज्यामुळे, इतर गोष्टी ऐकायला व करायला त्याला वेळ वा विचार असतच नाहीत. म्हणून सरतेशेवटी आपण आत्मचिंतनाकडे येतो,जे सर्व गोष्टींच्या मुळाशी आहे.  दुसऱ्याचं किती व काय, आपल्या बुद्धी आणि मन यापर्यंत जाऊ द्यायचं,हे आपणच ठरवू शकतो, ही संकल्पना किंवा हा विचार सकृत दर्शनी अव्यवहार्य वाटतो किंवा अप्रस्तुत वाटतो.पण खोलात जाऊन विचार केल्यास लक्षात येईल की, आपण अश्या प्रकारचं वर्तन, बरे...

काव्यांजली

काव्यांजली  तव स्वरांनी आमुच्या  सुख मिळाले मनाला कर्ण मन हृदयही माझे सुखावते त्या समयाला  लिहितीलही गीत सारे आपुल्या यश कीर्तीचे  तरीही मन माझे म्हणते अंगाई आईसम भासते  प्रेमगीत वा युगुलगीत गायले प्रियेने वाटे  विरह दुःख हे भावही त्या त्या गीतातून प्रकटे  इतुकेच आता शेवटी उरला लतास्वर तो  त्या गंधर्वकन्येचा आचंद्रसूर्य निनादो  © कवी : प्रसन्न आठवले ०६/०२/२०२२ १९:२३

मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे !!!

मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे !!!  आमच्या जन्माच्या दोन दशकं आधीपासून जन्माला आलेल्या सर्वांनी, कळायला लागल्यापासून, जो आवाज ऐकलाय आणि त्यांच्या, नित्य परिचयाचा झालाय,  तो आज लुप्त झाला. एका प्रचंड व्यासाच्या वर्तुळाचा, तीनशे साठ अंशांचा प्रवास आज शून्यावर येऊन समाप्त झाला.  इतकी गीतं इतकी वर्षे आणि तितक्याच ताकदीने गाणं व गातच राहणं, हे नक्कीच तपसाधनेचं फलित आहे, यात शंका नाही. एका अद्भुत आणि विलक्षण प्रतिभेची धनी आणि त्या प्रतिभेला सार्थ स्वरांचा आलेख, रेखाटलेलं व्यक्तित्व असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर अर्थात लतादीदी.  आवाजाची दैवी देणगी आणि त्या देणगीला अग्निदिव्याचं परिसस्पर्शस्वरूप खडतर असं सुरुवातीचं आयुष्य. नूरजहाँ, शमशाद, मुबारक आणि सुरेय्या अश्या चार प्रस्थापित आणि प्रचंड वेगळ्या धाटणीच्या आवाजाच्या काळात येऊन, संधी मिळवणं हेच दिव्य होतं. त्यातही पंजाबी वर्चस्व असलेल्या सिनेसृष्टीत, एका सामान्य मराठी कुटुंबातून येऊन, स्थान मिळवण्यासाठी झगडणं, हे कल्पनातीत आहे. असं म्हटलं जातं की, नूरजहाँ पाक निर्मितीनंतर जर पाकमध्ये गेली नसती तर, लतादीदींनी येणं वा प्रस्थ...

भोग आणि ईश्वर ४३३

भोग आणि ईश्वर  ४३३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  स्वतःच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना बांध घालण्यासाठी व त्यापासून आपल्या मनातील विचारांना, ती  नकारात्मकता ग्रासण्यापासून, सावध करण्याविषयी काल आपण चिंतन केलं. पण अशी नकारात्मक स्थिती किंवा परिस्थिती येणारच नाही, हे तोपर्यंत खात्रीपूर्वक सांगता येणार नाही, जोपर्यंत आपला आत्मविश्वास आपल्याला तसं सांगत नाही. हा आत्मविश्वास आपल्या मनात शंभर टक्के असेल तर, तो आपल्याला अश्या परिस्थितीत नुसतं सावधच करत नाही, तर त्यावर मात करून, या लढाईत सकारात्मकतेला वादातीत जिंकून देईल.  पण त्यासाठी आपलं, आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर पूर्ण नियंत्रण हवं. असं नियंत्रण, मनात येणाऱ्या विचारांकडे त्रयस्थ पणे बघण्याची सवय लागली किंवा लावून घेतली की, जमू शकेल. त्रयस्थपणे बघण्यासाठी आपल्याला मनात येणारा प्रत्येक भाव पारखता येणं महत्वाचं आहे. त्यासाठीची जाण येणं किंवा साधनेनं तशी जाण जागृत करणं गरजेचं आहे.  ते साध्य झाल्यावर आपोआप, चुकीच्या विचारांना येत असताना बाजूला सारता येतं आणि मनाची स्थिती पूर्ववत करता येते. काही जणांना हा आत्मविश...

भोग आणि ईश्वर ४३२

भोग आणि ईश्वर  ४३२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  जसं आपण संपर्कात असलेल्या, व्यक्तींच्या नकारात्मक लहरी आपल्यावर परिणाम करतात,त्याचप्रमाणे,आपल्या स्वतःच्या नकारात्मक विचारांच्या लहरी आपलं, मन बुद्धी व देह अर्थात शारीरिक,बौद्धिक व मानसिक पातळीवर हानी करतातच. पण आपल्या संपर्कात असलेल्या लोकांनासुद्धा, याचा त्रास होतो किंवा होऊ शकतो. म्हणूनच यासर्वांचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे.  एक साधं आणि आताचंच उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लगेच लक्षात येईल. सध्याच्या, अर्थात गेल्या दोन वर्षातील करोनाच्या प्रकोपानंतर, आपण या गोष्टीचा व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर अनुभव घेतला आहे. आपण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर, आपणही बाधित होतो किंवा आपण बाधित असताना, इतर कोणी किंवा जे जे आपल्या संपर्कात येतील,त्यांनासुद्धा,आपण बाधित करतो वा करू शकतो.  यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपण स्वतः याबाबत स्वच्छता, सुरक्षित अंतर व तोंड आणि नाक हे झाकल्यास, आपण बाधित असुनही, दुसऱ्यांना याची बाधा होणार नाही. दुसरं म्हणजे, अशी काळजी घेतल्या वर, बाधित व्यक्तींकडून, आपण बाधित होण्याची शक्यता कमी....

भोग आणि ईश्वर ४३१

भोग आणि ईश्वर  ४३१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालच्या विषयातील मुद्दा आज पुढे नेऊया. काल पाहिलं की, जेंव्हा दोन व्यक्तींपैकी एकजरी, नकारात्मक असेल तर संवाद न होता, तुटतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, विसंवाद होतो.कसा ते पाहू.नकारात्मक शब्द, विचार वा चिंतन किंवा आचार यातून उत्पन्न होणाऱ्या लहरी,या तिखटाप्रमाणे अतितीव्र असतात. म्हणूनच थोडसं, अगदी कणभर तिखटसुद्धा एखाद्या गोड पदार्थाला तिखटपणा आणायला पुरेसं असतं.  त्याचप्रमाणे, एखादं तुटक, तीव्र किंवा तिखट बोलणं, एखाद्या चांगल्या वृत्तीच्या व स्वभावाच्या माणसाच्या मनात घात करायला पुरेसं, असतं. यात त्या व्यक्तीने सोडून दिलं तर, हा त्या व्यक्तीचा स्वभावगुण झाला. पण त्या कर्माचा, विपरीत परिणाम आपल्या कर्मफलावर होतो. म्हणूनच संवादात विसंवाद होणार नाही याची काळजी आपल्याकडून आपण, घेतली पाहिजे.  दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, त्याच्या नकारात्मक लहरींचा परिणाम आपल्या मनातील ऊर्जा व शक्ती यावर होऊ शकतो. म्हणूनच ज्यावेळी नकारात्मक व्यक्तींशी किंवा नकारात्मक लहरींशी संबंध वा संपर्क येतो, तेंव्हा आपल्याला जाणीव होईल, त्यावेळी आ...

भोग आणि ईश्वर ४३०

भोग आणि ईश्वर  ४३० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  काल आपण विचार या गोष्टीवर चिंतन सुरू केलं आणि एक अद्भुत वाटणारी, पण शास्त्रीय सत्य असलेल्या मुद्दयावर येऊन थांबलो. तो मुद्दा म्हणजे दोन विचार लहरी या इतर सर्व लहरीं प्रमाणेच एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्या शास्त्रीय तत्वांनुसार, एकमेकांना छेद देतात किंवा एकमेकांत मिसळून, एकरूप होऊ शकतात. म्हणजे दोन व्यक्तींचं विचारचिंतन किंवा एकाच व्यक्तीचे एखाद्या विषया वरील दोन मतं वा दोन विचार एकमेकांना cross अर्थात छेद देतात किंवा देऊ शकतात.  यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा, जो याला कारणीभूत होतो, तो म्हणजे, त्या दोन विचारांची तीव्रता, गती आणि त्यामागे मनाचं लागलेलं बल आणि मनाची स्थिती. म्हणजे जर दोन व्यक्ती एखाद्या मुद्द्यावर चर्चा करत असतील, तर त्यांच्यामध्ये, ज्या पद्धतीने चर्चा होत असेल, ते वातावरण, त्यांचा त्यांच्या विचार व मन, यावरील नियंत्रण, मनातील सकारात्मक वा नकारात्मक पातळी आणि एकाग्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम, त्यांच्या वाणीतून मांडल्या गेलेल्या मुद्द्यांच्या लहरींवर होतो.  जर दोन्ही नकारात्मक असतील तर, विचारांचं छेदन ...

भोग आणि ईश्वर ४२९

भोग आणि ईश्वर  ४२९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकातील संगतीचा दीर्घ चिंतनातून विचार केल्यानंतर, या श्रेणीतील आणि स्वनियंत्रणात शक्य असलेला दुसरा मुद्दा म्हणजे आपले विचार. म्हणजे आता मी जे मांडतोय ते किंवा आपल्या मनात प्रत्येक क्षण येतात ते अथवा सतत आपणच आपल्याशी, चिंतनाच्या माध्यमातून बोलतो ते विचार.  इथे एक उदाहरण देता येईल, म्हणजे हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल व यावर योग्य चिंतन करता येईल. आता दूरचित्र वाणीवर आपण ज्या मालिका बघतो, त्या मालिकांमध्ये, अनेकदा, त्या मालिकेतील पात्रं, आपल्याच मनाशी, करत असलेला संवाद आपल्याला कळावा यासाठी, आवाजाच्या माध्यमातून दृष्य स्वरूपात दाखवला जातो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, असा संवाद प्रत्येक जण आपल्या मनाशी कळत वा नकळत करत असतोच.  डोक्यामध्ये अनेकदा, पुढच्या योजनांचे, कल्पनांचे, स्वप्नरंजनाचे मागे घडलेल्या कटुगोड आठवणींचे विचार सतत येतच असतात. आपल्या संपर्कात आलेल्या, येऊन गेलेल्या,काही सुखद तर काही दुःखद आठवणी ठेवलेल्या किंवा काहीच नसेल तरीही विचारांच्या तंद्रीत वा प्रवाहामध्ये, येऊ...

भोग आणि ईश्वर ४२८

भोग आणि ईश्वर  ४२८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  संगतीबाबत आपण बोलतो आहोत आणि आपण यातील सर्वात मोठ्या घटकाचा विचार न करताच पुढे जाऊ, असं होऊ शकत नाही. देहाचा बुद्धीचा आणि मनाचा विचार आपण केला. संगतीचा आणि संगतीमुळे या मनाची ऊर्जा  व शक्ती यात होऊ शकणारी किंवा होणारी वाढ वा घट याबद्दल चिंतन केलं. हे सर्व चिंतन नक्कीच लाभदायक ठरेल यात शंका नाही.  पण या सर्वांच्याहीवर आणि जीवाला आत्मोन्नती व आत्मोद्धार साधून देण्याकडे वाटचाल करवून घेणारी आणि देहात असताना आणि देहातीत चैतन्यावस्थेत असतानासुद्धा सर्वात श्रेष्ठ संगती म्हणजे सद्गुरूंची संगती. यावर चिंतन केल्याशिवाय सर्वच चर्चा निरर्थक आहे, हे नक्कीच.  आपण या जगात अनंत काळापासून ते अनंत काळापर्यंत फिरत आहोत आणि अनेकानेक जन्मांतून आपण तेच भोग, तेच दुःख, तेच देहाचं सुख, त्याच माया व रिपूंच्या स्वाधीन राहून जीवन जगतो आहोत. पण देह आणि मी हे भिन्न आहोत आणि मला या देहाच्या माध्यमातून, आत्म विकासासाठी देहधारणा देण्याचा ईश्वरी संकेत आहे, ही जाणीव येणं जरुरी आहे. अशी जाणीव फक्त सद्गुरू करून देतात.  त्यामुळे त्या संकेतानुसार म...

भोग आणि ईश्वर ४२७

भोग आणि ईश्वर  ४२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  संगतीबाबत बोलतानाच एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे संगतीच्या गुणाने आत्मा सुखावतो आणि दोषाने आत्मा मलिन होतो. कारण संगतीच्या गुणदोषांचा सरळसरळ परिणाम मनावर व बुद्धीवर होतो. कारण या दोन्हींमुळे विचार व विचारांची दिशा, आकार आणि त्यावर आधारित उच्चार व  आचार ठरतात. दुसरं म्हणजे संगतीचा गुण हा मनाची जडणघडण ठरवतो. जसं वाईट संगतीतून, शब्द उच्चार भाषा आणि सरतेशेवटी कर्म यांवर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होतो.  ज्याला बुद्धिभ्रम म्हणतात, म्हणजेच ब्रेनवॉश तो होण्याला, अनेकवेळा संगती कारणीभूत असते. चांगल्या विचार, आचार व उच्चारांची संगती मनाला, तसं वळण लावण्यास कारणीभूत ठरते. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की, जर आपल्याला जडलेली संगती ही चांगली व सकारात्मक नसून,ताप,पाप वा वैचारिक भ्रष्टता वाढवणारी आहे किंवा त्यावर परिणाम करणारी आहे असं जाणवलं किंवा लक्षात आलं तर काय.  याबाबत मी माझं स्वतःचं उदाहरण देईन. ज्यावेळी माझ्या लक्षात येतं किंवा जेंव्हा जेंव्हा अश्या संगतीचा अनुभव आला, त्या त्या वेळी, सदर व्यक्तीला आपल्या संपर्...