Skip to main content

भोग आणि ईश्वर ८६

भोग आणि ईश्वर  ८६
  
आयुष्यात घडणाऱ्या घटना या नियतीचा संकेत असतो. प्रारब्धाच्या वाटेवर चालताना आणि संचिताची ठेव पुढे नेताना माणूस नित्य नवीन कर्म करतच असतो. प्रत्येक कर्म अर्थातच एक मुदतठेव/फिक्स डिपॉझिट किंवा तारणकर्ज / लोन तयार करतं. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या कर्जाची परतफेड किंवा ठेवीचा परतावा समजावा. 

आता नियतीच्या संकेताकडे वळूया. वरचा परिच्छेद नीट ध्यानात घेतला तर एक लक्षात येईल की, ज्या ज्यावेळी सुखकारक वा आनंददायी घटना घडतात, त्या त्यावेळी आपण एखादी मुदतठेव सोडवून वापरली आणि ज्या ज्यावेळी आपल्या आयुष्यात वाईट, दुःखकारक, नकारात्मक घटना घडतात, त्या त्यावेळी आपण एखादं कर्ज परत केलं हे नक्की समजावं.

आता हा विचार अजून खोलात जाऊन बघूया. आपल्याला चांगले मित्र मिळतात, चांगले सहृद नातेवाईक मिळतात म्हणजेच आपल्या ठेवीच्या खजिन्यातून काही ठेव आपणच वापरून ती ठेव मोडली. म्हणजेच आपला ठेवीचा साठा त्या प्रमाणात कमी झाला. 

याउलट आपल्या वाईट, चुकीची, टीका व निंदा करणारी, आपले दोष दाखवणारी, आपल्याला समजून न घेणारी माणसं भेटली आणि त्यांनी आपल्याला त्रास, ताप, दुःख, अश्रू, बोच, घाव आणि सर्व नकारात्मक दिलं, याचा अर्थ त्या त्यावेळी आपल्या थकीत कर्जातून आपण काही हप्ते फेडले आणि त्याप्रमाणात आपण ऋणमुक्त झालो. 

म्हणूनच आता उलगडा होईल,  संत महंत का सांगतात की, सुखात चढून जाऊ नये, पाय जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि दुःखात खचून जाऊ नये, पण मन खंबीर करण्याचा प्रयत्न करावा. यातून अजून काही गोष्टी जोडता येतील, विचार करूया. 

ज्यावेळी आपल्याला एखादी नकारात्मक व्यक्ती भेटते एखाद्याकडून आपण सकारण वा अकारण दुखावले जातो, त्यावेळी त्याच्या प्रारब्धात तो कर्ज वाढवत असतो आणि आपल्या ताळेबंदातील कर्जाचा हप्ता चुकता होत असतो. ज्यावेळी आपल्याला एखादा सुखकारक अनुभव, सखे सोबती आप्तस्वकीय यांच्याकडून आनंद, समाधान, हास्य, संतोष मिळतं, त्यावेळी तो त्याच्या संचितात ठेव जोडतो आणि त्याचवेळी आपण एक मुदतठेव तोडून वापरली आहे.

साहजिकच प्रश्न निर्माण होईल की, याचा अर्थ आम्ही आनंदात दुःखी आणि दुःखात आनंदी व्हायचं का. तर नक्कीच नाही. मग आपण काय करणं अपेक्षित आहे. आपण ते करणं अपेक्षित आहे, ज्यामुळे आपल्या मुदतठेवी वाढतील आणि नवीन कर्ज तयार होणार नाहीत. कारण संचितात साठलेली कर्ज फेडण्याचं आणि मुदतठेवी मोडून वापरण्याची वेळ, आपल्या हातात आता उरलेली नाही. ते कर्म आपण पूर्वायुष्यात करून वेळ हातातून घालवली आहे. 

परंतु पुढील जमा वा कर्ज वाढवायचं नक्कीच आपल्या हातात आहे. कारण कर्म करण्याचं वा न करण्याचं स्वातंत्र्य विधात्याने आपल्या हातात दिलं आहे. त्यामुळे ठेव की कर्ज, ते आपणच ठरवू शकतो.  

यावर पूर्ण चिंतन करा उद्या अजून खोलात जाऊ. 

काय हितावह व काय हिताविरुद्ध याचं  चिंतन करा,  पण नाम घेत रहा, कारण नाम, सर्व काही सुलभ करेल, पाहूया उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...