Skip to main content

भोग आणि ईश्वर ९०

भोग आणि ईश्वर  ९०
  
सर्व सिद्धात्मे हे नित्य निरंतर आणि अखंड चैतंयशक्तीच्या रुपात या भूमंडळी वावरत असतात आणि ज्यावेळी साधकांच्या, साधनेमध्ये व्यत्यय अथवा बाधा आणणारी संकटं, उभी राहतात त्या त्यावेळी, सद्गुरू इष्टरूपाने येऊन, साधकांना मार्गभ्रष्ट होण्यापासून रोखतात आणि पुन्हा साधनामार्गात आणतात. याचा अनुभव मी स्वतःसुद्धा घेतलेला आहे. 

प्रश्न हा आहे की साधना करतात, त्या सर्वांना, गुरू असतीलच असं नाही. पण मग ज्यांना सद्गुरू नाहीत किंवा ज्यांनी व्यावहारिक अर्थाने सद्गुरू केले नाहीत किंवा ज्यांना अजून सद्गुरुकृपा झाली नाही त्यांचं काय. यावर जरा विचार करू. साधनेच्या मार्गात असलेले साधक आणि एकलव्याचा मार्ग अनुसरून कोणा सिद्ध महात्म्यांना आपले गुरू कल्पून त्यांच्या तारक वा नाममंत्राचा जाप करणारे अनेक असतील.

साधक हा साधना सुरू केल्यानंतर वा केल्यापासून त्या नामाशी वा सिद्धमंत्राशी जोडला जातो वा जोडला गेलेला असतो. साधनेची प्रामाणिकता आणि त्याच्या तरंगलहरींचा जोर हा साधनेच्या नित्य अनित्यतेवर अवलंबून असतो. मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे आपली काया वाचा व मन यांनी केलेली प्रत्येक कृती नित्य अखंड तरंगलहरी निर्माण करतं. अगदी शांत असतानासुद्धा हे तरंग मनातील विचारातून प्रकट होत असतात. 

क्वचित प्रसंगी याचा प्रत्यक्ष प्रत्ययसुद्धा येऊ शकतो वा आलेला असेल, ज्यावेळी एखादी आपल्या मनात असलेली इच्छा लगेच वा काही काळात पूर्ण झालेली दिसेल. विशेषतः ज्यावेळी त्या इच्छेचं घडणं, हे आपल्या कक्षेबाहेर वा शक्तीबाहेर असतं. त्यामुळे आपल्या देह व मन यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या लहरी जितक्या सूक्ष्म तितक्या कमजोर आणि जितक्या तीव्र तितक्या शक्तीस्वरूप व परिणामकारक असतात. 

आपल्या मनातील तरंगलहरी या सकारात्मक असतील तर सकारात्मक ऊर्जा, नाद आणि शक्ती निर्माण करतात आणि नकारात्मक लहरी नकारात्मक ऊर्जा नाद आणि शक्ती निर्माण करतात. त्या तीव्रतेने निर्माण झाल्यावर, समस्त अंतराळातील, त्या त्या परिणामांच्या शक्तींना आवाहन करतात. याची जाणीव आपल्याला होत नसली तरी त्या शक्तींप्रत त्या लहरी जाऊन भिडतात आणि त्यानुसार तसा प्रतिसाद, प्रतिक्रिया व परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. 

म्हणूनच काही जणांच्या नकारात्मक आणि काही जणांच्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर सुद्धा परिणाम त्याप्रमाणेच होतो आणि एखादा चिडला की, दुसऱ्याच्या देहात त्या नकारात्मक लहरी, मनातील भावनांच्या सुक्ष्मरूपात प्रवेश करतात. त्यानंतर, सदर दुसऱ्या व्यक्तीची स्वतःची आत्मबलशक्ती कशी आहे आणि मनाची कणखरता व आत्मसंयम कसा आहे, यावर, त्याचा प्रतिसाद वा प्रतिक्रिया अवलंबून असते. म्हणून समोरचा क्रोधीत झाला की एकाने शांत राहून त्या लहरी आपल्यापर्यंत येऊन नकारात्मक परिणाम करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

म्हणजेच आपण मनातून वा मनापासून करत असलेल्या, प्रत्येक लहरी, जर त्या त्या शक्तीपर्यंत, पोहोचून आपल्याला त्या लहरींच्या तीव्रतेनुसार प्रतिसाद देतात. इतक्या दीर्घ विवेचनातून हे नक्कीच ज्ञात होईल की, आपण करत असलेल्या साधनेतून निर्माण होणाऱ्या लहरी नक्कीच त्या त्या साधक वा तारक मंत्रांच्या सत्पुरुषांपर्यंत पोचत असतील वा पोचतीलच. म्हणजेच आपण लौकिक अर्थाने सद्गुरू केले नाहीत तरी मनातून आपण त्या चैतन्यशक्तीच्या मंत्राचा जाप करताना त्यांना आत्मरूपाने वा मन आणि आत्मा यांना स्मरून सद्गुरू मानलं आहेच. 

प्रश्न त्यांच्या स्वीकृतीचा आहे, ती स्वीकृती, कदाचित कोणत्याही प्रसंगात, त्यांनी आपल्याला, एखाद्या सहाय्याच्या रूपाने दिलेल्या प्रतिसादातून, व्यक्त झालेली असेल तर तीच त्यांची स्वीकृती समजून साधनामार्गात नित्य आणि नीत राहणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण देहरूपात त्यांचं अस्तित्व नाही त्यामुळे ते प्रतिसाद, प्रतिक्रिया या रुपात आपल्याला अनुभवावरून ठरवावं लागेल. परंतु, ज्यांना असा काही अनुभव नसेल, आला त्यांना नक्की अनुभव येईल, नित्य साधनेत राहा आणि नाम घेत रहा कारण, नाम सर्व काही सुलभ करेल. 

आज आपण एक नवीन शब्द पहिला आत्मबलशक्ती उद्या त्यावर चर्चा करूया. 

पुढील आठवड्यात माझ्या श्रीरामरक्षा भावार्थ आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या संयुक्त पुस्तकाबद्दल पूर्ण तपशील लेखामध्येच देण्यात येईल. काही जणांनी आधीच आगाऊ नोंदणी केली आहेच त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदले आहेत. त्यांच्याशी मी संपर्क करीन, ज्यांना अजूनही आगाऊ नोंदणी करायची आहे, त्याना प्रसिद्धीपूर्व सवलतीत ती मिळू शकेल. माझ्या खाली दिलेल्या व्हाट्सऍप क्रमांकावर संपर्क करून नोंदवून ठेवू शकता. सर्व सोपस्कार नीट पार पडले तर मार्च शेवटी किंवा जास्तीतजास्त गुढीपाडव्यापर्यंत प्रकाशन होईल. सदरची लेखमाला पूर्ण झाल्यानंतर ती पण पुस्तकरूपात छापण्यात येईल, तशी सूचना आगाऊ दिली जाईल.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...