Skip to main content

भोग आणि ईश्वर ८१

भोग आणि ईश्वर  ८१
  
खूपवेळा आपल्याला एखादं काम करायचं असतं. निर्णय खरतर बुद्धी मन आणि आत्मा मिळून घेतात. शरीर आणि मन बुद्धीच्या सहाय्याने त्याची अंमलबजावणी करतात. सरकारी किंवा खाजगी कार्यालयात प्रत्येक खात्यात काही कर्मचारी, एक नायक यांचा मिळून एक संघ असतो. अगदी खेळात सुद्धा संघ असतोच असतो. अगदी एकट्याने खेळायच्या खेळातसुद्धा तोखेळाडू, त्याचा प्रशिक्षक, खेळाचं त्याचं सामान, सराव व तयारी, त्याची तंदुरुस्ती हा एकप्रकारे संघ आहे. 

म्हणजेच संघ आणि संघाचा ताळमेळ यांच्यावर बरेच निर्णय व त्याची अंमलबजावणी अवलंबून असते. एखादा ढेपळला किंवा पूर्ण क्षमतेने काम करत नसेल किंवा तंदुरुस्तीचा प्रश्न असेल, तर संघ पूर्ण एकाग्रतेने काम करणार नाही. म्हणजे शारीरिक क्षमता, मानसिक शक्ती, बौद्धिक संपदा ( त्या त्या कामाला लागणारी), या त्रयीच्या मागे अंतरात्म्याची साथ असायला हवी, तर कोणतंही कार्य सिद्ध होऊ शकतं. 

मनाच्या तयारीत, जिद्ध चिकाटी, नेट कणखरपणा शरीराची सुदृढता, कार्यासाठी आवश्यक बुद्धी ( संघ असेल तर अनेक जणांची एकत्रितपणे कार्य करणारी बुद्धी) आणि या सर्वांचा समतोल साधून देणारा दुवा म्हणजे या सर्वांतील  सुसूत्रता ही नेहमी महत्वाची आहे. या सर्वांना सोबत घेऊन शरीर मन बुद्धी अनेक कठीण कार्य साध्य करू शकतात. 

या सर्वांचा विचार केल्यावर एक गोष्ट जाणवेल की, आपला देह हासुद्धा एक संघ आहे आणि देह, त्याची इंद्रिय, रक्ताभिसरण संस्था, चेतापेशी व मज्जासंस्थेचं जाळं, प्रत्येक पेशी, शिरा नसा, मेंदुसह आतील बुद्धी, अदृश्य असणारं पण जाणीव जागृत करणारं मन आणि या सर्वांच्या कार्याला ऊर्जा, चैतन्य आणि प्रेरणा देणारा आत्मा हा एक संघ आहे. यात संघनायक हा नेहमी आत्मा असावा. 

पण मायेचा प्रभाव इतका विलक्षण आहे की, आपण या संघाच्या नायकाला अर्थात कप्तानला बरेचदा खिजगणती तही धरत नाही. किंबहुना त्याचं अस्तित्व आपल्याला निव्वळ फक्त देह उरतो त्याचवेळी होतो, ते सुद्धा दुसऱ्याचा उरलेला देह पाहिल्यानंतर. म्हणजे नायक नाही अशी लढाई आपण लढतो नित्य, लक्षातही न येता. कारण आपल्या जाणिवेत आत्मा हा फक्त उर्जेची,  चैतन्याची ती कळ आहे जी एकदा जन्माला आल्यावर सुरू झाली, ती शेवटच्या श्वासापर्यंत दाबली गेलेली आहे आणि त्याच्या जोरावर सर्व आयुष्य जगतो व जगायचं आहे. 

या सर्वांचं एकत्रीकरण वा सुसूत्रीकरण झालं तरच जीवनाईप्सित साध्य होऊ शकतं. पण बरेचदा काय होतं की, आपण यापैकी सर्वांना अर्थात आपण स्वतः मनाला, देहाला, बुद्धीला गृहीत धरून आयुष्य जगतो. गृहीत धरणं म्हणजे त्यांचा फार विचार न करणं. ते आपल्यासोबत प्रत्येक निर्णयात असतीलच हा तर्क मनाशी बाळगणं. बर या सर्वात, यांची पुरेशी काळजी आपण घेतो का, तर तेही नाही. 

शारीरिक व्याधी, मनाचे विकार, नैराश्य, थकवा याबरोबर बुद्धीचा अयोग्य पद्धतीने कधी प्रमाणाबाहेर वापर तर कधी अपुरा वापर, या सर्वांमुळे एक प्रकारचा असमतोल निर्माण होतो. या असतोलातून बाहेर येण्याची किंवा  यंत्राप्रमाणे वंगणीकरण करून संघातील या सर्व सदस्यांना कार्यक्षम ठेवण्याची आपली इतिकर्तव्यता आहे. खरच आपण एका विशिष्ट वयापर्यंत याकडे लक्ष तर दूरच पण विचार देखील करत नाही. त्यामुळेच अतिवापराने किंवा कमी वापराने जशी शरीराला सूज वा व्याधी जडतात तश्या त्या मनावर जडतात. 

वरील या सर्व विचारांचं चिंतन करा, बघूया नक्की काय विषय आहे उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...