Skip to main content

भोग आणि ईश्वर ७०

भोग आणि ईश्वर  ७०
  
आता या सर्वांचा विशिष्ट नाम, अथवा विशिष्ट देवाचीच स्तुती अथवा स्मरण आणि त्याच्या योगे त्याच्याकडून प्राप्त कृपारूप शक्तीशी काय संबंध आहे हे आता पाहू. एक गोष्ट ध्यानात घ्या की प्रत्येक देव हे एका विशिष्ट शक्तीचं प्रतिकात्मक प्रकटीकरण आहे. म्हणजे जसं गणेश बुद्धी आणि सिद्धी, देवी शक्तीस्वरूप, इत्यादी.

मुळात भगवान श्रीविष्णूं यांनी चराचरसृष्टी आणि ब्रह्मांड निर्माण करण्याआधी ब्रम्हलोक आणि  ब्रम्हा व कैलासलोक आणि शंकर यांची निर्मिती स्वये केली आणि त्यांना काही विशिष्ट कार्यस्वरूप शक्ती आणि अधिकार दिले. त्या अधिकारांच्या सहाय्याने दोन्ही देवांनी अनेक असुर दानव दैत्य यांसह मानवालासुद्धा अनेक वरदान दिले. त्यांच्या आधाराने त्या त्या जीवांनी त्याचा सदुपयोग वा दुरुपयोग केला. 

ज्या ज्यावेळी अश्या दैत्य, दानव व असुर यांनी त्याचा उन्माद करून जगताला त्रस्त करून क्लेश, पीडा, दुःख, दैन्य देण्यास सुरुवात केली आणि यासर्वांचा कडेलोट होऊन परिस्थितीवश मानव आणि त्रैलोकांसह समस्त ब्रह्मांड भयभीत आणि त्राही त्राही झालं, त्या त्यावेळी भगवान विष्णूंनी, या तापदायक जीवांचा देह संपवून, त्यांच्या त्रासातून जगताची, ब्रह्मांडाची सुटका केली. 

तरीही इतकं युगं लोटूनसुद्धा महाविष्णूंनी एकाही देवतेचा कोणताही अधिकार कमी अथवा काढून घेतला नाही. काही प्रकरणांमध्ये यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा किंवा देव यांना अथवा स्वतःला देखील कोणत्यातरी चुकीबद्दल अथवा प्रमादाबद्दल शिक्षास्वरूप मानव जन्म देऊन प्रमादांचं प्रायश्चित्त व त्यायोगे जगताचं कल्याण साधलं. म्हणजेच समस्त चराचरात स्वतः अनंत रूपांनी अस्तित्वात असूनही प्रत्येक स्वरूपाला त्याच्या अधिकार कक्षेत कार्यरत राहण्याचं स्वातंत्र्य प्रदान केलं आणि त्याचं कालगतीनुसार चक्र सुरू ठेवून, कधीही हस्तक्षेप केला नाही. 

पण जिथे जिथे गरजेचं आहे, तिथे तिथे, नियंत्रण ठेवण्यासाठी नियमात राहून, मानवी अथवा प्राणी जन्मात येऊन दुरुस्त्या जरूर केल्या आणि त्या त्यावेळी त्या दुरुस्त्या गरजेच्या होत्या. या व्यतिरिक्त प्रत्येक चराचरातील सजीव आणि निर्जीव वस्तुंच्या जीवनाचं चक्र कर्ममार्गात बांधून त्यातून त्यांना सुटण्याचं तंत्र, शास्त्र वेद, पुराणं, ऋषीमुनी, संत महंत यांच्या माध्यमातून मानवाला शिकवलं आणि वेळोवेळी, याकरता, पुण्यवान जीवांना मानवी देहात गुरुस्वरूपात पाठवून, त्या ज्ञानाची महती सतत तेवत राहील याची नित्य सोय केली.

मानवाने शक्य आहे तिथे त्या त्या युगात त्या त्या युगातील उचित भक्ती, योगयाग, तप इत्यादी मार्गांचा वापर करून आपली उन्नती साधली. या सर्व साधनात तुलना करणं अशक्य आहे. तरीही प्रत्येक साधनात, ज्या उद्देशाने त्याची साधना, भगवंताच्या एका विशिष्ट रुपाला मनात योजून, केली गेली, त्या त्या स्वरूपातील शक्तीनुसार इच्छित वर आणि आशीर्वाद देऊन, मानवाला त्याच्या तपसामर्थ्यानुसार शक्ती, सिद्धी प्रदान केली. 

इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच परमेश्वराची ही विविध रूपं विशिष्ट शक्तीस्वरूपात प्रकट झाली, तरीही त्यांचं मूळ स्रोत हा एकच आहे. म्हणजेच जरी एखादा देव विशिष्ट गुणांसाठी प्रसिद्ध अथवा भजला व पुजला गेला, तरी त्याचं प्रकटीकरण आपल्यासमोर त्या शक्ती व सिद्धीसाठी झालेलं आहे. पण त्यामागे विश्वाला नियंत्रित करणारी शक्ती अर्थात परम ईश्वर हा गुह्यस्वरूपात अथवा त्या शक्तीच्या मागे अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असतो. 

त्यामुळे ज्यावेळी त्याच्या ज्या रुपाला आपण भजतो त्याच रुपाचं साध्य आपण प्राप्त करतो. कारण जसा भाव तसा देव हे परम सत्य आहे. म्हणजेच आपणच त्याला एका मर्यादित रुपात वा स्वरूपात पाहून पूजतो. तरीही त्याची शक्ती अनंत आहे आणि असतेच. 

म्हणूनच गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की सर्व त्यागून मला शरण ये. याचा व्यापक अर्थ हा की, तू ज्या ज्या मर्यादित स्वरूपाला पूजतोस, तो तुझा मर्यादित भाव त्यागून माझ्या अमर्याद रुपाला, शक्तीला शरण ये म्हणजे माझ्या अमर्यादित स्वरूपाला तू प्राप्त होशील. जितका काळ वा जन्म मानवी देहात आहेस सुख शांती आणि समाधान प्राप्त करशील आणि अंती मला अर्थात माझ्या पूर्ण स्वरूपाला प्राप्त होशील. 

मामेकम् शरणं व्रज. 

बघूया अजून विस्ताराने उद्याच्या भागात 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...