Skip to main content

भोग आणि ईश्वर ८२

भोग आणि ईश्वर  ८२
  
कालच्या लेखाला अनुसरून चिंतन करताना, मन बुद्धी आणि आत्मा यांच्या संगमाबद्दल विचार करता करता, ध्यान कधी लागलं समजलं नाही. ध्यानात वा कल्पनेत असताना,  मनातच घर करून असलेल्या ईश्वराशी संवाद साधता आला. त्यात जे विचार आले, ते प्रत्यक्ष लिहिण्यापेक्षा तो संवाद मुक्तकाव्यमय करून मांडण्याची कल्पना डोक्यात आली आणि ती त्वरित अंमलात आणली.  तेच  ईश्वराशी मनात संवाद साधताना आलेले विचार पुढे मांडत आहे. त्याचा मतितार्थ उद्या विचारात घेऊ. 

भक्त :

तू मला दिसत नाहीस मान्य,
पण मी तर तुला दिसतो ना,
कसल्या परीक्षा घेतोस, कर्मफलाच्या

एकदाच सांगून टाक ,
तुला अनंत अडचणींच्या विळख्यातून ,
मार्ग काढ़ायचाय, एकट्याला

अनेक जन्मांची बीजं रोवल्येस तू ,
त्याचाच माग काढत फिरायचय ,
आणि समजुन घ्यायचय स्वतःच, स्वतःला

आणि सांगून गेलायस तू गीतेत,
कोणत्या कर्माचं फलित, कधी
समोर येईल, ते मीही जाणत नाही

तू भोग, अनंत राशी पापांच्या,
तूच निर्माण केलेल्या, तुझ्याच कर्माने,
रस्ता तुझा, तूच आखलेला, तुझ्याचसाठी

पण तू दिलयस सोडून मला,
हा रस्ता, चाल आता स्वतःच ,
आणि हे पण म्हणालास मला,

तूच कर, तूच भोग, तूच संपव
आणि मग ये माझ्यापाशी,
कोळयाचं जाळं दिलयस मला

म्हणालास कधी , दिसलास कधी,
क्षुद्र कीटक आणि मी काय फरक
आहे बोल , सांग एकदातरी

भगवंत शांतपणे स्मित करून, वदले : 

बोलू मी आता नककी ,
झालय तुझ बोलून, सांग ,
मग मी सांगतो ते नीट ऐक

निर्गुणाच्या गाठी मारल्या मी,
सगुणात नेऊन, तूच त्याचं जाळं केलस
सर्व बीजं तूच पेरलीस, वाटेत तुझ्या

मी फक्त आणि फक्त भक्त पाहतो रे
त्याच कुल शील, जात काही कळत
नाही मला , ते तू केलस निर्माण

मोकळ्या वाटा दिल्या तुला सुरुवातीला
तूच त्याच्यामधे गुंता निर्माण करतोस ,
अडकतोस तूच, विणतोस कोष तूच,

सोड सर्व पाश मायेचे, मोहाचे, षड्रिपुचे
झुगार बंधनं नियमांची , अनिष्ट प्रथांची ,
पायमल्ली कर, कालबाह्य नियमांची

मी फक्त हॄदयातील हाका ऐकतो,
मार एक हाक मनातून, आत्म्याच्या गाभ्यातून,
समोरच असेन मी सतत, सदोदित, अविरत.

तूच बोलावत नाहीस , संकोचाचे बांध बांधलेस
प्रथा, पूजा अर्चा यांचा गुंता तूच केलास ,
कधी कळणार तुला, वेड्या ओळख मला.

मग बघ निर्मळ प्रेमाचा झरा पाझरेल,
तुझ्या हॄदयात, माणूस आहेस ना ,
मग बुद्धि, मन, आत्म्याचा साध संगम

कर विचार हे तिन्ही मी का दिलेत 
बुद्धी मस्तकात, आत्मा हृदयात आणि
यांचा दुवा, हे मन मुक्त,  संपूर्ण देहात 

जोड त्यांचे धागे, कर बाकीचं मागे
कर मुक्त शंकांना, जोड दे इच्छेचा 
धर धागा हा नामाचा नामाच्या प्रेमाचा
तीच असेल साधना साध्य साधण्याची
तीच असेल खरी समाधी साधण्याची 

शब्द : ईश्वरी

यावर सखोल  चिंतन करा,  उद्याच्या भागात पुढे विचार करू. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...