Skip to main content

भोग आणि ईश्वर ७६

भोग आणि ईश्वर  ७६
  
मन हे दुधावरच्या सायीसारखं असतं. म्हणजे कसं, तर,  ज्यावेळी आपल्याला ती साय चहात किंवा कॉफीमध्ये दूध ओतताना नको असते त्यावेळी ती हमखास पुढे येऊन चहात पडणार  आणि ज्यावेळी ती हवी असते त्यावेळी ती मागे मागे जाणार. मनही तसच आहे. ज्यावेळी आपल्याला एकाग्रता हवी असते त्यावेळी ते चळवळ वा अनेक विचारात आपल्याला गुरफटून टाकणार. पण मग मन आपल्याला कसं काय साथ देणार, मदत करणार. 

या सर्वांचाच विचार करून समर्थांनी मनाचे श्लोक लिहून चंचल, अस्थिर, वाऱ्यासम मनाला समजवण्याचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. पण हे कसं साध्य होईल, तर मन या अदृश्य पण अस्तित्वात असलेल्या वारुचे दोन साथीदार आहेत बुद्धी आणि आत्मा. बुद्धी जसं मनाचं ऐकण्याचं कार्य करते त्याचप्रमाणे बुद्धी ही, मनाला समजावून सांगण्याचं कार्य करते. कसं.

तर आपण खूप वेळा वाचतो की राग आला तर तो शांत करायला एक ते दहा किंवा त्याच्यापुढे शंभरपर्यंत आकडे मोजावे, म्हणजे राग शांत होतो. यात मन हे त्याक्षणी क्रोधीत असतं, मग आकडे कोण मोजणार, तर बुद्धी आणि आत्मा याक्षणी वा त्यावेळी बुद्धीला चेतना देणार अर्थात जेणेकरून शरीरात त्यावेळी क्रोधाने निर्माण झालेले हार्मोन्स आपलं काम करायच्या आधी मेंदू व मेंदूत असलेली बुद्धिरुप शक्ती तेच हार्मोन्स स्थिर करण्याचं कार्य करते.

म्हणजेच ज्यावेळी आपण तीन साथीदारांपैकी एकाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी इतर दोन आपल्याला मदत  करतात. हाच त्यांचा एकमेकांमधील संवाद धरून पुढे जायचं आहे. याच मुद्द्याला वा तत्वाला पुढे न्यायचं आहे आणि आपल्या मनाशी आपल्याला संवाद साधायचा आहे. हा संवाद आधी मुद्दाम नन्तर आपोआप सुरू राहतो किंवा सतत होत राहतो. 

खूपवेळा आपण म्हणतो मन चिंती ते वैरी न चिंती. यात खुपसं सार किंवा गुह्य दडलेलं आहे. म्हणजे त्यावेळी काही चुकीचा वा वाईट विचार मनात येतो त्यावेळी बुद्धी आपल्याला संकेत देतं आणि आत्मा जाणीव करून देतो की हे चुकीचं आहे किंवा हा विचार गैर आहे. हाच झाला मूक किंवा अजाणतेपणी घडलेला संवाद. अजाणतेपणी अश्यासाठी की, आपल्याला माहीतदेखील नाही की हा संवाद आहे. याचप्रकारे जेंव्हा बुद्धी चुकीचा मार्ग अवलंबत असते त्यावेळी आत्मा मनाच्या साथीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते, आपण ऐकतो की नाही तो वेगळा भाग. 

मनाशी घडलेला हा अजाणता संवाद आपल्याला प्रयत्नपूर्वक मुद्दामहून घडवायचा आहे. कसं तर ज्यावेळी मन एखादा विचार करतं, त्यावेळी एखाद्या मित्राशी आपण बोलतो त्याप्रमाणे  मनाला विचारप्रवृत्त करायचं. जर मनात आलेला विचार अयोग्य असेल तर त्याला हात धरून समजावून सांगा, म्हणजेच आपणच आपल्याशी बोला की, असा विचार चूक आहे आपण दुसरा एखादा विचार करू. किंवा अशावेळी मनाला एखाद्या चांगल्या विचाराच्या चिंतनात गुंतवून त्या चुकीच्या अथवा गैर विचारातून बाहेर न नेता त्याच्या जागी दुसरा विचार स्थिर करण्याचा प्रयत्न करावा.

यात कुठेही जोर जबरदस्ती नसावी. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगिन की, एखाद्या मित्राशी वा मैत्रिणीशी आपण बोलत आहोत इतक्या सहजपणे आणि प्रेमभावाने बोलत, बोलण्यात गुंगवून त्याला हळूहळू मूळ विचारातून सहजी बाहेर काढून त्याजागी दुसरा चांगला विचार स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. हे जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक, मुद्दामहून बुद्धीच्या साथीने करावं.  ही प्रक्रिया प्रत्येक चुकीच्या विचाराबाबत करत गेल्यास ती एक सलग प्रक्रिया होऊन आपला नित्याचा भाग होऊ शकते. यातले अजून काही मुद्दे व खाचाखोचा बघूया पुढील भागात. 

म्हणूनच मी सतत सर्वांना सांगतो की,  चिंतन करा, विचार येतील आणि त्यातील सद्विचार घेऊन पुढे जा, मार्ग सापडतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...