भोग आणि ईश्वर ६६
भगवंताच्या आशीर्वच लहरी प्राप्त होणं हा मुळात भाग्य योगाचा भाग आहे. मुळातून नाम घ्यावंसं वाटणं हीच खूप आनंददायी गोष्ट आहे, जिवाकरता आणि अंतरात्म्या करता. म्हणून सुरवात करून यात नेटाने पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. लहरीस्वरूपात मनाच्या सकारात्मक इच्छामध्ये, नामाचा नादमय आल्हाददायक आनंद, मिसळून आपण ज्यावेळी या देहातून बाहेर सोडतो, किंवा आपल्याकडून ज्यावेळी हे होत असतं, त्यावेळी त्याच्या प्रसारणाने आजूबाजूचं वातावरण गंधित आणि भारावलेलं व्हायला सुरुवात होते.
याचा परिणाम म्हणजे सकारात्मक लहरींचा संचार वाढून नकारात्मक लहरी व शक्ती यांचा परिणाम व प्रसार कमी व्हायला मदत होते. ज्या घरात नामस्मरणाचा जागर नित्य आहे वा असतो, त्या घरात गेल्यावर शुद्ध, सात्विक चैतन्य शक्तीचा अनुभव आपल्याला जाणवतो. त्या ठिकाणी समदृष्टी, समाधान आणि शांती नित्य वास करून असते.
भौतिक शास्त्राच्या नियमानुसार गुरुत्वाकर्षणातील ऋणभारित ऊर्जाकण अर्थात निगेटिव्ह एनर्जी पार्टीकल्स , हे, आपण नाम अथवा कोणत्याही अनुष्ठान वा साधना याद्वारे तयार करत असलेल्या धनभारीत ऊर्जाकणांच्या समप्रमाणात निर्माण होऊन, त्याचा परिणाम शून्यवत करते.
म्हणूनच हे चक्र भेदण्यासाठी पुराणकाळापासून कोणताही धार्मिक वा योगिक अथवा शुद्धीक्रिया किंवा सकारात्मक गोष्ट करताना, एखादं आसन घालून बसायची परंपरा रूढ करण्यात आली. हे आसन कृत्रिम धाग्यांनी जसं नायलॉन वगैरे असेल तर ते विद्युतभारित होतं वा होऊ शकतं आणि उलट नकारात्मक परिणाम वाढू शकतो. आपण एखाद्या अश्या वस्त्रावर कंगवा किंवा तत्सम प्लास्टिक वस्तू फिरवून पहा विद्युतकण निर्माण झालेले पहायला मिळतील.
म्हणूनच असं आसन लाकडी किंवा खादी अथवा कॉटनचं असावं, जेणेकरून आपण निर्माण केलेली सकारात्मक उर्जाशक्ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने कापली जाणार नाही. याच कारणाने बरेच वेळा आपण तक्रार करतो की, मी इतकं करतो वा करते त्याचा परिणाम काहीच दिसत नाही. त्यामागे या भौतिकशास्त्र नियमाचा परिणाम, हे एक कारण असू शकेल.
म्हणूनच नाम कधीही कुठेही व कसही घ्यावं, परंतु आपण नुसत्या जमिनीवर बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. याच कारणाचा दुसरा परिणाम म्हणजे ज्यावेळी आपण नकारात्मक विचार करतो, त्यावेळी, गुरुत्वाकर्षणशक्तीच्या नकारात्मक लहरी, आपल्या मनातील नकारात्मक उर्जेला अधिक वाढवतात. म्हणून एकजण रागावला की, त्याचा परिणामस्वरूप दुसरा रागावू शकतो.
अशावेळी दुसऱ्याने त्या नकारात्मक उर्जाशक्तीचा भेद करणं गरजेचं असतं. याचसाठी राग आला की, व्यक्त करण्याआधी मनातल्या मनात शंभर वा दहा आकडे मोजावेत असा प्रघात वा प्रथा पाडली गेली, ती याचसाठी की, या दुप्पट झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम जितका वेळ आहे, तितका वेळ दुसऱ्याने शांत राहून, त्या विद्युत उर्जेला साथ न देणं. यात जर तुमचा अहं साथीला असेल तर ती नकारात्मक ऊर्जा तिप्पट वा बहुपट होऊ शकते.
म्हणून एक रागावला की दुसऱ्याने सरळ आकडे म्हणण्यापेक्षा मनातल्या मनात नाम घ्यायला सुरवात करावी. नामाच्या सकारात्मक लहरी नक्कीच त्या नकारात्मक लहरींना शांत करून क्रोधाने होणारा घात टाळतील. हाच नियम आपल्याला राग आला तरीसुद्धा पाळावा.
यावर अजून चिंतन गरजेचं आहे, पाहूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment