Skip to main content

भोग आणि ईश्वर ९१

भोग आणि ईश्वर  ९१
 
आज आपण आत्मबलशक्ती म्हणजे काय त्याचा विचार करूया. ज्यावेळी देह गर्भात असतो त्यावेळी तो मातेच्या उदरात स्थानापन्न असताना, त्याची सुरक्षा माता स्वतः करतेच, पण त्या गर्भाची आत्मबलशक्ती त्याचं मुख्य रक्षण करते. म्हणूनच काही काही गर्भ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा, त्या परिस्थितीला टक्कर देऊन, या जगाला पाहतात. अश्या जीवांना संपूर्ण आयुष्य त्या आत्मबल शक्तीचा लाभ होतो आणि जन्मतः प्राप्त आत्मबलशक्ती त्यांना आयुष्यभर देहाने सशक्त आणि मनाने कणखर राखते. 

अश्या व्यक्ती कोणत्याही संकटात डगमगताना वा बावरलेल्या अथवा संकटाला भ्यायलेल्या दिसणार नाहीत. अश्या काहींना जन्मजात आत्मबलशक्ती प्राप्त असते, अर्थातच ती पूर्वसुकृतानेच. आत्मबलशक्ती म्हणजे अंतरात्म्याची जागृत अवस्था, ज्यायोगे, आत्म्याचं देह, मन, बुद्धी यांच्यावर स्वनियंत्रण प्राप्त असतं आणि त्यांना सदोदित एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवतो. 

कोणतंही काम सुरू करताना त्यांना त्याची माहिती असो वा नसो किंवा जाण असो वा नसो, पण ते न भिता वा न घाबरता त्यात झोकून  देतात. कदाचित अपयश आलं तरी, खचून न जाण्याची वृत्ती, त्यांना जन्मजात प्राप्त असते. अशी निर्भीड लोकं, जीवनात फार उंची गाठतील किंवा खूप यश मिळवतील असं नसेलही, पण जे करतील ते आत्मविश्वास पूर्वक करतील. अशी आत्मबलशक्ती प्राप्त आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली काही महान व्यक्तित्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी. यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्य करून धवल यश प्राप्त केलं. 

आपण कधी कधी या गोष्टीचा अनुभव घेतला असेलही. म्हणजे एखादी गोष्ट करताना आपल्याला पूर्ण उत्साह, ऊर्जा, शक्ती आणि मनाची एकाग्रता आपसूक जाणवते. पण ती क्वचितप्रसंगी, किंवा ठराविक कामात. गर्भात असताना काही प्रमाणात सर्वांच्या बाबतीत थोडीफार जागृत असणारी आत्मबलशक्ती, नन्तर देह, मन आणि बुद्धी यांच्यावरील संस्कारांमुळे लोप पावते किंवा झाकली जाते. जसजसं आपण मोठे होतो, त्याप्रमाणे, आजूबाजूचं वातावरण, घरची स्थिती, शिक्षण इत्यादींनुसार आत्मबलशक्ती वृद्धिंगत वा अस्तंगत होऊ शकते. 

यात प्राप्त परिस्थितीबरोबरच पूर्वजन्मातील संस्कार वा संचित याचाही बराचसा सहभाग असू शकतो. पण जर अशी आत्मबलशक्ती नसेल वा क्षीण असेल तर काही उपाय करू शकतो का. मुळात बुद्धी, मन याद्वारे आत्म्याचं तेज व ओज वाढवण्यासाठी मनाला सशक्त करून, बुद्धीने त्याला साथ देऊन, हळूहळू आत्मबलशक्ती पुनः स्थापित होऊ शकते. मनात असलेला आत्मविश्वास, ज्या प्रमाणात वाढेल, त्या प्रमाणात आत्मबलशक्ती पुनः जागृत होऊन, आपल्या मूळ तेजाला आणि ओजाला प्राप्त करू शकते. 

किंबहुना अशी आत्मबलशक्ती प्राप्त झाली की, माणूस कोणतेही साधन, पूर्ण एकाग्रतेने आणि निराकार रूपाने, करून, आपले ध्येय साध्य करू शकतो. अश्या कार्यात स्वतःच्या प्रयत्नाबरोबर सद्गुरूंची कृपा निश्चित कारणीभूत होते. गुरुकृपेने निश्चित आत्मबलशक्ती जागृत होते, फक्त ती श्रद्धा व तो विश्वास तितकाच दृढ राहणं आपल्या हाती असतं. त्यासाठी सद्गुरुकृपेच्या जोडीला साधनाच उपयोगी येते. जे एकलव्याप्रमाणे गुरू न करता साधना करत असतील त्यांना चैतन्यरूपातील सद्गुरू सार्थ साथ देतील, हे नक्की आणि योग्यवेळी योग्य गोष्टी ते करवून घेतली. 

आत्मबलशक्ती प्राप्त असणं आणि ती साधनेतून व गुरुकृपेने प्राप्त होणं हे त्या त्या जीवाच्या पूर्वपुण्यकर्म आणि नित्य साधनेची चिकाटी व आवेग यावर अवलंबून आहे. अशी आत्मबलशक्ती प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही नकारात्मक परिस्थितीचा परिणाम मनावर होत नाही आणि कोणत्याही विपरीत स्थितीत मनावर आत्म्याचं पूर्ण नियंत्रण राहू शकतं. म्हणूनच आपली साधना करताना आपण नित्य आत्मबल शक्ती प्राप्तीची कामना,इच्छा व प्रेरणा ठेवू, म्हणजे काला नुरूप, साधनेनुसार आणि सद्गुरुकृपेने नक्कीच प्राप्त होईल. 

काल ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी पुनः: 

पुढील आठवड्यात माझ्या श्रीरामरक्षा भावार्थ आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या संयुक्त पुस्तकाबद्दल पूर्ण तपशील लेखामध्येच देण्यात येईल. काही जणांनी आधीच आगाऊ नोंदणी केली आहेच त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदले आहेत. त्यांच्याशी मी संपर्क करीन, ज्यांना अजूनही आगाऊ नोंदणी करायची आहे, त्याना प्रसिद्धी पूर्व सवलतीत ती मिळू शकेल. माझ्या खाली दिलेल्या व्हाट्सऍप क्रमांकावर संपर्क करून नोंदवून ठेवू शकता. सर्व सोपस्कार नीट पार पडले तर मार्च शेवटी किंवा जास्तीतजास्त गुढीपाडव्यापर्यंत प्रकाशन होईल. सदरची लेखमाला पूर्ण झाल्यानंतर ती पण पुस्तकरूपात छापण्यात येईल, तशी सूचना आगाऊ दिली जाईल.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...