Skip to main content

Posts

Showing posts from 2015

रविराज नमन

  रविराज नमन    रविराज तू आशीष दे ये लीनता बनती रहे तेरे ह्रदय मेंही सदा श्रुष्टि की धग जलती रहे ।। तू यूं सदा अंगारबन निर्माण वश चलता रहे तेरा नियम जलकर किरण बनकर यूँही आता रहे ।। तू मौन है पर तेरी जुबाँ यूँही हमें जीवित रखे तू कांप उठे और फिर ये आग तेरी शूल रखे ।।  तू शांत हो तो ठण्ड भी हमको सताने पर तुले तब तू इसे बस इकही  झलक में तापकर जलमे तुले।। तू राग है इस श्रुष्टि का जो हर समय कहता है ये जो जल  रहा  सबके लिए वो आग बन बहता रहे।।  तू है जीवन  तू ही किरण तू आग और जल भी है तू तेरे ह्रदय का प्रेम भी परिवर्तन करे हर पल ही तू।। अब ये नमन स्वीकार कर मेरा ह्रदय अंगार कर तेरी तरह हर एक प्राणी कुछ करे  यह स्वीकार कर।।                                प्रसन्न आठवले

प्रेम स्वप्न

  प्रेम स्वप्न      मी तूला जग मानिले तूही मनी हे जाणिले समजून हे सर्वस्व माझे मी तूझ्यावर वाहीले । मग काय आता बोच ही देसी मला तू  भंग हां ।।   मी तूला …….         नाही पुढे जर जायचे तर पाऊले का टाकली तूही किती माझ्यात अन मीही तूझ्यातच मग्न रे होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।। मी तूला …….   दोघे कुठे आहोत हे फासे असे का सांडले मीही तूझी आहे परी तू का मला अव्हेरले कालच्या वाटेवरी तू भेटशी मजला कधी मी तूला …….    हे मानूनी मी वाटेवरी आहे कधीची थांबलेली     मला तो शब्द आणि प्रेम ही मज का दिले ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।। मी तूला …….   मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाऊके तरीही तूझी आहे परी ही आस तू का सोडली हे शेवटी मी सांगते माझे तूझ्यातच जग सख्या ।।   मी तूला …….       कवी  : प्रसन्न आठवले 

गीत गणेशायन १

  गीत गणेशायन १     प्रेममयी मूर्ती तू शशी विलसे माथा रवीतेजची मुखमंडली बुद्धिचा दाता ओमकारा साकारा त्रिगुणांचा धाता कार्याचा आद्यची तू विघ्नांचा त्राता ।।   सूर्य चन्द्र ग्रह तारे नक्षत्रे नभी विहरति तव नामे दिन उगवे निशिकर संभ्राता अवघे भूमण्डल तू त्रिलोकी महता स्वामी तू सकलांचा मोक्षाचा दाता ।।   प्रेममयी मूर्ती …….    रत्नाचा मुकुटची तो शोभे तव माथा वकृतुण्ड श्यामवर्ण वामे करी शुण्डा तेजाची नेत्रे दो रिपु हो  भयभीता शूर्पकर्ण उच्चमती संकट संक्रांता ।।   प्रेममयी मूर्ती ……….    उदरी तू धारियले प्रमरूपे भक्ता त्यावरी तो सर्प जणू भक्तभय रक्षा तुंदिल तनु चपलचरण  करी लिलये नृत्या तव चरणी काव्य सुमन हर्षे स्विकार्ता ।।                                  प्रसन्न आठवले   

तूझे सूख

तूझे सूख    तूझे गूज मनीचे मी हे जाणलेले तू झ्या काळजाचे धुके पाहिलेले ।। मी शोधून हे कसे मांडलेले जसे जाणिवांचे थवे सांडलेले ।।   मला वाटले मी आहे सखा ग  तूझ्या भावनांना जाणेंन मी ग तरी हे तुला का न वाटे कळेना   तू झ्या अंतरी व्यंचना ही कशी ग ।   तू झे गूज ………    जिथे पोचलो तिथे हास्य आहे जिथे पाहिले तिथे बाग़ आहे तरीही कळेना अजूनी कसे ग तू झ्या अंतरी अश्रू  लाचार आहे ।।   तूझे  गूज ……….    मी शब्दातूनि काही सांगेन तरीही तूला जाण आहे उरी काय दाटे तू अजूनी मला मानसी एक स्पर्शी तू ला अंतरी का न विश्वास वाटे ।।   तूझे गूज  …….…।       मला वाटते चूक ती कालची मी बोलून गेलो नकोतेच काही उमगले मला की  तू गेलीस फिरुनी  पून्हा बोलले ना  तू वाटे न काही ।।   तूझे गूज ……   मी परकाच याची मला जाण आहे सुखाचा मी स्वप्निल अनं भास् आहे तरीही कळावे तुला हे कधी की   तू झी मैतरी जी सखे ख़ास आहे ।।   तूझे गूज    ...

नवा दिवस

    नवा दिवस    चला चला रे पून्हा नवा हां आनंदाचा दिवस उगवला प्राची वरती प्रभा उषेची घेवून आला सूर्य उगवला ।। उत्साहाचे सळसळ शिरवे संचारुन फिरी येऊ द्या रे दवात भिजल्या गवतावरचा पायाना ओलावा द्या रे ।।  पुन्हा नव्या या दिवसाची ती शक्ति घेवून जागे व्हारे पुन्हा नव्याने कामा लागा जुने कालचे सोडून द्या रे ।।  नैराश्याचे रंग गळाले जाणा गेला राजनीनाथची आता आला दिन सोन्याचा पुन्हा उगवला सवितानाथही ।।  सारे सारे काळोखाचे राज्य संपले सोडून द्यारे नव्या दिनाच्या नव्या जगाच्या गाण्या संगे ताल धरा रे ।।   कवी : प्रसन्न  आठवले    

नाते

  नाते  का मन लावू या नात्याला सागर लागेना हाताला ।। जीव नको हां गुंतू द्यावा मग पून्हा का चिंता वाहा ।। वळणावर सोडून जे नाते  पून्हा मन त्या वाटे जाते ।।  दूर दूर सुख आहे भासे फूल कुठे हा काटा  हासे ।। का उगवावा येथे पुन्हा नाते की मृगजळ ते  पुन्हा ।। वाटो कोणा काही काही  पून्हा का मी झळ सोसवी ।। या दुःखानो परतुंन या रे वाट्याचा मज हिस्सा द्या रे ।।   हां जीव कुठे  गुंतवू का नये मज   सुख असे का येऊ नये ।। कवी : प्रसन्न आठवले घेतली याक्षणी जीव हां हरखूनी  ।।

प्रतिभेचे देणे

  प्रतिभेचे देणे      मी प्रतिभेचे देणे तूजला पुन्हा मागतो शारदे तुला वन्दितो तू ला प्रार्थितो  हे गजवदना हे गणराया हरसूता मोरया आता दे मज शब्द सम्पदा माथा ठेवितो   लाख चूका घ्या उदरामाजी हे दीन घना गौरीसूता हे तू स्वामी तू जला प्रार्थियतो  विद्येचा तू धाता तू तर आद्य प्रदाता दे मज ठायी शब्दखाण ती हर हर ओमकारा  तूझ्या वीना ही वाणी मूकच मुषकवाहना शरदातिरि तूझ्या मंदिरि दास मी आहे तू झा हेदेवी तू कृपावंत हो स्फूर्ति सूधा हो जरा करुनी वंदन ठेवूनि मस्तक तव चरणी माते तूझ्या कृपेचा प्रसाद देसी विश्व तू झे भासते तू असशी तर जिंकून घेईन शब्दांची जननी आता ठेवून मस्तक पायी रुधिरार्पण करितो आता विनवूनी तू ज चरणावर एक मागणे गातो  सारे जीवन अर्पीन काव्या साठी मी  माझे  सारे जीवन अर्पीन काव्या साठी मी  माझे     कवी : प्रसन्न  आठवले 

श्रावण

    श्रावण      हिरवाळीच्या गालीच्यातून तृणपुष्पांची शाल पांघरुन जलबिंदुची चादर ओढून श्रावण आला बरसत बरसत ||   आकाशाच्या चारी दिशानी निसर्ग आपुल्या अष्ट भुजानी सोडून दिधल्या अनंत धारा श्रावण आला बरसत बरसत ||   नभो मंडळी दाटी झाली मेघांची ती गर्दी जमली वसुंधरा ही तृप्त जाहली श्रावण आला बरसत बरसत ||   ऋतुपर्व हे सुरु जाहले लगबग लगबग सारे करती दशोदिशाना हर्ष भरुनी श्रावण आला बरसत बरसत ||   आता सारे फुलले मोदे रंगांचीही झाली उधळण निसर्गातही अवघी धुंदी श्रावण आला बरसत बरसत ||     कवी : प्रसन्न आठवले 

स्वातंत्र्य

  स्वातंत्र्य      मन आज तराणे गाई तो दिन सोन्याच्या आला हां देश  गुलामी तोडून निर्वेध स्वतंत्रची झाला || त्या दिशा उजळल्या साऱ्या त्यावेळी चंद्र नभाला उच्चारव बोलत होता हां देश स्वतंत्राची झाला || बलीदाने घडली अगणित त्यासाठी लढले असतील कितीकानी प्राणही दिधले संसार उधळले असतील || रक्ताने वा रक्तावीण तरी प्रयत्न सारे फळले हे भाग्य आम्हा अर्थासह स्वातंत्र्य काय ते कळले || या देशासाठी ज्यानी गमवीले प्राणही आपुले प्राचीवर उदयासाठी रुधीरही सांडले आपुले || करू त्याना वंदन आपण करू त्याना याद सदोदीत लढले अन अमर जहाले करू त्याना याद सदोदित ||                 प्रसन्न आठवले

बेगडी देशप्रेम

बेगडी देशप्रेम आता चार दिवस देशप्रेम लावतील बिल्ले छातीला ठेवतील डीपी आइकॉन रिंगटोन मोबाइलला ।। घेतील शपथा प्रेमाच्या देशासाठी त्याग्याच्या जातील सुद्धा सियाचेनला भेटी घेतील जवानांच्या ।। आणि पुन्हा वर्षभर शांत आपल्या कामात सर्व व्यस्त घड्याळापाठी समस्त धावतील होऊन तंदुरुस्त ।। मी आणि माझ देशप्रेम मनात ठेवीन कायमच नको रिंगटोन डीपी काहीही एकदाच दाखवून द्यायच।।   कवी :  पसन्न आठवले 

मन ये गाये सरगम

मन ये गाये सरगम रिमझिम गिरे सावन या गाण्याच्या  चालीवर हे गाण लिहिलंय    मन ये गाये सरगम छेड़े सूर ये ऐसी धुन तेरेही खयालो में डूबा रहे हर पल मन ।।धृ ।। ऐसेही बेमौसम बरसे घटायुं जैसे के साजनसे मिलने चली प्रीतम आजा ना मेरे साजन लगे ना कही ये मन ।।१।। तेरेही खयालो ...... अब तो  तुम्हारी यादे है हरपल जैसेके सावन में बिजली है आँगन खींचा जाए रे हरदम तू ही मेरा कणकण ।।२।। तेरेही खयालो में .....  मूश्किल है अबतो रहना तूम्हारे बीन जैसे के मछली का मूश्किल है पानी बीन  अब ना सताना तूम जल्दी से आना तूम तेरेही खयालो में ....   कवी : प्रसन्न आठवले

पराग कथन

पराग कथन फूलाफूलातील पराग बोले जन्मच माझा पूनर्निर्मिण्या।। इतूके माझे काम असे की जन्म जगी या पुन्हा जन्मण्या ।।१।। कोणा आवडे फूल छान तर कूणा तयातील रंग आवडे ।। कुणी म्हणे हे नाजुक साजुक कुणा तयातील गंध आवडे।।२।। कुणास वाटे वेणी करुया माळू सुंदर केसातूनीया कुणास वाटे गजरा करुया घालू आणि सुंदर दिसूया ।।३।। पण हे माझे भाग्य जगी  याआनंदाला कारण मी रे कुणा मिळाले असे भाग्य जे लहान जन्मी महान मी रे ।।४।। मला लाभला असा जन्म की पुनः पुन्हा मी असा येतसे ज्या योगाने जगण्या माझ्या नवा नवा तो अर्थ येतसे।।५।। कवी : प्रसन्न आठवले

विजय गान

विजय गान   मृदुंग भंग दम्भ पर कलेश कंठ मिथ्य पर विराट पर्व पंथ पर नमामि सार्थ चेतना ।।१।। कुसुमी हस्त वज्र पर धरे धरा ये खड्ग पर चले सदा ही धर्म पर व्रजा करे निखर्व पर ।।२।। रिपू  जले ये अंगरा प्रभा जो भानु सागरा पुनः पुनः प्रहाररा प्रकट प्रतापी ये धरा ।।३।। हजार हस्त साथ है सदा तुम्हारी पाथ पर चले करे प्रताप ये तुम्हारी एक चेत पर।।४।। ध्वजा धरे विजित पर यशोहीगान जीव्ह पर चले ये खड्ग शत्रू  पर विजय तूम्हारी राह पर।।५।। कवी : प्रसन्न आठवले

आस

आस मी तूला जग मानिले तू ही मनी हे जाणिले समजून हे सर्वस्व माझे मी तू झ्यावर वाहीले ।। धृ ।। मग काय आता टोचणी  देसी मला तू भंग हां नाही पूढे जर जायचे तर पाऊल का रे टाकले ।।   तू ही किती माझ्यात अन मीही तू झ्यातच मग्न रे होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।।१।। दोघे कूठे आहोत हे फासे असे का सांडले मीही तुझी आहे परी तू का मला अव्हेरले।। त्या कालच्या वाटेवरी तू भेटशी मजला कधी हे मानूनी वाटेवरी आहे कधीची थांबले ।।२।।  तू मला तो शब्द आणि प्रेम ही मज का दिले ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।। मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाउके तरीही तू झी आहेच  मी पण आस का तू सोडली ।।३।। हे शेवटी मी सांगते माझे तू झ्यातच जग सख्या पण एकदा भेटेन  ही आशा मनी या जागलेली जरी सोडले आहे मला तू एकदा येशील मागे  हीच साधीशीच माझी मागणी मी मांडलेली ।।४।। कवी : प्रसन्न आठवले

ख्वाब हो तुम या

  ख्वाब हो तुम या      चाल : ख्वाब हो तुम या कोई हकीकत कौन हो तुम बतलाओ   स्वप्न तू असशी की सत्याचा भास हे काही कळेना माझ्या मनीच्या तारा छेडूनि जाऊ नको तू ये ना ।।धृ ।।   या मनी प्रीत तू होउनि ये प्रिये उल्हासे हे भासे सारे हे जग खुळे स्वप्न तू ... ये ज़रा साद मी घालितो राणी ये एकांति ही प्रीति आपण ही फुलवू ये स्वप्न तू ...   कवी:  प्रसन्न आठवले 

हद तक खामोशी

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या या गण्या वरून हिंदीत त्याच आशयाच आणि त्याच चालीत बसलेल हिंदी गीत  हद तक खामोशी  जुबां मेरी आज खामोश क्योँ है ये आसूँ मेरी गालों पर नहीं है ये दिल मेरा मानता नहीं है की अबभी मुझे तू चाहता नहीं हैं ।।धृ ।। जुबां मेरी आज खामोश क्योँ है क्या है खेल बंद सारे खुदाके तुम्हे नहीं मांगना खुदासे क्या चाहे ये दिल फिरभी आखिर तुझे नहीं भूल सकता है आखिर ।।१।।   जुबां मेरी आज खामोश क्योँ है मना नहीं है मुझे ये रिश्ता नहीं मुझे है गिला भी कुछभी नहीं कहूँ ये क्या हो रहा है तुमही हो तुम मेरे आँखों में आखिर ।।२।। जुबां मेरी आज खामोश क्योँ है कहूँ भी क्या आज मैं तुम्हिसे करूँभी क्या शिकायत मैं तुमसे मेरा तो दिल पास है अब तुम्हारे मेरी तो सांस भी है तुम्हारी ।।३।।   कवी: प्रसन्न आठवले 

निश्चय

निश्चय निश्चये ती चालली ध्येये तिच्या त्या शांतवाटे चालताना ठेच ती लागून काटे  ते बोचलेले ।। ध्येय साधेसेच होते अन् किती ते सनुलेसे घर तिचे होते परी त्या सारख्या हलतात भिंती ।। अन् उन्हें ती तापलेली येती कवाडे लांघुनिया पण तिला ठाऊक नाही लक्ष्य ते जवळी असावे ।। पाऊले ती थांबली नसतील तर ती पोचलेली हे  तिला सांगून पुन्हा थांबना वाटेमधे तू ।। येऊनी तू पोचलेली लक्ष्य ते जवळी तुझ्या ते पूर्ण  ती होई तपस्या हे तुझे जे ध्येय आहे गाठले ते  ध्येय तू  जवळी तयाच्या पोचलेली ।। कवी : प्रसन्न आठवले

प्रेम गीत

प्रेम गीत गुन गुन गुन गुन भ्रमर गुंजतो मन गीत मधुर प्रेमाचे गाते || धुंद दिशा मोहरल्या साऱ्या आसमंत प्रेमातच विरते || या रंगीत रेशीम इंद्रधनूच्या रंगात रंगल्या  कळ्या पाकळ्या || मंद स्मित तव घेऊन आला आला तव आठव तो आला ।। तूझ्या जाहल्या जाणवल्या मज चेहर्यावर रेषा बावरल्या ।। मज  घेऊन जा  प्रिया जिथे ती  दशोदिशा का असुसलेल्या ।।  ओढ़ मना जाणवते भासे तूज पाशी ती घेऊन जाते ।। फूले शहारा अंगावर तो   धुंद चांदणे होऊन जाते ।। कवी : प्रसन्न आठवले

जाण

जाण मला जाण आहे तू झी धुंद स्वप्ने तू झ्या अंतरंगी उठतीं तरंगे ।। तूझ्या भावना शोध घेती किनारा तू झ्या भावनांची जणू सप्तरंगे ।। तू ला जाण माझ्या मूक्या कल्पनांची तू ला जाण माझ्या सून्या या मनाची ।। तू ला जाण माझ्या जून्या काजळाची तू ला जाण माझ्या धूक्याची कणांची।। मी शोधून जे पाहिले ते मिळाले मी जे बोलिलें मला ते मिळाले ।। मी स्वप्नातूनि पाहिली धूंदी  स्वप्ने मी जे वाहिले मला ते मिळाले ।। तू झ्या धुंद डोळ्यातली स्वप्नमाला तू झ्या लोचनांची मला आस आहे ।। तू झ्या पाउलांची मला वाट आहे तू झ्या अंतरंगी मला जाग आहे। कवी : प्रसन्न आठवले

।।वंदन ।।

।।वंदन ।। मी प्रतिभेचे देणे तूजला पुन्हा मागतो शारदे तू ला वन्दितो तू ला प्रार्थितो   हे गजवदना हे गणराया हरसूता मोरया आता दे मज शब्द सम्पदा माथा ठेवितो लाख चूका घ्या उदरामाजी हे दीन घना गौरीसुता हे तू स्वामी तू जला प्रार्थियतो विद्येचा तू धाता तू तर आद्य प्रदाता रे दे मज ठायी शब्दखाण ती हर हर ओमकारा तुझ्या वीना ही वाणी मुकच मुषकवाहना शरदातिरि तू झ्या मंदिरि दास मी आहे तू झा  हेदेवी तू कृपावंत हो स्फूर्ति सुधा हो जरा करुनी वंदन ठेवुनि मस्तक तव चरणी माते तू झ्या कृपेचा प्रसाद देसी विश्व तू झे भासते तू असशी तर जिंकून घेईन शब्दांची जननी आता ठेवून मस्तक पायी रुधिरार्पण करितो आता विनवूनी तू ज चरणावर एक मागणे माझे माझ्या हातून कोंणाला  नच त्रास कधी होऊदे त्यांच्या हास्या साठी माझे सर्व जीवन वाहूदे कोणा  कधी नच निराश करी मी वचन तूला दिधले मम प्रतिभेचा सागर सारा त्यासाठी खर्चूदे त्यासाठी खर्चूदे त्यासाठी खर्चूदे त्यासाठी खर्चूदे कवी : प्रसन्न आठवले

शाळेतली सुखद आठवण

शाळेतली सुखद आठवण प्रत्येकाच्याच् मनात शाळेतली एकतरी मुलगी असतेच्   तिची जागा मनाच्या आतल्या कोपर्यात कायम असते पुढे याचं लग्न होत संसार मार्गी लागतो बायको मुलं सर्व काही यथास्थित होत पण तरी तो कोपरा तसाच असतो तो वेळ मिळेल तसा दिवसातून आठवड्यातुंन  नियमित साफ़ होत असतो पुढे अनेक वर्ष जातात पण हे मनातून काही जात नसत की ती कुठे असेल काय करत असेल कशी असेल कशी दिसत असेल अनेक वर्ष ती तशीच असते त्याच शाळेच्या ड्रेस मधे तशीच दोन वेण्या फूल तेच हास्य तोच भाव तसच बघण पुढे अनेक वर्षानि ती सापडते दिसते भेटते बोलते मन परत एकदा त्याच वयात जाणिवेत विचारात जात ती काही जात नाही आणि  जात नाही तीच ते रूप आताच आणि त्यावेळच लगेच मन लागत तुलना करायला........... कवी : प्रसन्न आठवले

उत्तर

उत्तर अथांग समुद्र मनाचा पसरुन वाट धुक्यातून शोधे कोणी निळ्या निळ्या या जळा मधुनिया खोली त्याची शोधे कोणी कुठे निवारा कुठे किनारा कुठे कवाडसा शोधे कोणी कुणा इथे का सुख मिळते हे  उत्तर शोधून पाहे कोणी  उगा जीवा का त्रागा कोणा का नच रस्ता सापडतो मग कुणी उगीच हां विचार करतो साथ लाभली का न पुरेशी कुणी कधी हे जाणून घेण्या प्रश्न विचारी मनास आपुल्या समुद्र तरी तो कुठे कुणाला उत्तर देण्या हाती येतो उरे काही का नसे शेवटी हे नच कोणा कळते कधीही तरी पुन्हा ती भटकंती रे करसी मिळण्या उत्तर केवळ कोणा वाटे मज का साथी नसे भेटला आयुष्याचा कोणा वाटे असे भेटला पण का सोडुनि गेला लवकर कुणी शोधतो अनेक साथी वाटे त्याने उत्तर मिळते कुणी फिरे मग दारोदरि भटकंती ती प्रश्ना पायी असे कुणाला ठाऊक उत्तर याचे ते या वाटे सुखीवर पण मग त्याना असे वाटते उत्तर नसते तर किती गम्मत कुणी मानतो की जग मिथ्या कुणी म्हणे हे आहे सर्वची कुणी अडकले सगुण नी निर्गुण या चर्चेच्या फेऱ्यामध्ये एकच आहे याचे उत्तर कुणी एक ना सुखी  जगती रे उत्तर शोधून जन्म कशाला वाया जाऊ देतो तू रे जग ज़ग हे उत्...

कृष्णसखा

कृष्णसखा तो कृष्णसखा राधेला विनावितो मनी मी वाजवितो मुरली तू मुग्ध हो मनी या गोकुळास सोडुनि जाऊ ये वनी मी वाजवितो मुरली तू मुग्ध हो मनी चल वृंदावनी छेड़ितो मी स्वर सुधा मनी या धुंद वनी होऊ मुक्त भान सोडुनि मी करितो तुज मुग्ध जाऊ भान हरपुनी तुज आवाडीलें ते देईन स्वर मी ओतूनी या बासरीचे वेड सखे लागले जनी तरी तव प्रीति यावरी ही ख़ास साजणी तू एक प्रिये माझी ही माझी मोहिनी जरी या जगात प्रीति तव न पाहिली कुणी तू तन माझे जाहलो तव आत्म होउनि या भोगच्या पलीकडले राहु तत्व होउनी कवी: प्रसन्न आठवले

गम

गम कूछ तो गम है या है कशिश या है गीला या कू छ सबब ।। कू छ तो बात है शायद होठोंतक आके रुकती है क्या है रब ।। मुझे मेरे दिल की बात क्या पता क्यूँ लगता है गम कू छ ।। है तो सही एक काटा सा चुभता है दिलमे है तो कू छ ।। कू छ पानीसा कू छ खालिसा अहसास है कू छ दर्द पराया ।। लगता अपना गम है कू छ दिल में काटा है सताया।।   शायर : खूशमिजाज आशिक

लढत

लढत तू राहा खंबीर जग घाव घालेल वर्मी उफाळून येतील पूर वासनेच्या बैलांचे ।। तुझ्या पाठीशी लागतील ढूशी  देवून कळप लाज सोडलेल्या सापांचे ।। खूप होतील प्रयत्न दबाव आणून तुझे मत परिवर्तन करण्याचे ।। तू राहा ठाम कायम चट्टाणासारखी बळ तुला अतूट लढण्याचे ।। घेतील जरी पिशाच्चे घास तुझ्या साऱ्या पुण्याईच्या अनुरूपाचे ।। पूरुन उरशील त्याना तुझे आहे जिगर जिगरबाज लढवय्याचे ।। कोणी नसेंल  यात पण मी असेंन तुझ्या पाठी उभा खात्री बाळग ।। उड़ेल धूळ  धूक्याची जेंव्हा   असेल एक सावली खात्री  बाळग।। कवी : प्रसन्न आठवले

विचार १

विचार १ कधी कधी एखाद्याच् रागावण आपल्याला भावत , राग येत नाही त्याच्या बोलण्याचा,  जर ते निर्हेतुक प्रामाणिक आणि सच्च्या माणसाकडून असेल तर. कारण त्याच्या बोलण्यात राग कमी प्रेम जास्त चिड़ण कमी आणि माया जास्त असते. अश्या वेळी त्याच चिडण खर तर भावालेल असत आपल्याला. किंबहुना त्याच्या रागावण्यात एक आपुलकि दडलेली असते. त्याच ते रागावण आपण मनोमन मान्य केलेल असत. एरवी आपण कुणाच्या बापाला पण भाव देत नसू पण ती व्यक्ति आपल्याला रागावते हे मनात कुठेतरी आपण स्विकारलेल असत . हे तेंव्हाच शक्य असत जेंव्हा ती व्यक्ति प्रामाणिक सच्च्या दिलाची निरलस आणि सदाचारी असते. जेंव्हा त्याचा हेतु साफ निःसंशय तळमळीचा आणि कोणत्याही गैरहेतुशिवाय असतो. आणि अश्याच व्यक्तीचा आपण आदर राखतो त्याच्या चिडण्याला संमानपूर्वक स्विकारतो .

धुंदी

धुंदी हां गुन गुन गुन गुन भ्रमर गुंजतो मन गीत मधुर प्रेमाचे गाते धुंद दिशा मोहरल्या साऱ्या आसमंत प्रेमातच विरते   या रंगीत रेशिम इंद्रधनुच्या रंगातच फूलती कळ्या पाकळ्या वारा मंद स्मित तव घेऊन आला तव आठव तो आला का  तुझ्या  जाणवल्या मज त्या चेहऱ्यावर रेषा बावरल्या मज  घेऊन जा  प्रिया जिथे रे   दशोदिशा का असुसलेल्या का ओढ़ मना जाणवते भासे तुज पाशी ती घेऊन जाते फूले शहारा अंगावर तो तू धुंद चांदणे होऊन जाते कवी : प्रसन्न आठवले

कान्हा

 कान्हा वेंची वेंची मन राधेचे सांडे तव पाठी दमले सगळे गोकुळ अवघे गेले नदी काठी कृष्णा कान्हा रे घनःशामा  ।। सोडुनि दिधले विरही तीजला काय गुन्हा घडला तव नामाची आस लागली हाच पात घडला कृष्णा कान्हा रे घनःशामा  ।। पुनरपी भेटी नच येसी रे काय करे राधा येसी ऐसी आस राखली श्वास तिचा शामा कृष्णा कान्हा रे घनःशामा ।। हेतु तव तू राधा मोहन ब्रीद खरे करीरे तू येई हे एकवार तीज पाहुनी घेई रे कृष्णा कान्हा रे घनःशामा ।। कवी : प्रसन्न आठवले

किलबिल

किलबिल छोट्या छोट्या किलबिल कुंजित आवाजाचा नाद मधुर तो क्षणात भासे तान्हुल्या त्या  देवाचा तो अंश सानुला भास् कसा तो वाटे क्षणभर जणू दुधातच साय साखरी छोट्याश्या त्या जगात त्यांच्या फूल गुलाबी असे भासते जणू वर्खाचि बर्फी घेऊन हातामध्ये देव प्रकटला अश्या सुवासिक दिवसाची ती किती छान अंन आनंदाची अशी जाहली प्रारंभी की पूर्ण दिवस सोन्याच्या झाला कवी : प्रसन्न आठवले

ओढ भेटीची

ओढ भेटीची  एक अनामिक ओढ़ जाणवे  खेचून काही नेते मज का  का वाटे ही हूरहूर नूसती  नसता माझ्या मनात शंका का व्हावी  ही भेट वाटले  का वाटे हा मोदच  भेटूनी  असे अचानक का व्हावे  भासे काही गेले निसटूनी  उरात होते का ही धडधड  का होई हा श्वास जलदही    का पाउल हे पडते अडते  का भासे हे फिरते जगतही पुन्हा कधी का होईल हेही  नच जाणवले कधी कसेही  मृदुल मनाची जाणीव नव्हती  कि हे रम्यच स्वप्न असेही   विसरून गेले जाणीव सगळी  वाटे आता काही न उरले  फक्त एक काळोखी मिणमिण  बाकी सारे स्वप्नी सरले  का रे मजला ओढ जाणवे  तुझा मनाच्या कडे कपारी  का हे आहे असेच स्पंदन  आहे का मी उगा बावरी  निशा भासते गेली संपून  उरे उगवती उषा जणू हि  रंग बदलले दिशा दिशातील   जणू मनातील संपून  तीमिरही  कवी : प्रसन्न आठवले 

जीवन

जीवन  अथांग समुद्र मनाचा पसरुन वाट धूक्यातून शोधे कोणी निळ्या निळ्या या जळा मधूनिया खोली त्याची शोधे कोणी  कूठे निवारा  कू ठे किनारा  कू ठे कवडसा शोधे कोणी कू णा इथे का सूख मिळते   उत्तर शोधून पाहे कोणी  उगा जीवा का त्रागा कोणा का नच रस्ता सापडतो मग कू णी उगीच हां विचार करतो साथ लाभली का न पुरेशी  कू णी कधी हे जाणून घेण्या प्रश्न विचारी मनास आपूल्या समुद्र तरी तो  कू ठे  कू णाला उत्तर देण्या हाती येतो  उरे काही का नसे शेवटी हे नच कोणा कळते कधीही  तरी पुन्हा ती भटकंती रे करसी मिळण्या उत्तर केवळ  कोणा वाटे मज का साथी नसे भेटला आयुष्याचा कोणा वाटे असे भेटला पण का सोडूनि गेला लवकर  कू णी शोधतो अनेक साथी वाटे त्याने उत्तर मिळते कू णी फिरे मग दारोदरि भटकंती ती प्रश्ना पायी  असे  कू णाला ठाऊक उत्तर याचे ते या वाटे सूखीवर पण मग त्याना असे वाटते उत्तर नसते तर किती गम्मत  कू णी मानतो की जग मिथ्या  कू ण...

कवडसा - 25

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,  तसा  घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२५ तर तिकडे योगेंद्रला रूम मध्ये शिफ्ट केल तो हि काही वेगळ्या मनस्थितीत नसावा त्याच्या मनाचा थांग कसा काढावा प्रयत्न करूयात   अथांग हां मज लाभे किनारा तरीही न लाटा स्पर्शी किनारा हे आज पण काय झाले कळेना लाटा कशा शोधति त्या किनारा धुक्याचीच ही वाट आहेच माझी कधीही न मज लाभला रे निवारा तरीही मना वाटले ना कधीही घेऊ कधी कोणताही सहारा मला ना कुणा बोलण्या वाटले अन कधी ना कुणा पाहू हे साठले कुणाचाही मी बंदी नव्हतो कधीही तरी का तुला भेटणे साधले वसे आज हे पंचरंगी धुके जे  तुझ्या पाहिले भाव मी लोचनी  तुला भेटण्या का मी आलो कळेना नसे पाहिले दृश्य मी जे न स्वप्नी अश्या विचित्र भाव विश्वात असलेल्या दोघाना एका विचित्र मनस्थितीतून जाव लागत होत आणि त्याला त्या दोघांचीही विशिष्ट परिस्थिती कारणीभूत होती. शीतल बद्दल आपण  बरच काही जाणलंय पण योगेंद्र आपल्याला खूप नवी...

कवडसा - 24

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,  तसा  घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …२४ शीतल : चला डॉक्टर आई येईल त्याच्या आत जाऊया  योगेंद्र : या वयात पण आईला घाबरतेस.  शीतल : प्रश्न घाबरण्याचा नाहीये योग पण तिला माहित होण्याचा आहे  योगेंद्र : ओह ओके . आणि शोर्ट फॉर्म छान आहे  शीतल : कसला  योगेंद्र : माझ्या नावाचा  शीतल : मी कधी म्हटल  योगेंद्र : आता म्हणालीस ना योग बोलतांना . डॉक्टर आहेत विटनेस  शीतल : ओह ते अचानक निघाल, पण छान असेल तर ठीकच.  डॉक्टर : चला आधी शीतल ला नेतो  डॉक्टर नर्सला बोलावतात आणि शीतलला तिच्या रूम मध्ये शिफ्ट  करतात आणि त्यानंतर लगेचच आशाताई येतात. शीतल बराच वेळ  विचार करत असते. नक्की काय बर चालल असेल तिच्या मनात. बघुया  प्रयत्न करून डोकावण्याचा . तिची भेटी आधीची मनस्थिती अशी होती  एक अनामिक ओढ़ जाणवे  खेचून काही नेते मज का  का वाटे ही ...