विचार १
कधी कधी एखाद्याच् रागावण आपल्याला भावत , राग येत नाही त्याच्या बोलण्याचा, जर ते निर्हेतुक प्रामाणिक आणि सच्च्या माणसाकडून असेल तर. कारण त्याच्या बोलण्यात राग कमी प्रेम जास्त चिड़ण कमी आणि माया जास्त असते.
अश्या वेळी त्याच चिडण खर तर भावालेल असत आपल्याला. किंबहुना त्याच्या रागावण्यात एक आपुलकि दडलेली असते. त्याच ते रागावण आपण मनोमन मान्य केलेल असत. एरवी आपण कुणाच्या बापाला पण भाव देत नसू पण ती व्यक्ति आपल्याला रागावते हे मनात कुठेतरी आपण स्विकारलेल असत .
हे तेंव्हाच शक्य असत जेंव्हा ती व्यक्ति प्रामाणिक सच्च्या दिलाची निरलस आणि सदाचारी असते. जेंव्हा त्याचा हेतु साफ निःसंशय तळमळीचा आणि कोणत्याही गैरहेतुशिवाय असतो.
आणि अश्याच व्यक्तीचा आपण आदर राखतो त्याच्या चिडण्याला संमानपूर्वक स्विकारतो .
Comments
Post a Comment