आस
मी तूला जग मानिले तूही मनी हे जाणिले
समजून हे सर्वस्व माझे मी तूझ्यावर वाहीले ।। धृ ।।
मग काय आता टोचणी देसी मला तू भंग हां
नाही पूढे जर जायचे तर पाऊल का रे टाकले ।।
नाही पूढे जर जायचे तर पाऊल का रे टाकले ।।
तूही किती माझ्यात अन मीही तूझ्यातच मग्न रे
होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।।१।।
होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।।१।।
दोघे कूठे आहोत हे फासे असे का सांडले
मीही तुझी आहे परी तू का मला अव्हेरले।।
त्या कालच्या वाटेवरी तू भेटशी मजला कधी
हे मानूनी वाटेवरी आहे कधीची थांबले ।।२।।
तू मला तो शब्द आणि प्रेम ही मज का दिले
ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।।
मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाउके
तरीही तूझी आहेच मी पण आस का तू सोडली ।।३।।
ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।।
मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाउके
तरीही तूझी आहेच मी पण आस का तू सोडली ।।३।।
हे शेवटी मी सांगते माझे तूझ्यातच जग सख्या
पण एकदा भेटेन ही आशा मनी या जागलेली
जरी सोडले आहे मला तू एकदा येशील मागे
हीच साधीशीच माझी मागणी मी मांडलेली ।।४।।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment