राम अनुज भरत भाग ६०
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
अत्यंत गहिवर येऊन, तरीही अश्रू न येणाऱ्या, गहिवर लेल्या आवाजात माता कैकयी म्हणाली.
"पुत्री, कदाचित यातील काही भाव आणि घाव तुला उमगणार नाहीत. पण तू स्वभावतः सद्गुणी आहेस, म्हणून माझ्याशी इतकी बोलत आहेस. अन्यथा......."
एवढं बोलून, माता थांबली. तिला गहिवर आला आणि आलेला आवंढा, पुढे बोलू देईना. ही गोष्ट शृतकिर्तीने ओळखून, लगेचच तिला जल प्रशनास दिले. त्या पेल्या तील, थोडे जल प्राशन केल्यावर, मातेला पुन्हा भरून आलं. शृतकिर्तीने मायेने, स्नेहयुक्त अंतःकरणाने, मातेच्या पाठीवरून हात फिरवला.त्यातील स्नेहभाव, कदाचित मातेच्या मनापर्यंत पोचले असावेत. माता कैकयी, शांत झाली. त्यानंतर, हे भाव जाणूनच, माता तिला म्हणाली.
"तुझा स्नेह, वृथा आहे. मी त्यास पात्र व्यक्ती नाही, शृतकिर्ती."
शृतकिर्ती, यावर म्हणाली.
"वृथा नाही माते. ज्याअर्थी ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी आपली काळजी घेण्याची विशेष सूचना केली आहे, त्याअर्थी, त्यांच्या मनात आपल्या विषयी, विशेष कोणताही रोष व अनुचित भाव, नक्कीच नाही. त्यामुळे जर तो त्यांच्या मनात नसेल, तर आम्हालाही तो भाव, आमच्या मनात ठेवण्याचा अधिकार नाही. म्हणून तुम्ही निश्चिंत असा, मी व्यक्तिगत तुमची काळजी पाहीन. पण तूर्तास आपण, काही ग्रहण किंवा मधुरस प्राशन करावे, हेच उचित आहे."
तरीही अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगलेल्या माता कैकयीला, या विशेष स्नेहाचा भार असह्य होत होता. पण यात बिचाऱ्या शृतकीर्तीचा काहीच दोष नसल्यामुळे, मातेने, थोडा मधुरस, देण्यास, शृतकिर्तीला सांगितले. अर्थातच शृतकीर्तीने त्याप्रमाणे, उत्तम, सुगंधित, मधुरस, सुवर्ण पात्रातून, कांचन पेल्यात ओतून, मातेला दिला. थोडासा मधुरस प्रश्न केल्यावर, मातेने, अधिक प्राशनास नकार दिला. परंतु शृतकिर्ती ने, प्रेमयुक्त धाकाने, मातेला तो प्राशन करण्यास, भाग पाडले आणि म्हणाली.
" माते, यात्रा अधिक खडतर आहे आणि आपण काल पासून काहीही अन्न ग्रहण वा रसपान आणि जलपान देखील केलेलं नाही. आपण असं केलत तर, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना आम्ही चौदा वर्षे उपरांत, काय उत्तर देणार, आपल्या सकुशलते बाबत. आपल्या स्वतःच्या प्रकृती साठी अथवा निदान ज्येष्ठ भ्राता यांच्या साठी तरी आपण, आपल्या जठराग्नीला थोडी आहुती देऊन, संतृप्त करावं. अन्यथा त्या अग्निचा दाह देहाला शुष्क करेल. आपला मनाचा दाह काळच कमी करू शकेल, परंतु निदान देहाचा दाह तरी आपण ओढवून घेऊ नये "
शृतकिर्तीच्या या चातुर्य पूर्ण कथनाने, माता कैकयी, मनात थोडी प्रफुल्लित झाली. तिने थोडंसं मनाविरुद्ध का होईना, पण शृतकिर्तीच्या आग्रहा प्रित्यर्थ अजून थोडा मधुरस प्राशन करण्यास अनुमती दिली. अर्थात यानुसार शृतकिर्तीने त्वरेने,जवळील सुवर्ण पात्रातील,उत्तम मधु रस, सुंदर सुबक आकाराच्या आणि नक्षीकाम केलेल्या कांचन पेल्यातून, मातेला दिला. मातेने विचारांच्या नादात हळूहळू मधुरस प्राशन केलं.
अर्थातच मातेला थोडी हुशारी आली, बरही वाटलं. त्याहूनही अधिक आनंद शृतकिर्तीला झाला. ती मनमोकळे पणाने मातेकडे पाहून, स्मित वदन म्हणाली.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०८/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment