Skip to main content

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

" राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं. 

त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.."

राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला. 

महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या राज्यात, सज्जन, सद्गृहस्थ, सन्मार्गी यांचा उचित मान सन्मान केला जातो, हे आपण जाणता. मधल्या काळात,  त्यात काहीअव्यवस्था निर्माण झाली नाही ना. त्याचप्रमाणे सामान्य जनांच हित साधण्यासाठी, राज्याचा राजकोष हा सदैव, खुला असतो. त्याचीही व्यवस्था तशीच सुरू आहे ना. कारण स्वर्गीय महाराज दशरथ यांच्या स्वर्गवास होण्यानंतर व ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या वनगमना पश्चात, त्यात काही खंड पडलेला नाही ना. 

पुरेश्या प्रमाणात पाणवठे, पाणपोया आणि जलकुप यांची उचित व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे ना. त्याचप्रमाणे जिथे जलस्त्रोत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, तिथे भूमिजल प्राप्त करण्या साठी व्यवस्था, करण्यात आलेली आहे ना. जेणेकरून वाटसरू, पोटार्थी, राज्या राज्यातील यात्रा करणारे, यात्री, सन्यासी, व देव दर्शनासाठी, यात्रा करणारे, यात्रीजन, यांच्या व्यवस्थेत काही असुविधा अथवा गैरसोय, मधल्या काळात, झाली नाही ना. 

तसं झालं असेल,तर ते खचितच आपल्या राज्याच्या परंपरा व अतिथी धर्म व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गैर आहे. " 

राजपुत्र शत्रुघ्न याचं हे कथन ऐकून, अत्यंत आत्मविश्वास पूर्ण स्वरात महर्षी म्हणाले की,

" राजपुत्र शत्रुघ्न, या राज्याच्या प्रजाहित आणि अतिथी धर्म पालनाची निती,ही गेल्या कित्येक पिढ्यांची, निष्ठेने पालन केली जाणारी व्यवस्था आहे. तिला तडा जाईल, असं कोणतंही, कर्म व अव्यवस्था, इतःपर झालेली नाही आणि इथून पुढे होणे शक्य नाही, इतके नक्कीच मी आपल्याला आश्वस्त करू शकतो. मधल्या काळातील स्थितीत सुद्धा, या मध्ये कोणतीही अव्यवस्था घडली नाही. याचं महत्वाचं कारण, सर्व सेवार्थी जन, दिलेलं दायित्व हा आपला धर्म आहे, हे जाणून कार्य करत असतात.

याचीच परिणती म्हणून, मधल्या काळात, महाराज दशरथ यांच्या अकाली स्वर्ग गमना पश्चात आणि रिक्त सिंहासन व्यवस्थेच्या काळात, प्रत्येकाने आपले दायित्व, उत्तमरीत्या निभावून नेले. नव्हे आपला धर्म प्रत्येकाने उत्तम तऱ्हेने पार पाडला, असच म्हणता येईल. याचा, राज्य व्यवस्था या दृष्टीने आपल्याला संतोष असला तरी, धर्म पालनकर्त्या सर्व सेवक वर्गाला, आपण आपले निज कर्तव्य, पार पाडत आहोत, इतकाच भाव होता. रघुकुल रीत, आलेल्या व येणाऱ्या प्रत्येक राजाला, वंशनिष्ठा, राज्यनिष्ठा व धर्मनिष्ठा पालन करण्याचा आदर्श रुधिरातून, प्रदान करते. 

त्यावर, सर्व राज्य, प्रजाजन, सेवार्थी वर्गाला पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. म्हणूनच कोणीही अव्यवस्था होईल, असे कोणतेही कृत्य व कर्म करणे, अधर्म जाणून, तसे करण्याचे टाळले. किंबहुना, हा अदर्शाचा वस्तुपाठ, राजवंशाकडून, गेल्या कित्येक पिढ्या पाळला जात असल्यामुळे, प्रजेच्या निष्ठासुद्धा तितक्याच दृढ झालेल्या आहेत..

आपल्या पृच्छेतील दुसरा भाग म्हणजे यात्री सन्यासी जन, आस्था व श्रद्धाजन यांची कोणतीही गैर व्यवस्था वा अव्यवस्था, आपण कधीही करत नाही. कुमार आपल्याला ज्ञात असेल की, अतिथी देवो भव, हा आपला प्राण आहे.  त्या प्राण पालनाची, रघुवंशीय व्यवस्था ही, सर्वतोपरी, सुसंगत आणि कालप्रवाही आहे. 

महर्षी पुढे कथन करत म्हणाले.

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
३१/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...