राम अनुज भरत भाग ६४
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
एक लक्षात घ्या की, महाराज दशरथ यांनी सुद्धा, हा प्रश्न, कैकयीला विचारला होताच की, तुझ्या पुत्रप्रेमाच्या लोभा मुळे, भरताला राज्यपद हे अत्यंत सैयुक्तिक असू शकेल, एकवेळ, तू त्याची माता असल्यामुळे.जरी ते,मला आणि या रघु वंशाच्या रीतीला धरून नसलं तरीही, नाईलाज म्हणून का होईना, मी ते मान्य केलं असतं. पण रामाला वनवास का. म्हणजे त्याचा राज्यपदी आरुढ होण्याचा अधिकार डावलला जाणं, हा एक अन्याय, रामावर पुरेसा नाही का, कैकयी.मग कैकयी, तू रामाच्या वनवासाचां आग्रह धरू नयेस.
पण याचा नीट विचार केला तर खरी मेख ही इथेच आहे. जी राजकीय कारणाने भिन्न भासते आणि पारमार्थिक किंवा जनहित कारणाने भिन्न भासते. ती गोष्ट नीट विचार केल्या वर आणि काळाच्या पानातील काही गुह्य पदर जोडून बघितल्यावर,साधारण लक्षात येते.म्हणजे एकी कडे आपल्या पूत्रासाठी राज्याचा मोह, ते करताना, आपल्या पुत्राहून अधिक प्रिय असलेल्या, रामाला, वन वासात धाडणं आणि या सर्वाला स्वार्थी, लोभी, लालची अशी तात्कालीन दृष्टीने भासणारं कारणं देणं, हा थोडा विरोधाभास वाटतो.
अंतर्मुख होऊन, विचार करताना, श्रीराम आणि कैकयी, यांनी युगांच्या काळ पटलावर, आपल्या कार्याने, उमटवून ठेवलेला, ठसा,आजही,या दोघांना अजूनच महान करतो. म्हणूनच, कदाचित याच गोष्टीची जाण ठेवून,अगदी प्रथम पासून, माता कैकयीकडे, अत्यंत क्रोध रहित, शांतपणे पाहण्याची सूचना, भ्राता भरत याला, प्रभूंनी केलीच. परंतु, शत्रुघ्नला मातेकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलं.
कारण श्रीरामांचा स्वभाव मूलतः क्षमा शिलता होताच. पण उपकार कर्त्याला, वाऱ्यावर न सोडण्याचा, त्यांचा स्वभाव सुद्धा, दर्शवतो. चौदा वर्षे मातेने, कोणत्या मन:स्थितीत, किती अवहेलना, तिरस्कार सहन करत, एकेक क्षण घालवला असेल, याची जाणीव असलेल्या प्रभूंनी, याच कारणाने, चौदा वर्षे उपरांत, पुन्हा परत आल्यावर, प्रथम माता कैकयीचं दर्शन घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
इकडे सर्व अयोध्यावासी, सैन्य,राजपरिवार अत्यंत दुःखी, विमनस्क स्थितीत परत येत असताना, भरताच्या मनात काय चाललं असेल, याचा विचार करणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण या सर्वात त्याची स्थिती,एखाद्या वापरण्यात आलेल्या प्याद्याप्रमाणे झालेली होती. वरील विश्लेषित कोणत्याही मुद्द्याचा विचार, त्याच्या मनातील विचारात आणि बुद्धीत येण्याचा प्रश्नच नव्हता.
त्याच्या दृष्टीने, रघुकुलाचे भूषण असलेल्या, परम श्रेष्ठ श्रीराम याना,त्यांच्या अधिकारात असलेल्या, राज्यपदाची प्राप्ती न होण्यासाठी, एकमेव कारण असलेली कोणी व्यक्ती जगतात असेल, तर ती कैकयी. तिच्या अत्यंत स्वार्थी, गैरहेतु पूर्ण दुष्कृत्यांने, सर्व काही विस्कटून गेलं आहेच. परंतु, प्रजाजनांच्या नजरेत,आपण नाहक, स्वार्थी, दुष्ट, खल वृत्तीचे ठरलो.
ज्याने आपल्या राज्य प्राप्तीच्या लोभापायी, पिताश्री महाराज दशरथ आणि पित्यासमान माया केलेल्या, आपल्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांचा अयोध्या नरेश होण्याचा अधिकार काढून घेतला. बरं इतकं करूनही, ज्याचं मन, संतोष पावलं नाही, म्हणून त्याच ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांना चौदा वर्षे वनवास घडवून आणला. जेणेकरून, भरताला स्वतःला निरंकुश राज्यपद उपभोगता येईल.
भरत याचं विचारांच्या दाट धुक्यात, हरवून गेलेला आहे.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१२/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment