Skip to main content

राम अनुज भरत भाग ६३

राम अनुज भरत भाग ६३

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

त्यामुळे हा वनवासाच्या अट्टाहासाचा निर्णय का. याकडे वास्तविकपणें दोन दृष्टीने पहावं लागेल. एक राजकीय तर्क दृष्टीने आणि दुसरं धर्मकारणं दृष्टीने. राजकीय दृष्टीने पाहिलं, तर एक म्हणजे प्रत्यक्ष ज्येष्ठ भ्राता आपल्या सह असताना आणि त्याच्या समक्ष, भरताने, हे राज्य कधीही स्वीकारलं नसतं. अगदी प्रत्यक्ष, श्रीरामांनी सांगून सुद्धा. 

दुसरं कारण म्हणजे श्रीराम अयोध्येत असताना, प्रजेने सुद्धा, भरताला राजा म्हणून राज्यपदी स्वीकारलं नसतं. कदाचित, प्रत्यक्ष रामासमोर, इतक्या सहजी, महाराज दशरथ यांनी ते स्वीकारलं नसतं किंवा रामाला बंड करायला उद्युक्त केलं असतं. श्रीरामांनी असं बंड केलं असतं की नाही, हा प्रश्न नंतरचा. कारण तो त्यांच्या वृत्तीचा निर्णय होता. 

चौथं कारण म्हणजे लक्ष्मणाचं कालातीत अमर्याद बंधूप्रेम, ज्यामुळे, त्याने भरताला राजा म्हणून स्वीकारलं नसतं. पाचवं कारण म्हणजे जर यदाकदाचित, रामाच्या असण्याने, या निर्णयाला अस्वीकृती देऊन,  भरतानेच जर बंड केलं असतं, तर राज्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला असता आणि सहाव कारण म्हणजे या अद्भुत पेचात, महाराज दशरथ यांनीच आपला निर्णय वा मागणी अयोग्य आहे असे जाणून, सद्य स्थितीत स्थगित केली असती, तर. 

यासारख्या अनेक तात्कालीन राजकीय कारणाने, कैकयीने, भरताला राज्य मागताना, प्रजा, राजा दशरथ आणि प्रत्यक्ष भरत आणि लक्ष्मण यांच्या भीतीमुळे, दुसऱ्या वराने, रामाला, वनवास मागितला. तेसुद्धा साधं मागणं न करता, आपल्याला प्राप्त वर यांचा उपयोग करून, रामाला वनवास सुद्धा, मागितला. राजकीय दृष्टीने इतकं सखोल विश्लेषण केल्यानंतर, आता धर्म कारणाच्या दृष्टीने, याकडे पाहू. म्हणजे दोन्ही बाजूंचा विचार केल्यासारखे होईल. 

धर्म कारणाने विचार केला तर एक लक्षात घ्या की, भरतासाठी कैकयीने राज्यपद मागितलं असेल, हे थोडं अकल्पनीय वाटतं. ते मुख्यतः यासाठी की, अगदी लहान असल्यापासून, रामाचा ओढा आणि स्नेह हा माता कैकयी वर जास्त होता. राजवाड्यातील सेवकवर्ग आजही, या गोष्टीची चर्चा न थकता करतात. दुसरं भरताच्या बंधुप्रेमाची ग्वाही, समस्त अयोध्या वासी, आजही देतात.

प्रभूना अत्यंत कोवळ्या वयात, नुकतंच चालायला लागल्यापासून, प्रभात समयी, जाग येताक्षणी, माता कैकयीचं दर्शन हवं असायचं. त्यामुळे, जाग आल्यानंतर, प्रभू आपले लोचन मिटूनच,माता कैकयीच्या कक्षात जात असत. माता कैकयी सुद्धा, आपल्या पुत्राहून अधिक माया, बाळ रामावर करत असत. त्यांनाही या प्रभात समयीच्या राम दर्शनाची आस पूर्ण रात्र निद्रा देत नसे. इतकं मायाळू असलेलं मातेचं हृदय, इतकं कठोर होऊ कसं शकेल. म्हणून या मधे भरताला राज्य हा एक मुलामा होता. पण..... 

पण खरं कारण , रामाला, वनवासात धाडून, इप्सित जन्म कार्य पूर्ण करून घेणं हा होता. कारण मुळातच राजा दशरथाची सर्वात लाडकी राणी, कैकयी होती. तसाही, कैकयी चां शब्द हा अंतिम होता. त्यामुळे तिने सहज मागणी केली असती, तरीही राजा दशरथ यांनी ती फार आढेवेढे न घेता, माझी केली असती. 

याचेच ऋण फेडण्यासाठी प्रभूंनी, पुढील अवतारात, कैकयी अर्थात पुढील जन्मात असलेल्या माता देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि माता कौसल्येचे ऋण फेडण्या साठी, माता यशोदा असलेल्या, कौसल्या मातेला, जन्मा पासूनची चौदा वर्षे, गोकुळात पुत्रप्रेम करण्याची संधी प्राप्त करून दिली. कारण ईश्वर कोणाचेही ऋण कधीच बाकी ठेवत नाहीत, हे यातून लक्षात येतं. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
११/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...