Skip to main content

राम अनुज भरत भाग ५५

राम अनुज भरत भाग ५५

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

महर्षी वसिष्ठ अत्यंत विनम्र भावात म्हणाले.

" हे सर्व जगत, ज्यांच्या अधिपत्याने चालते, त्यांच्याच इच्छेने हा मार्ग निघाला.कारण राम मर्यादा सोडू शकतं. नव्हता आणि भरत आपला आग्रह सोडू इच्छित नव्हता. परंतु परम ईश्वराची योजना, पुढे नेणं त्यालाच क्रमप्राप्त होतं. त्यामुळे त्या त्या स्थितीत, योग्य त्या कार्यासाठी, सद्बुद्धी देण्याचं कार्य, तोच करतो.इथेही त्याचं ईश्वराच्या इच्छेने, हा राम पादुका प्राप्तीचा शुभयोग जुळून आला. " 

भरत म्हणाला

" गुरुदेव हा आपला विनम्र भाव आहे. अन्यथा आपली योग्यता, देवांचे गुरू श्री बृहस्पती यांच्या तुलनेची आहे, याच्याशी,आचार्य महर्षी भारद्वाज देखील सहमत होतील." 

यावर, अर्थातच भारद्वाज महर्षींनी संमती दर्शवून, अतिथिंच्या जलपानाची व्यवस्था करवली. भारद्वाज मुनींच्या निव्वळ दर्शनमात्रासाठी आलेली सर्व मंडळी, जल पान करून, पुन्हा आपापल्या रथांमधे आरुढ झाले. 

आर्य सुमंत यांनी आपला रथ, सर्वांच्या पुढे नेला आणि राजकुमार भरत याच्याकडून, प्रस्थानाची आज्ञा प्राप्त केली. सर्व रथ, अश्व, अश्वदल, गजदल, समस्त दळभार, परिवार जन, मंत्रीगण, सचिव, अधिकारी आणि सारा जनसमुदाय, अयोध्येच्या दिशेने प्रस्थान करते झाले. एका विचित्र मनःस्थितीत सर्वजण जात होते. श्रीरामांची भेट झाल्याचा अत्यानंद, परंतु आता चौदा वर्षांचा, हृदय, मन व बुद्धी याना पिळवटून टाकणारा विरह.

तो विरहसुद्धा, साधा नाही. श्रीराम वनवासात असल्याचा आणि त्यांच्या सह, सुकोमल राजराजेश्र्वरी देवी सीता आणि भ्राता लक्ष्मण, या तीनही निष्पाप जीवांना, विना कारण, वनवास घडावा, याचं, प्रत्येक जीवाला, अतीव दुःख होतं होतं. संपूर्ण अयोध्या,आपल्या कुलातील, परिवारातील कोणी सगासोयरा आप्त, बंधू, स्नुषा, जणू वनवासात आहेत, अश्याच भावनेत, शोकाकुल स्थितीत, निघाले होते,जात होते, अयोध्येच्या दिशेने.परंतु प्रत्येकाचं मन मात्र, त्या तीनही वनवासी राज परिवार सदस्यांच्या सोबत होतं.

मातांची स्थिती अती शोकाकुल होती. श्रीराम जो सर्वांचा लाडका प्राण होता, तो माता कौसल्या व माता सुमित्रा यांच्या ह्रदयीचा विसावा होता. तोच विसावा, आज इतक्या दूर वनात,आज्ञा पूर्तीच्या पालनार्थ वनात जाणार होता. त्याच्यासह, त्याची सहाचरणी असलेली, जनक नंदिनी, राजकुमारी, देवी सीता, ही सुद्धा, वनवासाच्या त्रासांना, कष्टांना, हाल अपेष्टाना सहन करणार होती. 

त्यातही माता सुमित्रा हिला, मनात एक समाधानाची जागा होती की, पुत्र लक्ष्मण, आपल्या ज्येष्ठ भ्राता आणि देवीस्वरुप वहिनी, सीता, यांच्या संरक्षणार्थ, त्यांच्यासह, चौदा वर्षे असणार होता. माता सुमित्रा हिला, लक्ष्मणाच्या निस्सीम, अत्याधिक निष्ठायुक्त बंधू प्रेमाची शाश्वती होती. तसा शब्द तिने, निघताना, लक्ष्मणा कडून घेतला होता. तिला, वनवासात निघतानाचा तो प्रसंग साक्षात आज घडल्या सारखा मन:चक्षू पुढे घडताना दिसत होता. 

कल्पनेत, मन हरवून गेलेल्या माता सुमित्रेला, नजरेसमोर दिसला, तो अत्यंत शोकाकुल, दुर्दैवी दिवस. आठवू नये, खरतर ठरवूनही, पण ती आठवण मनातून जात नव्हती, जाणं अशक्य होतं. अत्याधिक शोक, कैकयी बद्दल संताप, महाराज दशरथ यांची अगतिक दुःस्थिती, सर्व सर्व नजरेला दिसत होतं. आधी प्रभूंचा एकट्याने जाण्याचा निश्चय, त्याला छेद देऊन, सीतेचा, 

"जिथे रामचरण, तिथेच सीता," असा नैतिक आग्रह. त्यानंतर अतीव आर्जवे, सीतेने केलेली रामाची मनधरणी आणि त्याचे फलित म्हणून, रामांनी, सीतेला सोबत वनवासात येण्यासाठी दिलेली अनुमती, सर्व सर्व साक्षित्वाने स्मरताना होणाऱ्या वेदना, एक माताच जाणू शकते. लक्ष्मणाला नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण राम लक्ष्मण ही गाठ दैवाने, जन्मतः मारली होती. 

जन्मा नंतरचा तो प्रसंग सुद्धा, माता सुमित्रा हिला आजही जसाच्या तसा आठवत होता. 

नुकताच जन्मलेला लक्ष्मण, अतीव वेदनेने कळवळत रुदन करत होता. काही केल्या, थांबत नव्हता. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०२/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...