Skip to main content

राम अनुज भरत भाग ७३

राम अनुज भरत भाग ७३

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
 
माता कौसल्या गहिवरली आणि तिच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. भरताने मातेला स्नेहपूर्वक आलिंगन देऊन आपल्या हृदयाशी धरले. मातेचा गहिवर बऱ्याच प्रमाणात कमी झाला. दोन सेविकांनी तिला धरून बाजूला नेले आणि रथात बसवले. तदनंतर भरत माता सुमित्रा हिच्या समीप गेला. ह्रदय पूर्वक चरण स्पर्श करून, भरताने मातेला नमस्कार केला. मातेने त्याला प्रेमपूर्वक आलिंगन दिले आणि हृदयाशी धरले. 

मातेला भरताची चिंता वाटत होती. कारण तिचा एक पुत्र रामासह वनवासात गेला होता तरीही, दुसरा पुत्र शत्रुघ्न, हा तीनही मातांच्या समीप चौदा वर्षे असणारच होता. पण भरत असा दुर्दैवी जीव होता,जो त्याच्याच मातेच्या कर्मामुळे, आपला प्राणसखा आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पासून चौदा वर्षे दुरावला होता. राम लक्ष्मण हे सावली समान होते. परंतु भारत हा रामाच्या हृदयात होता. नव्हे तर तो रामाचा प्रथम भक्त होता. 

या कारणाने तो आत्मिक दृष्टीने रामाच्या अत्यंत समीप होता. लक्ष्मण हा रामाची सावली होता. तर भरत रामाचा श्वास होता. देह आणि श्वास यांची ताटातूट झाल्यावर, श्वास आणि देह यांची जी अवस्था होईल, अगदी तीच अवस्था, भरत आणि राम यांची झाली आहे. मातेच्या मनातील हे मती कुंठित करणारे विचार जाणून, भरत मातेला म्हणाला.

" माता सुमित्रा, जो विचार आपण माझ्याबाबत आणि प्राणप्रिय श्रीराम यांच्या बद्दल करत आहात, तो विचार अती तापकारक आणि दुःखदायक आहे. आपण त्या विचारांचा त्याग करावा. माझा शत्रुघ्न आपल्याला चारही पुत्रांचं सुख देईल. याबाबत मी निश्चिंत आहे. आपण सद्य स्थितीत अती दुःखकारक विचार वृथा करू नये." 

माता मंदपणे स्वतःशी हसली. मातेच्या स्मिताकडे पाहून, भरत ओशाळला. त्याची चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो वरमला. त्याला तसे पाहून, माता म्हणाली.

" तुला ओशाळता करण्याच्या माझा हेतू नव्हता. परंतु, मातेला दहा पुत्र असले आणि त्यातील एक जरी, दूर गेला असेल, तरीही मातेला दुःखच होते. इथे तर माझ्या चार पुत्रा पैकी तीन वनवासात आहेत. अश्यावेळी मातेला आपल्या ममतेला, बांध घालून, शांत राहणे, कसे शक्य आहे. पण तरीही मी तुला निश्चितपणे सांगते की, तुझी चिंता मला सर्वात अधिक आहे. तद्वत तू, आमची चिंता करू नयेस. तू आपली स्वतःची काळजी घे. कैकयी भगिनीचा विचार करू नकोस. 

जे घडले त्यामागे, मात्र आणि मात्र एकच कारण आहे. ते म्हणजे नियती मन. हे नियतीचे मन अत्यंत निष्ठुर असतं. जे तिच्या उदरात आहे, त्या काळाच्या गर्भातील डोहाळे, तिच्या कडून, अनेक गोष्टी, घटना व प्रसंग, घडवून घेतात. अर्थातच, जितक्या अनिष्ट, दुःखकारक घटना घडतील, तितकाच नियतीचा गर्भ, उज्वल भविष्य काळ घेऊन येतो. त्यामुळे, सर्वांना हे नियतीचा वियोग रूप डोहाळे सहन करणं, हितकारक आहे,, असेच जाणं."

मातेच्या या ज्ञानवर्धक आणि सांत्वन पर बोलानी, भरत भानावर आला आणि सावरून मातेला म्हणाला.

"माता आपणच एक आहात ज्या, सर्वांना या दुःखातून, सावरून, पुढे जायला, सहाय्य कराल. आपण महाज्ञानी आणि तपस्वी वृत्तीच्या आहात. आपल्या या बोलानी, हा भरत पूर्ण आश्वस्त झाला की, जे घडतं आहे, त्यामागे नियतीची काहीतरी सदिच्छा, नक्कीच आहे. आपण निश्चिंत असा. हा भरत, आता नक्की सावरेल आणि स्थिर मनाने, पुढील कार्यकाळ व्यतीत करेल. आपण माझ्या साठी इतकीच प्रार्थना करा की, ज्येष्ठ भ्राता कुलदीपक श्रीराम, चौदा वर्षे पूर्ण होताच, माझ्या समक्ष उभे असतील." 

मातेने यावर आपली मान हलवून म्हटले. 

" अवश्य असेल. कारण राम शब्दांचा आणि वचनांचा कठोर आहे. तो नक्कीच योग्य वेळी, तुझ्या पुढे उभा असेल." 

मातेला पुन्हा एकदा प्रणाम करून, भरत मांडवी कडे वळला. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२१/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...