Skip to main content

राम अनुज भरत भाग ६८

राम अनुज भरत भाग ६८

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

परम प्रतापी प्रभू श्रीराम, भ्राता लक्ष्मण याला बोधवचन देत असताना, इकडे अयोध्येला निघालेले समस्त राम भक्त, नंदीग्राम च्या समीप येऊन पोचले. भरताने, आधीच दोन मंत्री आणि सोबत काही सचिव, अधिकारी आणि सेवकवर्ग यांना अयोध्येला धाडून, राजकुमार भरत हा, आपल्या माता, आपला परिवार व सोबत नेलेले समस्त अयोध्यावासी यांच्यासह नंदीग्राम येथे, पोचला आहे, असा संदेश धाडला होताच. आपण स्वतः नंदीग्राम येथे राहून, पादुका स्थापन करून, येथूनच संपूर्ण अयोध्येचा राज्यकारभार पाहणार असल्याचा संदेश सुद्धा, त्यांच्या सोबत धाडला होताच. 

ठरल्याप्रमाणे सर्वजण, नंदीग्राम येथे थांबले. भरताने, तेथे, एक सुबकशी पर्णकुटी बांधून घेतली. त्याभोवती अंगण आणि त्याला जोडून, सर्व बाजूंनी, कुंपण बांधून घेतले. स्वतः भरत शत्रुघ्न यांसह, काही सेवक वर्गाने, हे कार्य संपन्न केलं. राजपरीवार, विशेषतः तीनही माता आणि मांडवी अत्यंत दुःखी होत्या. कारण यापुढील चौदा वर्षे, भरत येथेच राहणार होता. अत्यंत व्यथित करणारी गोष्ट होती. एका सुसंपन्न राज परिवारातील तीन उमदे राजकुमार, पुढील चौदा वर्षे, सन्यस्त जीवन व्यतीत करणार होते. 

इतके वैभवशाली, समृद्ध आणि अलौकिक परंपरा लाभलेले राज्य, राजाविना चालवले जाणार होते आणि तेसुद्धा प्रतिनिधी द्वारे. कदाचित त्यावेळच्या काळापर्यंत, प्रतिनिधी व्यवस्थेने राज्य कारभार चालवण्याची तशी प्रथम वेळ असावी, तीदेखील इतक्या दीर्घ कालावधी साठी. मातांना, त्यातही एक आधार होता की, चार मुलांपैकी, निदान शत्रुघ्न, हा सर्वात धाकटा पुत्र तरी, त्यांच्या सोबत असणार होता.नियतीच्या फासातून, कोणता फासा कधी फेकला जाईल आणि कोणाला कोणती भूमिका कधी आणि किती काळासाठी पार पाडावी लागेल,हे कदाचित विधाता देखील सांगू शकणार नाही. 

कारण जरी एक सत्य स्वीकारलं की, जे समोर येईल ते आपल्याच कर्माचं फलस्वरुप असेल, तरीही आपल्या इतक्या जन्माच्या कर्मराशीतून, कोणती कर्मराशी आपल्या समोर उभी राहील आणि आपल्याला कुठून कुठे नेईल, हे सांगणं केवळ अशक्य आहे. आज इतक्या संपन्न राज्याला, आपल्या सिंहासनावर, महाराज दशरथ यांच्या जागी, अत्यंत सुयोग्य अश्या श्रीराम यांना आरुढ होण्याची प्रतीक्षा, येथून पुढे चौदा वर्षे करावी लागणार आहे, हा त्या सिंहासनाचा देखील दुर्भाग्य योग असणार, हे नक्कीच. 

दुर्दैव हे अश्या चहू बाजूंनी, आपल्या अंगावर येणार आहे, याची अस्पष्ट सुद्धा कल्पना, श्रीराम यांचा राज्यअभिषेक, पार पाडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या, राजा दशरथ, परिवार आणि संपूर्ण अयोध्यावासी, याना नव्हती. पण एकदा असं दुर्दैव योग पर्व सुरू झालं की, मग त्याची शृंखलाच सुरू होते. कोणत्या बाजूंनी आपल्यावर याचा मारा सुरू होईल, हे सांगणं कदाचित नियतीला सुद्धा, अश्यावेळी अशक्य असतं. याची सुरुवात मंथरा नामक एका अति सामान्य व्यक्तित्व मात्राकडून नियतीने करून, पुढे दैवाचे दशावतार, अयोध्या राज्य आणि परिवार याना दाखवून दिले. 

कैकयीने मागितलेले दोन वर, त्याला नाईलाजास्तव, महाराज दशरथ यांनी दिलेली संमती, रामाला प्रत्यक्ष वनवासाची दिलेली आज्ञा, महाराज दशरथ यांनी, तदनंतर, कैकयीचां केलेला त्याग, रामाचा, पितृ आज्ञा प्रमाण मानून, वनात जाण्यासाठीचा निग्रह आणि प्रत्यक्ष कार्यवाही, त्याच्यासोबत देवी सीतेने, जाण्यासाठी केलेला हट्ट, श्रीराम यांनी, देवी सीता हिला, हट्ट सोडण्या साठी केलेला आग्रह,सोबत जाण्याच्या निर्णयाचा सीतेचा ठामपणा आणि श्रीराम यांनी त्याला दिलेली अनुमती,  

लक्ष्मण याची रामासोबत जाण्यासाठी जन्म घेतल्याची ग्वाही, तिघांचं वनात निर्गमन, भरताचं आजोळहून परतून येणं, सर्व सनाचार वार्ता जाणल्यावर, भरताचे माता कैकयीला खडे बोल आणि दूषणं, माता कौसल्ये कडे येऊन भरताची निष्कलंक असल्याची ग्वाही आणि भ्राता श्रीराम यांना घेऊन येण्याचं वचन व मनोनिग्रह, सर्वांचं वनात गमन, भ्राता श्रीराम यांचा आज्ञा पूर्तीवर ठाम राहण्याचा आग्रह, गुरुदेव श्री वसिष्ठ यांचा, श्रीराम पादुका, प्रतिनिधी स्वरूपात देण्याचा प्रस्ताव,  

श्रीराम यांची याला स्वीकृती, पण हे सर्व कमी म्हणून, भरताचा नंदीग्राम येथे राहून, कारभार करण्याचा मनोनिश्चय, हे सर्वच इतकं अकल्पित, दुर्दैवी आणि अत्यंत वेगवान पद्धतीने घडून आलं, की समस्ताना विचार करायला सुद्धा अवधी मिळाला नाही. 

नियतीच्या फटकाऱ्यातून, कोणीही वाचलं नव्हतं.

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१६/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...