Skip to main content

राम अनुज भरत भाग ७६

राम अनुज भरत भाग ७६

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

सर्वजण अयोध्येला परतून जात असलेले,एकटक पहात, आपल्याच विचारात हरवलेला भरत, निश्चल उभा होता. सर्वांनी प्रस्थान ठेवलं आणि सोबतचा सर्व गोतावळा दूर गेला, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, देवी सीता व अनुज लक्ष्मण, दूर चित्रकूट येथील वनात,तातश्री महाराज दशरथ स्वर्गस्थ प्रस्थान करते झालेले आणि बाकी सर्व परिवार अयोध्येत गेलेला. आता भरत एकटाच उरला होता. अश्या परिस्थितीत स्वतःला सावरून, संध्या समयाच्या स्नानादी नित्य कर्म आणि पादुकांच्या नित्य पूजना साठी, भरत, जवळ असलेल्या गंगेच्या तीरावर, स्नानाची तयारी करून, निघाला. 

मध्यांहीचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा समय झाला होता. उन्ह परतीला निघाली होती. ती पूर्ण क्षितिजाच्या पलिकडे जाण्याआधी, स्नान करून,संध्या विधी करून, पादुका पूजन करण्याच्या लगबगीने, भरत, गंगेच्या तिराकडे निघाला. 

नदीच्या एका बाजूला नगराच्या जवळ, राजा रघुच्या वंशातील, सर्व कुलदीपक राजांनी,गंगा नदीच्या किनाऱ्या वर, दोन्ही बाजूंना, उत्तम असे घाट, त्या घटांना अत्यंत सुशोभित अश्या पायऱ्या, त्या पायऱ्यांनी उतरण्यासाठी, दोन्ही बाजूंना व मधे मधे, जाडजूड लोखंडी साखळ्या सुद्धा लावल्या होत्या. 

घाटावर अंतरा अंतरावर, सुबक नक्षीकाम केलेले, उत्तम रंग दिलेले, विशाल परीघ असलेले, गोलाकार खांब उभे केलेले होते. त्या खांबांना वरून आढे चढवून, त्यावर उत्तम आच्छादन घालून, उन्ह, पाऊस यांपासून आडोसा निर्माण केला होता. प्रत्येक घाटाच्या सुरवातीला, उत्तम, प्रशस्त खोल्या बांधून, स्त्रीवर्गाची उत्तम सोय करण्यात आलेली होती. संपूर्ण घाटावर दोन्ही किनाऱ्याला, उत्तम, गर्भगृह,विशाल सभागार, अत्यंत सुबक नक्षीकाम केलेली गोपुरे असलेली, मंदिरे बांधून,त्यात श्री विष्णू,देवी लक्ष्मी, श्री शैलनाथ, पिनाकपाणी भगवान श्री शंकर, देवी पार्वती आदी देवी देवता यांची भव्य मंदिरे बांधलेली होती.

त्या भव्य दिव्य मंदिरातील वातावरण, आलेल्या प्रत्येक भाविकाला भारावून टाकत होतं. नंदीग्राम येथील वन्य प्रदेश, जिथे भरत पर्णकुटी बांधून राहायला आला होता, तिथून काही अंतर दूर हा घाट परिसर होता. पण या विशाल घाटापासून काहीश्या लांब अंतरावर,गंगा किनारी जिथे वस्ती, निवास, नगर व ग्राम असे काहीही नव्हते, त्या ठिकाणी, भरत, स्नानाच्या तयारीने आला. गंगेच्या विशाल, पात्रामुळे,संपूर्ण परिसर,वन संपदा, भव्य, डेरेदार विस्तीर्ण छाया असलेले वृक्ष, उत्तम सुवासिक मधु व गंध असलेली, जाई, जुई, चंपा, बकुळ,मालती,गोकर्ण इत्यादी फुलांनी युक्त, झाडं,वेली आणि मधुर,रसाळ गर असलेली अत्युत्तम फळं असलेले वृक्ष आदींनी बहरलेला तो परिसर होता. 

ते सर्व पाहून, प्रसंगोपात, मनात नैराश्य भाव जागृत असलेला भरत, प्रफुल्लित आणि प्रसन्न झाला. त्याच्या मनाला, या वृक्ष, वेली लता, फुलं आणि फळं यांनी उभारी मिळाली. अत्यंत मलूल होऊन निघालेला. भरत खिन्नता त्यागून, फूल आणि फळं यांच्या त्या एकत्रित गंधाने, हर्षित झाला.उत्तम मधुर फळांची झाडे न्याहाळीत व त्यातील काही, आपल्या नित्य आहारासाठी निरखून व मनात नोंदवून ठेवत, गंगेच्या पात्राच्या दिशेने पुढे पुढे निघाला. फुलांचा एकत्रित सुवास, आतावरणात मोह भरत होता.

भरत, या वातावरणाच्या प्रभावाने भारला गेला होता. विशाल पात्र असलेल्या गंगेच्या दिशेने जाणाऱ्या या मोहमयी मार्गिकेने, आता आपल्याला नित्य जायला मिळणार, या कल्पनेने, भरताच्या मनात आणि मनातून देहात ऊर्जा आणि शक्ती भरली गेली. त्या एकांत वासा तील आपल्या चौदा वर्षांच्या प्रदीर्घ व वनवासाच्या काळात, या नयनरम्य, मोहमयी गंधित वातावरणाचा सहवास व सहभाग लाभल्याचा एक वेगळाच आल्हाद, भरताला, नदीच्या दिशेने लगबगीने घेऊन गेला. 

पर्णकुटी ते नदीपात्र हे दूर असणारे अंतर, या वातावरण, गंध माधूर्याने, भरताने सहजी पार केले. कदाचित या सर्व धुंदिमुळे असेल,पण मूळची नैराश्याचा आणि राजपरीवार ज्येष्ठ भ्राता सर्व आप्तजन यांच्या विरहाच्या दुःखाचा भार, मनावरून कधी दूर झाला, ते भरताला समजलं नाही. नदीच्या खळाळत्या पाण्याचा, नाद कानी पडला आणि नेत्र व नासिका यांनी अनुभवलेली प्रसन्नता, आता कर्णांनी अनुभवण्यास सुरुवात झाली. 

जलाप्रवाहाचा तो कर्ण मधुर नाद, बासरी, जलतरांग आणि सतारीच्या नादाला कमीपणा आणतं होता. त्या विशाल पात्राचा तो प्रसन्न करणारा पहिला नाद आणि तद्नंतर त्या पात्राच घडलेलं मनोहारी दर्शन, उत्तम कांचन योग जुळवून गेलं. आता या सर्व शब्दातीत आनंदाचा प्रत्यय, नित्य मनाला प्रसन्न करत राहील, या विचारांच्या प्रवाहात, भरत आणलेले सर्व सामान किनाऱ्यावर ठेवून, नदीच्या प्रवाहात कधी उतरला,त्याचे त्याला सुद्धा समजलं नाही.

प्रदीर्घ काळानंतर इतकी निरव शांतता आणि जल प्रवाहात पोहाण्याचा आनंद भरत घेत होता. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२४/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...