Skip to main content

राम अनुज भरत भाग ७०

राम अनुज भरत भाग ७०

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

आपल्या प्राणप्रिय असलेल्या,ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पादुका, आपल्या पर्णकुटीच्या स्थानी स्थापित केल्यानंतर भरत, जवळच उभ्या असलेल्या, आर्य सुमंत याना म्हणाला.

" आर्य, आपण ज्येष्ठ मंत्री या नात्याने, स्वतः अयोध्येत राज्य सभागृहात नित्य उपस्थित राहून, दैनंदिन कार्य व्यवस्था पहाल. सर्व प्रकारच्या महत्वाच्या विषय आणि प्रसंग संदर्भातील, सर्व घटना व तपशील आपण आमच्या कडे धाडाल.त्यावरील, श्रीराम प्रेरणेने, आम्हाला प्राप्त आदेश,आम्ही आपल्याकडे कार्यवाही साठी पोचवू. आपण त्याची अंमबजावणीही त्या सूचनेनुसार करावी. 

कोणत्याही, अत्यंत विपरीत व आपत्तीजनक स्थितीत, आपण,आपल्या बुद्धी, सिद्धी व अनुभव यानुसार उपयुक्त कार्यवाही करावी व आम्हाला सूचित करून, आमच्या कडून प्राप्त सूचनेनुसार,पुढील व्यवस्था करावी. घडत. असलेल्या सर्वच गोष्टींची माहिती आपण, श्रीराम पादुकां मार्फत, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना देत राहू. 

त्यावर ज्येष्ठ भ्राता, आपल्याला, नक्कीच सद्बुद्धी देत राहतील. पुढील चौदा वर्षे, आम्ही सन्यस्त जीवन,व्यतीत करणार असल्या मुळें, आम्हाला येथे आमच्यासाठी, सेवकांची वा अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही. मात्र, राज्य कारभारासाठी आवश्यक असे काही महत्वाचे संदेश, सूचना पोचवण्यासाठी, व्यवस्था करावी. त्यासाठी मोजक्याच मंत्री, सचिव, अधिकारी व सेवक वर्ग यांची, त्यांच्या परिवारासह, येथून काही अंतरावर राहण्याची आणि बाकी सर्व व्यवस्था करावी. 

परंतु, त्यांच्या मुळे आम्हाला आणि आमच्यामुळे त्यांना कोणताही, त्रास, उपद्रव होणार नाही, हे आम्ही एकमेक पाहूच. जेणेकरून आमचं सन्यस्त जीवन, आमच्या इच्छे नुसार आणि कोणताही मोह, लोभ या वीना सुरळीत सुरू राहील. त्याचवेळी, राज्याच्या कारभारावर सुद्धा याचा विपरित परिणाम होणार नाही. मुख्यतः, आम्हाला येथे स्वतः करता,कोणत्याही सहाय्याची,सेवकाची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळे आमच्या कार्यात व दैनंदिन जीवनात कोणीही उपद्रव करता कांमा नये आणि आम्ही कोणालाही, राज्य कारभार या व्यतिरिक्त कोणताही त्रास वा कार्यभार सोपवणार नाही आणि त्यांच्याकडून कोणत्याही सहाय्याची आम्हाला आवश्यकता भासणार नाही, हे आम्ही पाहू. 

वरील सूचनांचे पालन, पुढील चौदा वर्षे, विना तक्रार व विना अडथळा पार पडत राहील, हे दायित्व मुख्यतः आपले असेल. आपल्या उच्च आणि संपन्न कार्य जीवनाचा अनुभव, अयोध्येच्या या विशाल राज्याला प्राप्त होत राहील. म्हणून आम्ही मुख्यतः आपल्या अनुभव आणि कार्य कुशलता, यावर अवलबून राहू. कारण आपण पिताश्री महाराज दशरथ,यांच्या संपूर्ण आयुष्यात, त्यांच्या सोबत होतात. 

त्यामुळे, आपल्या या अत्यंत समृद्ध आणि संपन्न कार्य जीवनाचा लाभ आम्ही घेत आहोत, हे पाहून स्वर्गात महाराज दशरथ हे सुद्धा, नक्कीच आनंद प्राप्तीचा अनुभव घेतील. आपल्या सर्व समावेशक धोरणात, अयोध्येची जनता, नक्कीच असीम सुखाचा व अविरत आनंदाचा अनुभव घेईल. आपण हेदेखील जाणता की, आम्ही देखील वनात जाण्याचा निर्णय घेताना आमच्या सुद्धा सुप्त मनात, या राज्याचे हित आपणच, अत्यंत कुशलतेने व योग्यपणे पाहाल, हाच भाव होता. त्यामुळे असा विचार चित्रकूट येथे,ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना बोलून दाखवताना, आमच्या मनात राज्याविषयी, परिवारा विषयी, प्रजेविषयी, कोणतीही चिंता तीळमात्र सुद्धा नव्हती.

याचं अत्यंत महत्वाचं कारण, आर्य सुमंत, आपण आणि आपली, या राज्यासाठीची प्रदीर्घ आणि कुशल कारकीर्द होती. म्हणूनच आपल्या अनुभव आणि कुशलता यांवर आम्ही आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम हे देखील नि:संकोचपणे विसंबून राहू. स्वर्गीय महाराज दशरथ, ज्येष्ठ भ्राता श्रीराम आणि आम्ही समस्त परिवार जन, आपल्या या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही. नव्हे तर ते ऋण पुढील चौदा वर्षे अजूनच वृद्धिंगत होत राहतील, हीच सदिच्छा, सकारण, आम्ही आजच नव्हे तर पुढच्या चौदा वर्षातील प्रत्येक क्षणी, करत राहू. " 

इतके बोलून भरताने आर्य सुमंत याना दोन्ही कर जोडून मनःपूर्वक नमस्कार केला. आर्य सुमंत यांच्या नेत्रा तून सहस्त्र अश्रुधारा बरसत होत्या. त्यांचा कंठ दाटून आला आणि आवाज कापरा झाला. त्यांना काय बोलावे हेच सुचत नव्हते. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१८/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...