Skip to main content

राम अनुज भरत भाग ५७

राम अनुज भरत भाग ५७

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
 
इतका अभूतपूर्व भाव सोहळा होता, त्या राज परिवारात की, सुमित्रा मातेला राम हा अधिक प्रिय होता आणि कौसल्या मातेला लक्ष्मण अधिक प्रिय होता. अर्थातच त्याची कारणं दोघींच्या दृष्टीने संयुक्तिक होती. राम हा धीर,गंभीर व शांत वृत्तीमुळे जगत प्रिय होता.पण कौसल्या मातेचा, लक्ष्मण हा कायम रामासोबत असल्या कारणाने, पुत्र म्हणूनच स्नेह होता. ज्या भावावस्थेत, परतीच्या प्रवासात, माता सुमित्रा शोक आणि दुःख यांनी ग्रस्त होती. 

त्याच भावात माता कौसल्या सुद्धा होती. तिला राम वनवासात गेला याचं आणि चौदा वर्षे, त्याचा मुखचंद्रमा आपल्याला दिसणार नाही, या अतीव दुःख सागराचा डोह, पार करायचा होताच. पण अजूनही एक अत्यंत गंभीर विवंचना होती. ती म्हणजे, राजकन्या आणि राजा जनकांची प्रिय कन्या, दुलारी जनक नंदिनी सीता, कोणत्या अपेक्षेने, राजा जनक यांनी, तिला रामाला अर्पण केली. 

पण आपण मात्र, तिला वनात धाडलं, याची अतीव दाहरुप टोचणी, तीक्ष्ण हत्यारा प्रमाणे, मनाला सतत टोचत होती. राजा जनक हे पुण्यवान सत्पुरुष आणि एक प्रेमळ राजा आहेत, हे मान्य केलं. तरीही, एक पिता म्हणून त्यांच्या मनातील भाव, राजा जनक हे अगतिकते पोटी बोलून दाखवणार नाहीत, तरीही त्यांच्या चर्येवरील वेदना,माझ्या मनाला, पिळवटून टाकल्याशिवाय राहणार. कोणत्या अधिकाराने, आपण त्यांना खुशाली कळवू शकतो की, आम्ही आपल्या लेकीला, सासरी सुखात ठेवलं आहे. 

पतीनिधन, पुत्र वनवास गमन, लक्ष्मण आणि सीता यांचं, रामासोबत प्रस्थान, अश्या विचित्र भावात, आपल्याच विचारात हरवलेली कौसल्या, " चला आता निघू पुढे" या मांडवीच्या शब्दांनी भानावर आली. तिची ती अवस्था पाहून, मातेला धीर देण्याच्या उद्देशाने आपण जे बोललो त्याचा अर्थ , विचारात, दुःखात गढून गेलेल्या कौसल्या मातांना ध्यानात आला नाही, हे मांडवीच्या लक्षात आलं. म्हणून ती मातेला म्हणाली. 

" आपण महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमा समीप आलो आहोत. आर्यपुत्र महर्षींना अभिवादन करून, ज्येष्ठ भ्राता यांची ख्याली खुशाली आणि घडलेला घटनाक्रम कथित करून, त्यांचे आभार मानण्यासाठी गेले होते. त्यांना सर्व वृत्तांत कथित केल्या पश्चात, आताच आर्यपुत्र आपल्या रथात आरुढ झाले आहेत. आपण थोड्याच अवधीत निघत आहोत. "

इतका वेळ आपल्या मानसिक दु:स्थितीत आणि दुःखात बुडालेली, माता कौसल्या, या बोलाने किंचित भानावर आली. पण ती काही क्षणच. पुन्हा आपल्या दुःखसागरात हरवून माता, राम,सीता व लक्ष्मण यांच्या आठवणीत गढून गेली. घडलेलं सर्वच, तिला अजूनही, एक दु:स्वप्न वाटत होतं.आभास आणि सत्य यांच्या मधे,माता कौसल्या, आपल्या मानसिक भावावस्थेत पोचली होती. म्हणूनच मांडवी आणि माता सुमित्रा यांना, श्रीरामांनी, मातेकडे, विशेष लक्ष देण्याचा आर्जव केला होता. प्रभू म्हणाले होते.

" हे माता सुमित्रा आणि देवी मांडवी, माझ्या माऊलीची स्थिती, ही अत्यंत शोचनीय व दयनीय आहे, हे मी जाणतो. परंतु कर्तव्याच्या पराकाष्ठेत, मी व्यक्तिशः, मर्यादांचा पुजारी आहे. त्यामुळे, जे कर्तव्य स्वरूपात प्राप्त झालं आहे, ते पुढे घेऊन जाणं, हे मी माझं परम ध्येय ठरवलं आहे. त्यामुळे, त्या मार्गावर, काही भाव भावना दूर सारून, त्यातूनच पुढे जावं लागेल. 

परंतु आपण मातेच्या सोबत, पुढील चौदा वर्ष असणार आहात. म्हणूनच, मातेच्या क्षेम आणि कुशल यांची चिंता, माझ्याऐवजी, तुम्ही दोघी, समर्थपणे सांभाळावी अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे." 

असं बोलून, श्रीरामांनी, दोघींपुढे आपले दोन्ही कर जोडले. अर्थातच, या कृत्याबद्दल माता सुमित्रा, श्रीरामांना रागे भरली, हे नक्कीच. माता सुमित्रा म्हणाली.

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०४/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...