Skip to main content

राम अनुज भरत भाग ७१

राम अनुज भरत भाग ७१

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

आर्य सुमंत यांना राजकुमार भरत याच्या मुखातून स्तुती ऐकून, अनंत वर्षांच्या आपल्या सेवेची कृतकृत्यता झाली हे आत्मभाव प्रकट झाले आणि कर्तव्यासाठी, इतकी वर्षे केलेली सेवा परिपूर्ण झाली, हे भाव, त्यांच्या नेत्रात दाटून आले. यांच्या नेत्रातून सहस्त्र अश्रुधारा बरसत होत्या. त्यांचा कंठ दाटून आला आणि आवाज कापरा झाला. त्यांना काय बोलावे हेच सुचत नव्हते. 

सद्गतीत स्वरात, त्यांनी आपल्या दोन्ही करांनी, राजकुमार भरत याला विनम्र प्रणिपात केला. भरताने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातांनी धरले आणि म्हणाला.

"आर्य आपण पिताश्री असल्यापासून आहात. त्याअर्थाने आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. आपण असा प्रणाम करणं योग्य नव्हे. आपण स्वतःआमच्याकडून प्रणीपातास पात्र आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवेचे, स्वर्गीय महाराज दशरथ आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्यासह आम्ही चारही बंधू सदैव ऋणी राहू. आपण आम्हाला मार्गदर्शन करत राहाल या विश्वास आहेच. "

भरताचे हे कृतज्ञता व्यक्त करणारे बोल ऐकून, जमलेल्या सर्वांनाच, आर्य सुमंत यांच्याबद्दल अभिमान वाटला.आर्य सुमंत, भरताच्या सूचनेनुसार वा श्रीराम पादुका प्रतिनिधी म्हणून केलेल्या आदेशानुसार, कार्यवाही, अमलबजावणी साठी अयोध्येच्या दिशेने, आपला रथ घेऊन आणि मंत्रीगण, सचिव, अधिकारी व सैन्य घेऊन, प्रस्थान करते झाले.पण प्रस्थान करण्याआधी त्यांनी, तीन मंत्रीगण, काही सचिव, अधिकारी आणि सेवकवर्ग यांना तेथेच थांबायला सांगितले. 

आर्य सुमंत यांच्या प्रस्थाना पश्चात भरत, कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांच्याकडे वळून, त्यांना चरणस्पर्श करून, दोन्ही कर जोडून, म्हणाला.

" हे महाज्ञानी, बृहस्पती स्वरूप, गुरुदेव श्री वसिष्ठ महर्षी. आपणही या रघुकुलाचे, पिढ्यानपिढ्या कुलगुरू आहात. आपण ज्ञानी, शास्त्रवेत्ते, व्युत्पन्न आणि अनुभवसंपन्न आहात. राज्याचा मंत्री म्हणून आपलाही प्रदीर्घ अनुभव आहे. म्हणून आपणही, आर्य सुमंत यांच्या प्रमाणेच, महाराज दशरथ यांची ही धुरा आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांचे, आमच्यावर असलेले दायित्व, यथायोग्यरित्या सांभाळून, ती धुरा, अविरत अग्रेशित करत राहाल, हा विश्वास आहे. म्हणूनच आपल्याला आम्ही अती विश्वासू महत्तम मंत्री मानतो.

आपण, आपल्या संपन्न अनुभव व समृद्ध ज्ञान, यांनी आपले दायित्व, न्यायाने पार पाडाल. आपणही अखंड, राज्य सभागृहात राहून, न्याय, ज्ञान प्रदान पहाल. आपल्या सेवेसाठी, हा भरत, या नंदीग्राम येथे अष्टौप्रहर, उपलब्ध असेल." 

भरताचे हे अनमोल शब्द, ऋषिवरांना सुद्धा आनंदाचे भरते देऊन गेले. त्यांनी मोठ्या कृतज्ञ भावात, भरताला, आश्वस्त करत म्हणाले.

" हे राजपुत्र, ज्ञानी आणि विनम्रता मूर्ती भरत, आपण सर्व मिळून, रामाच्या या पादुकारुप सिंहासन स्थानाला, पूज्य मानून, त्यांच्या मार्फत तुझ्याकडून आलेल्या आदेशाला, शिरसावंद्य मानू आणि चौदा वर्षे हे राज्य सुरळीत कार्यरत ठेवू. या चौदा वर्षांच्या काळात, प्रजाजन  अविरत, सुख व आनंद यांचा अनुभव घेतील, याचं उद्देशाने कार्यरत राहू." 

आपल्या कथनानंतर, भरताला प्रणाम करून, आपल्या शिष्य वर्गातील, काही ज्येष्ठ व ज्ञानी जनांना येथेच थांबायला सांगून, प्रस्थान करते झाले. तत्पश्चात आपल्या परिवाराकडे वळले.

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१९/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...