Skip to main content

राम अनुज भरत भाग ६५

राम अनुज भरत भाग ६५

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

भरत याचं विचारांच्या दाट धुक्यात हरवून. गेलेला आहे. आपल्याच विचारात हरवलेला, दोन्ही हातांनी श्रीराम पादुका धरून, रथासह आयोध्येकडे जात होता. पण मन मात्र ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्यामागे वनवासातच होतं. आपल्या मातेच्या अवास्तव, अतर्क्य आणि पुत्र मोहा पायी घडवून आणलेल्या, अनिष्ट घटनेमुळे, देवस्वरुप ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना नाहक, या कारस्थानाचं बळी व्हावं लागलं.

पिताश्री महाराज दशरथ यांचा, यामधे घडलेला मृत्यू, ज्याचा आपल्या चारित्रावरील डाग, कदाचित आजन्म पुसला जाणार नाही.याचं प्रायश्चित्त म्हणून आपण आयुष्यभर जरी, श्रीराम.चरणांची सेवा केली, तरीही त्याचं परिमार्जन होणार नाही, होऊच शकत नाही. ते दुःख, ती अवहेलना, लोकांच्या नजरेत, प्रभू श्रीराम यांना आपण राज्यपदावरून दूर केल्याचां असलेला रोष, एका घातकी चुकीचा समस्ताना झालेला मनस्ताप, या सर्वांच्या विचारात, भरत, वेळ काळ सुद्धा विसरून गेला. 

सारथ्य करणाऱ्या आर्य सुमंत यांनी सांगितलं, 

"राजकुमार भरत, आपण अयोध्येच्या समीप येऊन पोचत आहोत." 

या वाक्यानंतर भानावर आलेला भरत, सावरून आर्य सुमंत यांना म्हणाला की, 

" ताबडतोब ज्येष्ठ मंत्री व सचिव यांना पाचारण करा, मला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत."

आर्य सुमंत यांनी दोन ज्येष्ठ . मंत्र्यांना त्वरित बोलावून घेतलं. भरताने त्यांना सूचना केल्या की, 

" आपण लगेच, अती वेगवान अश्व घेऊन आणि सोबत काही सचिव,अधिकारी आणि सेवक वर्ग घेऊन, अयोध्येला सर्वांच्या पुढे जा. अयोध्येत जाऊन, सर्वांना ही बातमी द्या की, राजकुमार भरत, प्रभू श्रीराम यांच्या पादुका घेऊन आला आहे. त्या पादुकांची, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांचे प्रतिनिधी स्वरूपात स्थापना करून , पुढील चौदा वर्षे, भरत,अयोध्येबाहेर, नंदीग्राम येथे, तापसी वेषात, एक सन्यासी म्हणून, वास्तव्य करेल. 

स्वतः भरत, श्रीरामांच्या पादुकांच्या प्रतिनिधी म्हणून, नंदीग्राम येथूनच, कारभार पाहिलं. एक मुनी, तपस्वी आणि योगी या भूमिकेतून, भरत वल्कल व मृगाजीन नेसून, चौदा वर्षांचं आयुष्य, श्रीराम यांच्या प्रमाणेच व्यतीत करेल. कदाचित हेच या भरताचं प्रायश्चित्त असेल की, चौदा वर्षे तो आपल्या जन्मदात्या आईचं मुख पाहणार नाही. 

अयोध्येचे समस्त प्रजाजन आणि राजपरीवार पुढील चौदा वर्षे, या राज्याच्या अनअभिषिक्त राजाची, आपल्या प्राणप्रिय श्रीराम यांची प्रतीक्षा, प्रतिदिन, प्रतीप्रहर, प्रती घटिका अर्थात प्रत्येक पळ करेल. प्रत्येकजण हा काळ, आपल्या आराध्य असलेल्या श्रीराम यांचं नित्य स्मरण, चिंतन व मनन करेल,जेणेकरून श्रीराम आपल्या पर्यंत, लवकरात लवकर, परतून येतील. आपण मंत्रीगण त्वरित अयोध्येत हा संदेश देऊन या. तोपर्यंत मी समस्त परिवार व इथे उपस्थित प्रजाजन, यांच्या साक्षीने, श्रीराम पादुकांची, नंदीग्राम येथे, विधिवत स्थापना करवून घेतो. " 

वरील आदेशानुसार, दोन्ही मंत्रीगण, काही सचिव, अधिकारी आणि सेवक वर्ग यांना घेऊन, वायुवेग असलेल्या विशेष अश्वदलाने, अयोध्येत निघाले. इथे अयोध्येत, मागे राहिलेले, चिंतित आणि चिंतनात होते की, राजपुत्र भरत याच्यासह गेलेले, जनसाधारण, महाजन, ग्रामप्रमुख, सैन्य, परीवार आदी कधी परतून येत आहेत. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...