Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

भोग आणि ईश्वर ४२६

भोग आणि ईश्वर  ४२६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालच्या भागात पाहिलेला विषय पुढे नेऊया. संगतीचा एक भाग जो अपरिहार्यपणे आपल्यासोबत प्रारब्धाने, सचितातून येतो तो आपण काल जाणला. पण तो जाणूनही आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार वा आनंद किंवा दुःख करून काहीही उपयोग नाही. पण संगतीचाच दुसरा भाग जो आपल्या नियंत्रणात आहे किंवा असू शकतो, त्याचा आज विचार करूया.  संगती जी आपल्याला आपल्या निवडीतून किंवा निर्णयाने ठरवता येऊ शकतो, त्यातील महत्वाचा घटक म्हणजे स्नेही, मित्रसंबंधी हा आहे. स्नेही वा मित्र यांचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक हितसंबंधी आणि हितशत्रू. मुळातच स्नेही वा मित्र या घटकाचं, आपल्या आयुष्या तील स्थान किती महत्वाचं आहे, हे आपण सर्वजण जाणतो.  म्हणूनच यातून मनाला, बुद्धीला मिळणारी किंवा त्यामुळे वाया जाणारी ऊर्जा व शक्ती ही मिळवणं व घालवणं पूर्णपणे आपल्या हातात नसेलही.  तरीही हितशत्रू व चुकीच्या मैत्रीला वा संबंधाना दूर ठेवून, आपण निदान होऊ शकणारा, ऊर्जा व शक्ती यांचा ऱ्हास, नक्कीच कमी करू शकतो. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट जी बरेचवेळ...

भोग आणि ईश्वर ४२५

भोग आणि ईश्वर  ४२५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतील, म्हणण्यापेक्षा मनातील विचारांवर नियंत्रण ठेवून चागल्या लहरी अर्थात vibes निर्माण करू शकतील असे तीन घटक, जे आपल्या नियंत्रणात असतात किंवा मानवी कक्षेत येतात ते म्हणजे संगती, विचार व कर्म. आता एकेक घटकाचा विचार करूया. म्हणजे मनातील ऊर्जा व शक्ती सकारात्मक रीतीने कशी वापरता वा वळवता येईल यावर विचार करूया.  संगतीमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पूर्वसंचिताने मिळणारी संगती आणि दुसरी म्हणजे आपण निवडलेली वा आपल्याला निवडता येणारी संगती. पहिल्या प्रकारा तील संगती ही जन्माने व आपल्या नियंत्रणा शिवाय प्राप्त होते आणि त्या संगतीच्या व्यक्ती व वातावरणात, आपलं प्रारब्ध घेऊन जातं. किंवा त्यांच्या संपर्कात आपण येतो. याचा मनाच्या ऊर्जा व शक्तींशी काय संबंध, यासाठी हे लक्षात घ्या की, या गोष्टी अनेकदा किंवा बऱ्याचवेळा आपल्या पूर्वसंचिताने आपल्या संस्कारांचा भाग म्हणून आयुष्यात येतात.  आपल्या देहासह बुद्धी व मन यांची जडणघडण या गोष्टींनी ठरते किंवा आखली जाते. मनाचा खणखरपणा, राकटपणा, मृदुत...

भोग आणि ईश्वर ४२४

भोग आणि ईश्वर  ४२४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाचा विचार करताना, एक विचार सहज डोकावून जातो,तो म्हणजे,मनाची शक्ती जितकी अफाट, तितकाच त्याचा व्याप, पसारा, व्यास अचाट आहे. त्यामुळे त्याची ऊर्जा देखील अमर्याद आहे. खरंतर मनाबद्दल ही गोष्ट जाणल्यानंतर, वास्तविक सर्व सामर्थ्याची कल्पना किंवा जाणीव येऊन, त्या अफाट आणि अचाट शक्तीचा उपयोग करून घेता यायला पाहिजे.  पण अजून एक गोष्ट मनाबद्दल आहे, ती म्हणजे, त्या मनाचं चंचलत्व किंवा विषयाकडे सहजी असलेली ओढ किंवा आसक्ती. या एका अवगुणामुळे, अनेक बाबतीत मर्यादा पडतात वा येतात. मुळात विधात्याने अशी रचना का केली असेल, असा एक विचार बरेचवेळा येतो. पण त्याचं उत्तर म्हणजे, जे साध्य करण्यासाठी हा देह ईश्वराने निर्माण केला, ते साध्य करणं, फक्त देह, फक्त बुद्धी यांनी शक्य नाही. तर त्यासाठी ऊर्जा, शक्ती व प्रेरणा आवश्यक आहे आणि ती मनाकडे आहे. जेंव्हा हे तिन्ही एकत्र येऊन कार्य करतील, तेंव्हाच सर्व ईश्वरी इच्छेनुसार साध्य होईल.  म्हणजे जर देह हा वाहन असेल तर मनाची ऊर्जा व शक्ती,  हे त्याचं इंधन आहे. म्हणजे वाहनाशिवाय इंधन निरुपयोगी आहे,...

भोग आणि ईश्वर ४२३

भोग आणि ईश्वर  ४२३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता चांगल्या सवयीचा  विचार करायचा झाल्यास. आपण मुळात कोणताही विचार हा सकारात्मक, चांगला सकस आणि भल्याचाच करावा. मुळात हाच आपल्या मनाचा पाया किंवा बेस असावा.  क्षणिक, तात्पुरते येणारे वाईट, क्रोधाचे,एखाद्याबद्दल चुकीचे विचार हे त्या क्षणीच मनातून काढून टाकले पाहिजेत. मुळातच असे विचार येणं हे, आपल्याला पुन्हा पुन्हा मागे नेत राहील, हे लक्षातच राहिलं पाहिजे.  म्हणूनच, मनाला सतत जागरूक ठेवून, कर्म केलं पाहिजे. कारण कर्म हे जरी देह, बुद्धी वाचा इत्यादी करत असले, तरी त्या प्रत्येक कर्मामागे मनाची प्रेरणा, ऊर्जा व शक्ती असते. ज्यावेळी तशी प्रेरकशक्ती त्यामागे नसते, तेंव्हा आपण म्हणतोच की, हे काम किंवा ही गोष्ट मी मनापासून केली नाही. म्हणून प्रत्येक कर्मापाठी मनाला जोडून ते केल्यास, आपोआप समाधान मिळत जाईल.  मनाला, असं प्रत्येक कर्मामागे लावताना, मनाचा पाया हा उत्तम, उन्नत विचारांचा आणि त्यामुळे कोणाचंही वाईट किंवा गैर चिंतणारा नसावा, हे कटाक्षाने ध्यानात राहू द्या. म्हणजेच चुकीचे आलेले विचार तिथल्यातिथे ताबडतोब मनातून...

भोग आणि ईश्वर ४२२

भोग आणि ईश्वर  ४२२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) सवयीप्रमाणे घडणं ही अंगवळणी पडलेली बाब आहे हे आपण काल पाहिलं. पण सवय म्हणजे एखादी गोष्ट, कर्म करण्याचं देहाला, बुद्धीला व मनाला लागलेलं वळण. सवय हा नेम वा नित्य घडणारी गोष्ट आहे. अशी सवय कोणत्याही गोष्टीची व नित्य बाबीची असू शकते. पण सवय ही चांगल्या आणि वाईट किंवा सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही गोष्टींची असू शकते.  म्हणजे लाभदायक आणि हानिकारक अश्या सवयी असू शकतात. नित्य सवयी या नित्य कर्म निर्माण करून नित्य फलाच्या प्राप्तीसाठी पुन्हा येणंजाणं घडवतात. अर्थात संसाराच्या सवयी संसाराची किंवा संसाराबाबत म्हणजेच  व्यवहाराबाबतची फल प्राप्ती करून देतात. संसाराबाहेरील सवयी त्या क्षेत्रातील फल निर्माण करून, समोर आणून देतात.  खरतर  सवयीबाहेरील जी कर्म असतात, ती पण आपल्या क्षेत्रातील फल निर्माण करतातच. पण त्यांच्या बाबत आपण कोणत्याही प्रकारचं नियोजन करू शकत नाही. नियोजन हे चांगल्या व वाईट,अश्या दोन प्रकारच्या सवयीबाबत, नक्कीच करू शकतो. पण त्यासाठी मनात जाण आणि जागृती असणं किंवा येणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडं ज्ञान आवश्यक...

भोग आणि ईश्वर ४२१

भोग आणि ईश्वर  ४२१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) नकारात्मक विचार मनात येण्यापासून, स्वतःहून, पूर्ण जाणिवेने, निश्चय करावा. असा निश्चय केल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक कृती करावी. सुरवातीला नक्कीच अडचणी येऊ शकतात. म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक एखादा सकारात्मक विचार करत असताना, मनाला व बुद्धीला मागे खेचून नेणारे आणि अश्या सकारात्मक कार्यात खोडा घालणारे, नकारात्मक विचार येतील.  पण अश्या प्रत्येक वेळी वा प्रत्येक क्षणी, जाणीवा जागृत ठेवून स्वतःला किंवा मनाला समजावून सांगत, त्या मनाला व बुद्धीला, पुन्हा पुन्हा जागेवर आणणं, हे सुरवातीला गरजेचं असतं. मनाला काही गोष्टींची किंवा चांगल्या विचारांची मशागत करण्याची सवय, जाणीव पूर्वक लावून घेणं, महत्वाचं आणि गरजेचं आहे. खरंतर जाणीव, ही या सर्व प्रवासात किंवा आरंभीच्या काळात, खूप मोठं काम करते.  जाणिवांची जागृती म्हणजे एक प्रकारे मनातील त्रयस्थ जागा असणं.  जाणीवा या एकप्रकारे मनाला जागं ठेवण्याचं कार्य करतात. म्हणजे जाणीवा या पथावरील दिव्यासमान आहेत वा असतात. त्या सतत मनाला आठवण करून देतात, किंवा ज्यावेळी आपण एखादी गोष्ट विसरून पुन...

भोग आणि ईश्वर ४२०

भोग आणि ईश्वर  ४२० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) चुकीच्या विचारांवर, खर्च होणारी ऊर्जा व शक्ती नियंत्रित करण्याचा नुसता विचार केल्यावर, लक्षात येईल की, आपण मन, बुद्धी व देह यांना अकारण त्रास देऊन निष्कारण ऊर्जा व शक्ती वाया घालवत होतो. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. आपण नेहमी एका मार्गाने कार्यालय किंवा भाजी आणायला किंवा काही नियमित कामासाठी जातो. तो मार्ग लांबचा, पण आपल्या माहितीचा असलेला एकच मार्ग आहे.  एके दिवशी एक मित्र किंवा स्नेही आपल्याला वाटेत भेटतो आणि चौकशी करताना आपण सहज बोलून जातो की, अमक्या अमक्या ठिकाणी आपण रोज या मार्गाने कामा निमित्त जातो. त्यावर तो मित्र वा स्नेही, आश्चर्याने म्हणतो अरे एवढ्या लांबून का जातोस. तुझ्या घराजवळून एक मार्ग आहे, त्याने तुझा वेळ निम्म्याहून वाचेल आणि श्रमसुद्धा वाचतील.  चल मी तुला दाखवतो तो जवळचा रस्ता. असं म्हणून तो मित्र आपल्याला जवळून जाणारा आणि माहीत नसलेला मार्ग दाखवून चक्रावून सोडतो. आपण विचार करतो की, उगाचच आपण, इतके दिवस, कष्ट आणि वेळ वाया घालवले. पण याबाबत कर्मसिद्धांत लक्षात ठेवावा,की त्याने काही ऋण फेडून आपल्य...

भोग आणि ईश्वर ४१९

भोग आणि ईश्वर  ४१९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण चिंतनाच्या टप्प्यावर आलो आहोत, तर हाच विषय थोडा अजून समजून घेऊ. मुळात एक गोष्ट लक्षात आली असेल की, चिंतन म्हणजे मनात होणारं विचार मंथन. आणि आपल्याला दुसरं तिसरं काही करायचं नसून, मनातील विचारांना नकारात्मक भावाकडून, सकारात्मक भावाकडे नेऊन, तिथे स्थापित करायचं आहे. म्हणजे ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवणं.  कारण प्रत्येक विचारामागे ऊर्जा कार्य करते, जी त्या विचारांना गती देऊन, त्यांना एका दिशेने घेऊन जाते. म्हणजे कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला जशी गती असते, तशी गती विचारांना असते. ती ऊर्जेची गती. यासाठी देहाची बुद्धीची व मनाची ऊर्जा वापरली जाते. याच उर्जेला जर नकारात्मक विचारांच्या मागे लावलं, तर दोन प्रकारे हानी होते.  एक म्हणजे देह बुद्धी व मन यांची झीज होतेच, पण दुसरं म्हणजे मन, बुद्धी व देह यांच्या माध्यमातून चुकीच्या विचारांसाठी वापरलेल्या उर्जेतून मिळणारं कर्मफलसुद्धा पुन्हा मन बुद्धी व देह यांची झीज घडवून आणतं. हा कर्मफल नियम आपण पाहिला आहेच की, प्रत्येक कर्म आपल्या ऊर्जा व शक्तीच्या प्रभावा इतकंच, पण विरु...

भोग आणि ईश्वर ४१८

भोग आणि ईश्वर  ४१८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) वास्तविक स्वप्नरंजन म्हणजे काय, तर काही काल्पनिक विचारांच्या मागे मनाला जाऊ देऊन, त्याद्वारे, मनाला एका विशिष्ट तरंगावर व पातळीवर स्थिर करणं. अश्या स्वप्न रंजनात मनाला एका गतीत स्थिर करण्यात आलेलं असतं. हेच कार्य चिंतनातून घडतं.  फरक इतकाच की स्वप्नरंजनात आपण, नैसर्गिकरित्या येणाऱ्या, विचारांच्या मागे मन व बुद्धीला जाऊ देऊन साधतो, किंवा त्या विचारांच्या ओढीने वा आसक्तीने सांधलं जातं.  चिंतनात यांच्या विरुद्ध कार्य आहे. म्हणजे स्वप्न रंजनात आपोआप घडणारं चिंतन, चिंतनात मुद्दाम हून व चांगल्या विचारांनी घडवून आणायचं आहे वा असतं.  विचार करून बघा स्वप्नरंजनातील कल्पना आणि त्यातून प्राप्त होणारा आनंद, मनाला काही काळासाठी का होईना पण, सुखावून जातो. ते अशाश्वत सुख किंवा रंजन असतं. म्हणजे वास्तवात आल्यावर, आपण भानावर येतो आणि पुन्हा वास्तवातील जगतात हरवून जातो. पण मनाला ते सुख एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातं.  हेच चिंतनातून साध्य होतं. पण ते जर शाश्वत आणि चिरंतन सुख देणाऱ्या किंवा खऱ्या निर्गुण अस्तित्वाचं चिंतन असेल तर, त्यातू...

भोग आणि ईश्वर ४१७

भोग आणि ईश्वर  ४१७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) देह हा पंचमहाभूत तत्वांपासून बनलेला असल्यामुळे, गुरुत्वाकर्षण ओढ, त्यातील रक्ताला आणि त्या माध्यमा तून, बुद्धीला व मनाला असते. पण या सर्व शक्तीपेक्षा एक मोठी शक्ती प्रत्येक माणसाला मिळालेली आहे. ती शक्ती म्हणजे इच्छाशक्ती. मुळात एकदा ज्ञानप्राप्ती झाली आणि हे लक्षात आलं की, हा सर्व खेळ देह मन यांच्या आसक्तीतून आणि बुद्धी त्यामागे ओढली जाऊन, घडतो, मग खरंतर सर्व गोष्टी सोप्प्या व्हायला हव्यात.  पण यातच खरा पेच आहे किंवा खरी गोम आहे. म्हणजे बुद्धी ज्यामध्ये ज्ञान व जाणिवांची जागृती होते आणि मन जे या सर्वांचा विचार करतं, त्यांचा समागम किंवा संगम व्हायला हवा.तो झाला की, बुद्धीच्या ज्ञानयोगात, जाणिवांच्या जागृतीत मनाची प्रगल्भता वाढली पाहिजे. पण आपण स्वतःच हे होऊ देत नाही. याचं कारण म्हणजे मनाचा वारू, बुद्धीच्या लगामाने योग्य दिशेने वळायला हवा, तो आपण वळवत नाही. उलट बुद्धीला मनाच्या मागे धावायला लावून, अहित साधण्यास सहाय्य करतो आणि विचारांची, अर्थातच चिंतनाची गरज जेंव्हा असते, तेंव्हा आपण मनाला व बुद्धीला योग्य चिंतानाचं खाद्य पुरवत नाह...

भोग आणि ईश्वर ४१६

भोग आणि ईश्वर  ४१६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) एकूणच  विषय, वासना, माया, मोह हे सर्व आत्म्याला ग्रासणारे साप आहेत, पण ते शर्करा वेष्टनात आहेत. थोडं अतर्क्य आणि काल्पनिक वाटतं, पण सत्य आहे. कारण हे सर्व देह,बुद्धी व मुख्यतः मन यांना ग्रासतात. त्यांच्या सेवनातून  एक प्रकारचा आनंद किंवा मद प्राप्त होतो. म्हणजे त्यातून एक सुखाची अनुभूती प्राप्त होते. ती अनुभूती त्या विषय व वासनेभोवती, देह मन व बुद्धी यांना गुंतवून ठेवते.  म्हणजे मनाची देहाची धाव त्याकडे सतत होते. ज्यामुळे बुद्धी त्या विष्यसुखांना प्राप्त करण्याचे मार्ग शोधून, त्यांना देह आणि मन यांसाठी प्राप्त करण्याचं मुख्य कर्म, देहाकडून करवून घेते. म्हणजे मोह किंवा लोभ किंवा काम वा क्रोध आहेत, मन व देह यांच्या आनंदासाठी. पण देह एकटा किंवा मन एकटं प्रत्यक्ष कर्म करू शकत नाही. त्यासाठी दोघांनाही बुद्धीच्या सहाय्यची गरज असते. म्हणूनच या तिन्हींच्या एकत्र येण्याने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जातात.  सकृतदर्शनी यातील काही सांसारिक कर्मबंधनातील असतात आणि काही अनावश्यक असतात. सांसारिक कर्मातील असे षड्रिपु संगदोष, पुढील ...

भोग आणि ईश्वर ४१५

भोग आणि ईश्वर  ४१५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) खरतर ज्यावेळी मनात विचार येतो की आता भोग आणि ईश्वर आटोपतं घ्यावं का, त्याचवेळी, एखादा लेख इतका उत्तमप्रकारे जमून येतो, की वाटतं, महाराजांना अजून पुढे सांगणं अपेक्षित आहे. कालच्या लेखात, निष्काम कर्मयोगाचं उदाहरण चपखलपणे आणि साध्या शब्दात सांगितल्यावर आता प्रश्न उरतो, जर इतकं सहज आहे तर, जमत का नाही किंवा इतक्याच सहज साध्य होईल का. बघूया आज.  मुळात सर्व गुंता आहे, सांसारिक व देहातील गोष्टीत मन रमल्यामुळे आणि त्यातून ते काढून घेणं सर्वात अवघड असल्यामुळे,  सर्व प्रश्न सुरू होतात. कारण मुळात एक गोष्ट आपण विसरतो की, हा देह, हेच मुळात तात्पुरतं निवास स्थान आहे, आत्मरुप तत्वाचं. त्याचा मुख्य उद्देश देहाचा वापर करून, आत्म्याला प्रत्येक जन्मात हळूहळू परमात्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी पुढे पुढे नेणं. म्हणजे आत्म्याला ज्ञात असतं की, मला देह फक्त एका उद्देशाने देण्यात आला आहे.  पण हा उद्देश आत्मा, देहात आला की, सर्वस्वी विसरून जातो किंवा देहातील मन बुद्धी, मनाची चंचलता, प्राप्त सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती, देहाच्या प्राप्त स्थि...

भोग आणि ईश्वर ४१४

भोग आणि ईश्वर  ४१४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) कर्मावर लिहिताना, कर्माच्या मूळ स्वरूपाकडे त्याच दृष्टीने पाहणं गरजेचं आहे, जे वास्तविकपणे अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे.उदाहरणार्थ आपण सांसारिक कर्म करताना किंवा पारमार्थिक कर्म करताना, त्याच्या मागे असलेल्या उद्देशावर मन एकाग्र करतो आणि मग आपोआप मनातील वासना किंवा विषय, त्यामध्ये गुंतून, बद्ध कर्माची शृंखला तयार होते किंवा आपण ती तयार करतो. त्यातूनच जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकण्याची आपणच तयारी करतो.  यावर उपाय काय, तर देह कर्मात गुंतला तरी मनाला त्यात गुंतू न देता, मनाला तटस्थता द्यायची किंवा मनाला तटस्थ करायचं.म्हणजे नक्की काय करायचं, तर सांसारिक कर्मात देहाचा सहभाग असतो, त्यात देहाला देहाच्या गरजा पूर्ण करण्याची मुभा देऊन, मन मात्र त्यात गुंतू द्यायचं नाही. उदाहरणार्थ, आपण खूपवेळा आपल्या वर लादण्यात आलेलं,एखादं नावडतं काम नाईलाजास्तव करतो. म्हणजेच त्या कर्मात, कर्म करत असताना, देह गुंतलेला असला तरी, मन त्यात गुंतलेलं नसतं.  म्हणजेच त्यावेळी त्या कामात मनातील लहरी, त्या कर्माची प्रेरणा नसते. कारण उद्देश कर्म करण्याचा असला त...

भोग आणि ईश्वर ४१३

भोग आणि ईश्वर  ४१३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) सांख्य म्हणजे ज्ञानाने समृद्ध झालेला जीव, जो आत्मा आणि परमात्मा यांना जाणणारा आणि त्यामुळे सर्व जाणून, आपण निरिच्छ झालेला. प्रत्येक क्षण नित्य यज्ञ करणारा. पण असं जीवन आणि असं ज्ञान प्रत्येकालाच प्राप्त होईल असं नाही. किंबहुना असं ज्ञान प्राप्त झालेला योगी लाखात एखादा असू शकेल.  पण नित्य कर्म करूनही त्यात रत न झालेला वा कर्म करूनही अकर्मी किंवा निष्कर्मी असलेलासुद्धा कर्माच्या बंधनात न अडकता, आपला मोक्षाचा मार्ग सुकर करू शकतो. म्हणजे असा जीव कर्म करताना, त्यामध्ये मन बुद्धी यांनी गुंतत नाही. कारण जीवाला बद्धता आणते ती त्यामध्ये असणारी आसक्ती.  पण हेच आसक्तीराहित आणि चित्तवृत्ती निरोधीत करून केलेलं कर्म, ज्यामध्ये जीव गुंतत नाही, ते कर्म कोणत्याही नवीन बांधनाला जन्म देत नाही. अश्या जीवाला नैष्कर्मी म्हणतात. आता हे कसं शक्य आहे. तर यासाठी सर्वात प्रथम मी कर्म करतो हा भाव आणि याचा अहंकार, अर्थातच देहाभिमान नाहीसा झाला पाहिजे.  कारण देह आणि त्याच्या अस्तित्वाचा अहंकार बद्धता निर्माण करतो. याऊलट त्या कर्मातील मी जर नाहीसा झाल...

भोग आणि ईश्वर ४११

भोग आणि ईश्वर  ४११  प्रत्येक संक्रमण हे काही ना काही परिणाम व फल घेऊनच येतं. कारण तो परतीचा प्रवास असतो. मग ते संक्रमण सूर्याचं कर्क ते मकर असो किंवा मकर ते कर्क असो, वा कर्माचं संक्रमण असो. या दोन्ही, कर्क आणि मकर शब्दातून पुन्हा एका संयुक्त शब्दाचा,  कर्म याचा आभास होतो. म्हणजेच विधात्याला असं तर सुचवायचं नसेल की, हे संक्रमण तर्काचं ज्ञान समोर ठेव आणि त्यावरून आपल्या आयुष्याचं गणित बांध. कारण, विधात्याने, हे ज्ञान सर्वप्रथम सुर्यालाच सांगितलं, असं गीतेत स्वतः भगवंत सांगतात. असो, बघूया काय साध्य होतय चिंतनातून.  काल पाहिल्याप्रमाणे, प्रत्येक कर्म हे आपल्या कर्मसंपात बिंदूला स्पर्श करून माघारी, फलरूप होऊन निघतं. म्हणजे ही दोन संक्रमणं झाली. पहिलं आपल्याकडून वा आपल्या देह, बुद्धी वाचा व मन याद्वारे, घडलेलं कर्म, आपल्यापासून संक्रमित झालं, तो एक बिंदू किंवा एक संक्रमण आणि पुन्हा कर्मसंपात बिंदूला स्पर्श करून माघारी निघालं, ते दुसरं संक्रमण. इथे खरतर त्या कर्माची यात्रा संपली पाहिजे.  पण प्रत्येक वेळी असं होईलच हे खात्रीने सांगता येत नाही. याचं कारण म्हणजे ते दुसरं...

भोग आणि ईश्वर ४१०

भोग आणि ईश्वर  ४१०  आज संक्रांत आहे. त्यानिमित्ताने, संक्रातीचा अर्थ समजून आपण पुढे जाऊ. संक्रमण म्हणजे एखाद्या बिंदूवरून, ठिकाणा वरून वेगळ्या दिशेला वळणे. म्हणजे आपण एखाद्या सीमेपर्यंत जाऊन, त्याला स्पर्श करून, मग तिथून पुन्हा आपल्या मार्गाने माघारी येणे.  खरतर पृथ्वीच्या विशिष्ट भ्रमणामुळे, वर्षातून दोन वेळा सूर्य, एकदा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि एकदा दक्षिणे कडून उत्तरेकडे येतो.  त्यातील एक कर्कवृत्तावरून सूर्याचं दक्षिणेकडे प्रयाण, म्हणजे दक्षिणायन. म्हणजे कर्कवृत्त किंवा कर्कराशीला स्पर्श करून, सूर्य पुन्हा दक्षिणेकडे निघतो. त्यानंतर दक्षिणेकडे पूर्ण जाऊन, मकरवृत्ताला किंवा मकरराशीला  स्पर्श करून पुन्हा उत्तरेकडे निघतो. वास्तविक अर्थाने हे सूर्याचं चालणं वा फिरणं नसतंच. तर पृथ्वीचं स्वतःबरोबर सूर्याभोवती फिरण्यामुळे निर्माण झालेला हा आभास आहे, हे त्यामागचं खरं ज्ञान आहे.  याचं कारण आपलं पृथ्वीवरील अस्तित्व. ज्यामुळे आपल्याला हे सर्व आभासी बदल, खरे भासतात किंवा वाटतात. पण परिस्थिती वेगळीच आहे. हे वैश्विक सत्य खरतर भारतीय ऋषीमुनींना पुराण काळापासून ज्ञात ...

भोग आणि ईश्वर ४०९

भोग आणि ईश्वर  ४०९  आपल्यासारखे सर्वसामान्य जीव आणि ज्ञानी माणसं यातील मुख्य भेद हा दुःख आणि भोग याच प्रसंगात सिद्ध होतो असं नाही, तर तो सुखाच्या काळातही जाणवतो. मुळात दोन्ही काळ हे आत्मपरिक्षणासाठी आहेत वा असतात. जर दुःखाचा काळ असेल तर, आपण आधी केलेल्या चुका, प्रमाद यांच्या भोगण्याचा काळ आहे, याची जाणीव, त्याकाळात सतत ठेवून जगलं की, जगणं सुसह्य होऊन जातं. उपभोगांच्या काळात हीच जाणीव अजून सूक्ष्म झाली पाहिजे की, मी हा आनंद जगतोय तो माझ्या कर्माचं मला योग्यवेळी मिळालेलं फल वा मोबदला आहे.  पण निसर्गाच्या बदलांच्या नियमानुसार, सर्व दिवस बदलते असतात. त्यामुळे माझ्या या उपभोगांच्या काळात, मला याची जाणीव ठेवली पाहिजे की, हे जसे कर्मफल उपभोग स्वरूपात आहेत, तसेच भोग व दुःख हे देखील, कर्मफल स्वरूपंच आहेत. त्यामुळे हे सर्व चक्रा कार गतीने सुरूच राहणार. पण मी या प्रवाहातील एक थेंब न होता, यातून पार होऊन, पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं आहे.  म्हणजेच जर मी सुखात वाहावात गेलो नाही तर, मी दुःखातही शांत आणि स्थिर राहीन. कारण मुळात सुख व दुःख हे माझ्याच कर्मफलाच्या...

भोग आणि ईश्वर ४०८

भोग आणि ईश्वर  ४०८  आत्मज्ञानाची कवाडं उघडून जगतापलीकडे व देहातीत भावना प्राप्त झालेला, ज्ञानी माणूस, शांत मनःस्थितीला गेलेला असतो. सर्वसामान्य माणूस भोगांच्या काळात निराश, हताश वा नकारात्मक मनःस्थितीत जाण्याची शक्यता असते. कारण त्याला कर्मफल तर्क माहीत असला तरी त्यांची संगती लावून आपल्या मनाला, त्याआधारे, तटस्थ वा त्रयस्थ मनःस्थितीत ठेवणं, हे भोगांच्या काळात कर्मकठीण काम आहे.  कारण अश्या काळात माणूस सर्वात प्रथम विचार करतो तो लाभहानीचा. म्हणजे सर्वसामान्य मन हे एकप्रकारे व्यापारी विचार करतं. म्हणजे असं की, मी इतकं इतकं नेहमी करतो, तर त्या बदल्यात इतकं इतकं तरी मिळायला हवं. हा ढोबळ मानाने केलेला हिशोब, संपूर्ण आयुष्य, प्रत्येक दुःख व भोग प्रसंगात करत राहतो.  साधारण आपण सर्वसामान्य माणसं, देणं आणि घेणं या दोन गोष्टीत आयुष्याचे बरेचसे प्रसंग किंवा बहुदा सर्व आयुष्य मोजतो. त्यामुळे आपण आयुष्यभर देवघेव या मनःस्थितीतून कधीही बाहेर येत नाही. म्हणूनच भोग, दुःख आल्यावर  सर्वात प्रथम आपण माझ्या नशिबात का. मी तर चांगला आहे किंवा इतका काही वाईट नाही. मग मला हे का. या व्याव...

भोग आणि ईश्वर ४०७

भोग आणि ईश्वर  ४०७  आत्मज्ञान म्हणजे मुळात स्वतःबद्दल. किंवा या ब्रह्मांडा तील आपल्या अस्तित्वाबद्दल, जगताच्या पालनकर्त्या बाबत ज्ञान. म्हणजेच मी कोण, कुठून आलो आणि कुठे जाणार, का आलो  या सर्वांबद्दलचं ज्ञान जीवनाकडे आणि जीवनापलीकडे आणि जन्मजन्मांतरीचं ज्ञान अर्थातच आत्मज्ञान. हे आत्मज्ञान झालेला जीव जगातील वा जगताबाहेरील कोणत्याही गोष्टीने उदास, भयग्रस्त, चिंताग्रस्त, क्रोधीत, मोहित वा त्रस्त होत नाही.  कारण मुळात त्याला मिळवण्यासारखं आणि गमावण्या सारखं काहीच उरलेलं नसतं, पण तरीही त्याचा जीवना कडे बघण्याचा दृष्टिकोन उदास नसतो. जितकं जीवन विधात्याने क्रमागतीने दिलं आहे, तितकं जीवन निरसपणे न जगता सकारात्मक दृष्टीने आणि शुद्ध अंतःकरणाने जगण्याचा प्रयत्न व दृष्टिकोन आत्मज्ञानी माणसाचा असतो.  त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान झालेलं असल्यामुळे, जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात. अश्या प्रगल्भ जाणिवांनी, जीवन जगण्याचा विशाल व उच्चतम दृष्टिकोन अशा माणसाला प्राप्त झालेला असतो. प्रारब्ध व संचितात आपले भोग व उपभोग, कोणताही राग लोभ क्रोध मद न बाळगता वा कोणावरही आकस, राग लोभ न ठेवता...

भोग आणि ईश्वर ४०६

भोग आणि ईश्वर  ४०६  मनाला शांत केल्यानंतर आणि विवेकाचा बांध घातल्या वर, येणारे विचारच, विचार करून येतात. थोडं विचित्र वाक्य आहे. पण त्याचा परामर्ष घेऊ. मुळात फक्त मन शांत केल्यावर आणि विवेक धरल्यावर, काम।झालं का. तर यात विवेक धरणे किंवा विवेकाने वागणे म्हणजे नक्की काय याचा जरा विचार करू. कारण हा शब्द सर्वत्र वापरला जातो, पण त्याचा नेमक्या शब्दात अर्थ फार कमी ठिकाणी दिलेला आढळतो. म्हणून त्याचा आधी विचार करू.  मुळात विवेक म्हणजे सारासार विचार, योग्य अयोग्य यांची जाण ठेवून केलेला विचार, कर्म कर्तव्य यांना स्मरून व त्यांचा विचार करून निर्णय घेणे, तारतम्य बुद्धी वापरून व परिस्थितीची जाण ठेवून म्हणजेच थोडक्यात सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून अर्थातच ज्याला इंग्रजीत rational thinking म्हणतात ते. विवेकाचा सर्वात मोठा पाया म्हणजे भावभावना टाळून किंवा कोणत्याही भावनेच्या भरात न जाता निर्णय घेणे.  मुळात विवेक ही निर्णयप्रक्रिया नसून ती एक विचार प्रक्रिया आहे. म्हणजे असं की, प्रत्येकवेळी काही निर्णय घ्यायचा असल्यावरच विवेक असावा असं नसून, साध्या साध्या गोष्टी करतानासुद्धा, श...

भोग आणि ईश्वर ४१२

भोग आणि ईश्वर  ४१२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) देहाची वा देहाने घडणारी कर्म ही जेवढी अनिवार्य आहेत तितकीच बद्ध करत नाहीत. म्हणजे श्वास घेणं, हे जगण्या साठी अनिवार्य आहे. अन्नपाणी सेवन देहासाठी अनिवार्य आहे. म्हणून त्यासाठी करावं लागणारं कर्म हे बद्ध करत नाही आणि त्याच्या करण्याने बद्धता येत नाही. पण त्याच्या अनिवार्यतेच्या मर्यादेत राहूनच, ती ती कर्म केली तर, त्यातून बद्धता येणार नाही.  म्हणून कर्माच्या संक्रमणावर बोलतांना या कर्मांना वगळून, आपण फक्त बद्ध करणाऱ्या कर्मांवर बोलत असू, हे वेळोवेळी ध्यानात असुद्या. आता कर्माचं संक्रमण, ते कर्म, काया वाचा मन व बुद्धी या सर्वांतून किंवा कोणाही एकाच्या संकल्पाने घडत असताना, व्यक्तीला बद्ध करतं. पण श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी सांख्ययोग सांगताना, हे सांगितलं आहे की, ज्ञानी मनुष्य, या जगातील व जगताबाहेरील सर्व ज्ञान जाणत असतो. त्याच्या मनाची व आत्म्याची प्रगल्भता व त्याच्या जाणिवांची व्याप्ती अमर्याद झालेली असते.  त्यामुळे तो मूळ स्वरूपात विश्वाला, विश्वचैतन्याला जाणत असल्यामुळे, उत्पत्ती, स्थिती व लय, या सर्व खेळात ईश्वरी संकल्प श...

भोग आणि ईश्वर ४०५

भोग आणि ईश्वर  ४०५ शुद्ध अंतःकरणाबद्दल जाणतांना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ती माणसं, सौम्य व शांत असली तरी, विचाराने ठाम आणि अविचल असतात. म्हणजेच, कोणत्याही बाह्य शक्तींचा, विचारांचा व वादळांचा परिणाम त्यांच्या विचारां वर, बोलण्यावर व वागण्यावर होत नाही. किंबहुना त्यांची ठाम मानसिकता, या गोष्टींचा कोणताही विपरीत परिणाम यांच्या मनावर , विचारांवर, बुद्धीवर व कृतीवर होत नाही.  कारण शुद्ध अंतःकरण असलेल्या व्यक्ती बुद्धी, विचार व कृती यांनी प्रगल्भ असतात. म्हणजेच शुद्ध अंतःकरण व्यक्तीच्या चारित्र्यात, विचारात, वागण्यात अशी सर्वत्रच शुद्धता आणतं. अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, ही शुद्ध अंतःकरणाकडे वाटचाल एका रात्रीत होत नाही. किंवा सहजपणे होत नाही. पण त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची शांतता अर्थातच मनाची खोली वाढवणं आवश्यक असतं. मनाची खोली अर्थातच विचारांचा गुंता कमी करून,मनाला शांतपणे विचार करायला शिकवणं, महत्वाचं आहे.  त्यातून विवेक वाढीला लागतो. विवेक जागृत होऊन , तो वाढीला लागला की, आपोआप विचारांना प्रगल्भता येते. मनातून सर्व प्रकारची किल्मिष, गोंधळ, गडबड सर्वकाही शा...

भोग आणि ईश्वर ४०४

भोग आणि ईश्वर  ४०४  अंतकरणाची शुद्धता ही व्यक्तीसापेक्ष नसते. तर तिचे काही निश्चित मापदंड आणि गुणधर्म आहेत, जे अश्या माणसाला, इतरांपासून वेगळं दर्शवतात. अश्या लोकांच्या हृदयात करुणा आणि मनात ममत्व असतं. यांच्या मनात आपपर भाव नसतो. शुद्धता ही सात्विकतेच्या जवळची असल्यामुळे, अश्या व्यक्ती सत्वगुणयुक्त असतात.  त्यामुळे त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने वातावरणातील शुद्धता जाणवते. एक खूप महत्वाची खूण म्हणजे, अश्या माणसांच्या असण्याने तामसी माणसांना त्रास होतो. कारण त्यांच्यातील तामसी लहरींना छेद देणाऱ्या सात्विक लहरी, अश्या शुद्ध अंतःकरणाच्या माणसांपासून परावर्तित होतात. ही एक बाब किंवा अश्या काही व्यक्ती सोडल्या तर सात्विक व शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्ती नेहमी हव्याहव्याशा वाटतात.  शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्तींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दृष्टी स्वच्छ असते आणि मन शांत असतं. प्रत्येक समस्येकडे पाहण्याची यांची दृष्टी निकोप असते. त्यामुळे त्यांना मुळात समस्या या समस्या वाटतच नाहीत. उलट अश्या व्यक्ती कोणत्याही समस्येत, विवंचनेत दिसणार नाहीत. अंतःकरणाच्या शुद्धतेमुळे, कोणत्या...

भोग आणि ईश्वर ४०३

भोग आणि ईश्वर  ४०३  काल पाहिल्याप्रमाणे, दूध ते साजूक व सात्विकतेचा परामांश असलेल्या तुपापर्यंत घडणारा प्रवास हा विविध माध्यमातून होत असतो. म्हणून ते माध्यम तितकंच महत्वाचं आहे. आज त्यावर विचार करू.आपण कमी प्रतीच्या, हलक्या,अस्वच्छ पातेल्यात किंवा भांड्यांमध्ये जर दूध तापवलं, त्याला पुरेसा व मंद आंच नाही दिला, जमलेल्या सायीची हेळसांड केली तर, त्या पुढील प्रत्येक टप्प्यावर मिळणारं उत्पादन हे त्याच प्रतीचं असणार.  म्हणजे पुरेशी न जमलेली साय, दुध वा साय खराब होण्याची शक्यता या सर्व गोष्टी नक्कीच घडतील आणि ते नैसर्गिक आहे. त्याचप्रमाणे पुढच्या टप्प्यावर मिळणारं दही, त्याचं ताक हे निकृष्ट दर्जाचं व कमी प्रतीचं असेल. त्यामुळे लोणी कमी मिळून, सरतेशेवटी आपण ज्यासाठी हा आटापिटा केला , ते सात्विक व साजूक तूप निकृष्ट असेल, किंवा लोणी मिळणार सुद्धा नाही. म्हणजेच प्रत्येक टप्प्यावर वापरण्यात येणारं भांड वा पातेलं हे चांगलंच असावं आणि  त्यासाठी केली जाणारी प्रक्रिया उत्तम प्रतीची व योग्य काला वधीची हवी, यासाठी प्रत्येक गृहिणी नक्कीच प्रयत्नशील असतेच असते. या सर्व प्रक्रियेत माध्यम...

भोग आणि ईश्वर ४०२

भोग आणि ईश्वर  ४०२ ईश्वर स्मरणाने काय साधतं हे सांगण्यासाठी आपण एक उदाहरण  घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. शेगडीवर दूध ठेवून, त्याला खालून आंच दिल्यास, त्यातून सत्व, सायीच्या रुपात पृष्ठभागावर जमा होतं. त्याला विरजण लावून, त्याचं दही घालून, त्या तयार झालेल्या दह्यातून ताक तयार करून, त्या ताकातून आलेल्या लोण्याला कढवून, सरतेशेवटी तूप मिळतं. जे सर्वात उत्तम आणि अत्यंत गुणकारी असतं.  म्हणजे या एका शेवटच्या पदार्थासाठी दुधाला, अग्नी, किण्वन प्रक्रिया, पुन्हा मंथन अर्थात प्रचंड संघर्ष आणि पुन्हा अग्नीवर तापवलं जाणं, अश्या अनेक संघर्षात्मक परिस्थितीतून जावं लागतं. त्याचबरोबर अनेकविध नव नवीन देहधारण करावे लागतात. बरं या सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहेत. कारण अग्नी, किण्वन, मंथन व पुन्हा अग्नी, हे सर्व निसर्गातील मूळ घटक आहेत.  आपण अग्नी कोणत्याही प्रक्रियेने तयार केला तरी, तो अग्निच असतो.किण्वन ही सुद्धा एक प्रकारची, बॅक्टेरिया द्वारे घडणारी, नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याचं पृथक्करण व विश्लेषण विज्ञानाने एखाद, दोन शतकं आधी केलं असेल, पण त्याचा वापर करून तूप काढण्याचं कार्य, सनात...

भोग आणि ईश्वर ४०१

भोग आणि ईश्वर  ४०१  वास्तविक पाहिलं तर, ईश्वर हा देहाच्या सर्वात निकट म्हणजे हृदयस्थ आहेच आहे. पण आपण तो देऊळ,  मूर्ती, प्रतिमा यांमध्ये पाहतो, शोधतो आणि जाणतो. सगुण रूपाने मनाला पूजन व अर्चन यांची सवय लागते हे मान्य. पण काही काळानंतर मन निर्गुणाकडे गेलं पाहिजे.  ते निर्गुण रूप परब्रम्ह आत आत्म्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.   एक लक्षात घ्या, आत्मा हा अणू रूपात, त्या ईश्वराचा अंश आहे. अणूपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, हे हनुमंता इतकंच या देहातील आत्म्यालासुद्धा लागू पडतं. कारण अंतरात्म्याची ती शक्ती आहे, जी हनुमंताने सिद्ध केली होती, रामनामाने.  त्यासाठी सर्वात महत्वाची पहिली आवश्यकता आहे ती म्हणजे शुद्ध सात्विक मनाची. चित्तशुद्धी ज्याला म्हटलं जातं, ते नितांत आवश्यक आहे. चित्तशुद्धी हा या सर्वाचा मूलमंत्र आहे म्हटलं तरी वावगं ठरू नये.  कारण हृदयस्थ भगवंताला अंतरात्म्यात जागृत करण्यासाठी, अत्यंत शुद्धतेची जरुरी असते. म्हणून सर्वात प्रथम चित्तशुद्धी महत्वाची. ज्याप्रमाणे xray किंवा सोनोग्राफी यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या किरणांची आवश्यकता असत...

भोग आणि ईश्वर ४००

भोग आणि ईश्वर  ४००  या सर्वच ज्ञानाचा, परमार्थाचा, साधनेचा आणि श्रीमद्भ गवद्गीता यासारख्या अनेक ग्रंथांचा व शास्त्रं पुराणं यांचा उद्देश, मनाचा ओढा देहाच्या उपभोगातून बाहेर काढून, तो ओढा आत वळवून, आत्मचिंतनाच्या माध्यमातून, सद्सद्विवेक जागा करून, चित्तशुद्धी व आत्मशुद्धी जागृत करणं हा आहे. एकदा उद्देश समजला आणि मार्ग व साधन निश्चित झालं की, मार्गक्रमण सुलभ व्हायला हरकत नसावी.  पण कलियुगातील सद्यस्थिती व अजूनच बिकट होत जाणारी परिस्थिती, लक्षात घेता. कोणत्याही अति श्रमाच्या साधनाचा उपयोग होणार नाही आणि धर्ममार्गी जन यापासून परावृत्त होऊ शकतात. हीच शक्यता जाणून, भगवंतांनी स्वमुखाने उपदेश करताना, ज्ञानमार्ग अर्थात सांख्यमार्ग, कर्ममार्ग हे सांगून, सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून सांगितलेला भक्तिमार्ग अर्थात ईश्वर स्मरण हे सांगून, सर्वात शेवटी काहीही न जमल्यास, कर्तव्य करत असताना, फक्त मला शरण ये व तुझे मनातील सर्व विकल्प, चिंता, यांना माझ्या चरणी, अर्पण करून,मजपाशी ये, हा सल्ला दिला.  म्हणजे इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता,  फक्त मला शरण ये आणि माझं स्मरण कर. पण हे करत...

भोग आणि ईश्वर ३९९

भोग आणि ईश्वर  ३९९  कलियुगाच्या सुरवातीलाच त्याच्या लक्षणांची कल्पना  भगवंतांना आली होती म्हणूनच सगुण आणि निर्गुण भक्तीची अनेक उदाहरणं आपल्या जीवनात प्रभुनी घडवून आणली, जेणेकरून ती, कलियुगाला मार्गदर्शक ठरतील. वृंदावन, गोकुळ, मथुरा, इथला समस्त गोप गोपी परिवार हा प्रभूंच्या सगुण रूपावर निस्सीम प्रेम करत होता.  पण त्याच वेळी व त्याच परिसरात राधा कृष्णावर सगुणा च्याही पलीकडे प्रेम करत होती. कृष्णभेटीची ओढ ही सर्वांनाच सारख्या पद्धतीने कृष्णाभोवती बांधून ठेवत होती. पूर्वायुष्यात घडलेल्या या अद्भुत लीलानंतरसुद्धा, प्रभूंना अर्जुनासारखा निर्व्याज प्रेम करणारा सखा मिळाला, ज्याच्यावर प्रभूंनीसुद्धा अद्भुत पद्धतीने प्रेम केलं.  त्याला कारण करून, संपूर्ण जगताला, अनंत काळापर्यंत मार्गदर्शक ठरेल, असं श्रीमद्भगवद्गीता यासारखं,  अद्वैत तत्वज्ञान जगताला दिलं. ती श्रीविष्णूच्या या अवतार कार्याची अलौकिक देणगी होती. त्यानंतरसुद्धा या अलौकिक तत्त्वज्ञानावर धर्मांधतेचा व संकुचिततेचा शाप लागल्यावर, कृष्णजन्मानंतर चार हजार वर्षांनी, श्रीज्ञानोबाराय जन्मात येऊन, ते ज्ञान स्वहस्ते...

भोग आणि ईश्वर ३९८

भोग आणि ईश्वर  ३९८ काल पाहिलं त्याप्रमाणे, सूर व पितर या दोघांना, त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांच्या ऊर्जा व शक्तीचा पुरवठा, मानव करतो. आता याचा अजून खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की,यासाठी मानवी देहात आवश्यक equipments instruments अर्थात इंद्रिय व अवयव व्यवस्था विधात्याने मानवाला जन्मतः दिली आहे. बरं ही व्यवस्था पुढे पुढे सुरू राहावी, म्हणजेच एका स्वयंचलित व्यवस्थेतूनच दुसरी स्वयंचलित व्यवस्था निर्माण होईल, हे सुद्धा पाहिलं आहे.  म्हणजे एकदा या भूतलावर आल्यावर, कोणत्याही जीवाला, हा देह योग्य त्या कार्यासाठी वापरण्याचं विज्ञान देहातच आहे. Signal receiving व transmitting system आतच आहे.  ती सक्षम करण्यासाठी बुद्धी मन आणि आत्मा यांचा संयोग साधणं जरुरी आहे. त्यातूनच ही सिस्टिम activate होऊन, आपण केलेल्या शुद्ध सात्विक कर्माचे सिग्नल्स वरील व्यवस्थेपर्यंत पोचू शकतील.  म्हणून सर्व साधन, ध्यान, धारणा योगयाग, नामस्मरण इत्यादीचं ज्ञान मानवापर्यंत पोचवण्याची व्यवस्था ईश्वर अनेक मार्गांनी करतो.ज्याला ईश्वरीय ज्ञान वा अध्यात्मिक ज्ञान म्हटलं गेलं.  म्हणजे देहाचा...

भोग आणि ईश्वर ३९७

भोग आणि ईश्वर  ३९७  कालच्या चिंतनाचा विषय पुढे नेताना, असं म्हणता येईल की, याच भूतलावरील तत्वांप्रमाणे भूलोकांवरील सर्व लोकांना, त्यांच्या त्यांच्या ऊर्जा व शक्तीप्राप्तीसाठीच्या व्यवस्था, ईश्वरीय व्यवस्थेने निर्माण करून दिल्या आहेत. यातील देहधारी मानवाचं महत्व व कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण भूलोकांवरील बाकी सर्व लोकांतील, सर्व देहातीत व देहरहीत जिवात्मे हे मानवांच्या कर्माच्या आधीन आहेत.  म्हणजेच  देहप्राप्ती न झालेले आणि वरच्या लोकांत न गेलेले जीव, पुढील लोकांत जाईपर्यंत किंवा पुन्हा देह प्राप्त करेपर्यंत,   पितर योनीत वास्तव्य करून असतात. त्यांच्या दिनक्रमात, त्यांचा एक दिवस हा आपल्या एका वर्षासमान असतो. म्हणून वार्षिक एकदा केलेलं श्राद्ध व तर्पणकार्य त्यांना त्यांच्या, त्या योनीतील, सुस्थित संचारासाठी आवश्यक आहे.  त्यावरील लोकांतील, म्हणजेच देवलोकातील देव सुरवर व गण जे भगवंताच्या ब्रह्मांड श्रुष्टींबाहेर आहेत, पण जगाच्या सुरळीत संचलनाचा भाग आहेत, त्यांच्या ऊर्जा व शक्तीची व्यवस्था व गरज ही,मानवी धर्मकार्य, ईश्वर स्मरण, यज्ञयाग, नवविधा भक्ती यां...