भोग आणि ईश्वर ४२६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) कालच्या भागात पाहिलेला विषय पुढे नेऊया. संगतीचा एक भाग जो अपरिहार्यपणे आपल्यासोबत प्रारब्धाने, सचितातून येतो तो आपण काल जाणला. पण तो जाणूनही आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार वा आनंद किंवा दुःख करून काहीही उपयोग नाही. पण संगतीचाच दुसरा भाग जो आपल्या नियंत्रणात आहे किंवा असू शकतो, त्याचा आज विचार करूया. संगती जी आपल्याला आपल्या निवडीतून किंवा निर्णयाने ठरवता येऊ शकतो, त्यातील महत्वाचा घटक म्हणजे स्नेही, मित्रसंबंधी हा आहे. स्नेही वा मित्र यांचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक हितसंबंधी आणि हितशत्रू. मुळातच स्नेही वा मित्र या घटकाचं, आपल्या आयुष्या तील स्थान किती महत्वाचं आहे, हे आपण सर्वजण जाणतो. म्हणूनच यातून मनाला, बुद्धीला मिळणारी किंवा त्यामुळे वाया जाणारी ऊर्जा व शक्ती ही मिळवणं व घालवणं पूर्णपणे आपल्या हातात नसेलही. तरीही हितशत्रू व चुकीच्या मैत्रीला वा संबंधाना दूर ठेवून, आपण निदान होऊ शकणारा, ऊर्जा व शक्ती यांचा ऱ्हास, नक्कीच कमी करू शकतो. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट जी बरेचवेळ...