Skip to main content

नाम अवतार कलियुगी - ९

नाम अवतार कलियुगी - ९

गेल्या भागात आपण दोन परिणाम आणि त्यांची कारण- संगति यांची सांगड़ घालता येते हे पाहिल. पण यापुढे काही फल अशी असतात ज्यामधे फल वा परिणाम आणि त्यामागे असलेला कार्यकारण भाव अथवा त्याला कारणीभूत कर्म यांची सांगड घालण मुश्किल वा अशक्य असत,आणि इथेच
खरी मेख आहे.

कारणं माहित नसल्यामुळे मानव प्राणी अति विचारी, योग्य दिशा माहित नसल्यामुळे वा जगाच्या मायेच्या पदद्यामुळे असेल आणि आधीच्या दोन उदाहरणावरुन  असेल,पण जे समोर दिसत त्यावरून कार्यकारण भाव यांची संगति लावण्याची सवय जडलेली असते, म्हणून असेल, पण ज्या परिणामाची संगति जुळत नाही वा लावता येत नाही त्यावर विश्वास ठेवत नाही अथवा नशिब या गोष्टिवर विश्वास ठेवत नाही.

पण जिथे फायदा वा सकारात्मक परिणाम दिसतो तिथे या गोष्टीचा उपयोग करून नशिब , प्रारब्ध, या पेक्षा कर्म श्रेष्ठ मानतो. परंतु जिथे गोष्ट वा परिणाम नकारात्मक अथवा मनाविरुद्ध वा दुःखदायीं आणि क्लेशकारक असेल तेथे माणूस हे कस माझ्याच बाबत घडल या प्रश्नात गुंतून पडतो आणि खरा प्रश्न इथेच निर्माण होतो. कारण घड़लेली कोणतीही गोष्ट वा हाती आलेल कोणतेही फल हे कर्माचेच फलरूप आहे. जिथे आपल्याला संगति लावता येते तिथे आणि जिथे संगति लावता येत नाही तिथेसुद्धा. कारण गणितीय नियमात असलेली कर्मफल गति अपवाद करुच शकत नाही. गणित हे पूर्ण सिद्ध झालेल आणि नियमाबाहेर कधीही न जाणारं शास्त्र आहे.

एक उदाहरण घेऊन हा प्रश्न बघुया

तुमच शुभ कर्म हे सकारात्मक वा गणितातील अधिक चिन्ह आहे आणि अशुभ वा चुकीचे कर्म हे वजा चिन्ह आहे. गणितातील सोप्पा नियम अधिक चिन्हाकित संख्या जास्त असेल तर उत्तर अधिकच येणार याउलट वजा चिन्हाकित संख्या जास्त असेल तर अर्थातच उत्तर उणे वा वजा चिन्हाकितच असेल. इतकं सोप्प शास्त्र आहे, संख्याशास्त्र नियमावर आधारित कर्मफल सिद्धांताच.

त्यांमुळे जर आपण समस्याग्रस्त आहोत अथवा आयुष्याचा कठीण काळ चालू आहे त्याअर्थी आपण आपल्याच कर्माच्या वजा उत्तरात आहोत किंवा थोडक्यात निगेटिव काळात आहोत. आणि हे गणित सोड़वण्यासाठी फक्त कर्मफल गणित सुधारण गरजेच आहे. या व्यतिरिक्त सर्व शक्यता या पळवाटा आहेत, हे नककी.

आता यांच्या पुढे काय, कस हे चक्र बदलायच, काय करणं अपेक्षित आहे ते बघुया पुढील भागात

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१०/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...