Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १३

नाम अवतार कलियुगी - १३

निश्चय आणि इच्छा या एकत्र बद्ध झाल्या तर खुप छान कार्य कोणत्याही क्षेत्रात करू शकतात, पण.  हा पणच खुप महत्वाचा आहे. कारण हे दोन्ही कटिबद्ध होण्यासाठी तशी बुद्धि होण गरजेच आहे.  आता तुम्ही म्हणाल इच्छा झाली म्हणजे बुद्धि झालीच ना. तस असतच अस नाही. खुप वेळा इच्छा असते एखादी गोष्ट करण्याची पण बुद्धि नसेल तर कृति शून्य असते. या उलट एकदा बुद्धि झाली की कृति सुरु होण्यास वेळ लागत नाही. बुद्धि ही शारीरिक आहे आणि इच्छा मनाशी निगडित आहे. 

पण इथे एक मेख अशी आहे की जऱ ही इच्छा दृढ़ स्वरुपात परिवर्तित झाली तर ती बुद्धि पालटण्याचं महत्वाच कार्य करू शकते. म्हणजेच मुख्य भाग हा बुद्धि इच्छा आणि दृढ़ निश्चय यांचा संगम होण्याचा आहे.

भक्ति ही खरतर सर्वाचा कर्ताधर्ता भगवंत आणि भक्त यांचा विभक्त न होण्याचा संकल्प असतो. भक्ति ही नित्य, निरंतर, सत्व युक्त आणि सकारात्मक असते. या व्यतिरिक्त विपरीत जे जे विचार असतील ती वेगवेगळ्या स्वरूपातील वासना होय. वासना हा आपल्याच इच्छा आकांक्षा यांचा परिपाक असतो. म्हणजेच एक प्रकारे आपणच आपली गाड़ी  चुकीच्या मार्गाने नेलेली असते, रस्ता चुकला म्हणून ध्येय चुकत , नन्तर या साखळीचा न संपणारा खेळ अखंड जन्मोजन्मी चालू होतो. यातूनच पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र चालू होत.

या अव्याहत चालणाऱ्या चक्रात भरकटणारा जीव मग यात इतका गुंतून जातो की ध्येय काय होत ह्याचा पूर्ण विसर होतो. किंबहुना जे घडतय त्यातून बाहेर येण्याची बुद्धि होऊच शकत नाही इतका तो संसार चक्रात पूर्ण अडकतो. इथेच आसक्तिचा सक्तिचा खेळ सुरु होतो. हव नको, सत्य असत्य, पाप पुण्य, इच्छा वासना, जन्म मृत्यु, यात पूर्ण हरवून जातो. बर यात कर्मफल असा संबंध अनेक जन्मांचा असल्यामुळे या जन्मी कोणतेही पाप वा दुष्कृत्य न केलेला जीव सुद्धा भरडताना दिसतो ,या उलट एखादा पापी दुरात्मा सुखोपभोग सुखेनैव घेताना दिसतो.  हे अद्भुत कोड पडत तेंव्हा जीवाचा सर्व खेळ मुख्यतः विचारधारा चूकते आणि इथेच पुढचा प्रवास सुद्धा . 

. कस ते पाहुया पुढील भागात. 

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा 

श्री गुरुवे नमः 

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१४/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...