नाम अवतार कलियुगी - १३
निश्चय आणि इच्छा या एकत्र बद्ध झाल्या तर खुप छान कार्य कोणत्याही क्षेत्रात करू शकतात, पण. हा पणच खुप महत्वाचा आहे. कारण हे दोन्ही कटिबद्ध होण्यासाठी तशी बुद्धि होण गरजेच आहे. आता तुम्ही म्हणाल इच्छा झाली म्हणजे बुद्धि झालीच ना. तस असतच अस नाही. खुप वेळा इच्छा असते एखादी गोष्ट करण्याची पण बुद्धि नसेल तर कृति शून्य असते. या उलट एकदा बुद्धि झाली की कृति सुरु होण्यास वेळ लागत नाही. बुद्धि ही शारीरिक आहे आणि इच्छा मनाशी निगडित आहे.
पण इथे एक मेख अशी आहे की जऱ ही इच्छा दृढ़ स्वरुपात परिवर्तित झाली तर ती बुद्धि पालटण्याचं महत्वाच कार्य करू शकते. म्हणजेच मुख्य भाग हा बुद्धि इच्छा आणि दृढ़ निश्चय यांचा संगम होण्याचा आहे.
भक्ति ही खरतर सर्वाचा कर्ताधर्ता भगवंत आणि भक्त यांचा विभक्त न होण्याचा संकल्प असतो. भक्ति ही नित्य, निरंतर, सत्व युक्त आणि सकारात्मक असते. या व्यतिरिक्त विपरीत जे जे विचार असतील ती वेगवेगळ्या स्वरूपातील वासना होय. वासना हा आपल्याच इच्छा आकांक्षा यांचा परिपाक असतो. म्हणजेच एक प्रकारे आपणच आपली गाड़ी चुकीच्या मार्गाने नेलेली असते, रस्ता चुकला म्हणून ध्येय चुकत , नन्तर या साखळीचा न संपणारा खेळ अखंड जन्मोजन्मी चालू होतो. यातूनच पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र चालू होत.
या अव्याहत चालणाऱ्या चक्रात भरकटणारा जीव मग यात इतका गुंतून जातो की ध्येय काय होत ह्याचा पूर्ण विसर होतो. किंबहुना जे घडतय त्यातून बाहेर येण्याची बुद्धि होऊच शकत नाही इतका तो संसार चक्रात पूर्ण अडकतो. इथेच आसक्तिचा सक्तिचा खेळ सुरु होतो. हव नको, सत्य असत्य, पाप पुण्य, इच्छा वासना, जन्म मृत्यु, यात पूर्ण हरवून जातो. बर यात कर्मफल असा संबंध अनेक जन्मांचा असल्यामुळे या जन्मी कोणतेही पाप वा दुष्कृत्य न केलेला जीव सुद्धा भरडताना दिसतो ,या उलट एखादा पापी दुरात्मा सुखोपभोग सुखेनैव घेताना दिसतो. हे अद्भुत कोड पडत तेंव्हा जीवाचा सर्व खेळ मुख्यतः विचारधारा चूकते आणि इथेच पुढचा प्रवास सुद्धा .
. कस ते पाहुया पुढील भागात.
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१४/१०/२०१७
Comments
Post a Comment