Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १०

नाम अवतार कलियुगी - १०

आता हे गणितीय सिद्धांत पाहिल्यावर एक गोष्ट पटली असेल की हे सर्व जग काही विशिष्ट नियमावर आधारित आहे. हे नियम सर्वानाच सारखे आहेत. म्हणजे असणारच. म्हणून कर्मसिद्धांतानुसार जे समोर आले ते भोगणे हे क्रमप्राप्त आहे. नव्हे तेच  श्रेयस्कर आहे.

पण मग हे चक्रनेमिक्रमेण चालणार आणि आज केलेल्या कर्माचे फल उद्या वा भविष्यात कधीतरी भोगावे लागणार हे निश्चित. ह्या कालचक्राला भेद वा छेद करणे शक्यच नाही असे दिसते. कारण आज भोगतोय ते फल पूर्वीचे कधीतरी केलेले  आणि ज्याची संगति लागत नाही व साठलेले कर्म किति आहे,  हे ईश्वराला माहित.  म्हणजे नक्की किति हिशोब बाकीं आहे हे मानवाला कधीही कळणार नाही.

अनेकानेक जन्म,  साठलेल्या कर्माचा हिशोब लावण्यात खर्ची जातात, आणि तो हिशोब पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुढचे कर्म फल देण्यासाठी तयार असते. याचे कारण असेकि कोणतेही कर्म है आपले फल दिल्याशिवाय शांत बसत नाही , पण त्याची विशिष्ट वेळ आल्याशिवाय समोर येत देखिल नाही., मग हेच करायचे तर अनेक मानवी जन्म नककीच जातील आणि हाती कोरी पाटी कधीच येणार नाही.

मग यावरचा सोप्पा उपाय, कर्म न करणे. पण सूक्ष्म दृष्टया पाहता असे लक्षात येईल की काहीही न करणे हे सुद्धा एक कर्मच आहे आणि त्याचाही परिणाम भोगावाच लागेल. अस मानल जात की माणूस एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना आधीच्या जन्माचा हिशोब बरोबर घेऊन जातो. पुढील जन्मी त्याच्या कर्माचा हिशोब त्याच्या DNA साख़ळीत लिहिलेला असतो आणि त्यानुसार त्याची मार्गक्रमणा या जन्मात होत असते.

आता येथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की जर या जगात आलेला जीव फक्त कर्म फल कर्म फल यांच् साख़ळीत अडकायच आहे तर मग जीवन जगण्याच प्रयोजन काय आणि पहिल्या भागात बघितल्या पाहिल्या प्रमाणे विधात्याने
सृष्टि व्यवस्था निर्माण केली आणि तिला नियमात बांधल त्यामागे काय अपेक्षा आहेत विधात्याच्या. पाहुया पुढील भागात

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
११/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...