Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १५

नाम अवतार कलियुगी - १५

तीन दिवस प्रकृति ठिक नसल्यामुळे खंड पडला त्याबद्दल क्षमस्व. आज पुढे सुरु करू

मुळात एखादी गोष्ट मिळवण म्हणजेच साधण. एखाद्या गोष्टीचा योग साधण असही म्हटल जात. म्हणजेच काही विशिष्ट हेतु धरून परिश्रम करणे म्हणजेच योग साधणे.
पण साध्य म्हणजे उद्देश्य हे पूर्णपणे हितोपयोगी असेल म्हणजेच सकारात्मक असेल तरच त्या यत्नाना योग म्हटल जात. योग म्हणजे चांगल्या उद्देशाने योग्य मार्गानी व नियमित, आणि नियमात राहून केलेले प्रयास.

असेच योग्य मार्गाने साध्य साधण्यासाठी योगयुक्त प्रयत्न वा प्रयास म्हणजेच साधना.

साधना ही अनेक अंगानी केली जाते आणि त्यासाठी योगाचे म्हणजेच योग्य पद्धतिचे असलेले आठ  मार्ग म्हणजेच  अष्टांग योग. परमेश्वराची , परम् आत्म्याची परम् तत्वाची , परम् सुखाची, सत  चित स्वरूपाची प्राप्ती करण्याचे असलेले मार्ग मुख्यातः नऊ भागात मोडतात. त्यालाच नवविधा भक्ति म्हणतात.

आपल्या आपल्या शक्तिनुसार , वेळेनुसार जमेल त्या मार्गाचा अवलंब करून भक्तियुक्त प्रयास करून अंतिम उद्देश्याप्रत पोचणे म्हणजे साधना.

मूळ प्रश्न असा आहे की हया सर्वाची गरज काय आणि रोजच्या संसाराच्या मार्गात या सर्वाची जरूरत काय आहे. आपण जन्मलो, काही कर्म केलीआयुष्यात, आणि अंति वेळ आली की मान्य असो वा नसो पण इथून निघुनपुढे जाण. पुढे कुठे जायचय, काय करायचय, नक्की पुढे आहेच का काही, की सर्व कल्पना आहे. या सर्व साधनेचा आटापिटा कशासाठी. पुढे काय आहे माहित नाही, मग का करायच हे सर्व.

असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. बघुया काही उत्तर आहेत का, मिळतायत का .  पुढील भागात

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१९/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...