Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १७

नाम अवतार कलियुगी - १७

जस राजा बदलला की राज्यतंत्र बदलत,अगदी द्वारपाल सुद्धा बदलतो. इथे तर शत्रुच स्थानच बदललय. म्हणजे त्याप्रमाणे
नियम व नियमन दोन्ही वेगळ असल पाहिजे. अजुन एक भेद म्हणजे शत्रुला मारण हे अशक्य आहे कारण तो स्वतःतच वस्ती करून आहे. म्हणजे स्वहत्या हाच उपाय की काय. पण या स्वाहत्येचा विस्तृत अर्थ पुढील भागात पाहुच.

पण सांगण्याचा उद्देश हाच की शत्रु सूक्ष्म रुपात नसानसातून , धमन्यातून, अंतरातून वाहतोय. तो सहा रुपातच आहे पूर्वीच्या, पण तो परकायेत नसून आतच ठाण मांडून आहे. जी बीज आधीच्या कित्येक जन्मात आपणच पेरलित ती अनेक जन्मातुन फलित होऊन आता कलियुगी समोर ठाकलीत.  असाच संदेश या युगाचा आहे. म्हणजेच आपलच युद्ध आपल्याशीच आहे.

आता या शत्रुची रूप सहा आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर . आणि वेगवेगळ्या परिस्थितीत ति समोर येऊन आपल काम चोख करून जातायत. त्याच्या छटा अनेक, रंग अनेक, आणि मार्ग अनेक. पण मुख्य उद्देश्य मायेचा पाश आवळून जीव या जगात गुंतवून ठेवायचा म्हणजेच जन्म मरण फेरयातून सुटु द्यायचा नाही.  बर कर्मगतिच्या साखळीत आधी आहेच अडकलेलो, त्यातूनी सुटण्याचा मार्ग शोधावा तर हे अजुन अडकवतात आपल्याला.

यावर उपाय नाहीच का असा प्रश्न असेल पडला, तर एक ध्यानात ठेवा, गणितात प्रत्येक प्रश्नाला जस उत्तर असतच त्याप्रमाणे, इथेहि उत्तर आहे आणि ते खुप मोठे मोठे विद्वान गणितज्ञ सोडवून गेलेत. सूक्ष्म शत्रुचा विनाश वा बिमोड करण्यासाठी तसच सूक्ष्म शस्त्र जे अनेक संत , महंत, सांगून, आचरुन आणि सिद्ध करून गेलेत ते म्हणजे नामस्मरण.

या युगातून तरून जाण्यासाठी, प्रत्यक्ष परम ईश्वराला सुद्धा अवतार घेण दुरापास्त आहे. तिथे आपली काय गत. पण अनेक संत सज्जनानी ज्या मार्गानी स्वतः बरोबर जगाच्या कल्याणाचा विचार करून आणि या युगात सर्वश्रेष्ठ अस अस्त्र भारतवर्षात सिद्ध करून दाखवल असेल तर ते नामस्मरण आहे. आणि हाच कलियुगातील ईश्वरी अवतार आहे. सूक्ष्म रुपात, सूक्ष्म देह धारण करून, सूक्ष्मपणे आपल काम करणारा, व इप्सित हेतु शांतपणे साध्य करणारा, हाच तो नाम अवतार कलियुगी

नाम माहात्म्य माझ्या गुरुंच्या श्रीब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रेरणेने आणि आज पर्यन्त त्यानी केलेल्या कृपेने जे लिहिल त्याचाच मुख्य भाग आता उद्याच्या भागात. मी आजपर्यंत या विषयात जे जे लिहिल ते तुम्ही वाचून, वेचुन ग्रहण केलत त्याबद्दल मी कृपाभिलाषी आहे. आता यांच नामरूपी शस्त्राच महत्व विषद करीन पुढील भागात.

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२१/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...