Skip to main content

अध्यात्म विराम १५९

अध्यात्म विराम १५९

काल आपण वाचलेल्या कथेवर आधी चिंतन करूया आणि त्यानंतर विषय पुढे नेऊया. कालच्या कथेचा मुख्य गाभा होता की, नामाच्या क्षणिक उच्चाराने, त्या गृहस्थाला इतकी पुण्य प्राप्ती होते की, त्याची पापं शिल्लक असूनही, त्याच्या त्या पूण्यायीच्या जोरावर, त्या पुण्याचं मोल चुकेपर्यंत तो गृहस्थ कैलासावर राहील. यातील मुख्य गाभा म्हणजे, हरी नामाने प्राप्त होणारं पुण्य हे, अनेक पापांना बाजूस सारून, इहलोकातून स्वर्गलोकात घेऊन जातं. म्हणजे क्षणिक पुण्याचं जे मोल, माऊलींनी सांगितल आहे, त्याचा हा मतितार्थ आहे आता त्याचा गुह्यार्थ जाणून घेऊ, म्हणजे मुद्दा पूर्ण ध्यानात येईल. 

काही क्षण किंवा एक क्षण जरी आपण देवाच्या दारी उभं राहिलो तरी त्यातून चारी मुक्ती साध्य होतात, असं माऊलींनी म्हटलंय. माऊली म्हणजे साक्षात श्रीकृष्ण अवतार. त्यामुळे त्यांचं वचन मिथ्या असूच शकत नाही. पण त्यांना यातून नक्की काय सुचवायचं आहे, याचा आता शोध घेऊया. मुळात देवाचं दार म्हणजे काय, हे पाहू. प्रत्येक हृदयात आत्मा आहे आणि त्यामधे ईश्वराचं अस्तित्व अंशरुपात आहे.या अंशाचा पूर्णावतार करण्याचं कार्य करण्यासाठी देहप्राप्ती आहे, हे मुख्य गुह्य आहे आता या देहातील वासना, ज्या आतील ईश्वराला व्यापून टाकतात, या प्रापंचिक, असुरी आणि ईश्वरी अश्या तीन प्रकारच्या असतात. यातील प्रापंचिक वासना या मध्यम प्रकारात येतात. म्हणजे त्यातून सुख आणि दुःखं या दोन्हींचा लाभ होतो. अर्थात कर्म जसं असेल त्यानुसार प्राप्ती होते.  

म्हणजे विवाह केल्यानंतर, संयुक्त भोग व उपभोग योग येतात आणि सहसा ते संयुक्तपणे भोगावे व उपभोगावे लागतात किंवा मिळतात. त्यांची फलनिष्पत्ती, दोघांचे योग संयुक्तपणे एकत्रित, त्यांच्या संचीतानुसार असतील, त्याप्रमाणे व तितका काळ ते संयुक्त भोगावे लागतात. याचा अर्थ प्रपंचात आपलं प्रारब्ध आपल्या कर्माने चालतं आणि ते समिश्र असतं. पण एखाद्याच्या योगाने मला हे भोगावं लागतंय, असं म्हणण हे सर्वस्वी चूक आहे. तो योग संयुक्त होता म्हणूनच घडून आला. इतका सहज सोपा सिद्धांत ध्यानात घेतला की, बरचसे गैरसमज आणि मानसिक त्रास दूर होऊ शकतो. अर्थात विवाहा आधी किंवा एकट्याने सुद्धा अनेक भोग व उपभोग येतात. 

अर्थात जगण्याच्या वाटेवर, प्रपंच हा आपसूक आपल्या वाट्यास येतो. पण या उदाहरणात सांगितल्यानुसार फक्त वैवाहिक संसार म्हणजे प्रपंच नाही. तर या जगतात व देहात जन्माला येणं, म्हणजेच प्रपंच करणं असा या शब्दाचा अर्थ आहे, अशी खूप मोठी या व्यापक व्याख्या प्रपंच या शब्दाची आहे. आता या देहात आल्यानंतर, माया पाठी लागल्यावर आणि प्रारब्ध, सद्य कर्म यांची साखळी सुरूच असल्यानंतर येणाऱ्या वासना, या प्रपंचाचा भाग होऊन जातात. फक्त त्यामध्ये किंवा त्या प्रवाहात किंवा त्यांच्या नादात आपण अशी काही कर्म करत नाही ना, जी पापाला किंवा दुःखाला आमंत्रित करतात याची काळजी, प्रत्येकाला घेतली पाहिजे. 

अन्यथा ज्या वासना, पापाला, चुकीच्या मार्गाला घेऊन जातात त्यांनाच असुरी वासना म्हणतात. म्हणजे देहाचा प्रपंच करताना, आपण कळत वा नकळत, अशी काही कर्म करत नाही ना, की जी इतिकर्तव्यता व धर्माचा भाग नाहीत आणि जी पापाला पाचारण करत आहेत, अश्या कर्माच्या वासना, या असुरी वासना म्हणून समजल्या जातात. त्यांच्या योगे जीव, अतीव दुःख,ताप, दैन्य, नरक यातना यांचा धनी होतो. अर्थात ते दुःख ज्यावेळी, याचं जन्मात प्राप्त होतं, त्यावेळी माणूस, स्वतःला समजावू शकतो, की या कर्माने हा योग प्राप्त झाला आहे.

पण ज्यावेळी अशी गती, पुढील जन्मात प्राप्त होते, त्यावेळी, त्या देहात असलेला माणूस, चक्रावून जातो की, मी या जन्मात कोणतंही पाप कर्म केलेलं नसताना सुद्धा, मी हे भोग भोगत आहे, या यातनांमधून जात आहे. पण आत्म्याचा प्रवास हा सलग व अविरत असतो आणि प्रत्येक मिळणारा देह, हे त्या आत्म्याच्या प्रवासातील एक एक स्थानक आहे. पण मुख्य समस्या, तो देहच प्राधान्य होऊन बसतो आणि आत्मा पाठीशी राहतो. पण आत्मा अविनाशी आणि चैतन्यमय असल्यामुळे, तो अनेक देहात फिरतो. पण फिरताना, कर्मगतीचा फेरा सोबत घेऊनच फिरतो. 

हाच मुद्दा उद्याच्या भागात पुढे नेऊन असुरी व ईश्वरी वासना यांच्यावर सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...