Skip to main content

अध्यात्म विराम १६१

अध्यात्म विराम १६१

भाग क्रमांक १६० वरून पुढे सुरू करूया. मधल्या एक आठवड्याच्या काळात मला बर नसल्यामुळे, लेखन तात्पुरतं बंद ठेवावं लागलं. तरी त्याबद्दल मी वाचकांचा ऋणी आहे. पण महाराज कृपेने ते पुन्हा सुरू करत आहोत. 

मुळातच मानवाच्या ठायी आत्मा किंवा अंतरात्मा या रुपात आणि पुन्हा मन या स्वरूपात ईश्वर आहे. गीतेतील सूत्रानुसार मन आणि आत्मा या, ईश्वरी अधिष्ठान प्राप्त गोष्टी आहेत. पण देह व बुद्धी ह्या, या भुलोकी प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या अत्यंत जरुरीच्या आहेत. कारण या दोन गोष्टींशिवाय भुलोक ते परलोक किंवा वैकुठधाम हे अंतर मार्गक्रमण करणं अशक्य आहे. कारण आत्मा कोणत्याही पंचमहाभूतरूप साधनां शिवाय स्वतःच्या स्वतः काहीही करू शकत नाही. तशी ईश्वरी व्यवस्थाच आहे त्यामुळे मोक्ष, मुक्ती या गोष्टी प्राप्त करणं किंबहुना त्यासाठी विचार, साधन कर्म करणं हे देहाशिवाय अशक्य आहे. 

पण आत्मा व मन देहात स्थापित झाला की, आत्मा व मन हे, जडदेहामुळे बुद्धी, माया व अनेक प्रकारच्या प्रापंचिक बंधनात अडकून मूळ उद्देशाला पूर्ण विसरून, या जगताचा एक भाग होऊन जातात. त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म व मरण या चक्राला टाळू शकत नाहीत. ते टाळण्यासाठी आवश्यक ईश्वरी वासना व इच्छा यांची मोहिनी जीवाला जडावी लागते. पण देह व बुद्धी याना सर्वात जास्त मोहिनी, या जगतातील वासना, कामना, मोह, लोभ, इत्यादी गोष्टींची जडते. अनेकदा या चक्रात माणूस इतका गुरफटून जातो की, शेवटच्या काही दिवसात सुद्धा आत्म्याला जागृती येत नाही किंवा येऊ शकत नाही 

मी माझ्या देहाच्या माध्यमातून भुलोकीचं वैभव, माया, आदर सत्कार, मान मरातब, इस्टेट, हे सर्व किती जमा केलं, याचच कौतुक, जीव शेवटच्या दिवसात सुद्धा करतो. ते उत्तम कमावलं असेल तर स्वतःला धन्य समजतो आणि ज्यांनी हे प्राप्त केलं नाही, त्यांना तुच्छ लेखतो. या उलट परिस्थिती दारिद्र्यात, दुःखात, क्लेशात व दैन्यात आयुष्य काढलेली व्यक्ती, आयुष्याच्या शेवटच्या दिवसात, स्वतःला अत्यंत दुर्दैवी समजून आपल्याला दोष देते. त्याच्या मते त्याने आयुष्य पूर्ण वाया घालवलं असून, त्याने कोणताही मान मरातब, पैसा अडका जमा न करून, खूप मोठी हानी करून घेतली आहे. 

या अश्या विचित्र कात्रीत असलेल्या दोन्ही प्रकारच्या लोकांचा आपण विचार करूया. ऐश्वर्यात असलेला किंवा आयुष्यभर पैसे जमवून श्रीमंत झालेला मनुष्य, नेहमी एका भ्रमात असतो की, या जगाच्या व्यापात उत्तम आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे, ते म्हणजे पैसा आणि त्याने तो अत्यंत हुशारीने आणि व्यावसायिक तडजोडी करून चाणाक्षपणे कमावला आहे. 

त्यासाठी त्याने अनेक त्याग केले आहेत. अर्थातच कर्माच्या न्यायाने, त्या सर्व कर्मांच उत्तम फल किंवा सुयोग्य फल त्याला प्राप्त झालेलं आहे. अर्थात जदडेहाची वासना, त्यासाठीच कर्म व त्याप्रमाणे फल, असं हे चक्र आहे. 

एकप्रकारे विचार केला तर, देह, बुद्धी व ऐहिक सुखाच्या दृष्टीने त्याने उत्तम साधनांची जोडणी करून, देहाचे उत्तम साध्य प्राप्त केलेलं आहे. त्याचा लाभ देहाच्या उत्तमोत्तम सुखसोयी, ऐश आराम, सुविधा, त्याने मिळवल्या आहेत, यात दुमत असायचे कारण नाही. पण यामधे अनेक चुकीची कर्म, फक्त देह श्रेष्ठ मानून त्यासाठी केलेले हव्यास, व्याप हे सर्व अनेक प्रकारच्या चुकीच्या कर्मगतींना घेऊन येणारच. जर त्याचा त्रास या जन्मात झाला नाही, तर नक्की समजा की पुढील जन्मात, कदाचित जन्मा पासून त्याची सुरुवात होऊ शकते. 

कारण कोणतंही चांगलं किंवा वाईट, योग्य किंवा अयोग्य कर्म हे आपल्यासह फल घेऊन येणारच. ही गती अगदी देवांनासुद्धा चुकलेली नाही. या कर्मात एक कर्म, नकळत अजून जोडलं जातं, ते म्हणजे आपल्या प्रमाणे न वागून, उत्तम धन, ऐश्वर्य प्राप्त न करू शकलेल्या किंवा प्राप्त न केलेल्या लोकांबद्दल तुच्छ किंवा हीन भाव मनात असणं, हे अजून एक मोठं पाप कर्म अशी व्यक्ती, आपल्या संचीतात जोडत असते. याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्ती, आपल संचित आणि सद्य कर्म यांच्या फलाने बद्ध असते आणि ती त्यानुसारच गती प्राप्त करते. 

त्यामुळे तुझ्या संचीतातील फळानुसार तू जे प्राप्त करू शकलास, तेच किंवा त्याचप्रकारचं दुसऱ्याला मिळेल, हे अशक्य. पण म्हणून तो कोणत्याही प्रकारे हीन किंवा तुच्छ होऊ शकत नाही. याचं विषयाला उद्याच्या भागात पुढे नेऊया आणि आज इथेच थांबुया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...