Skip to main content

मुठ वळण्यातील व्यथा !!

मुठ वळण्यातील व्यथा !! 

गेल्या काही दिवसात हा शब्द सारखा कानावर येतोय आणि त्यामुळे उगाचच काहीतरी वेगवेगळे अर्थ आणि गैरसमज निर्माण होतात. त्यात सुद्धा इंद्राच्या अस्त्राचा उपयोग करून अशी मूठ तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, हे कदाचित इंद्राला सुद्धा माहीत नसेल. पण देवेंद्राला मात्र माहित आहे आणि अनाथांचा नाथ असलेल्या एकनाथांनाही माहित आहे. आता अशी मूठ वळण्यात आणि ती अजेय अर्थात जिंकण्या योग्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

साधारण दोन एक आठवड्यापूर्वी सुद्धा अशीच एक मूठ वळण्यात आली तेव्हा ती आतूनच सैल करण्यात आली. आतून म्हणजे त्यातील बोटांपैकी एकाने नुसता हलका संदेश दिला त्याबरोबर, इकडची सेना चांदीच्या ओक वृक्षाच्या शीतल छायेत जाऊन आली. असो आता पुन्हा हा एक प्रयत्न बर का. ही मूठ तीन बोटांची, पाच बोटांची की काय, हे देखील हाताला अजून माहित नाहीये. 

म्हणजे त्या मुठीत हाताचा सहभाग आहे की नाही की कसं, तेही अजून निश्चित नाही. हातावरच्या घड्याळाचं काही वेगळंच समीकरण चालू आहे आणि अशी मूठ वळली गेल्यानंतर, त्यात धरणार काय तर मशाल. त्यामुळे जोपर्यंत घड्याळ घातलेल्या हाताचा घट्ट मूठ करण्याचा विचार पक्का होत नाही, तोपर्यंत देवेंद्र अजितमय झाला नाही म्हणजे मिळवलं 

कारण त्या मुठीतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ काका, यांना स्व कियांनाच गारद करण्याचा जास्त अनुभव आहे आणि दुसरे राष्ट्रीय स्तरावर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही मूठ किती घट्ट असेल, हे तर त्या पाच बोटांनाच माहिती. त्यातही मशाल अनेक कायदेशीर अडीअडचणींमध्ये सापडण्याची दाट शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत ही मूठ खरंच इंद्राच्या अस्त्राच्या ताकदीची होईल का, ही पण एक दीर्घ शंका आहेच. 

बर यातील दुसऱ्या एका पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःच कायद्याने बाद केलेले आहेत आणि दुसऱ्यांकडे असलेले वजीर देवेंद्रांकडे नजर लावून बसले बसलेले आहेत. त्यामुळे अशा स्थितीत मुळातच त्या मुठीत बळ येणार कुठून आणि बळच नसेल तर अशी मूठ शक्तिमान होणार कुठून.असा एक प्रश्न निर्माण होत आहे.

त्यातही सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत जर निर्णय अनाथांच्या नाथांच्या बाजूने लागला तर, वळलेली मूठ लगेचच सैल होण्याची शक्यता अधिक आहे.त्यातही इंद्रदेवाच्या बुद्धिमत्तेपुढे,भलेभले पैलवानही आखाड्यात हारत आहेत. त्यामुळे अजून एखादा मोठा धोबीपछाड मारला जाण्याची चिन्हच, जास्त दिसत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वळली जाणारी मूठ, ही अभेद्य न राहता, लगेचच सेल होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता मजबूत मजबूत म्हणून म्हटली गेलेली आणि वळली गेलेली मूठ पुन्हा लगेच सैल होईल, अशी भीती सध्या तरी दिसत आहे 

कदाचित ही पडद्यामागील भीती उगाचच पडद्यावर येऊ नये म्हणूनही या मुठीची भीती, समोरच्याला दाखवली जात असल्याची शक्यता जास्त आहे. तिसरं म्हणजे यदाकदाचित सर्वोच्च न्यायालयात निकाल अनाथांच्या नाथाला मिळाल्यास व त्या निकालावर कोणी निवडणूक आयोगा वर केलेल्या शेरेबाजी प्रमाणे शेरेबाजी केल्यास, काकांना नाहक बदनामीला सामोरं जावं लागेल. किंवा त्यांना अशी कोणतीही शेरेबाजी, केली जाऊ नये, यासाठी आधीच तजवीज करून ठेवावी लागेल. 

म्हणूनच ही मूठ वळता वळता सैल होण्याची शक्यता आजतरी जास्त दिसत आहे. बाकी सर्व बघायला देवेंद्र समर्थ आहे, हे नक्कीच. 

बघुया निकालावर बरच काही अवलंबून आहे. 

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१६/१०/२०२३

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...