गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
गीत : म पां भावे
संगीत : अनिल अरुण
स्वर : आशाताई
या गाण्याने खरतर मला खूप वर्षांपासून मोहिनी घातली आहे. यातील शब्दांची अवर्णनीय आर्तता, त्याला त्याचं समर्पक चालीत बांधलेलं, मराठीतील अत्यंत बुद्धिमान जोडी अनिल अरुण यांचं संगीत आणि गीताचे, विरह, कधीकाळी केलेली प्रीत आणि त्यायोगे आता आलेला विरही उन्हाळा आपल्या भाव विभोर करणाऱ्या स्वरात बांधणाऱ्या अद्भुत आशाताई.
शब्दांची जादू इतकी मनोहारी आणि चित्त आकर्षित करणारी आणि मनाला बांधून ठेवणारी आहे की, अनेक वर्ष, किंबहुना हे विश्लेषण लिहीपर्यंत, हे गीत चि त्र्यं खानोलकर अर्थात आरती प्रभू यांचं आहे, असाच माझा समज होता. पण या विश्लेषणा साठी माहिती घेताना कळलं की, हे कल्पनातीत शब्द म पां भावे यांचे आहेत. गीतातील विरह आणि त्यातील हळूवार शब्द हे एका विरही स्त्रीचे आहेत, याची जाणीव करून देतात.
आयुष्यात एखाद्यावर अमाप प्रेम लुटावं आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं असं भाग्य लाभलं की, त्या प्रेमाला परिपूर्णता येते. म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम केलं, त्याच्याकडे प्रेम व्यक्त करता आलं आणि त्याने ते स्वीकारून, आपल्याला त्याच्या सहवासाचं भाग्य प्राप्त करून दिलं की, एक तृप्तता मिळते आणि त्या तिथून सुरू होणाऱ्या आयुष्याला एक वेगळीच श्रावणाची किनार लाभते. खरतर हे गीत लिहिलं तो काळ अश्या हळूवार प्रेमाचा, त्या प्रेमाच्या गोडव्याचा आणि त्यातील अपयशातून आलेल्या विरही आयुष्याचा भावतरंगी तरलता, जगण्याचा काळ होता.
एका ठराविक वयात, मनातील भाव उमलून येतात आणि आजपर्यंत जगलेलं आयुष्य अचानक मयूरपंखी, तरल, प्रेमाच्या अलौकिक तरंगांना मनात जागृत करून, आजपर्यंत निद्रिस्त असलेली ही प्रेममय जाणिवांची केंद्रं उद्दिपित करणारं वय. या वयात कधी एखाद्या घटनेने, वाक्याने, दृष्टिक्षेपाने किंवा क्षणिक नजरा नजर झाल्याने, कोण कधी मन घेऊन जाईल, याची काहीही शाश्वती नसलेलं हे वय. कदाचित तीच व्यक्ती, तोच माणूस वा मुलगा जो आजपर्यंत कधीही आवडला नसावा तो अचानक आवडायला लागणारं वय.
अश्या तरलतम आणि मुलायम भावविश्वात आवडलेली एखादी व्यक्ती वेड लावून जाते. आपल्या भावविश्वाचा प्राण होते, सर्वस्व वाटायला लागते. पण त्या हळूवार भावना जाणवून, त्या भावना, त्या व्यक्तीपर्यंत पोचवयच्या कश्या, हा सुद्धा एक प्रश्नच पडतो. विशेषतः त्या काळात जेंव्हा अशी संवादाची, संपर्काची कोणतीही साधनं नव्हती. आवडलेली व्यक्ती परत कुठे कधी दिसेल, हे ईश्वरच जाणो. पण अश्या आवडलेल्या व्यक्तीला कदाचित भाव पोचले, बंधं जुळले तर मन, अश्या स्वर्गीय आनंदात, सुखात, कल्पनेत रममाण होतं की, तो भाव अकल्पनीय आहे.
पण असे भाव पोचण्याच्या मधल्या काळात, प्रीती आपल्या मनात फुलली आहे. नवनवीन कल्पना साद घालत आहेत, सुखाच्या स्वप्नांची पाखरं मनात रुंजी घालत आहेत.पण ती भेट, तो धागा जुळणार की नाही हे मात्र अजून माहीत नाही. पण वेड मन मात्र, स्वप्नात अनेक प्रकारच्या कळ्या जोपासत बसलेलं असतं. त्या मनातल्या स्वप्नील कळ्याच मनाला एक वेगळं व्यसन लावतात. विरह आणि विरहाची आग पाहण्याचं आणि भेटीच्या सुखेनैव कल्पनांचे बिछाने अंथरण्याचं, हे व्यसन, त्या सुवर्णकाळातील एक सुखदानुभूती असते.
त्यामुळे आपलच वेड मन आपल्याच मनाला समजावतं की, हे स्वप्नील कळ्यानो तुमच्या या विरह, पुन्हा भेटीची ओढ की विरह अश्या या अपुर्णतेच्या बांधावर झुलणाऱ्या मनाला इथेच जरा विसावा घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही कधीच उमलू नका. या विरही आगीची आणि भेटीच्या ओढीची ही अपूर्णता वेड लावून उभी आहे, तोपर्यंत तरी तुम्ही उमलू नका. असा आर्जव मन या प्रेमात बुडालेल्या मनाला करत आहे.
क्रमशः .......
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०४/२०२३
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
गीत : म पां भावे
संगीत : अनिल अरुण
स्वर : आशाताई
या गाण्याने खरतर मला खूप वर्षांपासून मोहिनी घातली आहे. यातील शब्दांची अवर्णनीय आर्तता, त्याला त्याचं समर्पक चालीत बांधलेलं, मराठीतील अत्यंत बुद्धिमान जोडी अनिल अरुण यांचं संगीत आणि गीताचे, विरह, कधीकाळी केलेली प्रीत आणि त्यायोगे आता आलेला विरही उन्हाळा आपल्या भाव विभोर करणाऱ्या स्वरात बांधणाऱ्या अद्भुत आशाताई.
शब्दांची जादू इतकी मनोहारी आणि चित्त आकर्षित करणारी आणि मनाला बांधून ठेवणारी आहे की, अनेक वर्ष, किंबहुना हे विश्लेषण लिहीपर्यंत, हे गीत चि त्र्यं खानोलकर अर्थात आरती प्रभू यांचं आहे, असाच माझा समज होता. पण या विश्लेषणा साठी माहिती घेताना कळलं की, हे कल्पनातीत शब्द म पां भावे यांचे आहेत. गीतातील विरह आणि त्यातील हळूवार शब्द हे एका विरही स्त्रीचे आहेत, याची जाणीव करून देतात.
आयुष्यात एखाद्यावर अमाप प्रेम लुटावं आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं असं भाग्य लाभलं की, त्या प्रेमाला परिपूर्णता येते. म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम केलं, त्याच्याकडे प्रेम व्यक्त करता आलं आणि त्याने ते स्वीकारून, आपल्याला त्याच्या सहवासाचं भाग्य प्राप्त करून दिलं की, एक तृप्तता मिळते आणि त्या तिथून सुरू होणाऱ्या आयुष्याला एक वेगळीच श्रावणाची किनार लाभते. खरतर हे गीत लिहिलं तो काळ अश्या हळूवार प्रेमाचा, त्या प्रेमाच्या गोडव्याचा आणि त्यातील अपयशातून आलेल्या विरही आयुष्याचा भावतरंगी तरलता, जगण्याचा काळ होता.
एका ठराविक वयात, मनातील भाव उमलून येतात आणि आजपर्यंत जगलेलं आयुष्य अचानक मयूरपंखी, तरल, प्रेमाच्या अलौकिक तरंगांना मनात जागृत करून, आजपर्यंत निद्रिस्त असलेली ही प्रेममय जाणिवांची केंद्रं उद्दिपित करणारं वय. या वयात कधी एखाद्या घटनेने, वाक्याने, दृष्टिक्षेपाने किंवा क्षणिक नजरा नजर झाल्याने, कोण कधी मन घेऊन जाईल, याची काहीही शाश्वती नसलेलं हे वय. कदाचित तीच व्यक्ती, तोच माणूस वा मुलगा जो आजपर्यंत कधीही आवडला नसावा तो अचानक आवडायला लागणारं वय.
अश्या तरलतम आणि मुलायम भावविश्वात आवडलेली एखादी व्यक्ती वेड लावून जाते. आपल्या भावविश्वाचा प्राण होते, सर्वस्व वाटायला लागते. पण त्या हळूवार भावना जाणवून, त्या भावना, त्या व्यक्तीपर्यंत पोचवयच्या कश्या, हा सुद्धा एक प्रश्नच पडतो. विशेषतः त्या काळात जेंव्हा अशी संवादाची, संपर्काची कोणतीही साधनं नव्हती. आवडलेली व्यक्ती परत कुठे कधी दिसेल, हे ईश्वरच जाणो. पण अश्या आवडलेल्या व्यक्तीला कदाचित भाव पोचले, बंधं जुळले तर मन, अश्या स्वर्गीय आनंदात, सुखात, कल्पनेत रममाण होतं की, तो भाव अकल्पनीय आहे.
पण असे भाव पोचण्याच्या मधल्या काळात, प्रीती आपल्या मनात फुलली आहे. नवनवीन कल्पना साद घालत आहेत, सुखाच्या स्वप्नांची पाखरं मनात रुंजी घालत आहेत.पण ती भेट, तो धागा जुळणार की नाही हे मात्र अजून माहीत नाही. पण वेड मन मात्र, स्वप्नात अनेक प्रकारच्या कळ्या जोपासत बसलेलं असतं. त्या मनातल्या स्वप्नील कळ्याच मनाला एक वेगळं व्यसन लावतात. विरह आणि विरहाची आग पाहण्याचं आणि भेटीच्या सुखेनैव कल्पनांचे बिछाने अंथरण्याचं, हे व्यसन, त्या सुवर्णकाळातील एक सुखदानुभूती असते.
त्यामुळे आपलच वेड मन आपल्याच मनाला समजावतं की, हे स्वप्नील कळ्यानो तुमच्या या विरह, पुन्हा भेटीची ओढ की विरह अश्या या अपुर्णतेच्या बांधावर झुलणाऱ्या मनाला इथेच जरा विसावा घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही कधीच उमलू नका. या विरही आगीची आणि भेटीच्या ओढीची ही अपूर्णता वेड लावून उभी आहे, तोपर्यंत तरी तुम्ही उमलू नका. असा आर्जव मन या प्रेमात बुडालेल्या मनाला करत आहे.
क्रमशः .......
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०४/२०२३
Comments
Post a Comment